शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

शुभ्र शिधापत्रिकाधारक शेतकऱ्यांना जीवनदायीचा लाभ

By admin | Updated: May 25, 2016 00:16 IST

राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेचा लाभ आता जिल्हयातील शुभ्र शिधापत्रिका धारक शेतकरी कुटुंबांना मिळणार आहे.

शासनाचा निर्णय : शेतकरी कुटुंबीयांच्या फायद्याची योजना, सात-बाराच्या उताऱ्यावरही मिळेल योजनेचा लाभयवतमाळ : राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेचा लाभ आता जिल्हयातील शुभ्र शिधापत्रिका धारक शेतकरी कुटुंबांना मिळणार आहे. त्यामुळे या योजनेचा लाभ शेतकरी कुटुंबांनी घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी सचिन्द्र प्रताप सिंह यांनी केले आहे. राज्यात ३१ मे २०११ पासून राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना राबविण्यास सुरवात करण्यात आली. सुरवातीला या योजनेमध्ये दारिद्रय रेषेखालील पिवळी, अंत्योदय अन्न योजना, अन्नपूर्णा व दारिद्रय रेषेवरील एक लाखापर्यंत वार्षिक उत्पन्न असलेल्या केशरी शिधापत्रिका धारक कुटुंबांना लाभार्थी म्हणून समावेश करण्यात आला होता. मात्र, आता यामध्ये शुभ्र शिधापत्रिका धारक शेतकरी कुटुंबांचाही समावेश करण्यात आला आहे. यामध्ये यवतमाळ जिल्हयासह अमरावती विभागातील चार, औंरगाबाद विभागातील आठ जिल्हे आणि नागपूर विभागातील वर्धा अशा १४ आत्महत्याग्रस्त जिल्हयातील शुभ्र शिधापत्रिकाधारक शेतकरी कुटुंबांचा समावेश करण्यात आला आहे. तसेच ज्या शेतकऱ्यांकडे शुभ्र शिधापत्रिका उपलब्ध नसल्यास सात-बाराच्या उताऱ्यावर सुद्धा या योजनेचा लाभ घेता येणार आहे. जिल्हयातील या योजनेचा लाभ घेणारा लाभार्थी कुटुंबांचा व्यवसाय हा फक्त शेती एवढाच असणे आवश्यक राहणार असून शासकीय, निमशासकीय सेवेत असलेल्या शुभ्र शिधापत्रिकाधारक शेतकऱ्यांना योजनेचा लाभ घेता येणार नाही. तसेच जिल्हयातील सर्वच शुभ्र शिधापत्रिकाधारकांचा अतिरीक्त विमाहप्ता विमा कंपनीस अदा करण्यात येईल, ज्या शेतकरी कुटुंबांकडे शुभ्र शिधापत्रिका नाही अशा लाभार्थ्यांना सात-बाराच्या उताऱ्यावर योजनेचा लाभ घेता येणार आहे. एखाद्या शेतकरी कुटुंबातील सदस्याचे नाव शुभ्र शिधापत्रिका व सात-बारा उताऱ्यात समाविष्ट नसल्यास हा सदस्य त्या कुटुंबातीलच असल्याबाबतचे संबंधीत महसुली अधिकाऱ्याच्या स्वाक्षरीचे प्रमाणपत्र ग्राहय धरण्यात येणार आहे. त्यामुळे शुभ्र शिधापत्रिका धारक शेतकरी कुटुंबांनी राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी सचिन्द्र प्रताप सिंह यांनी केले आहे. (प्रतिनिधी)