शहरं
Join us  
Trending Stories
1
"तर मी फडणवीसांना या जन्मी माफ करणार नाही", अंजली दमानियांची पोस्ट, 'तो' फोटोही केला शेअर
2
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
3
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
4
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
5
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
6
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
7
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
8
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
9
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
10
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
11
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
12
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
13
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
14
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
15
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
16
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
17
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
18
आई-वडिलांचा केला खून, मृतदेहांचे तुकडे करून गोणीत भरले, अन् नदीत फेकले, मुलाचं धक्कादायक कृत्य 
19
‘महाराष्ट्रात येणाऱ्या सर्व विमानांमध्ये मराठी भाषेत उद्घोषणा करा’, नाना पटोले यांची मागणी 
20
हृदयद्रावक! 'तो' सेल्फी ठरला अखेरचा; लग्नाच्या वाढदिवशी पतीसमोर पत्नीचा पाय घसरला अन्...
Daily Top 2Weekly Top 5

एक लाखांवर कृषिपंपांना मिळणार १२ तास वीज

By admin | Updated: September 9, 2016 02:38 IST

कृषिपंपांना दिवसा १२ तास वीज देण्याच्या मुख्यमंत्र्यांच्या घोषणेची जिल्ह्यात वीज महावितरण कंपनीने गुरुवारपासून अंमलबजावणी सुरू केली आहे.

शेतकऱ्यांना दिलासा : मुख्यमंत्र्यांच्या घोषणेची अंमलबजावणी सुरूयवतमाळ : कृषिपंपांना दिवसा १२ तास वीज देण्याच्या मुख्यमंत्र्यांच्या घोषणेची जिल्ह्यात वीज महावितरण कंपनीने गुरुवारपासून अंमलबजावणी सुरू केली आहे. मात्र सध्या तरी आठवड्यात तीन ते चारच दिवस दिवसा वीज देणे शक्य होणार असल्याचे सांगण्यात आले. पावसाने दडी मारल्यामुळे पिके धोक्यात आली आहे. त्यामुळे पुढील तीन महिने राज्यात दररोज सलग बारा तास वीज पुरवठा करण्याचा निर्णय मुख्यमंत्री आणि उर्जामंत्र्यांनी मंगळवारी घेतला. या निर्णयांची अंमलबजावणी करण्याचे आदेश सर्व जिल्ह्यांना देण्यात आले. त्यानुसार यवतमाळ जिल्ह्यातही शेतीला बारा तास वीज पुरवठा निर्णयाच्या अंमलबजावणीला सुरूवात झाली.याचा फायदा जिल्ह्यातील एक लाख पाच हजार २२ कृषीपंपांना होणार आहे. जिल्ह्याला लागणाऱ्या एकूण वीजेच्या २० ते २२ टक्के वीज ही कृषीपंपांना लागते. यासाठी पूर्वी रात्री असणारे वेळापत्रकही बदलले असून आता रात्री ११.३० ते सकाळी ११.३० आणि सकाळी ११.३० ते रात्री ११.३० असे नवीन बारा-बारा तासांचे वेळापत्रक केले आहे. वीज पुरवठा करताना कोणत्याही तांत्रिक कारणामुळे वीज पुरवठा खंडीत झाल्यास दुसऱ्या दिवशी तेवढा वेळ वाढवून देण्यात येणार आहे. म्हणजे बारा तांसाऐवजी तांत्रिक अडचणीमुळे दहा तासच आज वीज पुरवठा करण्यात आला तर उद्या दोन तास वाढवून चौदा तास वीज पुरवठा अशा भागात करण्यात येणार आहे. तसेच काही भागात वीज पुरवठ्यामध्ये अडचण आल्यास अशावेळी गावठाण फिडरवर भारनियमन केले जाईल. याबाबतचे सर्व अधिकार त्या-त्या परिसरातील कार्यकारी अभियंत्यांना देण्यात आले आहे. दर तासाला रिडींग घेण्यात येणार असल्याने कुठे किती वीज लागत आहे, याची माहिती मिळेल. यवतमाळ जिल्ह्यात सध्या जवळपास दोन लाख हेक्टर जमिन सिंचनाखाली आहे. सध्या मुख्यमंत्र्यांनी केलेल्या घोषणेनुसार वीज पुरवठा करण्यात आल्यास २५ टक्के जमिनीवर सिंचन होईल. यामध्ये खरीप पिकांना याचा फायदा होणार आहे. (प्रतिनिधी) रात्रीचे शेड्यूल राहीलचमुख्यमंत्र्यांनी शेतीला बारा तास अखंड वीज पुरवठा आणि तोही सकाळी साडेपाच ते सायंकाळी साडेपाच या वेळात करण्याची घोषणा केली. जेणेकरून शेतकऱ्यांना पूर्वीप्रमाणे रात्रभर शेतात जागावे लागू नये. परंतु महावितरणकडून या वेळापत्रकाला सध्या तरी खो दिल्याचे दिसून येत आहे. कारण त्यांनी साडेअकरा ते साडेअकरा असे वेळापत्रक सध्या सांगितले आहे. आठवड्यातील चार दिवस रात्री आणि तीन दिवस दिवसाने किंवा तीन दिवस रात्री आणि चार दिवस दिवसाने हे वेळापत्रक राबविले जाईल. आठवडाभर दिवसानेच वीज देणे शक्य नसल्याचे सांगण्यात येते.