शहरं
Join us  
Trending Stories
1
Manoj Jarange: '...तोपर्यंत मुंबई सोडणार नाही', नोटीसनंतर मनोज जरांगेंचा मुख्यमंत्री फडणवीसांना इशारा
2
Manoj Jarange Patil Maratha Morcha Live: आझाद मैदानावर आंदोलन करावे, इतर कुठेही बसू नये; मुंबई पोलिसांचे आंदोलकांना आवाहन
3
औषधांवर २०० टक्क्यांपर्यंत टॅरिफ लावण्याचा डोनाल्ड ट्रम्प यांचा प्लॅन; भारतावर किती होणार परिणाम?
4
आंदोलनात बेकायदेशीर कृत्ये, लवकरात लवकर मैदान रिकामं करा; मनोज जरांगेंना पाठवलेल्या पोलिसांच्या नोटीसमध्ये काय?
5
भारत-रशिया मैत्री पाहून अमेरिका भडकली, ट्रम्प यांचे सल्लागार संतापले; म्हणाले, 'आमच्यासोबत...!'
6
GST बैठकीच्या पार्श्वभूमीवर शेअर बाजारात तेजी; रिलायन्समध्ये सर्वाधिक वाढ तर 'हे' स्टॉक्स घसरले
7
Parivartani Ekadashi 2025: परिवर्तनी एकादशी; चातुर्मासाचा मध्यंतर, यादिवशी श्रीहरी श्रीविष्णूंची बदलतात कूस!
8
Punjab Flood: अर्धा पंजाब पाण्यात! १३०० गावांना पुराचा वेढा, हजारो लोक बेघर; २९ जणांचा मृत्यू
9
Maharashtra Rain: राज्यात पाऊस पुन्हा धुमाकूळ घालणार, आठ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
10
गणेशोत्सव साजरा करत नाही आलिया? ट्रोल झाल्यानंतर दिलं सडेतोड उत्तर; फोटो शेअर करत म्हणाली...
11
अनंत चतुर्दशी २०२५: गणेशोत्सवाची सांगता; पाहा, मान्यता, २०२६ मध्ये कधी येणार गणपती बाप्पा?
12
Mitchell Starc T20I Retirement : आगामी टी-२० वर्ल्ड कप आधी स्टार गोलंदाजाने घेतला निवृत्तीचा निर्णय; जाणून घ्या त्यामागचं कारण
13
४ राजयोगात परिवर्तिनी एकादशी: ९ राशींचे कल्याण-भरभराट, सुबत्ता-शुभ-लाभ; धनलक्ष्मी प्रसन्न!
14
'ही' आंतरराष्ट्रीय बँक भारतातून गाशा गुंडाळण्याच्या तयारीत? ग्राहकांच्या पैशांचं काय होणार?
15
Mumbai: मुंबईत मोठी वाहतूक कोंडी; कार्यालय गाठता गाठता नोकरदारांच्या नाकीनऊ!
16
तुम्हाला कन्नड येते का? मुख्यमंत्र्यांच्या प्रश्नावर राष्ट्रपतींचे चोख प्रत्युत्तर; म्हणाल्या,'प्रत्येकाने आपली भाषा...'
17
Maratha Reservation: मराठा आरक्षणाबाबत सरकारचा मसुदा तयार, लवकरच निर्णय!
18
१५ राज्ये, अनेक बँका अन् ओटीपीशिवाय खात्यातून काढले २९ कोटी; ६ आरोपींचे हादरवणारे कृत्य
19
हेमा मालिनी यांनी विकले मुंबईतील दोन आलिशान फ्लॅट्स, १२.५ कोटींची कमाई अन् आता...
20
Raigad Accident: रायगडमध्ये रिक्षाला अपघात, ब्रेक फेल झाल्याने दिशादर्शकाला धडक, तीन ठार

प्रेयसीसमोरच प्रियकराने लावला गळफास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2020 14:45 IST

Yawatmal news यवतमाळ शहरालगतच्या जामडोह येथील विवाहित प्रियकर व प्रेयसी एकांत शोधण्यासाठी भिसनी शिवारातील जंगलात जात होते. दोघांमध्ये वाद झाला. संतापलेल्या प्रियकराने प्रेयसीसमोरच तिच्या ओढणीने गळफास लावून घेतला. यात त्याचा जागीच मृत्यू झाला.

ठळक मुद्देभिसनी जंगलातील थरारप्रेयसीच्या कबुलीवरून रहस्य उलगडले

लोकमत न्यूज नेटवर्क 

यवतमाळ : शहरालगतच्या जामडोह येथील विवाहित प्रियकर व प्रेयसी एकांत शोधण्यासाठी भिसनी शिवारातील जंगलात जात होते. नेहमीप्रमाणे हे युगुल २१ डिसेंबर रोजी दुपारी ३ वाजता त्यांच्या ठराविक जागेवर गेले. तेथे दोघांमध्ये वाद झाला. या वादात संतापलेल्या प्रियकराने प्रेयसीसमोरच तिच्या ओढणीने गळफास लावून घेतला. यात त्याचा जागीच मृत्यू झाला. हा घटनाक्रम प्रेयसीने ग्रामीण पोलिसांपुढे कबूल केल्याने खुनाच्या संशयाच्या मळभट दूर झाले. शब्बीर जुम्मा लालनवाले (३८) रा. जामडोह असे मृत प्रियकराचे नाव आहे. त्याचे गावातील ३५ वर्षीय महिलेशी प्रेमसंबंध होते. त्यांच्या या अनैतिक संबंधाचे बिंग फुटले. शब्बीरच्या कुटुंबीयांना ते माहीत झाल्याने त्याला समजावून सांगितले जात होते. शब्बीर दुचाकीने २१ डिसेंबरच्या दुपारी प्रेयसीला घेऊन  भिसनी जंगलातील एका दरीत उतरला. त्यांचे ते नेहमीचे ठिकाण होते. शब्बीर दोन दिवसांपासून बेपत्ता असल्याने त्याच्या कुटुंबीयांनी शोध घेतला. तेव्हा मंगळवारी शब्बीरची दुचाकी भिसनी जंगलात आढळली. काही अंतरावर दरीमध्ये त्याचे प्रेत दिसले. याची माहिती पोलिसांना देण्यात आली. प्रेमसंबंधाचा प्रकार असल्याचेही कुटुंबीयांकडून सांगण्यात आले होते. सुरुवातीला खुनाचा संशय व्यक्त केला जात होता. मात्र शब्बीरची प्रेयसी पोलिसांच्या हाती लागताच तिने संपूर्ण घटनाक्रम सांगितला. शब्बीरने मद्यप्राशन केले, नंतर त्याच दारूची बॉटल फोडून काचाने डाव्या हाताची नस कापण्याचा प्रयत्न केला. त्यात यश आले नाही. त्याने प्रेयसीच्या गळ्यातील ओढणी घेवून झाडाला गळफास लावला. त्याच्या प्रेयसीने त्याचा गळफास काढण्याचा प्रयत्न केला. मात्र तिला ते शक्य झाले नाही. शेवटी तिने काचाने ओढणी चिरली. तोपर्यंत वेळ निघून गेली होती. शब्बीरचा मृत्यू झाल्याचे पाहून तिनेही त्याच्या कंबरेचा पट्टा तोडून गळफास लावण्याचा प्रयत्न केला. मात्र तिला गळफास लागला नाही. घाबरलेल्या अवस्थेत ती पळून गेली, असा जबाब ग्रामीण पोलिसांनी नोंदविला आहे. शिवाय शवविच्छेदन अहवालानुसार शब्बीरचा मृत्यू हा गळफास लागल्याने झाल्याचे सांगण्यात आले. त्याच्या हातावरील जखमा या स्वत:च केल्याचेही वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले. याच आधारावर ग्रामीण पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद घेतली आहे, अशी माहिती ठाणेदार गजानन करेवाड यांनी दिली.

टॅग्स :Suicideआत्महत्या