शहरं
Join us  
Trending Stories
1
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
2
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
3
ट्रम्प यांचा चीनसोबत व्यापार करार, आता भारतासंदर्भात केलं मोठं विधान; म्हणाले- 'खूप मोठा...'
4
प्लेन क्रॅशनंतर खुशाल ऑफिसात पार्टी करत होते, एअर इंडियाने 4 अधिकाऱ्यांना झटक्यात 'किक आउट' केले!
5
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
6
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
7
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
8
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
9
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
10
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
11
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
12
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
13
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
14
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
15
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
16
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
17
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
18
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
19
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल
20
"चल पळून जाऊन लग्न करूया..." संजनानं शेअर केली लग्नाआधीची ती गोष्ट; बुमराहचा चेहराच पडला (VIDEO)

कोळसा कंपनीकडून जनतेची दिशाभूल

By admin | Updated: June 16, 2014 23:44 IST

येथील कोळसा कंपनीने मागील आठ महिन्यापूर्वी दिलेल्या लेखी आश्वासनाला केराची टोपली दाखविल्यामुळे जनतेत तीव्र संतापाची लाट उसळली आहे. ही कंपनी दिशाभूल करीत असल्याचा ग्रामस्थांचा आरोप आहे.

मुकुटबन : येथील कोळसा कंपनीने मागील आठ महिन्यापूर्वी दिलेल्या लेखी आश्वासनाला केराची टोपली दाखविल्यामुळे जनतेत तीव्र संतापाची लाट उसळली आहे. ही कंपनी दिशाभूल करीत असल्याचा ग्रामस्थांचा आरोप आहे.येथील खुल्या कोळसा खाणीच्या वाहनाने अडेगाव येथील देवेंद्र पालीवाल यांचा बळी घेतला होता. त्या घटनेला अनुसरून वातावरण तापले होते. संतप्त जमावाने बसस्थानक परिसरात टिप्पर जाळला होता. त्यानंतर जनक्षोम उसळला़ वातावरण तणावपूर्ण होते़ बसस्थानकासमोरच आंदोलनाला सुरूवात झाली होती. घटनास्थळाला तत्कालीन तहसीलदार ठमके यांनी भेट दिली़ पोलीस निरीक्षकांच्या मध्यस्थीने जनतेच्या मागण्या पूर्ण करण्याची ग्वाही कोळसा कंपनीने त्यावेळी दिली होती.पीडित पालीवाल कुटुंबियांनी बसस्थानकासमोर आमरण उपोषण केले होते. त्यावेळी अनेक पुढाऱ्यांनी पीडित कुटुंबाला ३० लाख रूपये देण्याची मागणी केली होती. परंतु कोळसा कंपनीने कोणतीही हालचाल केली नाही. नंतर काही महिन्यांनी पीडित कुटुंबाला पाच लाख रूपयांचा धनादेश देण्यात आला. त्यानंतर अनेकदा येथील ग्रामपंचायतीत कंपनी अधिकाऱ्यांसोबत बैठका झाल्या. त्यात जनतेने २० च्या वर मागण्या मांडल्या़ त्यापैकी १८ मागण्या कंपनीने मंजूर करण्याचा प्रयत्न केला़ मात्र अद्यापही कंपनीच्या गेटपासून ते एका बारपर्यंत रस्ता पक्का झालाच नाही. रस्ता दुभाजकही तयार झाले नाही. जनतेने कंपनीचे कोळसा वाहतूक करणारे टिप्पर रात्री १० ते पहाटे ६ वाजेपर्यंत सुरू करण्यास परवानगी दिली होती. मात्र मागण्या पूर्ण होण्याआधीच कंपनी दिवसा वाहतूक सुरू करणार असल्याचे संकेत मिळाल्यामुळे जनतेत तीव्र संतापाची लाट उसळली आहे़ दिवसा वाहतूक सुरू झाली, विपरीत परिणाम घडण्याची शक्यता आहे. त्यामुळे कंपनीने जनतेच्या मागण्यांना केराची टोपली न दाखविता मागण्या त्वरित पूर्ण कराव्यात, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. (शहर प्रतिनिधी)