शहरं
Join us  
Trending Stories
1
Anil Ambani : अनिल अंबानी अडचणीत? घरासह इतरही ठिकाणांवर सकाळपासूनच छापे; १७००० कोटींच्या बँक कर्ज घोटाळाप्रकरणी CBI ची कारवाई!
2
'भारत-पाकिस्तान मुद्द्यावर कोणतीही मध्यस्थी स्वीकार्य नाही', परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी नाव न घेता ट्रम्प यांना स्पष्टच सांगितले
3
मुंबईत घडामोडींना वेग, शिवसेना शिंदे गटाच्या मंत्र्यांनी घेतली शरद पवारांची भेट; कारण काय?
4
सरकारची 'उपसमिती' म्हणजे 'जुनेच खुळ', आमच्या मागण्यांचे काय? मनोज जरांगेंचा संतप्त सवाल
5
नागपूर: चालकाला येऊ लागली झोप, स्वतःच कार...; अपघातात कुलगुरू हरेराम त्रिपाठी यांचा पत्नीसह मृत्यू
6
एक ऑर्डर पोहोचवण्यासाठी Myntra आणि Amazon च्या डिलिव्हरी बॉयला किती पैसे मिळतात?
7
मुंबईत घडतेय तरी काय? आता अमित ठाकरेंनी घेतली आशिष शेलारांची भेट; राजकीय वर्तुळात चर्चा
8
"छन छन छन...असा आवाज करत ते...", प्रिया बापटनं सांगितला दादरच्या घरातील थरकाप उडवणारा प्रसंग
9
ठरलं! मेस्सी अर्जेंटिनाचा अख्खा वर्ल्ड चॅम्पियन संघ घेऊन भारतात खेळायला येतोय! कधी अन् कुठं रंगणार सामना?
10
विराट आणि रोहित वनडेतून कधी निवृत्त होणार? राजीव शुक्ला स्पष्टच बोलले...
11
भाद्रपद महिन्यात गौरी, गणपती आणि पितृपक्षही; जाणून घ्या या मराठी महिन्याचे महत्त्व!
12
अखेर लग्नाच्या ३८ वर्षांनंतर गोविंदा आणि सुनीताचा होतोय घटस्फोट? चीचीचे वकील म्हणाले...
13
खिलाडी अन् अनाडी १६ वर्षांनंतर एकत्र येणार, अक्षय कुमार-सैफ अली खानच्या 'हैवान'चं शूट सुरु
14
काजोलच्या 'द ट्रायल' सीझन २ चा दमदार ट्रेलर पाहिलात का? सोनाली कुलकर्णीचीही मुख्य भूमिका
15
विराट-धोनी नव्हे, तर हा आहे जगातला सर्वात श्रीमंत क्रिकेटर; बघा टॉप-5 क्रिकेटर्सची लिस्ट...!
16
उपराष्ट्रपती निवडणूक २०२५: “पवार-ठाकरेंची भूमिका विरोधाभासी, राष्ट्रहितविरोधी”; भाजपाची टीका
17
कर्जाचं ओझं कमी करतेय अनिल अंबानींची कंपनी; आता २००० कोटी रुपयांत विकणार पुणे-सातारा टोल रोड प्रोजेक्ट
18
जगदीप धनखड नेमके आहेत तरी कुठे? ते सध्या काय करतात?; महत्त्वाची माहिती समोर आली, पत्ता लागला!
19
काळाचा घाला...! पाटण्यात भीषण अपघात, ट्रक-ऑटोच्या धडकेत गंगा स्नानासाठी जात असलेल्या ७ महिलांसह ८ जणांचा मृत्यू!
20
रात्रभर नोटा जाळल्या, तरीही पैसे संपले नाहीत; अधीक्षक अभियंता निघाला काळ्या धनाचा कुबेर!

मान्सूनपूर्व वादळाचा कहर

By admin | Updated: May 29, 2017 00:22 IST

जिल्ह्यात शनिवारी सायंकाळच्या सुमारास मान्सूनपूर्व पावसाने वादळासह हजेरी लावली. या वादळी पावसाने २०० घरांवरील टिनपत्रे उडाली,

आठ तालुक्यांना फटका : महावितरणला ४३ लाखांचा झटका लोकमत न्यूज नेटवर्क यवतमाळ : जिल्ह्यात शनिवारी सायंकाळच्या सुमारास मान्सूनपूर्व पावसाने वादळासह हजेरी लावली. या वादळी पावसाने २०० घरांवरील टिनपत्रे उडाली, अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली. जिल्ह्यातील आठ तालुक्यात महावितरणचे तब्बल ४३ लाखांचे नुकसान झाले. जिल्ह्यात शनिवारी सायंकाळी वादळी पावसाने हजेरी लावली. वणी, पांढरकवडा, दारव्हा, मारेगाव, झरी, नेर, बाभूळगाव, राळेगाव, यवतमाळ आदी तालुक्याला पाऊस आणि वादळने झोडपून काढले. वणी, पांढरकवडा, नेर आणि दारव्हा तालुक्यातील सर्वाधिक गावांना या वादळाचा तडाखा बसला. नेर तालुक्यातील घुई, लिंगा, बोरगाव, मोझर, सोनखास, उत्तरवाढोणा, लासीना परिसरात १५ मिनीटांच्या वादळाने अनेक घरांवरील टिनपत्रे उडून गेली. अनेक झाडे व वीज खांब मोठ्या प्रमाणात उन्मळून पडले. अनेक घरांचीही पडझड झाली. दारव्हा तालुक्यात कामठवाडा, चाणी, चिकनीत वादळाने कहर केला. दारव्हा-यवतमाळ मार्गावरील रस्त्याच्या दुतर्फा असलेले अनेक वृक्ष उन्मळून पडले. हा मार्ग तब्बल १० तास बंद असल्याने वाहतूक ठप्प पडली. अनेक वीज खांब तुटून पडल्याने या परिसरात वीज पुरवठा खंडित झाला. यवतमाळ तालुक्यातील तिवसा, वारज, हिवरी, इचोरीतही मोठे नुकसान झाले. हिवरीत दिलीप जोशी यांच्या घरावर झाड पडल्याने मोठे नुकसान झाले. बाभूळगाव, वणी व पांढरकवडा तालुक्यालाही वादळाचा मोठा फटका बसला. आठ तालुक्यातील शेतकऱ्यांच्या उन्हाळी पिकांचे या वादळामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अवकाळी पाऊस व वादळामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून तातडीने अहवाल सादर करण्याचे निर्देश पालकमंत्री मदन येरावार यांनी जिल्हा प्रशासनाला दिले आहे. त्यांनी दारव्हा तालुक्यातील काही गावांना भेट देऊन पाहणी केली. जिल्ह्यात ३६० खांब कोसळले वादळाने महावितरणलाही मोठा फटका बसला. कामठवाडा-चाणी येथे ४० खांब कोसळले. राळेगावमधील वडकी, झाडगाव परिसरात १६ खांब तुटले. रूई-वाई आणि हिवरीमध्ये १६ खांब तुटले आहे. वणी तालुक्यात नांदेपेरा परिसरात २५ खांब बाधीत झाल्याने परिसरातील १५ गावांचा वीज पुरवठा खंडित आहे. जिल्ह्यात एकूण ३६० खांब कोसळले. उच्च दाब व लघुदाब वाहिनीचे खांब कोसळल्याने महावितरणला ४३ लाखांचा फटका बसला आहे. या वादळाने भुईमूगाचे मोठे नुकसान झाले.