शहरं
Join us  
Trending Stories
1
“२४ तासांत देश सोडा”; भारताने केली पाकिस्तानी उच्चायुक्तालयातील अधिकाऱ्यावर कठोर कारवाई
2
शेख हसीना यांच्या पक्षावर बंदी; बांगलादेशच्या निर्णयावर भारताची नाराजी, स्पष्ट केली भूमिका
3
Mumbai: मुंबईत पुन्हा मराठी- हिंदी वाद! जोपड्याचं डिलिव्हरी बॉयसोबत संतापजनक कृत्य
4
"एकनाथ शिंदे निष्ठावंतांना संधी देतात, तेच बाळासाहेब ठाकरेंचे खरे वारसदार, येणाऱ्या निवडणुकांमध्ये..."
5
'टीम इंडिया'त मिळाली नाही संधी; अखेर परदेशी संघाकडून खेळला, पहिल्याच सामन्यात ठोकलं शतक
6
छोटासा मुद्दा ठरणार सरकार उलथवून टाकण्यास कारणीभूत, इस्रायलच्या राजकारणात 'मोठा ट्विस्ट'
7
"आम्ही दहशतवादासोबतचे सर्व संबंध तोडले"; पंतप्रधान मोदींच्या इशाऱ्यानंतर पाकिस्तान घाबरला
8
दिव्यांग मुलांना बास्केटबॉल शिकवण्याचं 'चॅलेंज', आमिर खानच्या 'सितारे जमीन पर'चा ट्रेलर आउट
9
Mumbai: ताज हॉटेलबाहेर पहाटे संशयास्पद उडणारी वस्तू दिसली, तपासात संतापजनक प्रकार उघड
10
"पाकिस्तानला POK खाली करावा लागेल, काश्मीरच्या मुद्द्यावर कोणाचीही मध्यस्थी मान्य नाही"
11
चितगाव बांगलादेशचे 'बलुचिस्तान' होण्याच्या मार्गावर; युनूस सरकारला धक्का बसण्याची शक्यता
12
दात घासाच! रात्री ब्रश न करणं बेतेल थेट जीवावर; दातांच्या स्वच्छतेचं हार्ट ॲटॅकशी काय कनेक्शन?
13
Narendra Modi : "आम्ही घरात घुसून मारू, पळून जाण्याची संधीही देणार नाही"; मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
14
IPL 2025: गावसकर म्हणाले, आता तो डीजेही नको अन् त्या डान्सिंग गर्ल्सही नकोत!
15
Kiran Lahamte: आमदार किरण लहामटे यांच्या कारला ट्रकची जोरदार धडक, थोडक्यात बचावले!
16
ग्लेन मॅक्सेवलशी लग्नासंबंधी चाहत्याने विचारला प्रश्न, प्रिती झिंटाचा राग अनावर, रागारागात म्हणाली...
17
विराट कोहलीच्या रिटायरमेंटनंतर खूप इमोशनल झाली अनुष्का शर्मा, व्हिडीओ होतोय व्हायरल
18
Viral Video: कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबद्दल बोलताना भाजप नेत्याची जीभ घसरली, पाहा काय म्हणाले?
19
Nagpur: हेविवेट नेत्यांच्या जिल्ह्यात भाजपमध्ये नेतृत्वबदल, दयाशंकर तिवारी नवे शहराध्यक्ष
20
भारताची S-400 संरक्षण प्रणाली सुरक्षित: पीएम मोदींनी 'त्या' फोटोतून केली पाकिस्तानची पोलखोल

राष्ट्रीय महामार्गाचे काम संथ

By admin | Updated: July 3, 2014 23:47 IST

वाराणसी ते कन्याकुमारी या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सातचे काम देशात युध्द पातळीवर सुरू असताना पाटणबोरी ते पांढरकवडा दरम्यानच्या केवळ २५ किलोमीटरचेच काम गेल्या पाच वर्षांपासून रेंगाळले आहे.

पाटणबोरी : वाराणसी ते कन्याकुमारी या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सातचे काम देशात युध्द पातळीवर सुरू असताना पाटणबोरी ते पांढरकवडा दरम्यानच्या केवळ २५ किलोमीटरचेच काम गेल्या पाच वर्षांपासून रेंगाळले आहे. दक्षिण भारतात जवळपास पूर्णत्वास गेलेल्या या महामार्गाचे काम महाराष्ट्रात अद्याप अर्धवटच आहे.या महामार्गाचे कित्येक ठिकाणी काम थांबले आहे़ या महामार्गाचे प्रत्येकी २५ किलोमीटर अंतराचे टप्पे पाडून एकाच वेळी अनेक कंपनींना काम विभागून देण्यात आले. त्यातील काही कंपन्यांनी गाशा गुंंडाळल्याने तेच काम पुन्हा दुसऱ्या कंपनीला देण्यात आले. पिंपळखुटी ते केळापूर दरम्यानचा २५ किलोमीटरचा टप्पाही त्यामुळे रखडला आहे. या महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम अतिशय संथगतीने सुरू असल्याने या रस्त्याची दयनीय अवस्था झाली आहे़या महामार्गावर पाटणबोरी ते केळापूर दरम्यान अनेक ठिकाणी खड्डे पडले आहे. त्यातच रस्ता खोदकामामुळे अरूंद झाला. त्यामुळे वाहनधारकांना या मार्गावरून वाहन चालविणे कठीण झाले आहे़ परिणामी अपघाताच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे़ हे काम करताना पूर्वीच्या रस्त्यावर असलेले खड्डे बुजविणे आवश्यक होते. मात्र तसे करण्यात आले नाही. तसेच जेथे रस्ता पूर्ण उखडला, तेथे डांबरीकरणाचा थर टाकण्याची गरज आहे़ मात्र त्या दृष्टीने काहीच हालचाल होत नाही. या महामार्गावरून मोठ्या प्रमाणात दिवस-रात्र जड वाहतूक सुरू असते. परिणामी मार्गावरील खड्ड्यात पुन्हा भरत पडत आहे. वाहनधारकांना अपघात झाल्यास आपले प्राण गमवावे लागत आहे. नॅशनल हायवे आॅथॉरीटी मात्र डोळे लावून बसून आहे. या अ‍ॅथॉरीटीने सुरक्षिततेच्या दृष्टीने पावले उचलून चौपदरीकरणाच्या कामाला गती देण्याची गरज आहे. गेल्या पाच वर्षांपासून काम रखडल्याने पूर्वीच्या रस्त्याचीही दुर्दशा झाली. याच मार्गावर वर्षभरापूर्वी तत्कालीन केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांचे वाहन पंक्चर झाले होते, हे विशेष. तरीही अद्याप काम संथच आहे. (वार्ताहर)