शहरं
Join us  
Trending Stories
1
'चुका दुरुस्त केल्याशिवाय निवडणुका घेता येणार नाही'; उद्धव ठाकरेंची निवडणूक आयोगावर टीका
2
विद्यार्थिनीने स्वतः टॉयलेट अ‍ॅसिड आणले, वडिलांनीच कट रचला; डीयू विद्यार्थिनी अ‍ॅसिड हल्ला प्रकरणात मोठा ट्विस्ट
3
बांगलादेशात हाफीज सईदची नापाक खेळी; ईशान्येकडे भारतासाठी धोक्याची घंटा, सीमेवर हालचाली वाढल्या
4
रेस्टॉरंटमध्ये भाऊ-बहिणीशी पोलिसांचे गैरवर्तन; व्हिडीओ व्हायरल, एसओने कारणे दाखवा नोटीस बजावली
5
छठ पूजेदरम्यान उत्तर प्रदेशात मोठी दुर्घटना; लोक सेल्फी घेत असतानाच नाव उलटली, अनेक जण बुडाल्याची शक्यता
6
2028 मध्ये अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक कोण लढू शकतं? डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्टच सांगितलं
7
अरुणाचल सीमेपासून ४० किमी अंतरावर चीनने बांधला मोठा एअरबेस; लुंजेमध्ये ३६ नवीन एअरक्राफ्ट शेल्टर तयार
8
करारा जवाब मिलेगा..! पाकिस्तानच्या धमकीला तालिबानचं जशास तसं प्रत्युत्तर; युद्ध पेटणार?
9
Suryakumar Yadav: ऑस्ट्रेलियाविरुद्ध सूर्यकुमार इतिहास रचणार? विराट- रोहितला मागे टाकण्याची संधी!
10
मतदारांनो सावधान! 'ही' कागदपत्रे नसतील तर नाव होणार कट; आयोगाने यादी जाहीर केली
11
देशव्यापी 'मतदार यादी दुरुस्ती मोहिम' का गरजेची? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
12
मला जाऊ द्या ना घरी...! राष्ट्रवादीच्या कार्यालयात डान्स करणारी ही महिला कोण?; समोर आला खुलासा
13
"तू त्या कॅचसाठी..." आयसीयूमध्ये दाखल असलेल्या श्रेयस अय्यरसाठी शिखर धवनचा इमोशनल मेसेज!
14
Phaltan Doctor Death: फोटोवरून प्रशांतसोबत वाद, मंदिराजवळ गेली; डॉक्टर तरुणी हॉटेलवर जाण्यापूर्वी घरी काय घडले?
15
अरुणाचल हादरलं! HIV आणि दोन आत्महत्या; फरार आयएएस अधिकारी अटकेत; नेमकं प्रकरण काय?
16
3 दिवसांपासून मालामाल करतोय हा शेअर, सातत्यानं लागतंय अप्पर सर्किट; किंमत १० रुपयांपेक्षाही कमी; आता कंपनीची मोठी तयारीत
17
Video: फलटणच्या २ सख्ख्या बहिणींचा भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर गंभीर आरोप
18
थरारक ट्रेन अपघात; लोकमान्य टिळक भागलपूर एक्सप्रेसचे डबे वेगळे झाले, सुदैवाने मोठा अनर्थ टळला
19
कुठल्याही कोचिंगविना २१ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात UPSC उत्तीर्ण; 'ही' IAS तरूणी आहे कोण?
20
मोठी घडामोड! श्रेयस अय्यरचे आई-वडील ऑस्ट्रेलियाला जाणार, तातडीच्या व्हिसासाठी केला अर्ज

भारतातून पुन्हा एकदा सोन्याचा धूर निघू दे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2021 04:46 IST

फोटो पुसद : स्वातंत्र्यापूर्वी भारत देश अत्यंत श्रीमंत, वैभवसंपन्न, सुजलाम, सुफलाम होता. या वैभवशाली देशातून सोन्याचा धूर निघत ...

फोटो

पुसद : स्वातंत्र्यापूर्वी भारत देश अत्यंत श्रीमंत, वैभवसंपन्न, सुजलाम, सुफलाम होता. या वैभवशाली देशातून सोन्याचा धूर निघत होता, परंतु परकियांच्या आक्रमणामुळे, पारतंत्र्यामुळे देश दारिद्र्य, विविध समस्येच्या खाईत लोटला गेला. आता स्वातंत्र्य मिळाल्याने पुन्हा एकदा देशातून सोन्याचा धूर निघवा, असे प्रतिपादन प्रा.विठ्ठल शिंदे यांनी केले.

येथील शिवाजी कनिष्ठ महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने आयोजित दिवंगत मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक स्मृती व्याख्यानात ते बोलत होते. रासेयो कार्यक्रम अधिकारी प्रा.गजानन जाधव यांनी आयोजित केलेल्या ऑनलाइन व्याख्यानाच्या अध्यक्षस्थानी शिवाजी उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य विजय उंचेकर होते. प्रमुख पाहुणे म्हणून रासेयोचे जिल्हा समन्वयक प्रा.प्रदीप राऊत, पर्यवेक्षक ज्याेती तगलपल्लेवार उपस्थित होते.

‘स्वातंत्र्यप्राप्तीचे अमृत महोत्सवी वर्ष-एक सिंहावलोकन’ या विषयावर बोलताना प्रा.विठ्ठल शिंदे म्हणाले, स्वातंत्र्यानंतर देशाच्या प्रगतीला लागलेली कीड म्हणजे अनास्था, धर्म आणि जात. यातून भारताची सुटका होऊन देदिप्यमान प्रगती होऊन पुन्हा एकदा भारत देशातून सोन्याचा धूर निघू दे, असे आशावादी मत त्यांनी मांडले.

प्राचार्य विजय उंचेकर यांनी भारताचा इतिहास छत्रपतींच्या मावळ्यांच्या रक्ताचा, त्यागाचा, सामर्थ्याचा, स्वाभिमानाचा असल्याचे सांगून, यातून देशाच्या युवकांनी प्रेरणा घेऊन देशाला महासत्तेच्या दारात नेण्यासाठी पराकाष्ठेचे प्रयत्न करावेत, असे आवाहन केले. सहकार्यक्रम अधिकारी प्रा.अर्चना पाल यांनी आभार मानले. या ऑनलाइन व्याख्यानाला हभप महेंद्र महाराज मस्के, डाॅ.सचितानंद बिचेवार, प्रा.अजय राठोड, प्रा.नीता खराटे, प्रा.एस.एल. राठोड व विद्यार्थी उपस्थित होते.