शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला दिला स्पष्ट संदेश
2
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
3
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
4
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
5
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
6
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
7
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
8
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
9
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
10
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
11
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
12
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
13
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
14
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
15
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
16
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
17
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
18
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
19
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 
20
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका

आर्णीत दुसऱ्या दिवशीही चक्काजाम

By admin | Updated: January 22, 2015 02:15 IST

कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात तीन-तीन दिवस कापसाच्या गाड्या वजनासाठी ताटकळत असल्याने आणि त्यातच आज कापसाचे दर क्विंटलमागे १०० रुपयांनी पडले.

आर्णी : कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात तीन-तीन दिवस कापसाच्या गाड्या वजनासाठी ताटकळत असल्याने आणि त्यातच आज कापसाचे दर क्विंटलमागे १०० रुपयांनी पडले. त्यामुळे तीव्र असंतोष निर्माण होवून शेतकऱ्यांनी दुपारी ३ वाजताच्या सुमारास येथील नवीन कृषी उत्पन्न बाजार समितीसमोर चक्काजाम आंदोलन करून मार्ग रोखून धरला. सलग दुसऱ्या दिवशीही शेतकऱ्यांनी आंदोलन केल्याने यावेळी बाजार समितीसह पोलिसांचीही चांगलीच तारांबळ उडाली. निसर्गाच्या लहरीपणामुळे यंदा सोयाबीन आणि कापूस ही दोन्ही पिके शेतकऱ्याच्या हातून गेली. त्यामुळे शेतकरीवर्ग आधीच आर्थिक विवंचनेत आहे. असे असताना थोड्याफार प्रमाणात कापूस घरात आला. आता आर्थिक नड भागविण्यासाठी हा कापूस बाजारपेठेत विक्रीसाठी नेला जात आहे. आर्णी तालुक्यातील शेवटच्या टोकापासून येथील बाजार समितीत कापूस विक्रीसाठी येतो. त्यामुळे येथील बाजार समितीत कापसाच्या गाड्यांची रांगच रांग असते. कापूस खरेदी करणाऱ्या जिनिंगची संख्या कमी असल्याने शेतकऱ्यांना तीन-तीन दिवस ताटकळत राहावे लागत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसह त्यांच्या जनावरांचीही उपासमार होत आहे. कडाक्याच्या थंडीची झळही त्यांना सोसावी लागत आहे. त्यातच आज कापसाचे दर क्विंटलमागे १०० रुपयांनी पडले. त्यामुळे शेतकरी संतप्त झाले. त्यांनी दुपारी नवीन बाजार समितीसमोर चक्काजाम करीत रस्ता रोखून धरला. यावेळी प्रशासनाने आंदोलनाची गंभीर दखल घेत तेथे धाव घेतली. बाजार समितीचे सभापती जीवन जाधव, शिवसेनेचे नगरसेवक प्रवीण मुनगिनवार, रवी राठोड, प्रकाश सरोदे, तायडे आदींनी शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या. तसेच पणन महासंघाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून आणखी दोन जिनिंग सुरू करून शेतकऱ्यांना ताटकळत राहावे लागणार नाही, असे आश्वासन देण्यात आले. त्यामुळे शेतकऱ्यांनी आंदोलन मागे घेतले. (तालुका प्रतिनिधी)