शहरं
Join us  
Trending Stories
1
युतीचा श्रीगणेशा! उद्धव ठाकरे सहकुटुंब राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपतीचं घेतले दर्शन
2
भारतावर 50% टॅरिफ लावून ट्रम्प यांनी स्वतःच्याच पायावर कुऱ्हाड मारली, आता लागणार अमेरिकेची 'लंका'! आला असा अहवाल
3
मुंबईच्या दिशेने मराठा मोर्चा: "शांततेचं आंदोलन कुणीच रोखू शकत नाही," मनोज जरांगेंचा निर्धार
4
"लोक ओरडत होते, मी दगड पडताना पाहिले, मला..."; वैष्णोदेवी मार्गावर नेमकं काय घडलं?
5
३६ दिवस डिजिटल अरेस्ट; सायबर ठगांनी निवृत्त एअरफोर्स अधिकाऱ्याकडून ३.२२ कोटी लुटले...
6
बिहारमध्ये मंत्री श्रवण कुमार यांच्यावर जीवघेणा हल्ला; अनेक किलोमीटर पाठलाग, बॉडीगार्ड जखमी
7
भारतासमोर 'ट्रम्प'नीती अयशस्वी; मोदी फोन न उचलण्याचं कारण काय, अमेरिकन एक्सपर्ट सांगतात..
8
वैष्णोदेवी भूस्खलनात आतापर्यंत ३० मृत्युची नोंद; बचावकार्य सुरू, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता
9
Ganesh Chaturthi 2025: फक्त गणेश चतुर्थीला बाप्पाला दुर्वा नाही तर तुळस वाहतात; असे का? ते जाणून घ्या
10
मनोज जरांगेंच्या ताफ्याला जालना पोलिसांचा 40 अटींसह हिरवा कंदील, ड्रोनद्वारे राहणार नजर
11
ट्रम्प टॅरिफचा भारताच्या कोण-कोणत्या क्षेत्रांवर परिणाम होणार? 'या' क्षेत्रांना कमी तर 'या' सेक्टरला बसू शकतो सर्वाधिक फटका!
12
अंतरवाली सराटीतून आज मराठा बांधव मुंबईकडे, गावा-गावात स्वागताची जय्यत तयारी
13
KCL 2025: पदार्पणाच्या सामन्यात हॅटट्रिक, भारताच्या युवा गोलंदाजाचा केसीएलमध्ये धुमाकूळ!
14
"एवढे शुल्क लाऊ की तुमचं...!"; पंतप्रधान मोदींसोबतच्या फोन कॉलसंदर्भात ट्रम्प यांचा मोठा दावा!
15
Vasai: वसईत चार मजली इमारतीचा भाग कोसळला; दोघांचा मृत्यू, ९ जण जखमी!
16
गणेश चतुर्थी २०२५: गणपतीच्या नावापुढे 'बाप्पा' आणि 'मोरया' हे शब्द का आणि कसे जोडले गेले? वाचा!
17
Amravati: पॉर्न व्हिडिओ पाहण्यापासून रोखल्याने मुलांचा वडिलांवर हल्ला, अमरावतीतील घटना!
18
भारताचे ‘सुदर्शन चक्र’ होणार ढाल अन् तलवारही, भारताचे आत्मनिर्भर होण्याच्या दृष्टीने आणखी एक पाऊल
19
खासगी शिकवणीकडे वाढला विद्यार्थ्यांचा ओढा, शालेय शिक्षणावर केंद्र सरकारने केलेल्या सर्वेक्षणातील निष्कर्ष
20
एका पक्षकाराला सकाळी, दुसऱ्याला दुपारी बोलावले अन् प्रकरण निकाली! राज्य माहिती आयोगाचा असाही कारभार

हमीदराच्या बोलीवर व्यापाऱ्यांचा दबाव

By admin | Updated: January 8, 2017 00:58 IST

तुरीच्या पडलेल्या दराला संजीवनी मिळावी म्हणून खुल्या बाजारातून हमीदराने तूर खरेदीचा अधिकार हमी केंद्रांना देण्यात आला.

शेतकरी वाऱ्यावर : खुल्या बाजारात बोलीवर प्रश्नचिन्ह यवतमाळ : तुरीच्या पडलेल्या दराला संजीवनी मिळावी म्हणून खुल्या बाजारातून हमीदराने तूर खरेदीचा अधिकार हमी केंद्रांना देण्यात आला. त्यासाठी खुल्या बाजारात बोली लावण्याचा अधिकार देण्यात आला. मात्र या अधिकारावर दबाव निर्माण करण्याची मोहीम व्यापाऱ्यांनी सुरू केली. त्यामुळे खुल्या बाजारात हमीदराने तुरीची बोली लागणार किंवा नाही, यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. डाळवर्गीय पिकांचा पेरा वाढविण्याचे आवाहन सरकारने केले. मात्र या शेतमालाला चांगले दर देण्याची शाश्वती शासनाने दिली नाही. परिणामी तूर बाजारात येताच तुरीचे दर कोसळले. हे दर हमी दराच्या खाली आहेत. हमीदर आणि प्रत्यक्षात बाजारातील दर यात तब्बल १२०० रूपयांची तफावत आहे. केंद्र शासनाने तुरीला प्रती क्विंटल ५०५० रूपये हमी दर जाहीर केले. तथापि बाजारात प्रत्यक्षात ३८०० ते ४२०० रूपये क्विंटल दराने नवीन तुरीची खरेदी होत आहे. यात शेतकऱ्यांना क्विंटलमागे १२०० रूपये कमी मिळत असल्याने ते प्रचंड हादरले आहे. या स्थितीत तुरीला हमी केंद्राचाच आधार आहे. शेतकरी या केंद्रांकडे मोठ्या प्रमाणात जाण्याची शक्यता आहे. यामुळे धास्तावलेल्या व्यापाऱ्यांनी हमी केंद्र सुरू होण्यापूर्वीच दबावतंत्र निर्माण करण्यास प्रारंभ केला आहे. तूर खरेदी करायची असेल, तर सर्वच करा, नाही तर एकाच ठिकाणी तूर खरेदी सुरू ठेवा, असा अप्रत्यक्ष निरोप त्यांनी सरकारी केंद्र चालकांपर्यंत पोहचविला आहे. त्यामुळे गेल्यावर्षीचा अनुभव लक्षात घेता हमी केंद्र चालकांनी दक्षता घेण्यास सुरूवात केली आहे. बाजार समितीमध्ये तुरीचे खरेदी केंद्र सुरू झाले तरी ते एकाच ठिकाणी राहणार आहे. यामुळे हमी केंद्र सुरू झाले, तरी शेतकऱ्यांच्या तुरीला दर मिळण्याची शक्यता कमीच आहे. यातून व्यापाऱ्यांनाच लाभ होणार आहे. शेतकऱ्यांचे मात्र नुकसानच होणार आहे. शेतकऱ्यांना बळ देण्यासाठी जिल्हा प्रशासनाने हमी केंद्र चलकांना संरक्षण पुरविण्याची नितांत आवशकता आहे. तरच हमी केंद्र उघडण्याचा उद्देश सफल होणार आहे. (शहर वार्ताहर) जिल्ह्यात केवळ चार केंद्र जिल्ह्यात तूर खरेदीसाठी नाफेडचे दोन आणि एफसीआयचे दोन, असे चारच हमी केंद्र सुरू झाले आहे. यवतमाळ, बाभूळगाव, राळेगाव आणि आर्णी येथे ही केंद्रे सुरू झाली आहे. उर्वरित १२ तालुक्यांमध्ये तूर खरेदी केंद्रच नाही. त्यामुळे यात्तालुक्यातील शेतकऱ्यांना तूर बाजारात नेण्यासाठी मोठी कसरत करावी लागणार आहे. याला आळा घालण्यासाठी १२ केंद्रावर खरेदी सुरू करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.