शहरं
Join us  
Trending Stories
1
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
2
Latest Marathi News LIVE Updates: 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चेनं राजकारणात खळबळ, शिंदेसेना-ठाकरेसेना आमनेसामने
3
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
4
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
5
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
6
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
7
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
8
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
9
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
10
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
11
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
12
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
13
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
14
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
15
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
17
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
18
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
19
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
20
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
Daily Top 2Weekly Top 5

पांढरकवडा तालुक्यातील अनेक ग्रामपंचायती समस्यांच्या विळख्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2021 04:48 IST

तालुक्यातील गावांचा फेरफटका मारला असता, गावातील समस्यांची वास्तविकता निदर्शनास येते. अनेक गावांत घरोघरी शौचालये नाहीत. गावाच्या सुरुवातीलाच हागणदारीमुक्त गाव ...

तालुक्यातील गावांचा फेरफटका मारला असता, गावातील समस्यांची वास्तविकता निदर्शनास येते. अनेक गावांत घरोघरी शौचालये नाहीत. गावाच्या सुरुवातीलाच हागणदारीमुक्त गाव असे मोठमोठे फलक लागले आहेत. परंतु त्या फलकाशेजारीच सर्वत्र घाण पसरलेली दिसून येते. यावरून प्रत्यक्षात ती गावे हागणदारीमुक्त नाहीत, हे दिसून येते. गावात सांडपाण्याचे नियोजन दिसून येत नाही. सांडपाणी रस्त्यावर वाहताना दिसून येते. कित्येक ग्रामपंचायतींच्यासमोरच सांडपाणी वाहताना दिसते. त्यामुळे जिकडे तिकडे घाण पसरल्याचे दिसून येते. काही गावात नाल्या आहेत. त्याही कचऱ्याने बुजलेल्या अवस्थेत आहे. स्वच्छतागृहे स्वछ नसल्याचे दिसून येते. स्वच्छ पिण्याचा पाणीपुरवठा होत नाही. कित्येक गावात फ्लोराईडयुक्त पाण्याचा पिण्याच्या पाण्यासाठी वापर होताना दिसून आले. साथ रोगापासून बचाव करण्यासाठी कुठलीही उपाययोजना सुरू असल्याचे दिसून येत नाही. परिणामी नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. कित्येक योजनांमध्ये, मोहिमांमध्ये या गावांनी सहभाग घेतला असल्याचे सांगितले जाते. परंतु तो सहभाग नावापुरताच दिसून येत आहे. काही गावात तर दारूचा महापूर दिसून येतो. त्यावर कुणाचाही वॉच दिसून येत नाही. दारूमुळे अनेक समस्या गावात निर्माण होत आहेत. या ग्रामपंचायतींना निधी उपलब्ध होत असताना या निधीचा विनियोग कशा पद्धतीने होत आहे, हे कळायला मार्ग दिसत नाही. काही मोजक्या ग्रामपंचायतींना पुरस्कार मिळाला. परंतु पुरस्कार मिळाल्यानंतर त्या गावची परिस्थिती ‘जैसे थे’च झाली आहे. सध्या ग्रामपंचायतींना मोठे अधिकार प्राप्त झाले आहेत. त्याचा उपयोग अनेक उपक्रम राबवून अनेक लोकोपयोगी योजना ग्रामवासीयांना देता येऊ शकतात. मात्र, लोकांची निरूत्साही वृत्ती, केवळ मलिद्याकडे लक्ष देणारे पुढारी व प्रशासनाच्या दुर्लक्षित धोरणामुळे तालुक्यातील अनेक ग्रामपंचायती या समस्यांच्या गर्तेत सापडल्याचे दिसून येत आहे.