शहरं
Join us  
Trending Stories
1
पर्यावरणप्रेमींच्या तीव्र विरोधासमोर केंद्र सरकार झुकलं, ‘अरवली’ला वाचवण्यासाठी घेतला मोठा निर्णय   
2
नवीन वर्षात बदलणार काँग्रेसचं 'पॉवर' समीकरण; प्रियांका गांधींना मिळणार महत्त्वाची जबाबदारी
3
IPL 2026 आधीच RCBच्या स्टार खेळाडूला होणार अटक? तब्बल ५ कोटी मोजून घेतलंय संघात
4
‘प्लॅन २०४९’, चीनची भारताच्या अरुणाचल प्रदेशवर नजर, लष्करी बळावर कब्ज्याची तयारी
5
"आम्हाला मतदान केलं तर प्रश्न सोडवू, पण दुसरीकडे केलं तर..."; नितेश राणेंचा मतदारांना इशारा
6
VIDEO: धावत्या ट्रेनमध्ये WWE स्टाईल राडा! 'इंटरसिटी'मध्ये प्रवाशांमध्ये तुफान हाणामारी
7
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
8
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
9
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
10
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
11
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
12
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
13
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
14
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
15
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
16
"आम्ही इंग्रजी आहोत का? इथे लंडनमधून राहायला आलोय का?" बावनकुळेंनी ठाकरे बंधूंना सुनावलं
17
IPL लिलावात अनसोल्डचा टॅग; त्याच पठ्ठ्यानं विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत विक्रमी द्विशतकासह रचला इतिहास
18
"भजन करायला थोडीच बसलोय, मठ पुरेसे आहेत...!"; हा श्लोक म्हणत CM योगी भरविधानसभेत कडाडले
19
शिंदेसेनेच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर; गोविंदासह 'या' ४० नेत्यांकडे प्रचाराची धुरा!
20
शिवसेना-मनसे युती, संजय राऊतांना मानाचे स्थान, पण बाळा नांदगावकर कुठेच दिसेना; गेले कुठे?
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रीय महामार्गाचे काम संथ

By admin | Updated: July 3, 2014 23:47 IST

वाराणसी ते कन्याकुमारी या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सातचे काम देशात युध्द पातळीवर सुरू असताना पाटणबोरी ते पांढरकवडा दरम्यानच्या केवळ २५ किलोमीटरचेच काम गेल्या पाच वर्षांपासून रेंगाळले आहे.

पाटणबोरी : वाराणसी ते कन्याकुमारी या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सातचे काम देशात युध्द पातळीवर सुरू असताना पाटणबोरी ते पांढरकवडा दरम्यानच्या केवळ २५ किलोमीटरचेच काम गेल्या पाच वर्षांपासून रेंगाळले आहे. दक्षिण भारतात जवळपास पूर्णत्वास गेलेल्या या महामार्गाचे काम महाराष्ट्रात अद्याप अर्धवटच आहे.या महामार्गाचे कित्येक ठिकाणी काम थांबले आहे़ या महामार्गाचे प्रत्येकी २५ किलोमीटर अंतराचे टप्पे पाडून एकाच वेळी अनेक कंपनींना काम विभागून देण्यात आले. त्यातील काही कंपन्यांनी गाशा गुंंडाळल्याने तेच काम पुन्हा दुसऱ्या कंपनीला देण्यात आले. पिंपळखुटी ते केळापूर दरम्यानचा २५ किलोमीटरचा टप्पाही त्यामुळे रखडला आहे. या महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम अतिशय संथगतीने सुरू असल्याने या रस्त्याची दयनीय अवस्था झाली आहे़या महामार्गावर पाटणबोरी ते केळापूर दरम्यान अनेक ठिकाणी खड्डे पडले आहे. त्यातच रस्ता खोदकामामुळे अरूंद झाला. त्यामुळे वाहनधारकांना या मार्गावरून वाहन चालविणे कठीण झाले आहे़ परिणामी अपघाताच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे़ हे काम करताना पूर्वीच्या रस्त्यावर असलेले खड्डे बुजविणे आवश्यक होते. मात्र तसे करण्यात आले नाही. तसेच जेथे रस्ता पूर्ण उखडला, तेथे डांबरीकरणाचा थर टाकण्याची गरज आहे़ मात्र त्या दृष्टीने काहीच हालचाल होत नाही. या महामार्गावरून मोठ्या प्रमाणात दिवस-रात्र जड वाहतूक सुरू असते. परिणामी मार्गावरील खड्ड्यात पुन्हा भरत पडत आहे. वाहनधारकांना अपघात झाल्यास आपले प्राण गमवावे लागत आहे. नॅशनल हायवे आॅथॉरीटी मात्र डोळे लावून बसून आहे. या अ‍ॅथॉरीटीने सुरक्षिततेच्या दृष्टीने पावले उचलून चौपदरीकरणाच्या कामाला गती देण्याची गरज आहे. गेल्या पाच वर्षांपासून काम रखडल्याने पूर्वीच्या रस्त्याचीही दुर्दशा झाली. याच मार्गावर वर्षभरापूर्वी तत्कालीन केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांचे वाहन पंक्चर झाले होते, हे विशेष. तरीही अद्याप काम संथच आहे. (वार्ताहर)