शहरं
Join us  
Trending Stories
1
टॅरिफबाबत भारत आणि अमेरिकेमध्ये चर्चेचे दरवाजे अजूनही खुले, दोन्हीकडून मिळाले संकेत  
2
जम्मू-काश्मीरमध्ये पावसाने हाहाकार, वैष्णोदेवी मार्गावरील भूस्खलन घटनेतील मृतांची संख्या ४१ वर, जम्मू-उधमपूरमध्ये ११५ वर्षांतील रेकॉर्ड झाले ब्रेक
3
ट्रम्प यांच्या सूचनेनंतर पाच तासांतच शस्त्रसंधी, मतदार अधिकार यात्रेत राहुल गांधी यांचा आरोप
4
वर्षानुवर्षे खटला चालणे, हे शिक्षेसारखेच. सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त केली खंत
5
शाळांमध्येच होणार विद्याथ्यांचे आधार बायोमेट्रिक अपडेट, १७ कोटी आधार क्रमांक अजूनही प्रलंबित; पालकांचा वेळ, श्रम व त्रास वाचणार
6
'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश
7
"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार
8
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
9
मिनियापोलिस शहरातील शाळेवर हल्ला; तिघांचा मृत्यू, अनेक विद्यार्थी जखमी
10
कर्जाच्या ओझ्याखाली दबला पाकिस्तान; IMFच्या बेलआऊट पॅकेजनंतरही अर्धा देश उपाशी!
11
Vaishno Devi Landslide: ना सावरण्याची संधी मिळाली, ना पळण्याची... प्रत्यक्षदर्शींनी सांगितली आपबिती
12
गुगलवर चुकूनही सर्च करू नका 'या' गोष्टी, अन्यथा पोलीस पकडून घेऊन जातील!
13
'एआय'चा झटका! २२-२५ वयोगटातील तरुणांना नोकरी मिळेना, या नोकऱ्यांवर सर्वाधिक परिणाम
14
Vidarbha Rain: विदर्भातील चार जिल्ह्यांना पाऊस झोडपणार; हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा
15
जल्लोषपूर्ण वातावरणात श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पा विराजमान; जया किशोरी यांच्या हस्ते झाली प्राणप्रतिष्ठा!
16
विरारमध्ये दुर्घटना बचावकार्य युद्धपातळीवर सुरू, जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला बचावकार्याचा आढावा
17
Nikki Murder Case : निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण
18
"आता माझ्याकडे मृत्यूशिवाय पर्याय नाही, म्हणून..."; भाजपा नेत्यानं मुख्यमंत्र्यांकडे मागितलं इच्छामरण
19
गंगेचा प्रवाह धोका? गंगोत्री ग्लेशियर १० टक्के वितळला, पाणी होतंय कमी; IIT इंदूरच्या संशोधनात काय? 
20
'आम्ही तिला मारलं नाही' निक्कीच्या सासरच्या लोकांचा दावा! पण पतीच्या एका कृतीने वाढला संशय

लोकसहभागातून काढणार निळोणा धरणातील गाळ

By admin | Updated: April 12, 2015 00:03 IST

दरवर्षी उन्हाळ्यात यवतमाळ शहरात पाणीटंचाई निर्माण होते.

‘प्रयास’चा पुढाकार : पाणीटंचाईवर मात करण्यासाठी आवाहनयवतमाळ : दरवर्षी उन्हाळ्यात यवतमाळ शहरात पाणीटंचाई निर्माण होते. या पाणीटंचाईचे मुख्य कारण म्हणजे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या निळोणा धरणात साचलेला गाळ होय. हा गाळ काढण्यासाठी आता प्रयास संस्थेने पुढाकार घेतला असून लोकसहभागातून धरणातील गाळ काढला जाणार आहे. या मोहिमेचा शुभारंभ १३ एप्रिल रोजी होणार असून यवतमाळकरांनी यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन प्रयास संस्थेच्यावतीने येथे आयोजित पत्रकार परिषदेत केले. यवतमाळ शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या निळोणा धरणाचे बांधकाम १९७२ साली पूर्ण झाले. या धरणाचे आयुर्मान ६० वर्षाचे असून आता ४३ वर्ष पूर्ण झाले आहे. या धरणात ३० ते ५० टक्के गाळ साचला आहे. त्यामुळे या धरणाची साठवण क्षमता कमी झाली आहे. भविष्यात पाण्याची तीव्र टंचाई निर्माण होऊ शकते. पाण्याचे दुर्भिक्ष्य जाणू नये यासाठी प्रयास संस्थेने धरणातील गाळ काढण्याचा निर्धार केला आहे. त्या दृष्टीने २१ मार्चला गुढी पाडव्याला प्रकल्पस्थळी गुढी रोवून यवतमाळकरांनी मिशन डीप निळोणा या मोहिमेला सुरुवात केली. आता प्रत्यक्ष लोकसहभागातून गाळ काढला जाणार असून उन्हाळ्यात ५० हजार ट्रॅक्टर गाळ काढण्याचे उद्दीष्ट समोर ठेवण्यात आले आहे. या संस्थेने दोन लाख रुपयाचा निधी संकलित केला असून जलतज्ज्ञांकडून माहिती अवगत केली असल्याचे पत्रपरिषदेत सांगण्यात आले.धरणातील सुपिक गाळामुळे शेतजमिनीचे आरोग्य सुदृढ होऊन पिकाची उत्पादकता वाढत असल्याचे कृषी तज्ज्ञांनी सिद्ध केले आहे. त्यामुळे या धरणातून निघालेला गाळ मागेल त्या शेतकऱ्याला मोफत आणि उपलब्ध प्रमाणात उपलब्ध करून देण्यात येणार आहे. शहरात कार्यरत सामाजिक, व्यावसायिक उद्योजक, व्यापारी, विद्यार्थी, सांस्कृतिक, क्रीडा आदी क्षेत्रातील संघटनांची या अभियानासंदर्भात बैठक घेण्यात आली. ते या मोहिमेत प्रत्यक्ष सहभाग घेणार असल्याचे पत्रपरिषदेत सांगितले. पत्रकार परिषदेला प्रयासचे डॉ. अविनाश सावजी, डॉ. आलोक गुप्ता, सुरेश राठी, डॉ. विजय कावलकर, प्रशांत बनगीनवार, डॉ. अनिल पटेल, कमल बागडी, अमोल साखरकर उपस्थित होते. (नगर प्रतिनिधी)शासनाचे सहकार्यया जलदायी अभियानासाठी शासन आणि लोकप्रतिनिधींनी चांगला प्रतिसाद दिला आहे. जिल्हाधिकारी राहुल रंजन महिवाल यांनी ९ एप्रिल रोजी या प्रश्नावर संबंधित विभागाची बैठक घेतली. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनीही आपल्या अधिनस्त यंत्रणेची बैठक घेतली. कृषी विभागाचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तात्रय गायकवाड यांनी देखील या मोहिमेस महात्मा फुले जलभूमी अभियानांतर्गत इंधन खर्च देण्याचे आश्वासन दिले. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने धरणातून गाळ काढण्याची परवानगी दिली असून या विभागाचे तांत्रिक सहकार्य मिळणार आहे. वनविभागाकडून निळोणा मार्गावरील जलस्रोतावर बांध बंदिस्तींच्या कामाला मदत करणार आहे. महसूल आणि कृषी विभागाची ग्रामीण भागातील यंत्रणा आणि यवतमाळ नगरपरिषद देखील या कार्याकरिता यांत्रिक सहकार्य करणार असल्याचे सांगितले.यवतमाळकरांना आवाहनया जल अभियानात यवतमाळकरांनी सहभागी होऊन कुठल्याही स्वरूपात मदत करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या अभियानासाठी येरावार चौकात माँ दुर्गा दवाबाजार येथे संपर्क कार्यालय स्थापन करण्यात आले असून यवतमाळकरांच्या कल्पना, सूचना कळवाव्या तसेच कुणाला याबाबत सविस्तर माहिती हवी असल्यास संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले.