शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
2
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
3
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
4
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
5
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
6
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
7
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
8
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
9
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
10
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
11
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
12
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
13
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
14
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
15
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
16
गेल्याच वर्षी मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पूर्णा आजी, 'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडल्या आणि मग...
17
मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका
18
"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन
19
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
20
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?

राणे यांची मोहदा, पारवा येथे सभा

By admin | Updated: February 15, 2017 02:45 IST

शेतकऱ्यांच्या मालाला भाव नाही. त्यांची संपूर्ण दुर्दशा झाली आहे. त्याला केंद्र व राज्यातील भाजप

नागरिकांचा प्रतिसाद : केंद्र व राज्य सरकारने शेतकऱ्यांना देशोधडीला लावल्याचा आरोप पांढरकवडा/पारवा : शेतकऱ्यांच्या मालाला भाव नाही. त्यांची संपूर्ण दुर्दशा झाली आहे. त्याला केंद्र व राज्यातील भाजप सरकारच जबाबदार असल्याचा आरोप काँग्रेसचे जेष्ठ नेते, माजी मुख्यमंत्री आमदार नारायण राणे यांनी मोहदा व पारवा येथे मंगळवारी दुपारी जाहीर सभेत केला. काँग्रेसच्या जिल्हा परिषद व पंचायत समिती उमेदवारांसाठी आयोजित सभेत राणे बोलत होते. ते पुढे म्हणाले, सोयाबीनला सात हजारांचा भाव मागणाऱ्या फडणविसांना आता कोणी रोखले ? सोयाबीनला आता का सात हजार रूपये भाव देत नाही? गरिबांसाठी काँग्रेस सरकारने सुरू केलेल्या कल्याणकारी योजनांची नाव बदलवून जनतेला तुम्ही किती दिवस फसविणार, असा प्रश्न त्यांनी केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा त्यांनी चांगलाच समाचार घेतला. शिवसेनेचा हात धरून सत्ता मिळविणारे आता शिवसेनेला संपविण्याची भाषा करीत आहे. ही त्यांची दुटप्पी भाषा असल्याचा आरोप त्यांनी केला. जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक निमित्ताने सत्ताधारी पक्षाला धडा शिकविण्याची वेळ आली असून या संधीचा लाभ घेऊन जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत १२५ वर्षाची परंपरा असलेल्या आमच्या पक्षाच्या उमेदवारांना बळ देण्याचे आवाहन त्यांनी केले. पारवा येथे त्यांनी केंद्र सरकारच्या नोटाबंदी निर्णयावर सडकून टीका केली. या निर्णयामुळे गरीब, शेतकरी, मजूर आणि ग्रामीण भागातील सामान्य जनतेला प्रचंड हाल सहन करावे लागले, असा आरोप त्यांनी केला. त्यामुळे आता ही जनताच त्यांना धडा शिकवेल, असा इशाराही त्यांनी दिला. यावेळी माजी मंत्री अ‍ॅड. शिवाजीराव मोघे, प्रा.वसंतराव पुरके व जितेंद्रसिंग कोंघारेकर, बाबू धोपे, फारूक सिद्धीकी, रिजवान भाई व पांढरकवडा, राळेगाव व कळंब तालुक्यातील पक्षाचे उमेदवार यावेळी उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)