शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटेंना कधी डिस्चार्ज मिळणार? नाशिक पोलिसांचा फौजफाटा रुग्णालयात तैनात; काय आहे अपडेट?
2
कोणाशी युती, कोणाला उमेदवारी; काँग्रेसचा निर्णय २५ डिसेंबरला, आघाडीबरोबरच निधीची व्यवस्थाही स्थानिक पातळीवरच 
3
भाडे थकविणाऱ्यांची विक्रीची घरे जप्त करू; हायकोर्टाची पुनर्वसन योजनेतील विकासकांना तंबी
4
किडनी विक्री प्रकरणी कंबोडियाच्या लिंकसह प्रत्येक व्यवहार तपासणार; तांत्रिक तपासातून उघड होणार 'इंटरनॅशनल लिंक'
5
१५ हजार एचआयव्ही रुग्णांनी अर्धवट सोडले उपचार; सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेसाठी गंभीर इशारा
6
विजयासाठी पैठणी, नथींचे देताहेत वाण : लकी ड्रॉमध्ये टीव्ही, फ्रिज अन् एसी सुद्धा...
7
हिजाब वादानंतर मुख्यमंत्री नितीश कुमार यांची सुरक्षा वाढवली, पोलिसांनी व्यक्त केली भीती
8
"निवडणूक आयोग बेईमान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 'गजनी"; हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
9
माणिकराव कोकाटेंना आजच रात्री अटक होणार? नाशिक पोलिसांची टीम लिलावती रुग्णालयात दाखल
10
Shilpa Shetty: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीला दणका! मुंबईतील घरावर आयकर विभागाचा छापा
11
महसूल अधिकारी, कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे; चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी चर्चेनंतर निर्णय
12
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
13
ठाकरेंचा शिलेदार भाजपामध्ये... संजोग वाघेरेंचा राजीनामा, पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात भूकंप
14
'लाडक्या बहिणी' निवडणूक लढवण्यासाठी तुफान उत्साही; शिवसेनेत मुलाखतींसाठी इच्छुकांची गर्दी
15
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
16
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
17
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
18
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
19
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिळाला सर्वोच्च सन्मान
20
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
Daily Top 2Weekly Top 5

कर्जमाफी १३७७ कोटींवर

By admin | Updated: June 13, 2017 01:15 IST

राज्य शासनाने शेतकऱ्यांना कर्जमाफीची तत्वत: घोषणा केल्याने जिल्ह्यातील शेतकऱ्यांना १३७७ कोटी रुपयांची कर्जमाफी मिळण्याचे संकेत आहे.

२६ जुलैची प्रतीक्षा : दोन लाख ८० हजार शेतकऱ्यांचा समावेशलोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : राज्य शासनाने शेतकऱ्यांना कर्जमाफीची तत्वत: घोषणा केल्याने जिल्ह्यातील शेतकऱ्यांना १३७७ कोटी रुपयांची कर्जमाफी मिळण्याचे संकेत आहे. मात्र कर्जमाफीचे धोरण २६ जुलैनंतर स्पष्ट होणार असल्याने कर्जमाफीचा आकडा त्यानंतर निश्चित कळणार आहे.राज्यात शेतकऱ्यांच्या आंदोलनानंतर मंत्रीगट आणि सुकाणू समितीची मुंबईत बैठक झाली. या बैठकीनंतर अल्पभूधारक शेतकऱ्यांना तत्काळ कर्जमाफी तर मोठ्या शेतकऱ्यांना तत्वत: कर्जमाफी देण्याची घोषणा करण्यात आली. यामुळे जिल्ह्यातील दोन लाख ८० हजार शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत झाल्या आहे. या शेतकऱ्यांकडे १३७७ कोटी रुपयांचे कर्ज थकीत आहे. त्यात जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या एक लाख ९६ हजार ३६४ शेतकऱ्यांकडे ९२७ कोटी ९९ लाख ६२ हजार रुपयांचे कर्ज आहे. यामध्ये अल्प, अत्यल्पभूधारक आणि मोठ्या शेतकऱ्यांच्या कर्जाचा समावेश आहे. तर जिल्ह्यातील राष्ट्रीयकृत बँकांच्या ८४ हजार २०० शेतकऱ्यांकडे ४५० कोटी रुपयांचे कर्ज थकीत आहे. राज्य शासनाने अल्पभूधारक शेतकऱ्यांना कर्जमाफी दिल्याने जिल्हा बँकेच्या एक लाख दोन हजार अल्प व अत्यल्पभूधारक शेतकऱ्यांना ५५० कोटी रुपयांचे कर्जमाफ होण्याचे संकेत आहे. विशेष म्हणजे राष्ट्रीयकृत बँकेच्या थकबाकीदारांचा आकडा गुलदस्त्यात आहे. २६ जुलैनंतर याबाबतचे धोरण स्पष्ट होणार असल्याने आता सर्व शेतकऱ्यांचे लक्ष २६ जुलैकडे लागले आहे. शेतकऱ्यांना उत्तर देताना बँका हैराणराज्य शासनाने कर्जमाफीची घोषणा करताना अल्पभूधारक शेतकऱ्यांना सोमवारपासून कर्ज वाटप होईल, असे सांगितले. त्यामुळे जिल्हा बँकेसह विविध बँकांमध्ये शेतकरी कर्जासाठी धडकले. परंतु या शेतकऱ्यांना नेमके उत्तर देताना बँकेचे कर्मचारी हैराण झाल्याचे सोमवारी दिवसभर दिसत होते. अल्पभूधारक आणि अत्यल्पभूधारक अशा निकषात बसणाऱ्या एक लाख शेतकऱ्यांना कर्ज वितरणासाठी ५५० कोटी रुपये लागणार आहे. या पैशांची कुठलीही तरतूद राज्य शासनाने केली नाही, तसा कुठलाही आदेश निघाला नाही. प्रत्यक्षात जिल्हास्तरावर कर्जमाफी संदर्भात सोमवारी कुठलाही आदेश पोहोचला नव्हता. शासनाचा आदेश येईपर्यंत नवीन कर्ज मिळणार नाही, असे बँकेचे अधिकारी शेतकऱ्यांना वारंवार सांगत होते. नोटांचा तुटवडासध्याच्या स्थितीत संपूर्ण जिल्ह्यात चलनी नोटांचा तुटवडा निर्माण झाला आहे. २५ हजारांचा धनादेश असला तरी दोन ते तीन हजार रुपये दिले जाते. यामुळे कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना नवीन कर्ज मिळविताना मोठी अडचण येत आहे. बँकांमध्ये आणि एटीएमबाहेर रांगा लागल्या आहेत. अशातच कर्जमाफीनंतर नवीन कर्ज वितरित करावे लागल्यास चलनी नोटा आणाव्या कोठून असा प्रश्न बँकांपुढे उपस्थित झाला आहे.कर्जमाफीसंदर्भात कुठलाही आदेश आला नाही. बँकांना पतपुरवठा कसा होणार याची कुठलीही माहिती उपलब्ध नाही. जोपर्यंत लेखी सूचना आणि पैसा उपलब्ध होणार नाही तोपर्यंत थकबाकीदार शेतकऱ्यांना नवीन कर्ज देता येणार नाही.- अविनाश सिंघममुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा मध्यवर्ती बँक