शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या आकांसमोर झुकू नका, सॅलरी कापणार नाहीत; सुप्रीम कोर्टाने केली IPS अधिकाऱ्याची कानउघडणी
2
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
3
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
4
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
5
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव
6
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
7
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
8
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
9
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
10
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
11
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
12
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
13
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
14
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
15
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?
16
लोकसभेत असं काय घडलं की अमित शाह यांच्या सुरक्षेसाठी धावले मार्शल? विधेयकाची प्रतही फाडली गेली!
17
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
18
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
19
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
20
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव

महागावात महायुतीचा सूर जुळलाच नाही

By admin | Updated: May 18, 2014 23:58 IST

देशात सर्वत्र मोदी लाट असताना हिंगोली लोकसभा मतदारसंघात काँग्रेसचे अ‍ॅड. राजीव सातव विजयी झाले. विजयाच्या कारणांची मिमांसा करताना उमरखेड विधानसभेतील महागाव तालुकाही महत्वाचा ठरतो.

 रितेश पुरोहित - महागाव

 देशात सर्वत्र मोदी लाट असताना हिंगोली लोकसभा मतदारसंघात काँग्रेसचे अ‍ॅड. राजीव सातव विजयी झाले. विजयाच्या कारणांची मिमांसा करताना उमरखेड विधानसभेतील महागाव तालुकाही महत्वाचा ठरतो. या तालुक्यात सेना आणि भाजपाचा सूर निवडणूक काळात जुळलाच नाही. तर तालुकाध्यक्ष पदावरूनही शिवसेनेत शेवटपर्यंत कुरबुरी सुरूच होत्या. तसेच नेत्यांसह कार्यकर्त्यांनाही मोदी लाटेचा अतिआत्मविश्वासही चांगलाच नडला. हिंगोली लोकसभा मतदारसंघात शिवसेनेचे विद्यमान खासदार सुभाष वानखडे यांचा पराभव झाला. युवक काँग्रेसचे राष्टÑीय अध्यक्ष आमदार अ‍ॅड. राजीव सातव यांचा अल्पमताने का होईना विजय झाला. उमरखेड विधानसभा मतदारसंघात सातव यांना एक हजार ४७९ मतांची आघाडी भेटली. काँग्रेसचे आमदार विजयराव खडसे या मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करतात. शिवसेनेचा विजयरथ रोखण्यात उमरखेड विधानसभा मतदारसंघाचा वाटा असला तरी ही आघाडी आणखीन मोठी राहू शकली असती. परंतु मतदारांना आकर्षित करण्यात स्थानिक नेते कमी पडल्याचे दिसून येते. शिवसेनेच्या पराभवात महागाव तालुक्याचाही वाटा आहे. या तालुक्यात शेवटपर्यंत भाजपा आणि सेनेचे सूरच जुळले नाही. शिवसेनेतही अंतर्गत कुरबुरी सुरूच होत्या. जिल्ह्यात कुठेही नसेल असे दोन तालुका प्रमुख येथे आहे. सुरुवातीला नियुक्त केलेल्या तालुका प्रमुखाबद्दल खासदार वानखडे यांची नाराजी होती. त्यानंतर त्यांनी आपल्या मर्जीतील व्यक्तीला तालुका प्रमुख केले. दोघेही तालुका प्रमुख म्हणून सध्या येथे आहेत. यातूनही शिवसेनेत धुसपूस दिसत होती. निवडणूक काळातही सुभाष वानखडे यांनी निवडलेलाच तालुका प्रमुख सक्रिय होता. त्यांनी कुणालाही विश्वासात घेतले नाही. देशात मोदीची लाट आहे. शिवसेनेचा उमेदवार सहज निवडून येईल या आत्मविश्वासात सर्वच होते. मात्र झाले उलटेच. महागाव तालुका यवतमाळ जिल्ह्यात येत असून हा तालुका यवतमाळ-वाशिम आणि हिंगोली या दोन मतदारसंघात विभागला आहे. शिवसेनेच्या यवतमाळ-वाशिममधील उमेदवार भावना गवळी यांनी आपली निवडणूक आटोपल्यावर या भागात प्रचार केला. त्याचा फायदा सुभाष वानखडे यांना झाला. परंतु विजयात ते परावर्तीत करता आले नाही. विशेष म्हणजे सुभाष वानखडे खासदार असताना उमरखेड-महागावमध्ये त्यांच्या वाहनाची काच कधीही खाली झाली नाही. हा रोषही त्यांना या निवडणुकीत भोवला. काँग्रेसचे उमेदवार राजीव सातव यांनी नियोजनबद्ध प्रचार केला. सर्वांना सोबत घेतले. त्यांच्यासाठी ना.मनोहरराव नाईक यांनीही ठिकठिकाणी सभा घेतल्या. बंजारा बहूल भागात बंजारी भाषेत भाषणे देऊन प्रचार केला. त्याचाही फायदा राजीव सातव यांना झाला. एकंदरित हिंगोली लोकसभा मतदारसंघात देशात मोदी लाट असतानाही काँग्रेसचा उमेदवार निवडून आला.