शहरं
Join us  
Trending Stories
1
Thane Video: पतीला मारहाण करत शिवीगाळ, मनसे पदाधिकारी असलेल्या पत्नीने परप्रांतीय महिलेच्या लगावली कानशिलात; ठाण्यातील घटना
2
संतापजनक! प्रेमानंद महाराजांची भेट करुन देण्याच्या बहाण्याने हॉटेलमध्ये महिलेवर अत्याचार, मथुरा येथे आरोपीला अटक
3
"अमेरिकेची भूमिका दुटप्पी, आम्हीही..."; ट्रम्प यांच्या १०० टक्के टॅरिफच्या धमकीला चीनचे उत्तर
4
Viral Video: तिकीट न काढता मेट्रोतून प्रवास करण्याचा जुगाड, व्हिडीओ पाहून डोक्याला माराल हात!
5
IND vs WI 2nd Test Day 3 Stumps : फॉलोऑनची नामुष्की ओढावल्यावर या दोघांची बॅट तळपली, अन्...
6
IND vs WI: यशस्वी जयस्वालवर चेंडू फेकणं जेडेन सील्सला महागात पडलं; आयसीसीनं ठोठावला 'इतका' दंड!
7
चाबहार बंदर, वाघा बॉर्डर आणि..; भारत-अफगाणिस्तानात 'या' मुद्द्यांवर चर्चा, मुत्ताकी यांची माहिती
8
अफगाणिस्तानच्या हल्ल्यात पाकिस्तानचे ५८ सैनिक ठार; तालिबान सरकारने ISIS बद्दल काय सांगितलं?
9
संतापजनक! बहिणीला भेटायला चाललेल्या अल्पवयीन विद्यार्थिनीवर रस्त्यातच सामूहिक बलात्कार
10
AI नाही, भारतीयांच्या टॅलेंटची कमाल! या तरुणाच्या क्रिएटिव्हिटीने लावले सर्वांना वेड; व्हिडीओ एकदा बघा
11
'मुलींनी रात्री बाहेर पडू नये', दुर्गापूर सामूहिक बलात्कार प्रकरणावर ममता बॅनर्जींचे वादग्रस्त वक्तव्य
12
घरात घुसली ८ फूट लांब आणि ८० किलोंची मगर; पठ्ठ्याने एकट्यानेच नेली उचलून
13
धक्कादायक! कपडे उतरवून पोलिसांनी हैवानासारखं मारलं, धमन्या फुटल्या; तरुणाचा मृत्यू
14
'वनडे क्वीन' स्मृतीनं रचला नवा इतिहास; ७ वेळच्या वर्ल्ड चॅम्पियन विरुद्ध साधला मोठा डाव
15
“कोकणाच्या भूमीतील या न्याय मंदिरातून स्थानिकांना जलद गतीने न्याय मिळेल”: एकनाथ शिंदे
16
‘लंच पे चर्चा’! राज ठाकरे आईसोबत पुन्हा मातोश्रीवर; उद्धव ठाकरेंसोबत स्नेहभोजनाचा कार्यक्रम
17
गृह कर्जाचा हप्ता भरणं जड जातंय? ईएमआय कमी करण्यासाठी 'या' ५ स्मार्ट ट्रिक्स वापरा आणि मोठी बचत करा!
18
“दादा भुसेंचे ट्रम्प यांच्याशी घनिष्ट संबंध असतील, पालकमंत्रीपद...”; गिरीश महाजनांचा टोला
19
अर्धा संघ तंबूत धाडत कुलदीप यादवनं रचला इतिहास; दिल्लीच्या मैदानात मारला विश्वविक्रमी 'पंजा'
20
तुम्हालाही मस्त नेलपेंट लावायला आवडते? ठरेल जीवघेणं, वाढू शकतो स्किन कॅन्सरचा धोका

पाणी विक्रेत्यांकडून टंचाईग्रस्तांची लूट

By admin | Updated: May 18, 2016 02:44 IST

एकीकडे जिल्ह्यात प्रचंड दुष्काळ आणि तीव्र पाणीटंचाई असताना अशा स्थितीत ज्यांना शक्य आहे, ते आपापल्या परिने इतरांना मदत करीत आहेत.

प्रशासन निद्रिस्त : दुष्काळाचा उपयोग स्वत:चा गल्ला भरण्यासाठीयवतमाळ : एकीकडे जिल्ह्यात प्रचंड दुष्काळ आणि तीव्र पाणीटंचाई असताना अशा स्थितीत ज्यांना शक्य आहे, ते आपापल्या परिने इतरांना मदत करीत आहेत. परंतु काही महाभाग याही परिस्थितीचा फायदा स्वत:चे उखळ पांढरे करून घेण्यासाठी करीत असल्याचे दिसून येते. अत्यल्प पाऊस आणि त्यातच महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचा नियोजनाचा अभाव यामुळे यवतमाळ शहरात आज तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. अशा परिस्थितीत ज्यांच्या खासगी विहिरींना पाणी आहे, ते मात्र अव्वाच्या सव्वा दरात पाणी विक्री करीत आहेत. यवतमाळ शहरात जीवन प्राधिकरणाकडून सध्या चार दिवसाआड, काही भागात आठ ते दहा दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात येतो. काही भागात तर तो पूर्णपणे बंद करण्यात आला आहे. अशा स्थितीत नगर परिषदेकडून टँकरद्वारा पाणीपुरवठा करण्यात येत आहे. परंतु हे पाणी अपुरे पडत आहे. त्यामुळे अनेकजण स्वत: खासगी टँकरद्वारा पाणी विकत घेतात तर काही ठिकाणी दोनचार नागरिक मिळून टँकर बोलावून पाणी वाटून घेतात. अनेकांकडे काही प्रसंगारुप पाण्याची अधिक गरज असल्यास टँकर शिवाय पर्याय नसतो. याचाच फायदा घेऊन ज्यांच्या विहिरींना अथवा बोअरवेलला पाणी आहे, असे महाभाग अव्वाच्या सव्वा दराने पाणी विकत आहेत. केवळ दोन हजार लिटर्स पाण्याचे तीनशे ते चारशे रुपये तर तीन हजार लिटर्सच्या टँकरचे पाचशे ते आठशे रुपये घेणे सुरू आहे. कोणत्याही पावतीशिवाय मनमानी करून ही पाणीविक्री सुरू आहे. अनेकजण पिण्याचे पाणी बोअर किंवा विहिरीचे फिल्टर न करताच कॅनमध्ये भरून ३० ते ५० रुपयांपर्यंत या कॅनची विक्री करीत आहेत. या पाण्याच्या शुद्धतेची कोणतीही खात्री नाही. याकडे नगर परिषद व अन्न औषधी प्रशासन सारख्या सबंधित विभागांनी जाणीवपूर्वक दुर्लक्ष चालविले असल्याचा आरोप नागरिकांचा आहे. याबाबत नगर परिषदेशी संपर्क साधल्यास खासगी पाणी विक्रेत्यांनी ते जास्तीत जास्त किती रुपयांना विकावे, याचे निकष आहेत. परंतु त्यापेक्षा जास्त दराने कुणी विक्री करीत असल्यास लेखी तक्रार करा त्यानंतरच आम्ही कारवाई करू असे सांगण्यात आले. तक्रार करून या टँकर माफियांशी दुश्मनी गोरगरीब लोक कसे घेतील, हे मात्र ते समजून घ्यायला तयार नाही. पाण्यासारखे दुसरे कोणतेही पुण्य नाही, असे म्हटले जाते. पूर्वी दुष्काळ व पाणीटंचाईच्या परिस्थितीत ज्यांच्या विहिरींना पाणी असायचे, असे नागरिक स्वत:ची विहिर इतरांसाठी खुली करून देत होते, आज मात्र या पाण्याच्या पैशातून आपल्या सात पिढ्या कशा जगतील, याची तजवीज लावली जात आहे. (प्रतिनिधी)