शहरं
Join us  
Trending Stories
1
'लाडकी बहीण'नंतर आणखी एका योजनेची घोषणा; महायुती सरकारची नोकरदार महिला वर्गाला मोठी भेट
2
"मर्सिडिज, महागडा फोन अन् ३५ लाख दिले तरीही..."; मृत्यूपूर्वी युवकाचा भाजपा नेत्यावर गंभीर आरोप
3
घर सोडले, गाव सोडले अन् निघाल्या थेट मुंबईकडे; टीसीच्या सतर्कतेमुळे 'त्या' दोघी सुखरूप बचावल्या
4
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
5
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
6
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
7
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
8
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
9
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
10
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
11
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
12
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
13
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
14
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
15
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
16
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
17
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
18
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
19
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
20
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!

जिल्ह्यात वर्षभरात गंभीर गुन्ह्यांची संख्या रोडावली

By admin | Updated: December 26, 2016 01:44 IST

जानेवारी ते नोव्हेंबर या ११ महिन्यातील क्राईम रेकॉर्ड पाहता गंभीर गुन्ह्यांची संख्या चांगलीच रोडावल्याची नोंद आढळून आली आहे

गुन्हेगारी नियंत्रणात : अपघात, खुनाचा प्रयत्न, चोरीत मात्र वाढ यवतमाळ : जानेवारी ते नोव्हेंबर या ११ महिन्यातील क्राईम रेकॉर्ड पाहता गंभीर गुन्ह्यांची संख्या चांगलीच रोडावल्याची नोंद आढळून आली आहे. त्याच वेळी अपघात, खुनाचा प्रयत्न, वाहन चोरी या सारख्या गुन्ह्यांमध्ये अल्पशी का होईना वाढ झाली आहे. जानेवारी ते नोव्हेंबर २०१६ या काळात जिल्ह्यात विविध स्वरूपाचे चार हजार ८२२ गुन्हे दाखल झाले आहेत. त्यामध्ये खून ६८, खुनाचा प्रयत्न ५८, सदोष मनुष्य वध ३, जबरी संभोग ८५, दरोडा ६, दरोड्याची तयारी २, जबरी चोरी ६९, दिवसा घरफोडी ६०, रात्री घरफोडी १७९, वीज वायर चोरी ११, जनावरे चोरी ४०, सायकल चोरी ७, ट्रक चोरी ९, कार-जीप चोरी ३, मोटरसायकल चोरी २११, वाहनांची सुटे भाग चोरी १८, इतर चोऱ्या ५२५, शेती अवजारे चोरी १११, जेबकट १८, दंगा-गर्दी १६०, अफरातफर २३, धोका ९१, घरात अनधिकृत प्रवेश ५५, पळवून नेणे ११३, दुखापत १२३४, शासकीय कर्मचाऱ्यांवर हल्ला ७८, विनयभंग ३२४, नवविवाहितांच्या आत्महत्या १७, इतरांच्या आत्महत्या ३९, अपघातात मृत्यू २८५, नकली नोटा ३ व इतर ८१७ गुन्ह्यांचा त्यामध्ये समावेश आहे. ४८८२ पैकी ३७४१ गुन्हे उघडकीस आले आहेत. सुमारे सव्वा तीनशे गुन्हे उघडकीस आणण्याचा प्रयत्न पोलिसांकडून सुरू आहे. जानेवारी ते नोव्हेंबर २०१६ मध्ये दाखल गुन्ह्यांची सन २०१५ मध्ये याच ११ महिन्यात दाखल गुन्ह्यांशी तुलना केल्यास गुन्ह्यांच्या संख्येमध्ये एक हजार ९९ गुन्ह्यांनी घट झाल्याचे दिसून येते. खून, बलात्कार, दरोडा यासह गंभीर स्वरूपाच्या बहुतांश गुन्ह्यांमध्ये घट दिसून येते. केवळ खुनाचा प्रयत्न, जनावर चोरी, सायकल चोरी, ट्रक चोरी, घरात अनधिकृत प्रवेश, अपघाती मृत्यू, आत्महत्या या काही गुन्हे प्रकारात किंचित वाढ झाली आहे. गुन्हे उघडकीस आणण्याचे प्रमाणही बऱ्यापैकी असल्याचे दिसून येते. विविध प्रकारच्या चोऱ्या आणि घरफोडीचे सुमारे हजार गुन्हे नोंदविले गेले आहे. त्यात रोकड, सोन्या-चांदीचे दागिने असा लाखो रुपयांचा ऐवज लंपास केला गेला आहे. जिल्ह्यात अपघाती मृत्यूचे वाढलेले गुन्हे पाहता वाहतूक नियंत्रित करण्यात आणि अवैध प्रवासी वाहतूक रोखण्यात पोलीस यंत्रणा अपयशी ठरल्याचे दिसते. २०१५ च्या तुलनेत २०१६ मध्ये गुन्हेगारी कमी झाल्याचे व डिटेक्शनचे प्रमाण ठिकठाक असल्याचे दिसत असले तरी या गुन्ह्यांमधील खटल्यांमध्ये शिक्षेचे प्रमाण किती हे पाहणेही महत्वाचे ठरते. (जिल्हा प्रतिनिधी) गुन्हे बर्किंग तर नाही ? गत वर्षीच्या तुलनेत चालू वर्षी पोलीस दप्तरी दाखल एकूण गुन्ह्यांमध्ये कमालीची घट दिसत असली तरी या घटलेल्या गुन्ह्यांबाबतही खुद्द पोलीस वर्तुळातूनच शंकेचा सूर आवळला जात आहे. वरिष्ठांची खपामर्जी नको आणि कामगिरी दाखविण्यासाठी गुन्हे बर्किंग करून तर गुन्हेगारी नियंत्रणात असल्याचे रेकॉर्डवर दाखविले गेले नाही ना असा प्रश्नार्थक सवाल खाकी वर्दीतून पुढे येतो आहे. पोलिसांची एनर्जी गुन्हे होण्यापूर्वीच त्याला प्रतिबंध घालणे आणि घडलेले गुन्हे उघडकीस आणण्यासाठी खर्ची होण्याऐवजी ‘वसुली’तच खर्ची होत असल्याचेही बोलले जाते.