शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: भगूर नगरपरिषदेत शिवसेनेची २५ वर्षांची सत्ता अजितदादांच्या राष्ट्रवादीने उलथवली; पहा लेटेस्ट अपडेट
2
अमेरिका, ऑस्ट्रेलियानंतर आता दक्षिण आफ्रिका...! गोळीबारात १० जणांचा मृत्यू, १० जखमी
3
Akkalkot Nagar Parishad Election Result 2025: फटाक्यांची आतषबाजी, विजयाची घोषणा; मतमोजणीआधीच भाजपा कार्यकर्त्यांचा जल्लोष सुरू
4
Maharashtra Local Body Election Results 2025: 'या' तीन नगर परिषदा भाजपने जिंकल्या! निकालाआधीच उधळला गुलाल
5
घर खरेदीचे स्वप्न होणार साकार! 'ही' बँक देतेय स्वस्त होम लोन; ५० लाखांच्या कर्जासाठी किती हवी सॅलरी?
6
नात्याला काळीमा! विम्याच्या पैशांसाठी पोटच्या पोरांनीच रचला बापाच्या हत्येचा कट; 'असा' झाला पर्दाफाश
7
"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या
8
Nora Fatehi : "मी जिवंत आहे, माझं डोकं दारावर..."; कार अपघातानंतर कशी आहे नोरा फतेहीची प्रकृती?
9
घर घेणे सामान्यांच्या आवाक्याबाहेर? पगार वाढला, पण घर खरेदी का कठीण झाली...
10
भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
11
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
12
भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
13
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
14
चांगले संस्कार दिले नाहीत! अल्पवीयन मुलीला छेडणाऱ्या ४ आरोपींच्या आईलाच पोलिसांनी केली अटक
15
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
16
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
17
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
18
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
19
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
20
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
Daily Top 2Weekly Top 5

आजोळ टंचाईमुक्त व्हावं म्हणून

By admin | Updated: May 15, 2017 00:55 IST

आजोबाचे गाव ‘जीवन’ समृध्द व्हावे म्हणून वरिष्ठ अधिकारी असलेला नातू चक्क सुट्या टाकून सहकुटुंब दाखल झाला.

अधिकाऱ्याचे कुटुंब गावात : राळेगावातील चहांदमध्ये ‘वॉटर कप’साठी धडपड, ग्रामस्थांची साथ राजेश जवादे । लोकमत न्यूज नेटवर्क चहांद : आजोबाचे गाव ‘जीवन’ समृध्द व्हावे म्हणून वरिष्ठ अधिकारी असलेला नातू चक्क सुट्या टाकून सहकुटुंब दाखल झाला. हातात कुदळ-पावडे घेऊन कामालाही लागला. अन् पाहता पाहता अख्ख्या गावाची साथ मिळाली. आजोबांच्या गावातील नागरिकांचे पाण्यासाठी होणारे हाल थांबावे, म्हणून चालविलेली नातवाची धडपड निश्चितच प्रेरणादायी आहे. राळेगाव तालुक्यातील चहांद या गावाला प्रत्येक उन्हाळ्यात पाणी टंचाईच्या झळा सोसाव्या लागतात. घरातील चिल्यापिल्यांना घेऊन महिला मंडळीची पाण्यासाठी दोन ते तीन महिने पायपीट सुरू असते. पाण्यासाठीचा टाहो थांबावा यासाठी हे गाव सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेत सहभागी झाले आहे. या गावातील काही युवकांनी स्पर्धेसाठीचे प्रशिक्षणही घेतले. मात्र स्पर्धेच्या दृष्टीने तेवढी गती आलेली नव्हती. पण या गावाशी नाळ जुळून असलेल्या एका अधिकाऱ्याने हाती कुदळ पावडे घेतले. अख्खे गाव श्रमदानात सहभागी झाले आहे. औरंगाबाद येथे जिल्हा समाज कल्याण अधिकारी म्हणून कार्यरत असलेले डॉ.सचिन शंकरराव मडावी यांनी चहांदला टंचाईमुक्त करण्याचा विडा उचलला आहे. चहांद हे त्यांचे आजोळ असून त्यांच्या वडिलांचे आठवीपर्यंतचे शिक्षण याच गावात झाले आहे. ते सेवानिवृत्त तहसीलदार आहेत. आजोबाचे गाव टंचाईग्रस्त आहे आणि स्पर्धेतही मागे राहू नये म्हणून डॉ.सचिन मडावी हे येथे दाखल झाले आहे. २२ मे पर्यंत त्यांनी सुट्या टाकल्या आहेत. सोबत पत्नी डॉ.प्रियंका आणि परिवारातील सदस्यही आहेत. डॉ. सचिन मडावी गावात दाखल झाल्यापासून त्यांनी गावकऱ्यांना पाण्याचे महत्व पटवून दिले. टंचाईतून मुक्तीसाठी ही स्पर्धा किती महत्वाची आहे, हे सांगितले. प्रोजेक्टरवर माहिती दिली. पाहुणे म्हणून नव्हे तर चहांद पाण्याचे समृध्द व्हावे म्हणून आलेल्या मडावी कुटुंबातील सदस्यांनी श्रमदानात सहभागही नोंदविला. आजोबाचे गाव टंचाईमुक्त व्हावे, यासाठी त्यांनी घेतलेला पुढाकार निश्चितच प्रेरणादायी आहे. दरम्यान, आमदार प्रा.डॉ.अशोक उईके, उपविभागीय अधिकारी संदीपकुमार अपार, तहसीलदार हेमंत गांगुर्डे, गटविकास अधिकारी विनोद खेडकर आदींनी या गावात सुरू असलेल्या कामांची पाहणी केली. श्रमदानात सहभागी झालेल्या लोकांना आवश्यक त्या सूचना केल्या. पाण्याचे महत्त्व या अधिकाऱ्यांनी पटवून देतानाच त्यासाठी उपाययोजनाही सुचविण्यात आल्या आहेत.