शहरं
Join us  
Trending Stories
1
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
2
Mig 21 : ६० वर्षांत पाकिस्तानला अनेकदा दिली मात; निरोप घेण्यापूर्वी लढाऊ विमान 'मिग-२१'ने केले शेवटचे उड्डाण!
3
Rain Update : बाप्पाच्या स्वागतासाठी पावसाच्या 'पायघड्या'; पुढचे चार दिवस 'झोडपणार', कोणत्या भागांना इशारा?
4
जगातील सगळ्यात महागडी ७ शहरे! 'या' ठिकाणी राहायचा विचार करत असाल तर आताच जाणून घ्या...
5
नागपुरातील रस्त्यांवर कुत्र्यांना खाऊ घालाल तर खबरदार! कारवाईसाठी रहा तयार
6
पंतप्रधान मोदींची डिग्री सार्वजनिक होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द
7
‘रोजगार महाकुंभ’चे आयोजन; ५०,००० हून अधिक तरुणांना नोकऱ्या देणार योगी सरकार!
8
विमान हवेतच गायब झालं! २२ दिवसापूर्वी तस्मानियाहून उड्डाण केलं होतं; नेमकं काय घडलं?
9
Beed: लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर गेवराईत हल्ला; आमदार पंडित यांचे कार्यकर्ते आक्रमक
10
क्षुल्लक कारणावरून वाद झाला, बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडच्या तोंडात बॉम्ब टाकला अन्...; घटना ऐकून होईल अंगाचा थरकाप!
11
Atharva Sudame : 'अक्कल शिकवतोय, तुझा धंदा मर्यादित ठेव'; अथर्व सुदामेला ब्राह्मण महासंघानेही सुनावले
12
एकाच घरात का केलं दोन्ही मुलींचं लग्न? निक्की भाटीच्या वडिलांनी सांगितलं कारण! म्हणाले...
13
"राज ठाकरे साहेब, आपण..."; हकालपट्टीनंतर वैभव खेडेकरांनी सोडलं मौन, राणेंच्या भेटीबद्दल काय सांगितलं?
14
"गौतम एका ठिकाणी बसून ओरडत होता"; सिंहगड किल्ल्यावरून बेपत्ता झालेल्या तरुणाला पोलिसांनी कसं शोधलं?
15
"कुटुंबाला सांगू नका, लोकांकडून पैसे घेऊन अंत्यसंस्कार करा"; मनातील वेदना कागदावर लिहून तरुणाने संपवलं आयुष्य
16
Video: कार चालकाने अचानक दरवाजा उघडला; क्रिकेटर थेट धडकला, जागीच मृत्यू
17
याला म्हणतात परतावा...! 11403% ने वाढला हा स्टॉक, आता कंपनीला DRDO कडून मिळाली ₹3.36 कोटींची ऑर्डर, शेअरची किंमत 200 हून कमी!
18
मोबाइल हॅक झाला आहे का? हे संकेत ओळखा आणि लगेच पावलं उचला
19
अथर्व सुदामेवर टीकेचा भडीमार, असिम सरोदे मैदानात; म्हणाले, "राज ठाकरेंनी तुझं कौतुक केलंय, तू..."
20
"पप्पांनीच मम्मीला काठीने मारलं, पंख्याला लटकवलं..."; ३ वर्षांच्या लेकीने केली हत्येची पोलखोल

पाणी विक्रेत्यांकडून टंचाईग्रस्तांची लूट

By admin | Updated: May 18, 2016 02:44 IST

एकीकडे जिल्ह्यात प्रचंड दुष्काळ आणि तीव्र पाणीटंचाई असताना अशा स्थितीत ज्यांना शक्य आहे, ते आपापल्या परिने इतरांना मदत करीत आहेत.

प्रशासन निद्रिस्त : दुष्काळाचा उपयोग स्वत:चा गल्ला भरण्यासाठीयवतमाळ : एकीकडे जिल्ह्यात प्रचंड दुष्काळ आणि तीव्र पाणीटंचाई असताना अशा स्थितीत ज्यांना शक्य आहे, ते आपापल्या परिने इतरांना मदत करीत आहेत. परंतु काही महाभाग याही परिस्थितीचा फायदा स्वत:चे उखळ पांढरे करून घेण्यासाठी करीत असल्याचे दिसून येते. अत्यल्प पाऊस आणि त्यातच महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचा नियोजनाचा अभाव यामुळे यवतमाळ शहरात आज तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. अशा परिस्थितीत ज्यांच्या खासगी विहिरींना पाणी आहे, ते मात्र अव्वाच्या सव्वा दरात पाणी विक्री करीत आहेत. यवतमाळ शहरात जीवन प्राधिकरणाकडून सध्या चार दिवसाआड, काही भागात आठ ते दहा दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात येतो. काही भागात तर तो पूर्णपणे बंद करण्यात आला आहे. अशा स्थितीत नगर परिषदेकडून टँकरद्वारा पाणीपुरवठा करण्यात येत आहे. परंतु हे पाणी अपुरे पडत आहे. त्यामुळे अनेकजण स्वत: खासगी टँकरद्वारा पाणी विकत घेतात तर काही ठिकाणी दोनचार नागरिक मिळून टँकर बोलावून पाणी वाटून घेतात. अनेकांकडे काही प्रसंगारुप पाण्याची अधिक गरज असल्यास टँकर शिवाय पर्याय नसतो. याचाच फायदा घेऊन ज्यांच्या विहिरींना अथवा बोअरवेलला पाणी आहे, असे महाभाग अव्वाच्या सव्वा दराने पाणी विकत आहेत. केवळ दोन हजार लिटर्स पाण्याचे तीनशे ते चारशे रुपये तर तीन हजार लिटर्सच्या टँकरचे पाचशे ते आठशे रुपये घेणे सुरू आहे. कोणत्याही पावतीशिवाय मनमानी करून ही पाणीविक्री सुरू आहे. अनेकजण पिण्याचे पाणी बोअर किंवा विहिरीचे फिल्टर न करताच कॅनमध्ये भरून ३० ते ५० रुपयांपर्यंत या कॅनची विक्री करीत आहेत. या पाण्याच्या शुद्धतेची कोणतीही खात्री नाही. याकडे नगर परिषद व अन्न औषधी प्रशासन सारख्या सबंधित विभागांनी जाणीवपूर्वक दुर्लक्ष चालविले असल्याचा आरोप नागरिकांचा आहे. याबाबत नगर परिषदेशी संपर्क साधल्यास खासगी पाणी विक्रेत्यांनी ते जास्तीत जास्त किती रुपयांना विकावे, याचे निकष आहेत. परंतु त्यापेक्षा जास्त दराने कुणी विक्री करीत असल्यास लेखी तक्रार करा त्यानंतरच आम्ही कारवाई करू असे सांगण्यात आले. तक्रार करून या टँकर माफियांशी दुश्मनी गोरगरीब लोक कसे घेतील, हे मात्र ते समजून घ्यायला तयार नाही. पाण्यासारखे दुसरे कोणतेही पुण्य नाही, असे म्हटले जाते. पूर्वी दुष्काळ व पाणीटंचाईच्या परिस्थितीत ज्यांच्या विहिरींना पाणी असायचे, असे नागरिक स्वत:ची विहिर इतरांसाठी खुली करून देत होते, आज मात्र या पाण्याच्या पैशातून आपल्या सात पिढ्या कशा जगतील, याची तजवीज लावली जात आहे. (प्रतिनिधी)