शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पाकला स्पष्ट शब्दांत ठणकावले; पाहा, भाषणातील ५६ महत्त्वाचे मुद्दे
2
आजचे राशीभविष्य १३ मे २०२५ : या राशींना आर्थिक लाभ, कसा असेल तुमचा आजचा दिवस...
3
एअर मार्शल भारती म्हणाले, “भय बिनु होइ न प्रीति, कोणत्याही आव्हानांचा मुकाबला करण्यास सज्ज”
4
१९७१नंतर प्रथमच पाकला मोठा दणका; ५२हून अधिक वायुसैनिकांचा मृत्यू; १२ एअरबेसवर भारताचे हल्ले
5
‘हे’ तीन दहशतवादी हवेत, मगच थांबेल काश्मीरचा दहशतवाद; भारताची पाककडे सातत्याने मागणी
6
धास्ती: सीमावर्ती गावांत अद्याप शेकडो जिवंत बॉम्ब, ६ ठिकाणी केले निष्क्रिय; नागरिक परतले घरी
7
जे होते ‘ऑपरेशन सिंदूर’चा चेहरा त्यांचे ट्रोलिंग; मिस्रींच्या मुलीची वैयक्तिक माहिती लीक
8
युद्ध झालेलेच नाही, तेव्हा शस्त्रसंधीचा प्रश्नच नाही; भारत-पाकच्या राजनैतिकांनाच श्रेय
9
३२ विमानतळ पुन्हा सुरू करण्याची तयारी; भारत-पाकिस्तान संघर्षामुळे विमान उड्डाणे होती बंद
10
पाकच्या ताब्यातील जवानाच्या पत्नीशी संवाद; सुटकेसाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन, फोनवर चर्चा
11
संरक्षण दलांना राज्यात सर्वतोपरी मदत: मुख्यमंत्री; तिन्ही दलांच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक
12
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर सायबर हल्ल्यांचा आकडा १५ लाखांवर; फक्त १५० यशस्वी, सायबर विभागाचा तपास
13
दहावीचा निकाल आज... मित्रांनो, मनासारखे नाही झाले, तरी हार मानू नका 
14
मराठवाडा, उत्तर महाराष्ट्राला अवकाळीचा तडाखा; पिकांनी टाकल्या माना, शेतकऱ्यांचे मोठे नुकसान
15
घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील जखमी म्हणतात, आजही तेथून जाताना हृदयात चर्रर्र होतं
16
नवीन होर्डिंग धोरण वर्षभरानंतरही कागदावरच! घाटकोपर दुर्घटनेला वर्ष होऊनही महापालिका गप्पच
17
शाहरुख खानच्या ‘त्या’ कर्मचाऱ्याच्या कुटुंबाला ६२ लाखांची भरपाई योग्यच; हायकोर्टाचे आदेश
18
आंतरराष्ट्रीय सीमेवर संशयित ड्रोन दिसले, अनेक ठिकाणी ब्लॅकआऊट केले; ‘त्या’ ४ तासांत काय घडले?
19
डोनाल्ड ट्रम्प यांचा ‘तो’ दावा फेटाळला; भारताने स्पष्टच सांगितले, “चर्चेत ते मुद्दे नव्हते”
20
“भारत-पाकने युद्धविराम केला नाही, तर व्यापार नाही, आम्ही अण्वस्त्रांचे युद्ध रोखले”: ट्रम्प

विषबाधितांंना राष्टÑवादीची मदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 9, 2017 00:37 IST

जिल्ह्यात फवारणीच्या विषबाधेतून मृत्युमुखी पडलेल्या शेतकºयाला प्रत्येकी दहा हजारांची मदत आणि गंभीर रुग्णांच्या उपचाराची संपूर्ण जबाबदारी राष्टÑवादी काँग्रेस स्वीकारत असल्याची हमी ...

ठळक मुद्देधनंजय मुंडेची भेट : गंभीर रुग्णांच्या उपचाराची जबाबदारी स्वीकारली

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : जिल्ह्यात फवारणीच्या विषबाधेतून मृत्युमुखी पडलेल्या शेतकºयाला प्रत्येकी दहा हजारांची मदत आणि गंभीर रुग्णांच्या उपचाराची संपूर्ण जबाबदारी राष्टÑवादी काँग्रेस स्वीकारत असल्याची हमी विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांनी येथे दिली.फवारणी बाधित रुग्णांच्या भेटीसाठी यवतमाळात आले असता त्यांनी येथील वसंतराव नाईक शासकीय रुग्णालयात जाऊन रुग्णांची आस्थेने विचारपूस केली. यावेळी त्यांनी रुग्णांच्या नातेवाईकांना दिलासा देत राष्टÑवादी काँग्रेस तुमच्या संकटात सोबत असल्याचे सांगितले. राष्टÑवादीच्या स्थानिक पदाधिकाºयांकडून मृताच्या कुटुंबियांना प्रत्येकी दहा हजार रुपये मदत जाहीर केली. गंभीर रुग्णांवर मुंबई येथील प्रसिद्ध रुग्णालयात उपचार करण्यासाठी राष्टÑवादी पुढाकार घेईल, असे त्यांनी सांगितले.रुग्णालयातील स्थितीबाबतही त्यांनी नाराजी व्यक्त केली. विषबाधित रुग्णांवर परंपरागत पद्धतीनेच उपचार केले जातात. आता यामध्ये नवनवीन संशोधन झाले असून उपचारपद्धती अधिक प्रभावित झाली आहे. मात्र त्याचा उपयोग स्थानिक पातळीवर होत नसल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली. यावेळी आमदार मनोहरराव नाईक, माजी आमदार संदीप बाजोरिया, जिल्हा परिषदेचे बांधकाम सभापती निमीष मानकर, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष, राष्टÑवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आशिष मानकर, विजय तेलंगे आदी उपस्थित होते.राष्टÑवादीची संवेदनशीलतायवतमाळ ‘मेडिकल’ विषबाधित रुग्णांमुळे चर्चेत आले आहेत. मंत्री, राज्यमंत्री, सचिव, वरिष्ठ अधिकारी या रुग्णांच्या भेटीसाठी येत आहेत. परंतु रुग्णांना थेट मदत किंवा आस्थेने विचारपूस करण्याचे औदार्य कुणीच दाखविले नाही. राष्टÑवादीचे माजी आमदार संदीप बाजोरिया, जिल्हा परिषद बांधकाम सभापती निमीष मानकर व जिल्हाध्यक्षांनी रुग्णालयात शनिवारी सकाळी भेट दिली असता सर्व रुग्णांना बिस्कीट व फळे देऊन आपल्या संवेदनशीलतेचा परिचय दिला. तसेच बंद असलेल्या एसीबाबत अधिष्ठातांना जाब विचारुन तत्काळ एसी सुरू करून घेतला.कळंबमध्ये शेतकरी कुटुंबीयांची भेटकळंब - फवारणीच्या विषबाधेतून मृत्युमुखी पडलेले कळंब येथील शेतकरी देवीदास मडावी यांच्या घरी भेट देऊन विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांनी कुटुंबियांंचे सांत्वन केले. कृषी विभागाच्या दुर्लक्षित धारणामुळे शेतकºयांचा जीव गेला. यातील दोषींवर कारवाई होणार असल्याचे सांगितले. यावेळी आमदार मनोहरराव नाईक, माजी आमदार संदीप बाजोरिया, जिल्हा परिषद बांधकाम सभापती निमीष मानकर, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रवीण देशमुख, चंद्रशेखर चांदोरे, मनीषा काटे आदी उपस्थित होते.