शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारने करून दाखवले! ११ वर्षांत भारतातील गरिबी किती घटली? आकडेवारीच समोर आली
2
“नितेशने जपून बोलावे, भान ठेवायला हवे, आपण महायुतीमध्ये आहोत हे विसरता कामा नये”: निलेश राणे
3
आंतरराष्ट्रीय स्तरावर हात पसरणारा पाकिस्तान भरतोय नेत्यांचे खिसे! सरकारने वाढवला पाचपटींनी पगार
4
मुंबई गोवा महामार्गांवर CNG टँकरची शिक्षकांच्या ट्रॅव्हल्सला धडक; गॅस गळतीमुळे घराने घेतला पेट
5
HDFC बँकेच्या CEO वर कारवाईची मागणी, ₹२५ कोटी घोटाळळ्याचा आरोप; जाणून घ्या प्रकरण
6
विराट कोहलीसारखी निष्ठा कायम राहील का? १८ वर्षांपर्यंत तुमचाही संयम टिकू शकेल का?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींचे शुभ कल्याण, ६ राशींना काहीसा संमिश्र काळ; तुमची रास कोणती?
8
दहशतवादी आणि पीडित एकाच तराजूत नाहीच..; जयशंकर यांचा पुन्हा एकदा जगाला स्पष्ट संदेश
9
फुफ्फुस निकामी, सतत दम्याचा त्रास अन्..! दुर्धर आजारावर मात करुन ३ वर्षांनी मराठी अभिनेत्याचं कमबॅक
10
T20 Mumbai League : कॅप्टन पृथ्वीची फसलेली चाल; सलामीवीर जोडीदाराला Retire Out करून स्वत:ही परतला तंबूत
11
“निवडणूक आयोग हा भाजपा आयोग, मतांवर टाकलेल्या दरोड्याची चौकशी का करत नाही?”: नाना पटोले
12
"गंभीर परिणाम भोगावे लागतील"; ट्रम्प यांचा मस्क यांच्याशी समेट करण्यास नकार, दिला मोठा इशारा
13
जनता त्यांना नाकारते, ते जनादेशाला नाकारतात! देवेंद्र फडणवीसांचा राहुल गांधींना टोला
14
कोलंबियात भाषण देताना राष्ट्राध्यक्ष पदाच्या उमेदवाराच्या डोक्यात झाडली गोळी; हल्लेखोराला अटक
15
Bengaluru Stampede: कर्नाटक सरकारने भरपाईची वाढवली रक्कम; मृतांच्या कुटुंबियांना देणार २५ लाख रुपये
16
आता रिपब्लिकन घडवणार ट्रम्प-मस्क यांच्यात समेट, दोघांतील वादामुळे भविष्यात अडचणी वाढण्याची पक्षाला भीती
17
आजचे राशीभविष्य : ०८ जून २०२५; आर्थिक लाभ संभवतात, विवाद व बौद्धिक चर्चेपासून दूर राहा
18
शैक्षणिक दाखले, शपथपत्रासाठी स्टॅम्प पेपरची मागणी नियमबाह्य! महसूलमंत्री बावनकुळे यांची अधिकाऱ्यांना तंबी
19
पिनकाेड विसरा; आता हा ‘पीन’ सांगेल हवा असलेला अचूक पत्ता, टपाल विभागाने सुरू केली नवीन डिजिपीन प्रणाली
20
छोट्या-छोट्या गरजांसाठी आधी घ्यावे लागायचे कर्ज, शेती क्षेत्रात झाले चांगले बदल, पंतप्रधान नरेंद्र मोदी

पांढरकवडा तालुक्यातील अनेक ग्रामपंचायती समस्यांच्या विळख्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2021 04:48 IST

तालुक्यातील गावांचा फेरफटका मारला असता, गावातील समस्यांची वास्तविकता निदर्शनास येते. अनेक गावांत घरोघरी शौचालये नाहीत. गावाच्या सुरुवातीलाच हागणदारीमुक्त गाव ...

तालुक्यातील गावांचा फेरफटका मारला असता, गावातील समस्यांची वास्तविकता निदर्शनास येते. अनेक गावांत घरोघरी शौचालये नाहीत. गावाच्या सुरुवातीलाच हागणदारीमुक्त गाव असे मोठमोठे फलक लागले आहेत. परंतु त्या फलकाशेजारीच सर्वत्र घाण पसरलेली दिसून येते. यावरून प्रत्यक्षात ती गावे हागणदारीमुक्त नाहीत, हे दिसून येते. गावात सांडपाण्याचे नियोजन दिसून येत नाही. सांडपाणी रस्त्यावर वाहताना दिसून येते. कित्येक ग्रामपंचायतींच्यासमोरच सांडपाणी वाहताना दिसते. त्यामुळे जिकडे तिकडे घाण पसरल्याचे दिसून येते. काही गावात नाल्या आहेत. त्याही कचऱ्याने बुजलेल्या अवस्थेत आहे. स्वच्छतागृहे स्वछ नसल्याचे दिसून येते. स्वच्छ पिण्याचा पाणीपुरवठा होत नाही. कित्येक गावात फ्लोराईडयुक्त पाण्याचा पिण्याच्या पाण्यासाठी वापर होताना दिसून आले. साथ रोगापासून बचाव करण्यासाठी कुठलीही उपाययोजना सुरू असल्याचे दिसून येत नाही. परिणामी नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. कित्येक योजनांमध्ये, मोहिमांमध्ये या गावांनी सहभाग घेतला असल्याचे सांगितले जाते. परंतु तो सहभाग नावापुरताच दिसून येत आहे. काही गावात तर दारूचा महापूर दिसून येतो. त्यावर कुणाचाही वॉच दिसून येत नाही. दारूमुळे अनेक समस्या गावात निर्माण होत आहेत. या ग्रामपंचायतींना निधी उपलब्ध होत असताना या निधीचा विनियोग कशा पद्धतीने होत आहे, हे कळायला मार्ग दिसत नाही. काही मोजक्या ग्रामपंचायतींना पुरस्कार मिळाला. परंतु पुरस्कार मिळाल्यानंतर त्या गावची परिस्थिती ‘जैसे थे’च झाली आहे. सध्या ग्रामपंचायतींना मोठे अधिकार प्राप्त झाले आहेत. त्याचा उपयोग अनेक उपक्रम राबवून अनेक लोकोपयोगी योजना ग्रामवासीयांना देता येऊ शकतात. मात्र, लोकांची निरूत्साही वृत्ती, केवळ मलिद्याकडे लक्ष देणारे पुढारी व प्रशासनाच्या दुर्लक्षित धोरणामुळे तालुक्यातील अनेक ग्रामपंचायती या समस्यांच्या गर्तेत सापडल्याचे दिसून येत आहे.