शहरं
Join us  
Trending Stories
1
'सर्व भारतीयांचा DNA एकच; हिंदू राष्ट्र म्हणजे...', RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे विधान
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा ४ वेळा फोन, पण PM मोदींचा बोलण्यास नकार; जर्मन वृत्तपत्राचा दावा
3
डीएचएलसह अनेक कंपन्यांनी अमेरिकेकडे पाठवणारे पार्सल थांबवले! डोनाल्ड ट्रम्प यांच्यामुळे उडाला गोंधळ
4
फोनमधील 'या' सेटिंग्ज बदलाल तर वाचेल बराच इंटरनेट डेटा! अनेकांना माहीत नाहीत सोप्या टिप्स
5
प्रेरणादायी अध्यात्मिक वक्त्या जया किशोरी यांच्या हस्ते होणार श्रीमंत भाऊसाहेब रंगारी बाप्पाची प्राणप्रतिष्ठा!
6
सिंहगडावर 'त्या' ५ दिवसांत काय काय घडलं? बेपत्ता झालेल्या गौतम गायकवाडने सांगितला थरार
7
काश्मीर खोऱ्यातील तीन मंडळांना गणेश मूर्ती प्रदान; पुनीत बालन यांच्यासह मानाच्या गणेश मंडळाचा स्तुत्य उपक्रम!
8
वैष्णोदेवी यात्रा मार्गावर मोठा अपघात; भूस्खलनामुळे ५ भाविकांचा मृत्यू, १४ जखमी
9
Vidarbha Weather Alert: पावसाचा विदर्भाकडे मोर्चा; अनेक ठिकाणी मुसळधार कोसळणार; कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट?
10
आणखी एक 'निक्की', हुंड्याने घेतला संजूचा जीव; मुलीसह स्वतःला पेटवलं, चिठ्ठीत म्हणाली...
11
किचनमधील 'या' वस्तूंमुळे दुप्पट वाढतो कॅन्सरचा धोका; डॉक्टर म्हणाले, आताच उचला अन् बाहेर फेका
12
७ मुलांची आई २२ वर्षांच्या भाच्याच्या प्रेमात पडली, पळून जायचा प्लॅन केला अन् पतीचे तीन लाखही केले लांपास!
13
बदल्याची आग! लव्ह मॅरेजनंतर पहिल्यांदा गावी आलं कपल; कुटुंब झालं हैवान, केली जावयाची हत्या
14
"मुंबईत येणारच, न्यायदेवता नक्कीच न्याय देईल", हायकोर्टाच्या निर्णयानंतरही मनोज जरांगे ठाम
15
पाकिस्तानला आसिम मुनीर यांचं किती कौतुक! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये आपटल्यानंतरही सरकारने दिलं मोठ बक्षीस
16
दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष ली व्हाईट हाऊसमध्ये, ट्रम्प यांची घेतली भेट! चर्चेत झाला किम जोंग उनचा उल्लेख
17
झाली का गणपती पूजेची तयारी? काय राहिलं, काय घेतलं? झटपट तपासून घ्या पूजा साहित्य 
18
Nikki Murder Case : "न्यायाच्या बदल्यात न्याय, रक्ताच्या बदल्यात रक्त, आम्ही मुलगी गमावली"; निक्कीच्या आईचा टाहो
19
संधी मिळताच मोलकरणीने मारला डल्ला, घरातून ३५ लाखांचे दागिने, १० लाखांची रक्कम लंपास
20
Yavatmal: 'ती' गोष्ट लपवण्यासाठी रात्रीस 'खेळ'?; ग्रामसभेच्या आदल्या दिवशीच फोडले ग्रामपंचायत कार्यालय अन्...

शहरात होणार पाण्याच्या आणखी सोळा टाक्या

By admin | Updated: June 12, 2017 02:01 IST

गेल्या काही वर्षांपासून शहरातील नागरिकांना पाण्याच्या समस्येला तोंड द्यावे लागत आहे.

पाण्याचा दाब वाढणार : ‘अमृत’मधून होणार पाणीपुरवठ्याची विविध कामेलोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : गेल्या काही वर्षांपासून शहरातील नागरिकांना पाण्याच्या समस्येला तोंड द्यावे लागत आहे. उन्हाळ्यातील पाणीटंचाई तर पाचवीलाच पुजली आहे. यात भरीस भर म्हणजे, कमी दाबाचा पाणीपुरवठा. हा प्रश्न निकाली निघावा यासाठी यवतमाळ शहरात विविध भागांमध्ये १६ नवीन टाक्यांची निर्मिती केली जाणार आहे. ‘अमृत’ योजनेतून पाणीपुरवठ्याची विविध कामे हाती घेतली जाणार आहे. यवतमाळ शहराची मागील ४५ वर्षांपासून तहान भागविणारा निळोणा प्रकल्प आचक्या देवू लागला आहे. उन्हाळ्याचे चार महिने या प्रकल्पातून पाणीपुरवठा म्हणजे नागरिकांच्या आरोग्यास घातक ठरत आहे. गाळाने भरलेल्या या धरणाची साठवण क्षमता कमी झाली आहे. दोन-तीन पाण्यातच हा प्रकल्प ओव्हर फ्लो होतो. शहराची पाण्याची गरज लक्षात घेता सोबतीला असलेला चापडोह प्रकल्पाचा आधार गेली काही वर्षांपासून घ्यावा लागत आहे. पुढील काही वर्षात निळोणा प्रकल्प ‘होता’ असे म्हणण्याची वेळ शहरवासीयांवर येवू शकते. गाळ काढण्याचा खर्च आवाक्याबाहेर असल्याने ही शक्यता अधिक आहे. आता बेंबळा प्रकल्पावरून पाणी आणण्याची तयारी आहे. सोबतच शहराला मोठ्या प्रमाणात भेडसावणारा कमी दाबाने पाणीपुरवठ्याचा प्रश्नही निकाली काढला जाणार आहे. यासाठी ठिकठिकाणी सहा ते बारा लाख लिटर क्षमतेच्या नवीन टाक्या उभारल्या जाणार आहे. येत्या वर्षभरात किमान नऊ टाक्या पूर्ण क्षमतेने तयार होतील, असे सांगितले जात आहे. पुढील तीन वर्षात ही कामे पूर्ण करण्याचा प्रयत्न आहे, अशी माहिती महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे उपविभागीय अभियंता अजय बेले यांनी दिली. यासाठीची आवश्यक ती प्रक्रियाही पूर्ण झाली असल्याचे ते म्हणाले.नवीन टाक्यांचे क्षेत्र व क्षमताचापडोह पुनर्वसन (सहा लाख लिटर), रूक्मिणीनगर (नऊ लाख लिटर), जिंद्राननगर (नऊ लाख लिटर), आरटीओ कार्यालयामागे (नऊ लाख लिटर), राजारामनगर (नऊ लाख लिटर), उमरसरा (नऊ लाख लिटर), बेले ले-आऊट (दहा लाख लिटर), वनवासी मारोती मंदिर परिसर (बारा लाख लिटर), सुयोगनगर दुसरी टाकी (चार लाख लिटर), शिवाजीनगर (चार लाख लिटर), वाघापूर टेकडी दुसरी टाकी (चार लाख लिटर), प्रिया रेसिडेन्सी परिसर (पाच लाख लिटर), विसावा कॉलनी (पाच लाख लिटर), चांदोरेनगर (दहा लाख लिटर), पॉलिटेक्नीक परिसर (दहा लाख लिटर), विठ्ठलवाडी (आठ लाख लिटर).