शहरं
Join us  
Trending Stories
1
जागांवर तडजोड नाही, शिंदेसेना ठाम, भाजपाही मागे हटेना; अहिल्यानगरमध्ये महायुतीत फूट पडणार?
2
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
3
Dollar vs Rupee: RBI च्या मोठ्या निर्णयानं परिस्थिती बदलली, ९१ पार गेलेला रुपया ८९ पर्यंत आला, नक्की काय केलं?
4
Mumbai Crime: शीतपेयातून गुंगीचा पदार्थ, मुंबईत अल्पवयीन मुलींवर ४५ वर्षाच्या व्यक्तीने...; व्हिडीओही बनवला
5
मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
6
Post Office ची धमाल स्कीम, व्हाल मालामाल; मॅच्युरिटीवर मिळतील ४० लाख रुपये, किती गुंतवणूक करावी लागणार?
7
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
8
तुफान राडा! असं काय झालं की सुरक्षा रक्षकांनी ५० लाखांची मर्सिडीज फोडली; व्हायरल व्हिडीओतील घटना काय?
9
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
10
"वडिलांप्रमाणेच मलाही पुरस्कार आवडतात...", सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा अवॉर्ड मिळाल्यानंतर आर्यन खानची प्रतिक्रिया
11
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
12
"पहिल्यांदाच लेकाला सोडून शहराबाहेर आलोय..." विकी कौशलची भावुक प्रतिक्रिया
13
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
14
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
15
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
16
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
17
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
18
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
19
Thane Fire: ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
20
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
Daily Top 2Weekly Top 5

अनेक वर्षांपासून राजूर रिंगरोडचे काम थंडबस्त्यात

By admin | Updated: June 14, 2014 23:52 IST

गेल्या अनेक वर्षांपासून चार किलोमीटर लांबीच्या राजूर रिंगरोडचे काम थंडबस्त्यात पडले आहे. लोकप्रतिनिधींनी या रिंगरोडला मंजुरी मिळाल्याची आवई उठवून जनतेची दिशाभूल केल्याचे आता स्पष्ट झाले आहे.

वणी : गेल्या अनेक वर्षांपासून चार किलोमीटर लांबीच्या राजूर रिंगरोडचे काम थंडबस्त्यात पडले आहे. लोकप्रतिनिधींनी या रिंगरोडला मंजुरी मिळाल्याची आवई उठवून जनतेची दिशाभूल केल्याचे आता स्पष्ट झाले आहे.वणी ते यवतमाळ या राज्य मार्गापासून काही दूर अंतरावर वणीलगतच तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत असलेले राजूर (कॉलरी) गाव आहे. गावाची लोकसंख्या जवळपास १५ हजारांच्यावर आहे. या गावात चुन्याच्या अनेक खाणी आहेत. येथील चुना संपूर्ण विदर्भात प्रसिद्ध आहे. ब्रिटिशांच्या काळात याच गावात पहिली कोळसा खाण सुरू झाली होती. त्यानतंर तालुक्यात अनेक कोळसा खाणी अस्तित्वात आल्या. एकूणच हे गाव औद्योगिकदृष्ट्या तालुक्यातील इतर गावांपेक्षा कितीतरी पुढे आहे. तथापि विकासाचा शाप लागल्याने हे गाव आता मागे पडले आहे. ग्रामस्थांना धड रस्ताही मिळत नसल्याने राजूरवासीय त्रस्त आहे.वणी-यवतमाळ राज्य मार्गापासून या गावाला जोडण्यासाठी गेल्या अनेक वर्षांपूर्वी चार किलोमीटरचा डांबरी रस्ता तयार करण्यात आला. याच रस्त्याचा ग्रामस्थ सध्या वापर करीत आहेत. हा रस्ता तयार झाल्यानंतर मात्र त्याच्या देखभाल आणि दुरुस्तीकडे दरवर्षी दुर्लक्ष झाले. परिणामी या आता रस्त्याची दयनीय अवस्था झाली आहे. याच रस्त्यावरून कोळसा, गिट्टी, चुना भरलेली वाहने धावत असल्याने रस्त्याची प्रचंड दुर्दशा झाली. ठिकठिकाणी मोटमोठे खड्डे पडले आहेत. त्यातून वाहन काढणे कठीण झाले आहे. दुचाकीस्वारांनाही प्रवास करताना डोळ्यात तेला घालूनच वाहन चालवावे लागत आहे. जुन्या रस्त्याची भयावह अवस्था झाल्याने वणी ते यवतमाळ या राज्य मार्गापासून राजूरला जोडण्यासाठी रिंगरोडचा प्रस्ताव तयार करण्यात आला. गावाला वळसा घालून हा रिंगरोड राजूरमध्ये पोहोचणार होता. मात्र प्रत्यक्षात हा रिंगरोड अद्याप कागदावरच आहे. लोकप्रतिनिधींनी अनेकदा हा रिंगरोड मंजूर झाल्याची आवई उठविली होती. या रस्त्याच्या आजूबाजूला आजपर्यंत काही कोल वॉशऱ्या होत्या. सोभतच राजूर येथे चुना उद्योग आहे. हाच मार्ग पुढे जगन्नाथ महाराज यांच्या भांदेवाडा येथील मंदिराकडे जातो. त्यामुळे या रस्त्यावरून सतत वाहनांची वर्दळ असते. मात्र आजपर्यंत सुरू असलेल्या कोल वॉशऱ्यांच्या अवजड वाहनांमुळेच या रस्त्याची वाट लागली आहे. रस्ता दयनीय झाल्याने काही वर्षांपूर्वी संबंधित वॉशऱ्यांकडून काही प्रमाणात निधी घेऊन प्रस्तावीत रिंगरोडची कल्पना मांडण्यात आली होती. या वॉशऱ्यांनी निधी देण्याचे मान्यही केले होते. त्यानंतर या प्रस्तावित रिंगरोडच्या बांधकामासाठी त्यावेळी निविदाही काढण्यात आली. वणीतील एका कंत्राटदाराला रस्ता बांधकामाचे कंत्राटही देण्यात आले होते. कंत्राटदाराने रस्ता बांधण्यासाठी त्यावेळी बांधकाम साहित्यही आणले होते. मात्र त्यानंतर ‘कुठे माशी शिंकली, कुणास ठावूक’, या रिंगरोडचे काम थंडबस्त्यात पडले. ते अद्यापही सुरूच होऊ शकले नाही. यामागे काय गूढ लपले, हे कुणालाच माहीत नाही. (कार्यालय प्रतिनिधी)