शहरं
Join us  
Trending Stories
1
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
2
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
3
ट्रम्प यांचा चीनसोबत व्यापार करार, आता भारतासंदर्भात केलं मोठं विधान; म्हणाले- 'खूप मोठा...'
4
प्लेन क्रॅशनंतर खुशाल ऑफिसात पार्टी करत होते, एअर इंडियाने 4 अधिकाऱ्यांना झटक्यात 'किक आउट' केले!
5
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
6
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
7
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
8
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
9
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
10
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
11
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
12
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
13
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
14
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
15
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
16
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
17
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
18
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
19
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल
20
"चल पळून जाऊन लग्न करूया..." संजनानं शेअर केली लग्नाआधीची ती गोष्ट; बुमराहचा चेहराच पडला (VIDEO)

शहरात होणार पाण्याच्या आणखी सोळा टाक्या

By admin | Updated: June 12, 2017 02:01 IST

गेल्या काही वर्षांपासून शहरातील नागरिकांना पाण्याच्या समस्येला तोंड द्यावे लागत आहे.

पाण्याचा दाब वाढणार : ‘अमृत’मधून होणार पाणीपुरवठ्याची विविध कामेलोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : गेल्या काही वर्षांपासून शहरातील नागरिकांना पाण्याच्या समस्येला तोंड द्यावे लागत आहे. उन्हाळ्यातील पाणीटंचाई तर पाचवीलाच पुजली आहे. यात भरीस भर म्हणजे, कमी दाबाचा पाणीपुरवठा. हा प्रश्न निकाली निघावा यासाठी यवतमाळ शहरात विविध भागांमध्ये १६ नवीन टाक्यांची निर्मिती केली जाणार आहे. ‘अमृत’ योजनेतून पाणीपुरवठ्याची विविध कामे हाती घेतली जाणार आहे. यवतमाळ शहराची मागील ४५ वर्षांपासून तहान भागविणारा निळोणा प्रकल्प आचक्या देवू लागला आहे. उन्हाळ्याचे चार महिने या प्रकल्पातून पाणीपुरवठा म्हणजे नागरिकांच्या आरोग्यास घातक ठरत आहे. गाळाने भरलेल्या या धरणाची साठवण क्षमता कमी झाली आहे. दोन-तीन पाण्यातच हा प्रकल्प ओव्हर फ्लो होतो. शहराची पाण्याची गरज लक्षात घेता सोबतीला असलेला चापडोह प्रकल्पाचा आधार गेली काही वर्षांपासून घ्यावा लागत आहे. पुढील काही वर्षात निळोणा प्रकल्प ‘होता’ असे म्हणण्याची वेळ शहरवासीयांवर येवू शकते. गाळ काढण्याचा खर्च आवाक्याबाहेर असल्याने ही शक्यता अधिक आहे. आता बेंबळा प्रकल्पावरून पाणी आणण्याची तयारी आहे. सोबतच शहराला मोठ्या प्रमाणात भेडसावणारा कमी दाबाने पाणीपुरवठ्याचा प्रश्नही निकाली काढला जाणार आहे. यासाठी ठिकठिकाणी सहा ते बारा लाख लिटर क्षमतेच्या नवीन टाक्या उभारल्या जाणार आहे. येत्या वर्षभरात किमान नऊ टाक्या पूर्ण क्षमतेने तयार होतील, असे सांगितले जात आहे. पुढील तीन वर्षात ही कामे पूर्ण करण्याचा प्रयत्न आहे, अशी माहिती महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे उपविभागीय अभियंता अजय बेले यांनी दिली. यासाठीची आवश्यक ती प्रक्रियाही पूर्ण झाली असल्याचे ते म्हणाले.नवीन टाक्यांचे क्षेत्र व क्षमताचापडोह पुनर्वसन (सहा लाख लिटर), रूक्मिणीनगर (नऊ लाख लिटर), जिंद्राननगर (नऊ लाख लिटर), आरटीओ कार्यालयामागे (नऊ लाख लिटर), राजारामनगर (नऊ लाख लिटर), उमरसरा (नऊ लाख लिटर), बेले ले-आऊट (दहा लाख लिटर), वनवासी मारोती मंदिर परिसर (बारा लाख लिटर), सुयोगनगर दुसरी टाकी (चार लाख लिटर), शिवाजीनगर (चार लाख लिटर), वाघापूर टेकडी दुसरी टाकी (चार लाख लिटर), प्रिया रेसिडेन्सी परिसर (पाच लाख लिटर), विसावा कॉलनी (पाच लाख लिटर), चांदोरेनगर (दहा लाख लिटर), पॉलिटेक्नीक परिसर (दहा लाख लिटर), विठ्ठलवाडी (आठ लाख लिटर).