शहरं
Join us  
Trending Stories
1
एखाद्याला खासदार करायचं म्हटल्यावर करतो अन् पाडायचं म्हटलं तर पाडतोच' अजित पवारांची टोलेबाजी
2
AC लोकलमधून रेल्वेच्या फुकट्या कर्मचाऱ्याचा प्रवास; जाब विचारता टीसीची मग्रुरी, VIDEO व्हायरल
3
5 महिन्यात 3 बैठका; भारत-अफगाणिस्तानची वाढती जवळीक, पाक सरकारची डोकेदुखी वाढणार
4
गेम कुठे फिरला? भारताने पाकिस्तानात डमी फायटर जेट घुसविली, अन् लष्कराला जे पाहिजे होते तेच झाले...
5
सतत धमकी देणाऱ्या पाकिस्तानची अण्वस्त्रे जप्त होऊ शकतात? राजनाथ सिंह यांच्या 'त्या' विधानाने उपस्थित केला प्रश्न
6
आम्ही भारतात गुंतवणूक करतच राहू; भारत सरकारला.., Apple चा ट्रम्पना मोठा झटका
7
सैन्याला मिळणार ₹50,000 कोटींचा बुस्टर डोस; ऑपरेशन सिंदूरनंतर सरकार तिजोरी उघडणार
8
Sankashthi Chaturthi 2025: मन अस्थिर, अशांत असेल त्याक्षणी म्हणा किंवा ऐका 'हे' गणेशस्तोत्र!
9
मुख्यमंत्र्यांनी कान टोचल्यानंतर मेहता नरमले; गेल्या दोन वर्षांपासून बंद पडलेले काशिगाव मेट्रो स्थानकाच्या जिन्याचे काम सुरु झाले
10
घर आणि गाडी खरेदी करणाऱ्यांसाठी खुशखबर! RBI रेपो रेट ०.७५% ने कमी करू शकते; किती येईल EMI
11
भारत-पाकिस्तान युद्धविरामावर मोठी अपडेट; १८ मेपर्यंत मुदतवाढ, पुन्हा डीजीएमओ चर्चेला बसणार... 
12
आता ५९५ कोटींचा घोटाळा? Indusind Bank समोरील समस्या संपेनात; काय आहे प्रकरण?
13
म्हणे, व्हाईट हाऊसच्या प्रेस सचिवांना कतारमध्ये काश्मिरी वेटर भेटला; 'ट्रम्पना थँक्यू सांगा' म्हणाला...
14
भाजीपाल्यावरून वाद, तलवार चालवली,आगही लावली; मंदिरासमोरच दोन गटांमध्ये तुंबळ हाणामारी
15
अमेरिकेचा दुटप्पीपणा; पाकिस्तानला मदत करणाऱ्या तुर्कीला अत्याधुनिक क्षेपणास्त्रे पुरवणार...
16
गुरुवारी सायंकाळी तुर्की तर पहाटे हादरला चीन; पाकिस्ताननंतर त्याला साथ देणाऱ्या देशांना भूकंपाचे धक्के
17
पत्नी पतीच्या आत्महत्येचा लाईव्ह व्हिडीओ बनवत राहिली, मृत्यूचे धक्कादायक कारण आले समोर
18
शेअर बाजाराची घसरणीसह सुरुवात, निफ्टी २५,००० च्या लेव्हलवर; Bharti Airtel, IndusInd, Infosys टॉप लूझर्स
19
शेअर बाजारात यंदाची पहिलीच बंपर लॉटरी लागणार; या IPO ला मिळतोय दणकून GMP
20
चिदंबरम थरूर यांच्या मार्गावर! आधी युद्धविरामवर मोदी सरकारला पाठिंबा; आता इंडिया आघाडीबाबत सवाल उपस्थित

एक लाखांवर कृषिपंपांना मिळणार १२ तास वीज

By admin | Updated: September 9, 2016 02:38 IST

कृषिपंपांना दिवसा १२ तास वीज देण्याच्या मुख्यमंत्र्यांच्या घोषणेची जिल्ह्यात वीज महावितरण कंपनीने गुरुवारपासून अंमलबजावणी सुरू केली आहे.

शेतकऱ्यांना दिलासा : मुख्यमंत्र्यांच्या घोषणेची अंमलबजावणी सुरूयवतमाळ : कृषिपंपांना दिवसा १२ तास वीज देण्याच्या मुख्यमंत्र्यांच्या घोषणेची जिल्ह्यात वीज महावितरण कंपनीने गुरुवारपासून अंमलबजावणी सुरू केली आहे. मात्र सध्या तरी आठवड्यात तीन ते चारच दिवस दिवसा वीज देणे शक्य होणार असल्याचे सांगण्यात आले. पावसाने दडी मारल्यामुळे पिके धोक्यात आली आहे. त्यामुळे पुढील तीन महिने राज्यात दररोज सलग बारा तास वीज पुरवठा करण्याचा निर्णय मुख्यमंत्री आणि उर्जामंत्र्यांनी मंगळवारी घेतला. या निर्णयांची अंमलबजावणी करण्याचे आदेश सर्व जिल्ह्यांना देण्यात आले. त्यानुसार यवतमाळ जिल्ह्यातही शेतीला बारा तास वीज पुरवठा निर्णयाच्या अंमलबजावणीला सुरूवात झाली.याचा फायदा जिल्ह्यातील एक लाख पाच हजार २२ कृषीपंपांना होणार आहे. जिल्ह्याला लागणाऱ्या एकूण वीजेच्या २० ते २२ टक्के वीज ही कृषीपंपांना लागते. यासाठी पूर्वी रात्री असणारे वेळापत्रकही बदलले असून आता रात्री ११.३० ते सकाळी ११.३० आणि सकाळी ११.३० ते रात्री ११.३० असे नवीन बारा-बारा तासांचे वेळापत्रक केले आहे. वीज पुरवठा करताना कोणत्याही तांत्रिक कारणामुळे वीज पुरवठा खंडीत झाल्यास दुसऱ्या दिवशी तेवढा वेळ वाढवून देण्यात येणार आहे. म्हणजे बारा तांसाऐवजी तांत्रिक अडचणीमुळे दहा तासच आज वीज पुरवठा करण्यात आला तर उद्या दोन तास वाढवून चौदा तास वीज पुरवठा अशा भागात करण्यात येणार आहे. तसेच काही भागात वीज पुरवठ्यामध्ये अडचण आल्यास अशावेळी गावठाण फिडरवर भारनियमन केले जाईल. याबाबतचे सर्व अधिकार त्या-त्या परिसरातील कार्यकारी अभियंत्यांना देण्यात आले आहे. दर तासाला रिडींग घेण्यात येणार असल्याने कुठे किती वीज लागत आहे, याची माहिती मिळेल. यवतमाळ जिल्ह्यात सध्या जवळपास दोन लाख हेक्टर जमिन सिंचनाखाली आहे. सध्या मुख्यमंत्र्यांनी केलेल्या घोषणेनुसार वीज पुरवठा करण्यात आल्यास २५ टक्के जमिनीवर सिंचन होईल. यामध्ये खरीप पिकांना याचा फायदा होणार आहे. (प्रतिनिधी) रात्रीचे शेड्यूल राहीलचमुख्यमंत्र्यांनी शेतीला बारा तास अखंड वीज पुरवठा आणि तोही सकाळी साडेपाच ते सायंकाळी साडेपाच या वेळात करण्याची घोषणा केली. जेणेकरून शेतकऱ्यांना पूर्वीप्रमाणे रात्रभर शेतात जागावे लागू नये. परंतु महावितरणकडून या वेळापत्रकाला सध्या तरी खो दिल्याचे दिसून येत आहे. कारण त्यांनी साडेअकरा ते साडेअकरा असे वेळापत्रक सध्या सांगितले आहे. आठवड्यातील चार दिवस रात्री आणि तीन दिवस दिवसाने किंवा तीन दिवस रात्री आणि चार दिवस दिवसाने हे वेळापत्रक राबविले जाईल. आठवडाभर दिवसानेच वीज देणे शक्य नसल्याचे सांगण्यात येते.