शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

दरकरार बंद पद्धतीचा निर्णय एकतर्फी

By admin | Updated: December 17, 2015 02:32 IST

शासनाने लघुउद्योगांसाठी राखिव असलेल्या वस्तुंचे आरक्षण संपुष्टात आणून दरकरार पद्धत बंद करण्याबाबत ...

यवतमाळ : शासनाने लघुउद्योगांसाठी राखिव असलेल्या वस्तुंचे आरक्षण संपुष्टात आणून दरकरार पद्धत बंद करण्याबाबत एकतर्फी निर्णय घेऊन लघु उद्योगांवर अन्याय केल्याचा आरोप लघु उद्योजकांनी केला आहे. लघु उद्योग विकास महामंडळाची स्थापना १९ आॅक्टोंबर १९६२ रोजी करण्यात आली. लघुउद्योगातून निर्मित वस्तुंना बाजारपेठ मिळवून देणे हा त्यामागिल मुख्य हेतू होता. त्या अनुषंगाने शासनाने दोन जानेवारी १९९२ च्या शासन निर्णयामध्ये लघुउद्योगांसाठी स्टिल फर्निचर, संगणक फर्निचर, एअर कुलर, पीव्हीसी पाईप, पॉलिथिन पिशव्या, आरसीसी पाईप या व लघुउद्योगांद्वारा निर्मित इतर वस्तू खरेदीसाठी आरक्षित केल्या होत्या. त्या आरक्षणाच्या आधारे महाराष्ट्र लघु उद्योग विकास महामंडळाद्वारे दरकराराची प्रक्रिया संपूर्ण महाराष्ट्रभर राबविण्यात येत होती. त्याद्वारे न्यूनतम दरानुसार लघुउद्योगांकडून स्विकृती मिळवून अंतिम दर ठरत होता. त्यानुसार संपूर्ण राज्यभरातील शासकीय, निमशासकीय कार्यालयांना दरकरारानुसार साहित्याचा पुरवठा करण्यात येत होता. मागिल पाच वर्षांपासून महामंडळाद्वारे इ टेंडरिंगची प्रक्रिया राबविण्यात येत होती व लघुउद्योगांकडून साहित्याचे नमुने मागवून त्याची त्रयस्त संस्थेकडून तांत्रिक तपासणी करून अहवाल मागविण्यात येत होता. त्यानुसार संपूर्ण प्रक्रिया होऊन दरकरार अस्तित्वात येत होता. सद्यस्थितीत लघुउद्योग हा बँकेकडून कर्ज घेऊनच सुरू झालेला असतो. तसेच लघुउद्योगांमध्ये कार्यरत कामगार या उद्योगांवरच अवलंबून असते. राज्याच विचार केल्यास लघुउद्योगांवर आज चार हजारांहून अधिक कामगार अवलंबून आहेत. २०१५-१६ या आर्थिक वर्षासाठी इ निविदा प्रणालीद्वारे दर मागविले होते. संपूर्ण प्रक्रिया पार पडली. परंतु नंतर मात्र शासनाने यावर स्थगिती आणली. शिवाय लघुउद्योगांसाठी राखिव असलेल्या वस्तुंचे आरक्षण संपुष्टात आणून दरकरार पद्धत बंद करण्याबाबत मंत्रीमंडळाच्या १४ आॅक्टोबर २०१५ च्या बैठकीत एकतर्फी निर्णय घेऊन लघुउद्योगांवर अन्याय केल्याचा आरोप यवतमाळ येथील ओंकार इंडस्ट्रिजचे संचालक कलिंदरसिंग मानकू यांनी केला आहे. एकीकडे शासन बंद उद्योगांचे पुनर्जीवन करीत आहे तर दुसरीकडे सुरू असलेले लघुउद्योग बंद पाडत आहे. लघुउद्योगांना सापत्न वागणूक मिळत असल्याचाही आरोप उद्योजकांमधून होत असून याबाबत अधिवेशनात विस्तृत चर्चा होऊन लघुउद्योगांना दिलासा द्याव्या अशी मागणी होत आहे. (प्रतिनिधी)