शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेचा प्रत्येक नागरिक आणि सैनिक आमच्या निशाण्यावर, अणुकेंद्रावर हल्ल्यानंतर इराणचा थेट इशारा  
2
"इराणने आता शांततेच्या मार्गावर यावे, अन्यथा...", अणुकेंद्रांवरील हल्ल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा सक्त इशारा  
3
VIDEO: इराणवर हल्ले सुरुच; अमेरिकेने दिलेली लढाऊ विमाने इस्रायलने केली नष्ट
4
नोकऱ्या आल्या धोक्यात! सरकार शिक्षकांना म्हणते, ‘देता आधार, का करू अंधार’
5
US Airstrikes Iran: तीन अणुऊर्जा केंद्रावर बॉम्बचा वर्षाव, अमेरिकेने इराणवर हवाई हल्ला कसा केला?
6
मी अजूनही ठाकरेंसोबत; तेजस्वी घोसाळकरांचे स्पष्टीकरण, राजकीय वळण न देण्याचे केले आवाहन 
7
"आधी ताकद दाखवली जाते, मग..."; अमेरिकेच्या हल्ल्यांवर इस्रायलने व्यक्त केला आनंद, नेतान्याहू म्हणाले, "धन्यवाद ट्रम्प"
8
आजचे राशीभविष्य - २२ जून २०२५, मान-प्रतिष्ठा ह्यात वाढ झाल्याने आपण आनंदित व्हाल
9
America Iran: अमेरिकेचा इराणमध्ये घुसून हल्ला! अनेक अणुऊर्जा केंद्रावर टाकले बॉम्ब; ट्रम्प म्हणाले, "आता..."
10
विशेष लेख: शिंदे-ठाकरे दोघांना भांडू द्या, तुम्ही निवडून कसे येणार हे बघा!
11
विमान कर्मचारी वेळापत्रकात आढळल्या गंभीर त्रुटी, एअर इंडियाच्या तीन अधिकाऱ्यांवर कारवाईचे आदेश
12
'मला नोबेल मिळणार नाही'; डोनाल्ड ट्रम्प यांनी व्यक्त केली खंत
13
हिंदी भाषा पुस्तकांच्या छपाईचे आदेशच नाहीत, कच्च्या आराखड्यास अंतिम मान्यताच नाही
14
लेख: पूल कोसळला, रेल्वेतून पडून मृत्यू... जे जबाबदार, तेच बेजबाबदार म्हणून या आपत्ती
15
विशेष लेख: कुंभमेळ्याचं नवं स्टेटस! येणार ‘रील’वाली गर्दी
16
कर्जमाफीचा निर्णय योग्य वेळी घेणार -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
17
अटल सेतूवर खड्डे! कंत्राटदाराला २० लाखांचा दंड; पाऊस, तेल गळतीमुळे प्रकार 
18
लेख: आषाढी पायी वारी :विज्ञाननिष्ठ उत्सव
19
मुंबईत विमानाच्या महिला पायलटचा कॅब प्रवासादरम्यान विनयभंग; चालकासह दोन तरुणांविरोधात गुन्हा 
20
मुलाला आईची जात लावण्यास मुंबई उच्च न्यायालयाने दिला नकार; प्रकरण काय? 

अनेक वर्षांपासून राजूर रिंगरोडचे काम थंडबस्त्यात

By admin | Updated: June 14, 2014 23:52 IST

गेल्या अनेक वर्षांपासून चार किलोमीटर लांबीच्या राजूर रिंगरोडचे काम थंडबस्त्यात पडले आहे. लोकप्रतिनिधींनी या रिंगरोडला मंजुरी मिळाल्याची आवई उठवून जनतेची दिशाभूल केल्याचे आता स्पष्ट झाले आहे.

वणी : गेल्या अनेक वर्षांपासून चार किलोमीटर लांबीच्या राजूर रिंगरोडचे काम थंडबस्त्यात पडले आहे. लोकप्रतिनिधींनी या रिंगरोडला मंजुरी मिळाल्याची आवई उठवून जनतेची दिशाभूल केल्याचे आता स्पष्ट झाले आहे.वणी ते यवतमाळ या राज्य मार्गापासून काही दूर अंतरावर वणीलगतच तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत असलेले राजूर (कॉलरी) गाव आहे. गावाची लोकसंख्या जवळपास १५ हजारांच्यावर आहे. या गावात चुन्याच्या अनेक खाणी आहेत. येथील चुना संपूर्ण विदर्भात प्रसिद्ध आहे. ब्रिटिशांच्या काळात याच गावात पहिली कोळसा खाण सुरू झाली होती. त्यानतंर तालुक्यात अनेक कोळसा खाणी अस्तित्वात आल्या. एकूणच हे गाव औद्योगिकदृष्ट्या तालुक्यातील इतर गावांपेक्षा कितीतरी पुढे आहे. तथापि विकासाचा शाप लागल्याने हे गाव आता मागे पडले आहे. ग्रामस्थांना धड रस्ताही मिळत नसल्याने राजूरवासीय त्रस्त आहे.वणी-यवतमाळ राज्य मार्गापासून या गावाला जोडण्यासाठी गेल्या अनेक वर्षांपूर्वी चार किलोमीटरचा डांबरी रस्ता तयार करण्यात आला. याच रस्त्याचा ग्रामस्थ सध्या वापर करीत आहेत. हा रस्ता तयार झाल्यानंतर मात्र त्याच्या देखभाल आणि दुरुस्तीकडे दरवर्षी दुर्लक्ष झाले. परिणामी या आता रस्त्याची दयनीय अवस्था झाली आहे. याच रस्त्यावरून कोळसा, गिट्टी, चुना भरलेली वाहने धावत असल्याने रस्त्याची प्रचंड दुर्दशा झाली. ठिकठिकाणी मोटमोठे खड्डे पडले आहेत. त्यातून वाहन काढणे कठीण झाले आहे. दुचाकीस्वारांनाही प्रवास करताना डोळ्यात तेला घालूनच वाहन चालवावे लागत आहे. जुन्या रस्त्याची भयावह अवस्था झाल्याने वणी ते यवतमाळ या राज्य मार्गापासून राजूरला जोडण्यासाठी रिंगरोडचा प्रस्ताव तयार करण्यात आला. गावाला वळसा घालून हा रिंगरोड राजूरमध्ये पोहोचणार होता. मात्र प्रत्यक्षात हा रिंगरोड अद्याप कागदावरच आहे. लोकप्रतिनिधींनी अनेकदा हा रिंगरोड मंजूर झाल्याची आवई उठविली होती. या रस्त्याच्या आजूबाजूला आजपर्यंत काही कोल वॉशऱ्या होत्या. सोभतच राजूर येथे चुना उद्योग आहे. हाच मार्ग पुढे जगन्नाथ महाराज यांच्या भांदेवाडा येथील मंदिराकडे जातो. त्यामुळे या रस्त्यावरून सतत वाहनांची वर्दळ असते. मात्र आजपर्यंत सुरू असलेल्या कोल वॉशऱ्यांच्या अवजड वाहनांमुळेच या रस्त्याची वाट लागली आहे. रस्ता दयनीय झाल्याने काही वर्षांपूर्वी संबंधित वॉशऱ्यांकडून काही प्रमाणात निधी घेऊन प्रस्तावीत रिंगरोडची कल्पना मांडण्यात आली होती. या वॉशऱ्यांनी निधी देण्याचे मान्यही केले होते. त्यानंतर या प्रस्तावित रिंगरोडच्या बांधकामासाठी त्यावेळी निविदाही काढण्यात आली. वणीतील एका कंत्राटदाराला रस्ता बांधकामाचे कंत्राटही देण्यात आले होते. कंत्राटदाराने रस्ता बांधण्यासाठी त्यावेळी बांधकाम साहित्यही आणले होते. मात्र त्यानंतर ‘कुठे माशी शिंकली, कुणास ठावूक’, या रिंगरोडचे काम थंडबस्त्यात पडले. ते अद्यापही सुरूच होऊ शकले नाही. यामागे काय गूढ लपले, हे कुणालाच माहीत नाही. (कार्यालय प्रतिनिधी)