शहरं
Join us  
Trending Stories
1
Russia Ukrain War : डोनाल्ड ट्रम्प युक्रेनचे दोन तुकडे करणार? क्रिमिया अन् दोन मोठी शहरे रशियाला मिळणार
2
आभाळ फाटले! मुखेड तालुक्यातील सहा गावांत पाणी शिरले; बेपत्ता १२ जणांचा शोध सुरु
3
Mumbai Rain Alert: मुंबईत रेड अलर्ट; तीन ते चार तासात 'अतिमुसळधार' कोसळणार, शाळांना सुट्टी जाहीर
4
School Holiday: मुंबईत शाळांना सुट्टी जाहीर, पाणी साचल्याने अनेक ठिकाणी वाहतूक ठप्प; ४८ तासांसाठी रेड अलर्ट जारी
5
Video: टोलनाक्यावरील कर्मचारी की गुंड; लष्कराच्या जवानावर तुटून पडले, खांबाला बांधून दांडक्याने मारले
6
चेकच्या मागच्या बाजूला सही का करतात? ९०% लोकांना या प्रश्नाचे उत्तर माहित नसणार
7
‘मत चोरी’चा वाद वाढला, विरोधक मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात महाभियोग प्रस्ताव आणण्याच्या तयारीत 
8
Technology: ATM मधून पैसे काढल्यानंतर तुमचा PIN सुरक्षित राहतो का? 'अशी' घ्या काळजी!
9
Asia Cup India Squad : गंभीरनं 'फिल्डिंग' लावली तर गिल खेळणार; नाहीतर... आगरकर हे ३ मोठे निर्णय घेणार?
10
धक्कादायक! रणथंभोर व्याघ्र प्रकल्पात पर्यटकांची गाडी अचानक पडली बंद आणि मग...
11
श्रावणातला शेवटचा आठवडा; 'या' दिशेला लावा बेलाचे झाड, घरात धन, समृद्धी, पैसा येईल अपार
12
"सिनेमाच्या नावाखाली अभिनेते मजा..." कमी वयाच्या अभिनेत्रींसोबत काम करण्यावर आर माधवनचं भाष्य
13
सतर्क राहा: कोकण, पश्चिम महाराष्ट्रात १८-१९ ऑगस्टला मुसळधार पाऊस; कुठे-कुठे 'रेड अलर्ट'?
14
अहिल्यानगरमध्ये फर्निचरच्या दुकानात अग्नितांडव; अख्खं कुटुंब संपलं, दोन चिमुकल्यांसह पाच जणांचा मृत्यू
15
भाडे देऊन लाखोंचे नुकसान की EMI देऊन घर खरेदी करावे? ५० लाखांच्या घराचं आर्थिक गणित समजून घ्या
16
फ्लॉप शोचा सिलसिला संपेना! अन् म्हणे; सलमानचा पाक संघ आशिया कपमध्ये टीम इंडियासमोर हिट ठरेल
17
Apple नं ट्रम्प आणि चीनला दाखवला ठेंगा; भारतात आणखी एका प्रकल्पातून सुरू केलं iPhone चं उत्पादन
18
Home Remedy: महागडी हेअर ट्रीटमेंट सोडा, ५० रुपयांत लांबसडक, घनदाट, काळेभोर केस मिळवा 
19
जन्माष्टमीच्या मिरवणुकीतील रथ विजेच्या तारांना चिकटला, शॉक लागून ५ जणांचा मृत्यू, केंद्रीय मंत्र्यांचा सुरक्षा रक्षकही जखमी 
20
'सिटी ऑफ ड्रीम्स'नंतर प्रिया बापटचा पुन्हा 'तो' सीन, अभिनेत्री सुरवीन चावलासोबत लिपलॉक

आजोळ टंचाईमुक्त व्हावं म्हणून

By admin | Updated: May 15, 2017 00:55 IST

आजोबाचे गाव ‘जीवन’ समृध्द व्हावे म्हणून वरिष्ठ अधिकारी असलेला नातू चक्क सुट्या टाकून सहकुटुंब दाखल झाला.

अधिकाऱ्याचे कुटुंब गावात : राळेगावातील चहांदमध्ये ‘वॉटर कप’साठी धडपड, ग्रामस्थांची साथ राजेश जवादे । लोकमत न्यूज नेटवर्क चहांद : आजोबाचे गाव ‘जीवन’ समृध्द व्हावे म्हणून वरिष्ठ अधिकारी असलेला नातू चक्क सुट्या टाकून सहकुटुंब दाखल झाला. हातात कुदळ-पावडे घेऊन कामालाही लागला. अन् पाहता पाहता अख्ख्या गावाची साथ मिळाली. आजोबांच्या गावातील नागरिकांचे पाण्यासाठी होणारे हाल थांबावे, म्हणून चालविलेली नातवाची धडपड निश्चितच प्रेरणादायी आहे. राळेगाव तालुक्यातील चहांद या गावाला प्रत्येक उन्हाळ्यात पाणी टंचाईच्या झळा सोसाव्या लागतात. घरातील चिल्यापिल्यांना घेऊन महिला मंडळीची पाण्यासाठी दोन ते तीन महिने पायपीट सुरू असते. पाण्यासाठीचा टाहो थांबावा यासाठी हे गाव सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेत सहभागी झाले आहे. या गावातील काही युवकांनी स्पर्धेसाठीचे प्रशिक्षणही घेतले. मात्र स्पर्धेच्या दृष्टीने तेवढी गती आलेली नव्हती. पण या गावाशी नाळ जुळून असलेल्या एका अधिकाऱ्याने हाती कुदळ पावडे घेतले. अख्खे गाव श्रमदानात सहभागी झाले आहे. औरंगाबाद येथे जिल्हा समाज कल्याण अधिकारी म्हणून कार्यरत असलेले डॉ.सचिन शंकरराव मडावी यांनी चहांदला टंचाईमुक्त करण्याचा विडा उचलला आहे. चहांद हे त्यांचे आजोळ असून त्यांच्या वडिलांचे आठवीपर्यंतचे शिक्षण याच गावात झाले आहे. ते सेवानिवृत्त तहसीलदार आहेत. आजोबाचे गाव टंचाईग्रस्त आहे आणि स्पर्धेतही मागे राहू नये म्हणून डॉ.सचिन मडावी हे येथे दाखल झाले आहे. २२ मे पर्यंत त्यांनी सुट्या टाकल्या आहेत. सोबत पत्नी डॉ.प्रियंका आणि परिवारातील सदस्यही आहेत. डॉ. सचिन मडावी गावात दाखल झाल्यापासून त्यांनी गावकऱ्यांना पाण्याचे महत्व पटवून दिले. टंचाईतून मुक्तीसाठी ही स्पर्धा किती महत्वाची आहे, हे सांगितले. प्रोजेक्टरवर माहिती दिली. पाहुणे म्हणून नव्हे तर चहांद पाण्याचे समृध्द व्हावे म्हणून आलेल्या मडावी कुटुंबातील सदस्यांनी श्रमदानात सहभागही नोंदविला. आजोबाचे गाव टंचाईमुक्त व्हावे, यासाठी त्यांनी घेतलेला पुढाकार निश्चितच प्रेरणादायी आहे. दरम्यान, आमदार प्रा.डॉ.अशोक उईके, उपविभागीय अधिकारी संदीपकुमार अपार, तहसीलदार हेमंत गांगुर्डे, गटविकास अधिकारी विनोद खेडकर आदींनी या गावात सुरू असलेल्या कामांची पाहणी केली. श्रमदानात सहभागी झालेल्या लोकांना आवश्यक त्या सूचना केल्या. पाण्याचे महत्त्व या अधिकाऱ्यांनी पटवून देतानाच त्यासाठी उपाययोजनाही सुचविण्यात आल्या आहेत.