शहरं
Join us  
Trending Stories
1
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
2
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
3
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
4
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
5
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
6
मनसेनं मोर्चाची तारीख बदलली, राज ठाकरेंनी जारी केलं निवेदन, काय म्हणाले? जाणून घ्या...
7
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
8
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
9
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
10
"एनआरसी सारखे षड्‍यंत्र..."; बिहारमधील मतदार यादीवरून ममता बॅनर्जी यांचा निवडणूक आयोगाला टोला
11
'अमेरिकेच्या थोबाडीत मारली...', युद्धविराम जाहीर केल्यानंतर खामेनी यांनी केला विजयाचा दावा
12
..त्यामुळे हिंदी सक्तीचे नकोच; राज्य शासनाने हट्ट सोडावा, शरद पवार यांचा सल्ला 
13
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
14
इतिहास घडला! 'ड्रॅगन'मधून शुभांशु शुक्ला आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर पोहोचले, १४ दिवस करणार संशोधन
15
"हिंदी कुठल्याही भाषेची शत्रू नाही..."; भाषावादावर पुन्हा एकदा अमित शाह स्पष्ट बोलले
16
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
17
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत
18
२८ जुलैपर्यंत मंगळ राहु-केतु अशुभ योग: ८ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; शुभ-कल्याणाचा काळ!
19
दोन दिग्गज एकत्र आले; अदानी-अंबानी यांच्यात मोठा करार, 'या' क्षेत्रात क्रांती घडणार...
20
"राज्यात मराठीच सक्तीची, पण..."; त्रिभाषा सूत्रावरून भाजपाने स्पष्ट केली भूमिका

कर्जमाफी १३७७ कोटींवर

By admin | Updated: June 13, 2017 01:15 IST

राज्य शासनाने शेतकऱ्यांना कर्जमाफीची तत्वत: घोषणा केल्याने जिल्ह्यातील शेतकऱ्यांना १३७७ कोटी रुपयांची कर्जमाफी मिळण्याचे संकेत आहे.

२६ जुलैची प्रतीक्षा : दोन लाख ८० हजार शेतकऱ्यांचा समावेशलोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : राज्य शासनाने शेतकऱ्यांना कर्जमाफीची तत्वत: घोषणा केल्याने जिल्ह्यातील शेतकऱ्यांना १३७७ कोटी रुपयांची कर्जमाफी मिळण्याचे संकेत आहे. मात्र कर्जमाफीचे धोरण २६ जुलैनंतर स्पष्ट होणार असल्याने कर्जमाफीचा आकडा त्यानंतर निश्चित कळणार आहे.राज्यात शेतकऱ्यांच्या आंदोलनानंतर मंत्रीगट आणि सुकाणू समितीची मुंबईत बैठक झाली. या बैठकीनंतर अल्पभूधारक शेतकऱ्यांना तत्काळ कर्जमाफी तर मोठ्या शेतकऱ्यांना तत्वत: कर्जमाफी देण्याची घोषणा करण्यात आली. यामुळे जिल्ह्यातील दोन लाख ८० हजार शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत झाल्या आहे. या शेतकऱ्यांकडे १३७७ कोटी रुपयांचे कर्ज थकीत आहे. त्यात जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या एक लाख ९६ हजार ३६४ शेतकऱ्यांकडे ९२७ कोटी ९९ लाख ६२ हजार रुपयांचे कर्ज आहे. यामध्ये अल्प, अत्यल्पभूधारक आणि मोठ्या शेतकऱ्यांच्या कर्जाचा समावेश आहे. तर जिल्ह्यातील राष्ट्रीयकृत बँकांच्या ८४ हजार २०० शेतकऱ्यांकडे ४५० कोटी रुपयांचे कर्ज थकीत आहे. राज्य शासनाने अल्पभूधारक शेतकऱ्यांना कर्जमाफी दिल्याने जिल्हा बँकेच्या एक लाख दोन हजार अल्प व अत्यल्पभूधारक शेतकऱ्यांना ५५० कोटी रुपयांचे कर्जमाफ होण्याचे संकेत आहे. विशेष म्हणजे राष्ट्रीयकृत बँकेच्या थकबाकीदारांचा आकडा गुलदस्त्यात आहे. २६ जुलैनंतर याबाबतचे धोरण स्पष्ट होणार असल्याने आता सर्व शेतकऱ्यांचे लक्ष २६ जुलैकडे लागले आहे. शेतकऱ्यांना उत्तर देताना बँका हैराणराज्य शासनाने कर्जमाफीची घोषणा करताना अल्पभूधारक शेतकऱ्यांना सोमवारपासून कर्ज वाटप होईल, असे सांगितले. त्यामुळे जिल्हा बँकेसह विविध बँकांमध्ये शेतकरी कर्जासाठी धडकले. परंतु या शेतकऱ्यांना नेमके उत्तर देताना बँकेचे कर्मचारी हैराण झाल्याचे सोमवारी दिवसभर दिसत होते. अल्पभूधारक आणि अत्यल्पभूधारक अशा निकषात बसणाऱ्या एक लाख शेतकऱ्यांना कर्ज वितरणासाठी ५५० कोटी रुपये लागणार आहे. या पैशांची कुठलीही तरतूद राज्य शासनाने केली नाही, तसा कुठलाही आदेश निघाला नाही. प्रत्यक्षात जिल्हास्तरावर कर्जमाफी संदर्भात सोमवारी कुठलाही आदेश पोहोचला नव्हता. शासनाचा आदेश येईपर्यंत नवीन कर्ज मिळणार नाही, असे बँकेचे अधिकारी शेतकऱ्यांना वारंवार सांगत होते. नोटांचा तुटवडासध्याच्या स्थितीत संपूर्ण जिल्ह्यात चलनी नोटांचा तुटवडा निर्माण झाला आहे. २५ हजारांचा धनादेश असला तरी दोन ते तीन हजार रुपये दिले जाते. यामुळे कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना नवीन कर्ज मिळविताना मोठी अडचण येत आहे. बँकांमध्ये आणि एटीएमबाहेर रांगा लागल्या आहेत. अशातच कर्जमाफीनंतर नवीन कर्ज वितरित करावे लागल्यास चलनी नोटा आणाव्या कोठून असा प्रश्न बँकांपुढे उपस्थित झाला आहे.कर्जमाफीसंदर्भात कुठलाही आदेश आला नाही. बँकांना पतपुरवठा कसा होणार याची कुठलीही माहिती उपलब्ध नाही. जोपर्यंत लेखी सूचना आणि पैसा उपलब्ध होणार नाही तोपर्यंत थकबाकीदार शेतकऱ्यांना नवीन कर्ज देता येणार नाही.- अविनाश सिंघममुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा मध्यवर्ती बँक