शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

मारेगावचे ग्रामीण रूग्णालय आॅक्सिजनवर

By admin | Updated: April 8, 2017 00:16 IST

येथील ग्रामीण रूग्णालयात डॉक्टरांच्या कमतरतेमुळे रूग्णालय आॅक्सिजनवर आले असून उपचाराअभावी गरीब जनतेचे आरोग्यच धोक्यात आले आहे.

कायमस्वरूपी डॉक्टर नाही : प्रभारावरच कारभार सुरू, रूग्णालयात पाण्याची टंचाई मारेगाव : येथील ग्रामीण रूग्णालयात डॉक्टरांच्या कमतरतेमुळे रूग्णालय आॅक्सिजनवर आले असून उपचाराअभावी गरीब जनतेचे आरोग्यच धोक्यात आले आहे. तालुक्यात आरोग्याच्या सुविधा अपुऱ्या आहे. तालुक्यातील १०५ गावासाठी दोन प्राथमिक आरोग्य केंद्र व एक शहरात ग्रामीण रूग्णालय आहे. परंतु आरोग्य विभागात कर्मचाऱ्यांची कमतरता हा आता नेहमीचाच विषय बनला आहे. गेल्या दीड वर्षांपासून तालुक्याला तालुका आरोग्य अधिकारी नाही, प्रभारावर काम निभावले जात आहे. गेल्या दोन वर्षापासून येथील ग्रामीण रूग्णालय कर्मचाऱ्यांच्या कमतरतेमुळे आणि इतर कारणाने आॅक्सिजनवर आहे. उपचार करण्यासाठी रूग्णांना तासन्तास प्रतीक्षा करावी लागते. बरेचदा तर रूग्णालयात उपस्थित कर्मचारीच रूग्णांवर उपचार करतात. सध्या येथील रूग्णालयात एकही कायमस्वरूपी डॉक्टर नाही. वैद्यकीण अधिकाऱ्यांचा प्रभार वणी येथील डॉ.चंद्रशेखर खांबे यांच्याकडे सोपविला आहे. ते वणीसोबतच मारेगाव रूग्णालयाचा कारभार सांभाळतात. ग्रामीण रूग्णालयात एकही डॉक्टर नसल्याने प्राथमिक आरोग्य केंद्र वेगावचे डॉ.सतिश कोडापे व पांढरकवडा येथी डॉ.नैताम यांना प्रतिनियुक्तीवर देण्यात आले. एक डॉक्टर सलग तीन दिवस म्हणजे ७२ तास रूग्णांच्या सेवेत असतो. येथील रूग्णालयात पाणी टंचाई असल्याने एकाही कुलर आजतागायत लागले नाही. खिडक्यांना तावदाणे नसल्याने गरम हवेने रूग्ण होरपळून निघत आहे. पिण्याच्या पाण्याची बिकट स्थिती आहे. नगरपंचायतीचे नळ आले, तरच टाकीत पाणी भरले जाते. नाही तर रूग्ण पाण्यासाठी परिसरात भांडे घेऊन फिरत असतात. औषधाचा तुटवडाही तर नित्याचीच बाब आहे. रूग्णांच्या उपचारासाठी बाहेरून औषधे आणावी लागतात. रूग्णांच्या तपासणीसाठी असलेले यंत्र जाग्यावरच सडले आहे. त्यामुळे नेमका ताप कशाचा आहे, हे शोधण्यासाठी रूग्णांची रक्त तपासणी बाहेरून करून आणावी लागते. ३० खाटाच्या येथील ग्रामीण रूग्णालयासाठी दोन शौचालय आहे. परंतु शौचालयाची दुरावस्था आणि पाण्याची टंचाई, यामुळे रूग्ण व नातेवाईक परिसरातच आपल्या विधी करतात. त्यामुळे सर्वत्र घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. अनेक अनेक असुविधा असल्याने डॉक्टर बहुतांश रूग्णांना सरळ रेफर करतात. त्यामुळे रूग्णांची प्रचंड गैरसोय होत आहे. (शहर प्रतिनिधी)