शहरं
Join us  
Trending Stories
1
'परिवार का साथ, परिवार का विकास...', बिहारमधून पीएम मोदींची काँग्रेस-रादजवर खोचक टीका
2
इस्रायलसोबत युद्ध सुरू असताना अचानक ३ इराणी विमाने ओमानमध्ये पोहोचली, नेमकं कारण काय?
3
Two-Wheeler New Rules : नवीन सर्व दुचाकींना 'एबीएस आणि दोन हेल्मेट' सक्तीचे; केंद्रीय परिवहन मंत्रालयाचा मोठा निर्णय
4
कुणी फुकट खाऊ घालत नाही...! आसिम मुनीर-डोनाल्ड ट्रम्प 'लन्च पॉलिटिक्स'नं पाकिस्तानचंच टेन्शन वाढवलं
5
Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेवेळी एका टिफिनवाल्याने वाचवला ८० डॉक्टरांचा जीव
6
एअर इंडियानं रद्द केली ८ उड्डाणं, आता काय घडलं? पुणे, मुंबई, दिल्लीसह अनेक मोठ्या शहरांतील प्रवाशांची अडचण
7
Pandharpur Wari 2025: आता स्वस्तात करा विठ्ठलाचे दर्शन; एसटी महामंडळाची खास ऑफर!
8
१ जुलैपासून बदलणार बँकिंगचे नियम, क्रेडिट कार्ड बिल पेमेंटमध्येही होणार बदल; जाणून घ्या माहिती
9
क्रुझर प्रेमींची पहिली पसंत; नवीन अवतारात येणार Bajaj ची Avenger, किंमत फक्त...
10
Debt on US: ट्रम्प अडकले... संकटात अमेरिका; कर्ज ३७ ट्रिलियन डॉलर्सच्या पार, भारताचं किती देणं लागतो US
11
आधी स्वत:च पत्नीचं कुंकू पुसलं, नंतर बॉयफ्रेंडसोबत लग्न लावलं; पती म्हणतो, “मला विष देऊन...”
12
इराण-इस्त्रायल युद्ध आता ट्रम्प विरुद्ध पुतिन; चीन, नॉर्थ कोरियाचा हुकुमशाह उघडपणे पुढे आले
13
पंढरपुरात मोठी घटना! मित्रासोबत विठू माऊलीच्या दर्शनाला आलेल्या तरुणाचा चंद्रभागा नदीत बुडून मृत्यू
14
'वर्षभरापूर्वीच एअर इंडियाच्या बोईंगमधील खराबीची माहिती दिलेली'; अहमदाबाद विमान अपघातावर खळबळजनक दावा
15
“पप्पा, आम्हाला भारतात बोलवा अन् फोन कट”; इराणमध्ये अडकली लेक, वडिलांना सतावतेय भीती
16
अभिषेक-करिश्मा कपूरचा झालेला साखरपुडा, पण लग्न का मोडलं? बिग बींनी केलेला खुलासा
17
बँकेत जाताय? थांबा! जुलैमध्ये १३ दिवस बँका बंद राहणार; पहा तुमच्या शहरातील सुट्ट्यांची यादी
18
मुंबई महापालिकेची निवडणूक मविआ एकत्र लढणार की नाही? शरद पवार म्हणाले, "उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची..."
19
Ashadhi Wari 2025: वारी म्हणजे केवळ पंढरपूरला चालत जाणं नव्हे, तर वारी म्हणजे सदेह वैकुंठाची वाट चालणं!
20
प्रियकरासोबत मिळून पतीची केली हत्या, लग्नाआधीपासून सुरू होते अफेअर; हत्येनंतर रचला बनाव

९२ वे अ.भा. मराठी साहित्य संमेलन; सधन साहित्यिकांसाठी रोखले गरिबांच्या रोजगाराचे साधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 11, 2019 12:47 IST

सरस्वतीचे साधक, देशभरातील गणमान्य लेखक ताजेतवाने चेहरे घेऊन अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या भव्य मांडवात बोलत होते, ऐकत होते. त्याच मांडवाच्या दारात शे-दोनशे कष्टाचे पाईक मात्र मजुरीविना तळमळत होते.

ठळक मुद्दे२०० मजुरांचा तीन दिवस वांदा सारस्वतांच्या दारात अडला माणसांचा लिलाव

लोकमत न्यूज नेटवर्कअविनाश साबापुरेयवतमाळ : सरस्वतीचे साधक, देशभरातील गणमान्य लेखक ताजेतवाने चेहरे घेऊन अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या भव्य मांडवात बोलत होते, ऐकत होते. त्याच मांडवाच्या दारात शे-दोनशे कष्टाचे पाईक मात्र मजुरीविना तळमळत होते. आशाळभूत नजरेने साहित्यिकांच्या गर्दीकडे पाहात होते. गर्दीवर फिरून आलेली नजर पुन्हा शून्यात बुडत होती. आजचा दिवस कसा लोटायचा, हा सवाल मात्र साहित्याच्या सोहळ्यातूनही सुटू शकला नाही...प्रसंग होता साहित्य संमेलनाच्या उद्घाटनाचा. पण प्रश्न होता दोनशे मजुरांच्या लिलावाचा.. हाताला काम मिळण्याच्या प्रतिक्षेचा. यवतमाळात शुक्रवारपासून जिथे अखिल भारतीय साहित्य संमेलनाचा उरूस भरला, त्याच जत्रेच्या पुढे दररोज मजुरांचा लिलाव होतो. पण शुक्रवारी साहित्य संमेलनासाठी रस्त्यांवरची वाहतूक वळविण्यात आली. त्यातच पूनम चौकात होणारा मजुरांचा लिलावही रोखण्यात आला.क्रिकेटच्या आयपीएलसाठी जसा खेळाडूंचा कोट्यवधी रूपयांत लिलाव होतो, तसाच यवतमाळात दररोज मजुरांचा ठेकेदारांकडून हर्रास होतो. गेल्या १५ वर्षांपासून पुनम चौकात हा रतीब सुरू आहे. २५-३० ठेकेदार हा लिलाव करतात. त्यातून २०० पेक्षा अधिक मजुरांना दिवसभराचे काम मिळते. पण शुक्रवारी साहित्य संमेलनाच्या भाऊगर्दीत हा लिलावच झाला नाही. शुक्रवारी पहाटेच पुनम चौकात रोजच्या प्रमाणे मजुरांची गर्दी लिलावासाठी जमली. त्याचवेळी प्रतिभावंत साहित्यिकांचीही वर्दळ वाढली. पोलिसांचा बंदोबस्त होता, वाहतूक रोखण्यात आली अन् मजुरांचा लिलाव झालाच नाही. सारस्वतांच्या मांडवात भाषेचा सोहळा मांडवाच्या दारात भाकरीचा शोध असा विरोधाभास निर्माण झाला होता.आमचा रोज कोण देणार?दिनेश रेड्डी, जनार्दन भगत, संजय शेलारे, अमोल कवाडे, हरिदास राडरी, सुधाकर सोनटक्के, क्रिष्णा पानतनवार, गजानन गुरनुले शेकडो मजुरांची गर्दी संमेलनाच्या प्रवेशद्वाराजवळच ठेकेदार येतील आणि आपल्याला कामासाठी नेतील म्हणून ताटकळत होती. नंतर त्यांना कळले आज लिलाव होणारच नाही. हे संमेलन तीन दिवस हाये. मंग तीन दिवस जर आमची हरार्सी झाली नाई तं आमचा रोज कोण देणार? हा मजुरांचा आर्त सवाल मात्र संमेलनातही अनुत्तरित राहिला.

टॅग्स :Marathi Sahitya Sammelanमराठी साहित्य संमेलन