शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
2
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
3
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
4
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
5
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
6
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
7
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
8
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
9
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
10
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
11
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
12
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
13
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
14
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
15
LIC चे तिमाही निकाल जाहीर; नफा 31% ने वाढला अन् ₹10,098 कोटींचा आकडा गाठला...
16
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
17
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही
18
अक्षरच्या फिरकीची जादू, वॉशिंग्टनच्या ८ चेंडूत ३ विकेट्स! कांगारुंची शिकार करत टीम इंडियाची मालिकेत आघाडी
19
Babar Azam: बाबर आझमचं करिअर धोक्यात? वयाच्या ३१ व्या वर्षीच निवृत्त होण्याची येऊ शकते वेळ!
20
'वन नाइट स्टॅण्ड'मधून पैसे कमावतेय ही बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री, डिटेक्टिव्हचा खुलासा, म्हणाली-"तासानुसार..."

राष्ट्रीय महामार्गाचे काम संथ

By admin | Updated: July 3, 2014 23:47 IST

वाराणसी ते कन्याकुमारी या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सातचे काम देशात युध्द पातळीवर सुरू असताना पाटणबोरी ते पांढरकवडा दरम्यानच्या केवळ २५ किलोमीटरचेच काम गेल्या पाच वर्षांपासून रेंगाळले आहे.

पाटणबोरी : वाराणसी ते कन्याकुमारी या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सातचे काम देशात युध्द पातळीवर सुरू असताना पाटणबोरी ते पांढरकवडा दरम्यानच्या केवळ २५ किलोमीटरचेच काम गेल्या पाच वर्षांपासून रेंगाळले आहे. दक्षिण भारतात जवळपास पूर्णत्वास गेलेल्या या महामार्गाचे काम महाराष्ट्रात अद्याप अर्धवटच आहे.या महामार्गाचे कित्येक ठिकाणी काम थांबले आहे़ या महामार्गाचे प्रत्येकी २५ किलोमीटर अंतराचे टप्पे पाडून एकाच वेळी अनेक कंपनींना काम विभागून देण्यात आले. त्यातील काही कंपन्यांनी गाशा गुंंडाळल्याने तेच काम पुन्हा दुसऱ्या कंपनीला देण्यात आले. पिंपळखुटी ते केळापूर दरम्यानचा २५ किलोमीटरचा टप्पाही त्यामुळे रखडला आहे. या महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम अतिशय संथगतीने सुरू असल्याने या रस्त्याची दयनीय अवस्था झाली आहे़या महामार्गावर पाटणबोरी ते केळापूर दरम्यान अनेक ठिकाणी खड्डे पडले आहे. त्यातच रस्ता खोदकामामुळे अरूंद झाला. त्यामुळे वाहनधारकांना या मार्गावरून वाहन चालविणे कठीण झाले आहे़ परिणामी अपघाताच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे़ हे काम करताना पूर्वीच्या रस्त्यावर असलेले खड्डे बुजविणे आवश्यक होते. मात्र तसे करण्यात आले नाही. तसेच जेथे रस्ता पूर्ण उखडला, तेथे डांबरीकरणाचा थर टाकण्याची गरज आहे़ मात्र त्या दृष्टीने काहीच हालचाल होत नाही. या महामार्गावरून मोठ्या प्रमाणात दिवस-रात्र जड वाहतूक सुरू असते. परिणामी मार्गावरील खड्ड्यात पुन्हा भरत पडत आहे. वाहनधारकांना अपघात झाल्यास आपले प्राण गमवावे लागत आहे. नॅशनल हायवे आॅथॉरीटी मात्र डोळे लावून बसून आहे. या अ‍ॅथॉरीटीने सुरक्षिततेच्या दृष्टीने पावले उचलून चौपदरीकरणाच्या कामाला गती देण्याची गरज आहे. गेल्या पाच वर्षांपासून काम रखडल्याने पूर्वीच्या रस्त्याचीही दुर्दशा झाली. याच मार्गावर वर्षभरापूर्वी तत्कालीन केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांचे वाहन पंक्चर झाले होते, हे विशेष. तरीही अद्याप काम संथच आहे. (वार्ताहर)