शहरं
Join us  
Trending Stories
1
केजरीवालांचा शीषमहल, तर रेखा गुप्तांचा 'मायामहल'; ९ लाखांचे टीव्ही, रिनोवेशनसाठी ६० लाखांचे टेंडर
2
विराट-रोहितच्या संदर्भात आली मोठी अपडेट; टीम इंडियाच्या चाहत्यांचा पुन्हा होणार 'मूड ऑफ'
3
होम लोन घेण्याचा विचार करताय? ३ सरकारी बँकांनी कमी केले व्याजदर; पाहा कोणत्या बँकेत मिळतंय स्वस्त कर्ज
4
हृदयद्रावक! खेळताना प्लास्टिकचा बॉल गिळला; दीड वर्षांच्या लेकीचा पालकांसमोर तडफडून मृत्यू
5
"माझा मुलगा मानव ठणठणीत आहे...", मुलाच्या आत्महत्येची खोटी बातमी पसरवणाऱ्यांवर संतापली रेशम टिपणीस
6
मुंबईतील तरुणीवर अलिबागमध्ये बलात्कार, पार्टीनंतर ऑफिसमधील सहकाऱ्यानेच केला घात; पीडितेसोबत काय घडलं?
7
इराणसोबत गेम झाला ...! इस्रायलवरील हल्ले रोखण्यासाठी लढाऊ विमाने, हेलिकॉप्टर पाठविलेली...
8
पालकांनो लक्ष द्या! मुलांच्या शिक्षणासाठी आणि लग्नासाठी 'ही' SIP ठरेल गेम चेंजर!
9
मेळाव्यात कोण कुठे बसणार? कुणाची भाषणं होणार? सगळं ठरलं; दोन्ही ठाकरेंचं १५ मुद्द्यांवर एकमत...
10
SEBI ची मोठी कारवाई, शेअर बाजारात या कंपनीला बंदी; ₹४८४३ कोटींचा नफाही होणार जप्त
11
Viral Video: इस्रायलने इराणवर केलेल्या हल्ल्याचा व्हिडीओ पाहून अंगाचा थरकाप उडेल!
12
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांच्या नातेवाईकांचे एअर इंडियावर गंभीर आरोप, कंपनीनं दिलं असं स्पष्टीकरण
13
Sonam Raghuwanshi : "मला सतत वकिलांचे फोन येताहेत, पण माझी एक अट..."; सोनमच्या भावाने स्पष्टच सांगितलं
14
AI म्हणालं, चूप, तुझं अफेअर उघड करीन! एआय माॅडेलच्या या धमकीनं साऱ्यांनाच धडकी भरली
15
महागाई भत्त्यात ४ टक्क्यांची वाढ होण्याची शक्यता; मोदी सरकार कर्मचाऱ्यांना देऊ शकतं मोठं गिफ्ट
16
टाटांच्या या कंपनीला मोठा धक्का! एका घोषणेने शेअर ९% घसरला, गुंतवणूकदारांचे लाखो कोटी बुडाले!
17
छत्रपती संभाजीनगर हादरलं; काळा गणपती मंदिरासमोर कारने ६ जणांना उडवलं, एकाचा मृत्यू
18
तरुण दिसण्यासाठी भारतीय लाखो रुपये उधळतायेत? ग्लुटाथिओनची किंमत पाहून धक्का बसेल!
19
IND vs ENG: भारताने इंग्लंडच्या 'बॅझबॉल'ची काढली हवा, नवा रेकॉर्ड बनवला; पाकिस्तानला टाकले मागे
20
पंतप्रधान कमलांसह 38 मंत्री, 4 खासदार; PM मोदींच्या स्वागतासाठी पूर्ण मंत्रिमंडळ विमानतळावर दाखल

नगर परिषदांकडे क्वॉलिटी कंट्रोलच नाही

By admin | Updated: August 2, 2016 01:28 IST

जिल्ह्यातील दहाही नगरपरिषदांकडे आपल्या हद्दीत होणाऱ्या रस्ते व इमारतींच्या बांधकामांची गुणवत्ता

यवतमाळ : जिल्ह्यातील दहाही नगरपरिषदांकडे आपल्या हद्दीत होणाऱ्या रस्ते व इमारतींच्या बांधकामांची गुणवत्ता तपासण्यासाठी एक्सपर्ट यंत्रणाच नाही. त्यामुळे कनिष्ठ व उपअभियंता म्हणेल तीच पूर्व दिशा मुख्याधिकाऱ्यांना मानावी लागते. अभियंत्याने बिल तयार करायचे आणि प्रशासनाने लगेच ते मंजूर करायचे असा पायंडा जणू नगरपरिषदांमध्ये पडला आहे. जिल्ह्यात दहा पैकी आठ नगरपरिषदांच्या निवडणुका यावर्षा अखेर होऊ घातल्या आहे. त्यात वणी, घाटंजी, यवतमाळ, दारव्हा, आर्णी, दिग्रस, पुसद, उमरखेड या नगरपरिषदांचा समावेश आहे. या निवडणुकांच्या निमित्ताने नगरपरिषदांच्या गेल्या पाच वर्षातील कामगिरीवर नजर टाकली असता सर्वत्र गटातटाचे राजकारण आणि विकास कामातील भ्रष्टाचार दृष्टीस पडतो. नगरपरिषद क्षेत्रातील जनता रस्त्यांवरील खड््यांना सर्वाधिक त्रासली आहे. एक तर नव्या वस्त्यांमध्ये रस्तेच नाही, कुठे असले तरी त्यावर प्रचंड खड्डे पडले आहेत. पावसाळ्यात तर या रस्त्यांची खरोखरच गुणवत्ता किती हे स्पष्ट होते. नगरपरिषदांकडे बांधकामांवर नियंत्रण ठेवण्यासाठी एक किंवा दोन अभियंते असतात. तेथे रस्त्यांच्या दर्जावर नियंत्रण ठेवण्यासाठी स्वतंत्र गुणवत्ता नियंत्रण विभाग अस्तित्वात नाही. बांधकाम अभियंत्यांवरच गुणवत्ता राखण्याची जबाबदारी दिलेली असते. परंतु अनेक ठिकाणी हे अभियंते कंत्राटदारांच्या व राजकीय पदाधिकाऱ्यांच्या दावणीला बांधलेले असल्याचे चित्र पहायला मिळते. रस्ता बांधकामात नगरपरिषदेकडे एक्सपर्ट नसल्याने अभियंता म्हणेल तीच पूर्व दिशा अशी स्थिती आहे. अभियंताच मुख्याधिकाऱ्यांच्या संमतीने सर्व प्रक्रिया पूर्ण करतो आणि तोच बांधकामांवर नियंत्रण ठेवतो. कामाचे देयक तयार करण्याची, मंजूर करण्याची जबाबदारी या अभियंत्यावरच आहे. तोच अभियंता देयक तयार करुन लेखा विभागाकडे पाठवितो. तेथून मुख्याधिकाऱ्यांकडे ते मंजुरीसाठी पाठविले जाते. परंतु मुख्याधिकारी बांधकामातील एक्सपर्ट नसल्याने अभियंता हाच एक्सपर्ट मानून त्याने पुढे ठेवलेले बिल मुख्याधिकारी फार सूक्ष्म तपासणी न करता लगेच मंजूर करून टाकतात. हा पायंडा पडल्याने आणि एक्सपर्ट नसल्याने जिल्ह्याच्या बहुतांश नगरपरिषद क्षेत्रात रस्त्यांचे यंदाच्या पावसाळ्यात बारा वाजले आहे. अशीच स्थिती जिल्ह्याचे मुख्यालय असलेल्या यवतमाळसह अन्य नगरपरिषदांमध्ये कायम आहे. नेर आणि पांढरकवडा या आत्ताच निवडणुका नसलेल्या नगरपरिषदाही त्यातून सुटलेल्या नाहीत. गुणवत्तेशिवाय होणाऱ्या या रस्त्यांना काही ठिकाणी नगरपरिषदेचे प्रशासन, पदाधिकारी यांचेही छुपे अभय असण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यांची साखळी व आशीर्वादामुळेच कंत्राटदार व अभियंते आपल्या मर्जीने काम करू शकत असल्याचा जनतेचा सूर आहे. (जिल्हा प्रतिनिधी) पुसद शहरातील रस्त्यांना पहिल्याच पावसात खड्डे गुणवत्ता धाब्यावर बसवून बांधले गेलेले रस्ते सर्वत्रच उखडले गेले असले तरी पुसद विभाग त्यात आघाडीवर असल्याचे सांगितले जाते. तेथील ६० लाखांचे शिवाजी चौक ते मुखरे चौक आणि ४० लाखांचे मुखरे चौक ते वसंतराव नाईक चौक या रस्त्यांच्या कामाची गुणवत्ता धोक्यात आली आहे. या रस्त्यांवर वर्षभरातच मोठमोठ्ठाले खड्डे पडले आहेत. ४० टक्के बीबीएम कंत्राटदाराच्या घशात गुणवत्तेबाबत कुणी जाब विचारणारेच नसल्याने नगरपरिषद क्षेत्रात कार्पेटखालील बीबीएमचे काम केले जात नाही. वास्तविक अंदाजपत्रकाच्या ४० टक्के किंमत त्याच कामाची असते. परंतु ती सर्व किंमत कंत्राटदार घशात घालतो. बीबीएम न करता तयार केले जाणारे रस्ते अवघ्या काही महिन्यातच फुटत असल्याचे चित्र आहे.