शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
2
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
3
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
4
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
5
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
6
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
7
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
8
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
9
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
10
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
11
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
12
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
13
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
14
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
15
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
16
नागपुरात आई अन् मुलानेच सुरू केलं सेक्स रॅकेट, व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो पाठवायचे; रात्री...
17
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!
18
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
19
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
20
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका

नगर परिषदांकडे क्वॉलिटी कंट्रोलच नाही

By admin | Updated: August 2, 2016 01:28 IST

जिल्ह्यातील दहाही नगरपरिषदांकडे आपल्या हद्दीत होणाऱ्या रस्ते व इमारतींच्या बांधकामांची गुणवत्ता

यवतमाळ : जिल्ह्यातील दहाही नगरपरिषदांकडे आपल्या हद्दीत होणाऱ्या रस्ते व इमारतींच्या बांधकामांची गुणवत्ता तपासण्यासाठी एक्सपर्ट यंत्रणाच नाही. त्यामुळे कनिष्ठ व उपअभियंता म्हणेल तीच पूर्व दिशा मुख्याधिकाऱ्यांना मानावी लागते. अभियंत्याने बिल तयार करायचे आणि प्रशासनाने लगेच ते मंजूर करायचे असा पायंडा जणू नगरपरिषदांमध्ये पडला आहे. जिल्ह्यात दहा पैकी आठ नगरपरिषदांच्या निवडणुका यावर्षा अखेर होऊ घातल्या आहे. त्यात वणी, घाटंजी, यवतमाळ, दारव्हा, आर्णी, दिग्रस, पुसद, उमरखेड या नगरपरिषदांचा समावेश आहे. या निवडणुकांच्या निमित्ताने नगरपरिषदांच्या गेल्या पाच वर्षातील कामगिरीवर नजर टाकली असता सर्वत्र गटातटाचे राजकारण आणि विकास कामातील भ्रष्टाचार दृष्टीस पडतो. नगरपरिषद क्षेत्रातील जनता रस्त्यांवरील खड््यांना सर्वाधिक त्रासली आहे. एक तर नव्या वस्त्यांमध्ये रस्तेच नाही, कुठे असले तरी त्यावर प्रचंड खड्डे पडले आहेत. पावसाळ्यात तर या रस्त्यांची खरोखरच गुणवत्ता किती हे स्पष्ट होते. नगरपरिषदांकडे बांधकामांवर नियंत्रण ठेवण्यासाठी एक किंवा दोन अभियंते असतात. तेथे रस्त्यांच्या दर्जावर नियंत्रण ठेवण्यासाठी स्वतंत्र गुणवत्ता नियंत्रण विभाग अस्तित्वात नाही. बांधकाम अभियंत्यांवरच गुणवत्ता राखण्याची जबाबदारी दिलेली असते. परंतु अनेक ठिकाणी हे अभियंते कंत्राटदारांच्या व राजकीय पदाधिकाऱ्यांच्या दावणीला बांधलेले असल्याचे चित्र पहायला मिळते. रस्ता बांधकामात नगरपरिषदेकडे एक्सपर्ट नसल्याने अभियंता म्हणेल तीच पूर्व दिशा अशी स्थिती आहे. अभियंताच मुख्याधिकाऱ्यांच्या संमतीने सर्व प्रक्रिया पूर्ण करतो आणि तोच बांधकामांवर नियंत्रण ठेवतो. कामाचे देयक तयार करण्याची, मंजूर करण्याची जबाबदारी या अभियंत्यावरच आहे. तोच अभियंता देयक तयार करुन लेखा विभागाकडे पाठवितो. तेथून मुख्याधिकाऱ्यांकडे ते मंजुरीसाठी पाठविले जाते. परंतु मुख्याधिकारी बांधकामातील एक्सपर्ट नसल्याने अभियंता हाच एक्सपर्ट मानून त्याने पुढे ठेवलेले बिल मुख्याधिकारी फार सूक्ष्म तपासणी न करता लगेच मंजूर करून टाकतात. हा पायंडा पडल्याने आणि एक्सपर्ट नसल्याने जिल्ह्याच्या बहुतांश नगरपरिषद क्षेत्रात रस्त्यांचे यंदाच्या पावसाळ्यात बारा वाजले आहे. अशीच स्थिती जिल्ह्याचे मुख्यालय असलेल्या यवतमाळसह अन्य नगरपरिषदांमध्ये कायम आहे. नेर आणि पांढरकवडा या आत्ताच निवडणुका नसलेल्या नगरपरिषदाही त्यातून सुटलेल्या नाहीत. गुणवत्तेशिवाय होणाऱ्या या रस्त्यांना काही ठिकाणी नगरपरिषदेचे प्रशासन, पदाधिकारी यांचेही छुपे अभय असण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यांची साखळी व आशीर्वादामुळेच कंत्राटदार व अभियंते आपल्या मर्जीने काम करू शकत असल्याचा जनतेचा सूर आहे. (जिल्हा प्रतिनिधी) पुसद शहरातील रस्त्यांना पहिल्याच पावसात खड्डे गुणवत्ता धाब्यावर बसवून बांधले गेलेले रस्ते सर्वत्रच उखडले गेले असले तरी पुसद विभाग त्यात आघाडीवर असल्याचे सांगितले जाते. तेथील ६० लाखांचे शिवाजी चौक ते मुखरे चौक आणि ४० लाखांचे मुखरे चौक ते वसंतराव नाईक चौक या रस्त्यांच्या कामाची गुणवत्ता धोक्यात आली आहे. या रस्त्यांवर वर्षभरातच मोठमोठ्ठाले खड्डे पडले आहेत. ४० टक्के बीबीएम कंत्राटदाराच्या घशात गुणवत्तेबाबत कुणी जाब विचारणारेच नसल्याने नगरपरिषद क्षेत्रात कार्पेटखालील बीबीएमचे काम केले जात नाही. वास्तविक अंदाजपत्रकाच्या ४० टक्के किंमत त्याच कामाची असते. परंतु ती सर्व किंमत कंत्राटदार घशात घालतो. बीबीएम न करता तयार केले जाणारे रस्ते अवघ्या काही महिन्यातच फुटत असल्याचे चित्र आहे.