शहरं
Join us  
Trending Stories
1
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
2
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
3
Asia Cup 2025 : बांगलादेशनं मॅच जिंकली; अफगाणिस्तानला अजूनही स्वबळावर बाजी पलटण्याची संधी, पण...
4
'आपण दहशतवादी नाही… पाकिस्तानसाठी लढलो'; काय म्हणाला जैश कमांडर? भारताविरुद्धही ओकली गरळ
5
West Indies Squad For India Test Series : दिग्गजाच्या पोराला संधी; माजी कर्णधाराचा पत्ता कट
6
लाखो लोकांची फसवणूक, दीड वर्षांपासून फरार; अखेर ‘ज्ञानराधा’च्या अर्चना कुटे यांना अटक
7
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
8
दोन मुंबईकरांसोबत नेट प्रॅक्टिस करताना दिसला हिटमॅन रोहित शर्मा; फोटो व्हायरल
9
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
10
BAN vs AFG : 'चमत्कारी' खानचा हिट शो! भुवीचा विक्रम मोडला; हार्दिक पांड्यालाही संधी, पण...
11
म्युच्युअल फंड असावा तर असा...! ₹10000 ची SIP गुंतवणूक ₹1.79 कोटींवर पोहोचली, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
12
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!
13
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
14
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय
15
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
16
'या' मुस्लीम देशावर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल, दिला बंदरं रिकामी करण्याचा अल्टीमेटम!
17
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
18
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
19
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
20
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग

पांढरकवडा तालुक्यातील अनेक ग्रामपंचायती समस्यांच्या विळख्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2021 04:48 IST

तालुक्यातील गावांचा फेरफटका मारला असता, गावातील समस्यांची वास्तविकता निदर्शनास येते. अनेक गावांत घरोघरी शौचालये नाहीत. गावाच्या सुरुवातीलाच हागणदारीमुक्त गाव ...

तालुक्यातील गावांचा फेरफटका मारला असता, गावातील समस्यांची वास्तविकता निदर्शनास येते. अनेक गावांत घरोघरी शौचालये नाहीत. गावाच्या सुरुवातीलाच हागणदारीमुक्त गाव असे मोठमोठे फलक लागले आहेत. परंतु त्या फलकाशेजारीच सर्वत्र घाण पसरलेली दिसून येते. यावरून प्रत्यक्षात ती गावे हागणदारीमुक्त नाहीत, हे दिसून येते. गावात सांडपाण्याचे नियोजन दिसून येत नाही. सांडपाणी रस्त्यावर वाहताना दिसून येते. कित्येक ग्रामपंचायतींच्यासमोरच सांडपाणी वाहताना दिसते. त्यामुळे जिकडे तिकडे घाण पसरल्याचे दिसून येते. काही गावात नाल्या आहेत. त्याही कचऱ्याने बुजलेल्या अवस्थेत आहे. स्वच्छतागृहे स्वछ नसल्याचे दिसून येते. स्वच्छ पिण्याचा पाणीपुरवठा होत नाही. कित्येक गावात फ्लोराईडयुक्त पाण्याचा पिण्याच्या पाण्यासाठी वापर होताना दिसून आले. साथ रोगापासून बचाव करण्यासाठी कुठलीही उपाययोजना सुरू असल्याचे दिसून येत नाही. परिणामी नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. कित्येक योजनांमध्ये, मोहिमांमध्ये या गावांनी सहभाग घेतला असल्याचे सांगितले जाते. परंतु तो सहभाग नावापुरताच दिसून येत आहे. काही गावात तर दारूचा महापूर दिसून येतो. त्यावर कुणाचाही वॉच दिसून येत नाही. दारूमुळे अनेक समस्या गावात निर्माण होत आहेत. या ग्रामपंचायतींना निधी उपलब्ध होत असताना या निधीचा विनियोग कशा पद्धतीने होत आहे, हे कळायला मार्ग दिसत नाही. काही मोजक्या ग्रामपंचायतींना पुरस्कार मिळाला. परंतु पुरस्कार मिळाल्यानंतर त्या गावची परिस्थिती ‘जैसे थे’च झाली आहे. सध्या ग्रामपंचायतींना मोठे अधिकार प्राप्त झाले आहेत. त्याचा उपयोग अनेक उपक्रम राबवून अनेक लोकोपयोगी योजना ग्रामवासीयांना देता येऊ शकतात. मात्र, लोकांची निरूत्साही वृत्ती, केवळ मलिद्याकडे लक्ष देणारे पुढारी व प्रशासनाच्या दुर्लक्षित धोरणामुळे तालुक्यातील अनेक ग्रामपंचायती या समस्यांच्या गर्तेत सापडल्याचे दिसून येत आहे.