शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या विमानाने लँडिंग करायचा प्रयत्न केला अन् प्रवाशांमध्ये पसरलं भीतीचं वातावरण! नेमकं काय झालं?
2
आजचे राशीभविष्य, १७ ऑगस्ट २०२५: अचानक धनलाभ, मान-सन्मान; सरकारी कामात यश, शुभ दिवस
3
ऐतिहासिक दिवस; कोल्हापूर सर्किट बेंचचे आज उद्घाटन; सरन्यायाधीश भूषण गवई उद्घाटक
4
बीएसएनएलच्या कामास चेंबरमध्ये गेलेले तिघे ठार; स्वातंत्र्यदिनी पिंपरी-चिंचवडमधील घटना
5
गाळप क्षमतेबाबत धोरणाची गरज, कारखानदारीस सुरुंग: माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार
6
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना उत्तम, नोकरीत पदोन्नती योग; व्यापारात भरभराट, अनुकूल काळ!
7
सीमाप्रश्नावर चर्चेसाठी चिनी परराष्ट्रमंत्री भारत दौऱ्यावर; सुरक्षा सल्लागार अजित डोवालांशी चर्चा करणार
8
उपराष्ट्रपतिपदासाठी भाजपची जोरदार तयारी, संघनिष्ठ व्यक्तीवर भर; ९ सप्टेंबरला होणार मतदान
9
परवडणाऱ्या घरांची संख्या वाढवण्यासाठी बिल्डरांना सवलती, तरीही किमती चढ्याच: मुख्यमंत्री
10
उंच इमारतीच्या बांधकामाबाबतचे सुरक्षा नियम राज्यासाठीही बंधनकारक; हायकोर्टाचे निर्देश
11
भारतावर दुय्यम शुल्क लावणार नाही; अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे संकेत
12
राहुल गांधी यांची आजपासून 'व्होट अधिकार यात्रा'; गैरप्रकारांविरोधात जनता जागृत झाल्याचा दावा
13
जिद्द असावी तर अशी! मुंबई, ठाण्यात थरांचा विश्वविक्रम; कुरघोडीच्या राजकारणात गोविंदांचा विजय
14
अंतराळवीर शुभांशू शुक्ला ऐतिहासिक यात्रा पूर्ण करून आज भारतात; PM मोदी यांना भेटणार
15
'फाळणीला जिना, काँग्रेस, माउंटबॅटन हे जबाबदार'; 'एनसीईआरटी'च्या मॉड्युलमधून मोठा दावा
16
वाहनांवरील दंडात सूट; अभय योजना लवकरच ! परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा वृत्ताला दुजोरा
17
राज्यात 'पाऊस हंडी'; ५ दिवस अतिवृष्टीचे! पूर परिस्थितीत आपत्तीपासून सतर्क राहण्याचे आवाहन
18
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
19
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
20
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर

भारतातून पुन्हा एकदा सोन्याचा धूर निघू दे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2021 04:46 IST

फोटो पुसद : स्वातंत्र्यापूर्वी भारत देश अत्यंत श्रीमंत, वैभवसंपन्न, सुजलाम, सुफलाम होता. या वैभवशाली देशातून सोन्याचा धूर निघत ...

फोटो

पुसद : स्वातंत्र्यापूर्वी भारत देश अत्यंत श्रीमंत, वैभवसंपन्न, सुजलाम, सुफलाम होता. या वैभवशाली देशातून सोन्याचा धूर निघत होता, परंतु परकियांच्या आक्रमणामुळे, पारतंत्र्यामुळे देश दारिद्र्य, विविध समस्येच्या खाईत लोटला गेला. आता स्वातंत्र्य मिळाल्याने पुन्हा एकदा देशातून सोन्याचा धूर निघवा, असे प्रतिपादन प्रा.विठ्ठल शिंदे यांनी केले.

येथील शिवाजी कनिष्ठ महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने आयोजित दिवंगत मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक स्मृती व्याख्यानात ते बोलत होते. रासेयो कार्यक्रम अधिकारी प्रा.गजानन जाधव यांनी आयोजित केलेल्या ऑनलाइन व्याख्यानाच्या अध्यक्षस्थानी शिवाजी उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य विजय उंचेकर होते. प्रमुख पाहुणे म्हणून रासेयोचे जिल्हा समन्वयक प्रा.प्रदीप राऊत, पर्यवेक्षक ज्याेती तगलपल्लेवार उपस्थित होते.

‘स्वातंत्र्यप्राप्तीचे अमृत महोत्सवी वर्ष-एक सिंहावलोकन’ या विषयावर बोलताना प्रा.विठ्ठल शिंदे म्हणाले, स्वातंत्र्यानंतर देशाच्या प्रगतीला लागलेली कीड म्हणजे अनास्था, धर्म आणि जात. यातून भारताची सुटका होऊन देदिप्यमान प्रगती होऊन पुन्हा एकदा भारत देशातून सोन्याचा धूर निघू दे, असे आशावादी मत त्यांनी मांडले.

प्राचार्य विजय उंचेकर यांनी भारताचा इतिहास छत्रपतींच्या मावळ्यांच्या रक्ताचा, त्यागाचा, सामर्थ्याचा, स्वाभिमानाचा असल्याचे सांगून, यातून देशाच्या युवकांनी प्रेरणा घेऊन देशाला महासत्तेच्या दारात नेण्यासाठी पराकाष्ठेचे प्रयत्न करावेत, असे आवाहन केले. सहकार्यक्रम अधिकारी प्रा.अर्चना पाल यांनी आभार मानले. या ऑनलाइन व्याख्यानाला हभप महेंद्र महाराज मस्के, डाॅ.सचितानंद बिचेवार, प्रा.अजय राठोड, प्रा.नीता खराटे, प्रा.एस.एल. राठोड व विद्यार्थी उपस्थित होते.