शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

आर्णीत दुसऱ्या दिवशीही चक्काजाम

By admin | Updated: January 22, 2015 02:15 IST

कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात तीन-तीन दिवस कापसाच्या गाड्या वजनासाठी ताटकळत असल्याने आणि त्यातच आज कापसाचे दर क्विंटलमागे १०० रुपयांनी पडले.

आर्णी : कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात तीन-तीन दिवस कापसाच्या गाड्या वजनासाठी ताटकळत असल्याने आणि त्यातच आज कापसाचे दर क्विंटलमागे १०० रुपयांनी पडले. त्यामुळे तीव्र असंतोष निर्माण होवून शेतकऱ्यांनी दुपारी ३ वाजताच्या सुमारास येथील नवीन कृषी उत्पन्न बाजार समितीसमोर चक्काजाम आंदोलन करून मार्ग रोखून धरला. सलग दुसऱ्या दिवशीही शेतकऱ्यांनी आंदोलन केल्याने यावेळी बाजार समितीसह पोलिसांचीही चांगलीच तारांबळ उडाली. निसर्गाच्या लहरीपणामुळे यंदा सोयाबीन आणि कापूस ही दोन्ही पिके शेतकऱ्याच्या हातून गेली. त्यामुळे शेतकरीवर्ग आधीच आर्थिक विवंचनेत आहे. असे असताना थोड्याफार प्रमाणात कापूस घरात आला. आता आर्थिक नड भागविण्यासाठी हा कापूस बाजारपेठेत विक्रीसाठी नेला जात आहे. आर्णी तालुक्यातील शेवटच्या टोकापासून येथील बाजार समितीत कापूस विक्रीसाठी येतो. त्यामुळे येथील बाजार समितीत कापसाच्या गाड्यांची रांगच रांग असते. कापूस खरेदी करणाऱ्या जिनिंगची संख्या कमी असल्याने शेतकऱ्यांना तीन-तीन दिवस ताटकळत राहावे लागत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसह त्यांच्या जनावरांचीही उपासमार होत आहे. कडाक्याच्या थंडीची झळही त्यांना सोसावी लागत आहे. त्यातच आज कापसाचे दर क्विंटलमागे १०० रुपयांनी पडले. त्यामुळे शेतकरी संतप्त झाले. त्यांनी दुपारी नवीन बाजार समितीसमोर चक्काजाम करीत रस्ता रोखून धरला. यावेळी प्रशासनाने आंदोलनाची गंभीर दखल घेत तेथे धाव घेतली. बाजार समितीचे सभापती जीवन जाधव, शिवसेनेचे नगरसेवक प्रवीण मुनगिनवार, रवी राठोड, प्रकाश सरोदे, तायडे आदींनी शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या. तसेच पणन महासंघाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून आणखी दोन जिनिंग सुरू करून शेतकऱ्यांना ताटकळत राहावे लागणार नाही, असे आश्वासन देण्यात आले. त्यामुळे शेतकऱ्यांनी आंदोलन मागे घेतले. (तालुका प्रतिनिधी)