शहरं
Join us  
Trending Stories
1
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
2
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
3
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
4
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
5
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
6
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
7
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
8
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
9
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
10
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
11
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
12
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
13
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
14
'धुरंधर'मुळे पालटले या टीव्ही कलाकारांचे नशीब; कोणी आयटम साँगने गाजवले, तर कोणी अभिनयाने जिंकली मने!
15
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
16
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
17
बॉक्स ऑफिस मॉन्स्टर 'धुरंधर'सोबत 'उत्तर' रिलीज झाला अन्.., क्षितिज पटवर्धनची लक्षवेधी पोस्ट
18
सरकारच्या तिजोरीत लोकांनी भरले १७ लाख कोटी; कॉर्पोरेट, वैयक्तिक करात मोठी वाढ
19
'धुरंधर'मध्ये अक्षय खन्नाचंच होतंय कौतुक, आर माधवनचा जळफळाट? म्हणाला, "तो नव्या घरात..."
20
BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?
Daily Top 2Weekly Top 5

लोकसहभागातून काढणार निळोणा धरणातील गाळ

By admin | Updated: April 12, 2015 00:03 IST

दरवर्षी उन्हाळ्यात यवतमाळ शहरात पाणीटंचाई निर्माण होते.

‘प्रयास’चा पुढाकार : पाणीटंचाईवर मात करण्यासाठी आवाहनयवतमाळ : दरवर्षी उन्हाळ्यात यवतमाळ शहरात पाणीटंचाई निर्माण होते. या पाणीटंचाईचे मुख्य कारण म्हणजे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या निळोणा धरणात साचलेला गाळ होय. हा गाळ काढण्यासाठी आता प्रयास संस्थेने पुढाकार घेतला असून लोकसहभागातून धरणातील गाळ काढला जाणार आहे. या मोहिमेचा शुभारंभ १३ एप्रिल रोजी होणार असून यवतमाळकरांनी यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन प्रयास संस्थेच्यावतीने येथे आयोजित पत्रकार परिषदेत केले. यवतमाळ शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या निळोणा धरणाचे बांधकाम १९७२ साली पूर्ण झाले. या धरणाचे आयुर्मान ६० वर्षाचे असून आता ४३ वर्ष पूर्ण झाले आहे. या धरणात ३० ते ५० टक्के गाळ साचला आहे. त्यामुळे या धरणाची साठवण क्षमता कमी झाली आहे. भविष्यात पाण्याची तीव्र टंचाई निर्माण होऊ शकते. पाण्याचे दुर्भिक्ष्य जाणू नये यासाठी प्रयास संस्थेने धरणातील गाळ काढण्याचा निर्धार केला आहे. त्या दृष्टीने २१ मार्चला गुढी पाडव्याला प्रकल्पस्थळी गुढी रोवून यवतमाळकरांनी मिशन डीप निळोणा या मोहिमेला सुरुवात केली. आता प्रत्यक्ष लोकसहभागातून गाळ काढला जाणार असून उन्हाळ्यात ५० हजार ट्रॅक्टर गाळ काढण्याचे उद्दीष्ट समोर ठेवण्यात आले आहे. या संस्थेने दोन लाख रुपयाचा निधी संकलित केला असून जलतज्ज्ञांकडून माहिती अवगत केली असल्याचे पत्रपरिषदेत सांगण्यात आले.धरणातील सुपिक गाळामुळे शेतजमिनीचे आरोग्य सुदृढ होऊन पिकाची उत्पादकता वाढत असल्याचे कृषी तज्ज्ञांनी सिद्ध केले आहे. त्यामुळे या धरणातून निघालेला गाळ मागेल त्या शेतकऱ्याला मोफत आणि उपलब्ध प्रमाणात उपलब्ध करून देण्यात येणार आहे. शहरात कार्यरत सामाजिक, व्यावसायिक उद्योजक, व्यापारी, विद्यार्थी, सांस्कृतिक, क्रीडा आदी क्षेत्रातील संघटनांची या अभियानासंदर्भात बैठक घेण्यात आली. ते या मोहिमेत प्रत्यक्ष सहभाग घेणार असल्याचे पत्रपरिषदेत सांगितले. पत्रकार परिषदेला प्रयासचे डॉ. अविनाश सावजी, डॉ. आलोक गुप्ता, सुरेश राठी, डॉ. विजय कावलकर, प्रशांत बनगीनवार, डॉ. अनिल पटेल, कमल बागडी, अमोल साखरकर उपस्थित होते. (नगर प्रतिनिधी)शासनाचे सहकार्यया जलदायी अभियानासाठी शासन आणि लोकप्रतिनिधींनी चांगला प्रतिसाद दिला आहे. जिल्हाधिकारी राहुल रंजन महिवाल यांनी ९ एप्रिल रोजी या प्रश्नावर संबंधित विभागाची बैठक घेतली. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनीही आपल्या अधिनस्त यंत्रणेची बैठक घेतली. कृषी विभागाचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तात्रय गायकवाड यांनी देखील या मोहिमेस महात्मा फुले जलभूमी अभियानांतर्गत इंधन खर्च देण्याचे आश्वासन दिले. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने धरणातून गाळ काढण्याची परवानगी दिली असून या विभागाचे तांत्रिक सहकार्य मिळणार आहे. वनविभागाकडून निळोणा मार्गावरील जलस्रोतावर बांध बंदिस्तींच्या कामाला मदत करणार आहे. महसूल आणि कृषी विभागाची ग्रामीण भागातील यंत्रणा आणि यवतमाळ नगरपरिषद देखील या कार्याकरिता यांत्रिक सहकार्य करणार असल्याचे सांगितले.यवतमाळकरांना आवाहनया जल अभियानात यवतमाळकरांनी सहभागी होऊन कुठल्याही स्वरूपात मदत करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या अभियानासाठी येरावार चौकात माँ दुर्गा दवाबाजार येथे संपर्क कार्यालय स्थापन करण्यात आले असून यवतमाळकरांच्या कल्पना, सूचना कळवाव्या तसेच कुणाला याबाबत सविस्तर माहिती हवी असल्यास संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले.