शहरं
Join us  
Trending Stories
1
युतीचा श्रीगणेशा! उद्धव ठाकरे सहकुटुंब राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपतीचं घेतले दर्शन
2
भारतावर 50% टॅरिफ लावून ट्रम्प यांनी स्वतःच्याच पायावर कुऱ्हाड मारली, आता लागणार अमेरिकेची 'लंका'! आला असा अहवाल
3
मुंबईच्या दिशेने मराठा मोर्चा: "शांततेचं आंदोलन कुणीच रोखू शकत नाही," मनोज जरांगेंचा निर्धार
4
"लोक ओरडत होते, मी दगड पडताना पाहिले, मला..."; वैष्णोदेवी मार्गावर नेमकं काय घडलं?
5
३६ दिवस डिजिटल अरेस्ट; सायबर ठगांनी निवृत्त एअरफोर्स अधिकाऱ्याकडून ३.२२ कोटी लुटले...
6
बिहारमध्ये मंत्री श्रवण कुमार यांच्यावर जीवघेणा हल्ला; अनेक किलोमीटर पाठलाग, बॉडीगार्ड जखमी
7
भारतासमोर 'ट्रम्प'नीती अयशस्वी; मोदी फोन न उचलण्याचं कारण काय, अमेरिकन एक्सपर्ट सांगतात..
8
वैष्णोदेवी भूस्खलनात आतापर्यंत ३० मृत्युची नोंद; बचावकार्य सुरू, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता
9
Ganesh Chaturthi 2025: फक्त गणेश चतुर्थीला बाप्पाला दुर्वा नाही तर तुळस वाहतात; असे का? ते जाणून घ्या
10
मनोज जरांगेंच्या ताफ्याला जालना पोलिसांचा 40 अटींसह हिरवा कंदील, ड्रोनद्वारे राहणार नजर
11
ट्रम्प टॅरिफचा भारताच्या कोण-कोणत्या क्षेत्रांवर परिणाम होणार? 'या' क्षेत्रांना कमी तर 'या' सेक्टरला बसू शकतो सर्वाधिक फटका!
12
अंतरवाली सराटीतून आज मराठा बांधव मुंबईकडे, गावा-गावात स्वागताची जय्यत तयारी
13
KCL 2025: पदार्पणाच्या सामन्यात हॅटट्रिक, भारताच्या युवा गोलंदाजाचा केसीएलमध्ये धुमाकूळ!
14
"एवढे शुल्क लाऊ की तुमचं...!"; पंतप्रधान मोदींसोबतच्या फोन कॉलसंदर्भात ट्रम्प यांचा मोठा दावा!
15
Vasai: वसईत चार मजली इमारतीचा भाग कोसळला; दोघांचा मृत्यू, ९ जण जखमी!
16
गणेश चतुर्थी २०२५: गणपतीच्या नावापुढे 'बाप्पा' आणि 'मोरया' हे शब्द का आणि कसे जोडले गेले? वाचा!
17
Amravati: पॉर्न व्हिडिओ पाहण्यापासून रोखल्याने मुलांचा वडिलांवर हल्ला, अमरावतीतील घटना!
18
भारताचे ‘सुदर्शन चक्र’ होणार ढाल अन् तलवारही, भारताचे आत्मनिर्भर होण्याच्या दृष्टीने आणखी एक पाऊल
19
खासगी शिकवणीकडे वाढला विद्यार्थ्यांचा ओढा, शालेय शिक्षणावर केंद्र सरकारने केलेल्या सर्वेक्षणातील निष्कर्ष
20
एका पक्षकाराला सकाळी, दुसऱ्याला दुपारी बोलावले अन् प्रकरण निकाली! राज्य माहिती आयोगाचा असाही कारभार

राष्ट्रवादीच्या आमदारकीने सेनेची डोकेदुखी वाढणार

By admin | Updated: May 31, 2014 00:12 IST

राष्ट्रवादी काँग्रेसने ख्वाजा बेग यांना विधान परिषदेवर घेऊन जिल्ह्यातील आपली आमदार संख्या वाढविली. त्याचा सर्वाधिक फटका दिग्रस विधानसभा मतदारसंघात शिवसेनेला बसण्याची शक्यता आहे.

संतोष अरसोड - यवतमाळ राष्ट्रवादी काँग्रेसने ख्वाजा बेग यांना विधान परिषदेवर घेऊन जिल्ह्यातील आपली आमदार संख्या वाढविली. त्याचा सर्वाधिक फटका दिग्रस विधानसभा मतदारसंघात शिवसेनेला बसण्याची शक्यता आहे. या आमदारकीमुळे सेनेची डोकेदुखी वाढणार, एवढे निश्‍चित. बेग यांच्या आमदारकीने दिग्रस मतदारसंघातील राजकीय समीकरणे बदलली आहे. काँग्रेस आघाडीची ताकद वाढल्याचे दिसत असले तरी धर्मनिरपेक्ष प्रतिमा असलेल्या बेग यांना अल्पसंख्यक समाज किती प्रतिसाद देतो यावर आघाडीचे राजकीय गणित अवलंबून आहे. एकीकडे मोदी लाट विधानसभेपर्यंत कायम राहून त्याचा फायदा महायुतीला होईल असे भाकीत वर्तविले जात आहे. अशातच काँग्रेस आणि राष्ट्रवादीने बस झाल्या भानगडी नाहीतर आपण औषधालाही उरणार नाही असा पवित्रा घेतला आहे. राहूलसाठी माणिकरावांनी जिल्ह्यात आपल्या सोईने काँग्रेसच्या कोट्यातील आमदारकी दिल्यानंतर आता राष्ट्रवादीने ख्वाजा बेग यांना विधानपरिषदेवर पाठविले आहे. राजकीय खड्डयांची डागडूजी करण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे. जिल्ह्यात दिग्रस मतदारसंघच शिवसेनेच्या ताब्यात आहे. त्यामुळे या ठिकाणी शिवसेनेचा विजयरथ रोखण्याचा प्रयत्न आघाडीकडून होणार आहे. याचाच परिणाम म्हणून दिग्रस मतदारसंघात प्रचंड उलथापालथ होणार आहे.२00४ च्या लोकसभा निवडणूकीत दारव्हा मतदारसंघातून भाजपा उमेदवाराने काँग्रेसच्या उत्तमराव पाटील यांच्यापेक्षा २५ हजार ६४६ मतांची आघाडी घेतली होती. २00९ च्या लोकसभा निवडणुकीत दिग्रस मतदारसंघातून काँग्रेसच्या उमेदवारावर शिवसेनेच्या  भावना गवळी यांनी नऊ हजार ७३७ मतांची आघाडी घेतली. लोकसभेला दिग्रस मतदाससंघातून शिवसेनेला नऊ हजार ७३७ मतांची आघाडी तर विधानसभेच्या निवडणूकीत मात्र ५0 हजाराच्यावर मतांची आघाडी मिळते. यावरून दिग्रस मतदारसंघात जातीय समीकरणे प्रभावी ठरत असल्याचे सिध्द होते. मखराम पवार यांनी दीड दिवसाच्या प्रचारात माणिकराव ठाकरे यांना घाम फोडला होता. त्यावेळी उठलेल्या अफवेने माणिकरावांना तारले. त्यानंतर हा मतदारसंघ राखीव होण्याच्या हालचाली सुरू झाल्या होत्या. मात्र माणिकरावांना मतदारसंघ उरणार नाही म्हणून मग उमरखेड राखीव करण्यात आला. यासाठी प्रशासकीय हालचाली झाल्या अशी चर्चा त्यावेळी मतदारसंघात होती. मतदारसंघ राखीव न होणे आणि मखराम पवार यांची धडक हे गणित लक्षात ठेवून काही उमद्या कार्यकर्त्यांनी संजय राठोड यांचे कार्ड पुढे केले.