शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेची आणखी २० देशांना 'नो एंट्री'; राष्ट्रीय सुरक्षेसाठी डोनाल्ड ट्रम्पच्या सरकारने घेतला निर्णय
2
किडनी विक्रीमागे सावकारी की आंतरराष्ट्रीय तस्करी?; शेतकऱ्याला कंबोडियाला पाठविणारा डॉ. क्रिष्णा पोलिसांच्या रडारवर
3
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
4
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
5
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
6
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
7
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
8
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
9
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
10
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
11
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
12
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
13
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
14
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
15
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
16
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
17
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
18
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
19
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
20
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
Daily Top 2Weekly Top 5

पावसाने काढले नव्या रस्त्याचे वाभाडे

By admin | Updated: September 25, 2016 02:54 IST

रस्त्याच्या बांधकामानंतर कमीत-कमी दोन वर्षापर्यंत त्या कामात कोणताही दोष निघू नये, असे अपेक्षित असते.

निकृष्ट काम : दोषदायित्व कालावधीतच लागली वाटकळंब : रस्त्याच्या बांधकामानंतर कमीत-कमी दोन वर्षापर्यंत त्या कामात कोणताही दोष निघू नये, असे अपेक्षित असते. परंतु, येथील कळंब-जोडमोहा रस्ता दोषदायित्व कालावधीतच उखडू लागला आहे. परतीच्या पावसाने या रस्त्याच्या बांधकामातील दोष चव्हाट्यावर आणले आहे. त्यामुळे आता या रस्त्याची पूर्ण दुरुस्ती कंत्राटदाराकडून करून घेण्यात यावी, अशी मागणी नागरिकांतून करण्यात येत आहे. कोणत्याही रस्त्याच्या बांधकामानंतर तो कमीत-कमी दोन वर्षापर्यंत सुस्थितीत असणे शासनास अभिप्रेत आहे. तसा नियमही आहे. यालाच दोषदायित्व कालावधी म्हटले जाते. या कालावधीत काही त्रुटी उघड झाल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी संबंधित कंत्राटदाराची असते. परंतु, कंत्राटदार व अधिकाऱ्यांच्या अर्थपूर्ण संबंधांतून कंत्राटदाराला वाचविण्याचाच प्रयत्न केला जातो. अशीच परिस्थिती कळंब-जोडमोहा रस्त्याच्या बाबतीत घडण्याची शक्यता वर्तविली जात आहे. या डांबरी रस्त्यावरुन पावसाळ्याच्या दिवसात ‘जलवाहतूक’ करावी लागते. कारण पाऊस आला की संपूर्ण रस्ता जलमय होतो आणि नागरिकांना गुडघाभर पाण्यातून मार्ग काढावा लागतो. शाखा अभियंत्याकडे वारंवार तक्रारी केल्यानंतरही दखल घेण्यात आली नाही. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून कळंब शहरातून दत्तापूरकडे जाणारा हा रस्ता जवळपास अर्धा किलोमीटर दुतर्फा करण्यात आला. रस्त्याचे डांबरीकरण व नालीचे बांधकाम करण्यात आले. यासाठी जवळपास ७० लाख रुपये खर्च करण्यात आले. दोन्ही बाजूला लाखो रुपये खर्च करुन सिमेंट नाल्या तयार करण्यात आल्या. परंतु, पावसाचे पाणी वाहून जाण्यास व्यवस्थित उपाययोजना करण्यात आली नाही. त्यामुळे पाऊस पडला की, संपूर्ण पाणी रस्त्यावर साचते. विशेष म्हणजे, जेव्हा सदर बांधकाम सुरु होते, तेव्हा संबंधित शाखा अभियंत्याला वारंवार पाणी जाण्यासाठी व्यवस्थित व्यवस्था केल्या जात नाही, याची कल्पना देण्यात आली. परंतु, लोकांच्या सूचनेकडे साफ दुर्लक्ष करीत कंत्राटदाराला पाठीशी घालण्याचे काम करण्यात आले. आता हा रस्ता उखडू लागला आहे. दोषदायित्व कालावधीत उखडलेला रस्ता नियमानुसार कंत्राटदाराकडून करुन घेणे बंधनकारक आहे. त्यामुळे संबंधित विभाग कोणती ठोस कारवाई करते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.लाखो रुपये खर्च करून बांधकाम करण्यात आलेला हा रस्ता पावसाळ्यात नागरिकांनाची डोकेदुखी ठरतो. एवढेच नाहीतर रस्त्यावर पाणी साचून राहत असल्यामुळे डांबरी रस्ता खराब व्हायला लागला आहे. कुठे उखडला गेला तर काही ठिकाणी खड्डे पडायला सुरुवात झाली आहे. त्यामुळे आतापासूनच या रस्त्याच्या उपयोगितेविषयी प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. त्यामुळे संबंधित कंत्राटदार व अभियंत्याविरुद्ध कारवाईची मागणी जोर धरू लागली आहे. (तालुका प्रतिनिधी)