शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain Updates Live: मध्य रेल्वेची ठाणे ते सीएसएमटी दरम्यानची वाहतूक पूर्णपणे बंद
2
मिठी नदी धोक्याच्या पातळीवर; नदीलगतच्या कुटुंबांना सुरक्षित स्थळी हलवलं, बीकेसीत पाणी साचण्याची शक्यता
3
ती गुढ आग... ज्यात भारताचं सेमीकंडक्टर बनवण्याचं स्वप्न झालं होतं जळून खाक, ७ फेब्रुवारी १९८९ रोजी नेमकं काय झालं होतं?
4
सावधान! अनोळखी व्यक्तीला कॅशच्या बदल्यात पैसे ट्रान्सफर करताय? 'या' एका चुकीमुळे जावं लागेल थेट तुरुंगात
5
Himachal Pradesh: हिमाचलच्या कुल्लूमध्ये ढगफुटी; अनेक घरे, गाड्या गेल्या वाहून, ४०० रस्ते बंद!
6
Miss Universe India: २२ वर्षांच्या मनिका विश्वकर्माने जिंकला 'मिस युनिव्हर्स इंडिया २०२५' चा खिताब, कोण आहे ही सुंदरी?
7
ट्रम्प यांना भेटायला गेलेल्या झेलेन्स्कींनी मेलानियांसाठी पाठवले खास पत्र; काय आहे या पत्रात?
8
आज उपराष्ट्रपती पदासाठी उमेदवाराची घोषणा करणार 'I.N.D.I.A.'? ही 3 नावं शर्यतीत!
9
'हिंदुस्तान झिदाबाद...' तिरंग्यासाठी लंडनमध्ये पाकिस्तानींशी भिडल्या भारतीय तरुणी, पाहा VIDEO
10
पैसे दुप्पट करते ही सरकारी योजना; ५ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळेल १० लाखांचा गॅरंटीड रिटर्न, पाहा डिटेल्स
11
पतीच्या निधनामुळे खचलेल्या तिच्या आयुष्यात 'तो' आला अन् मोठा झटका देऊन गेला! तरुणीसोबत घडलं असं काही की...
12
LIC ची मोठी घोषणा! बंद पडलेल्या पॉलिसी पुन्हा सुरू करण्याची सुवर्णसंधी; विलंब शुल्कातही मोठी सूट
13
मुंबईतील सर्व सरकारी कार्यालयांना सुट्टी; खासगी कंपन्यांना वर्क फ्रॉम देण्याच्या सूचना, शाळा, कॉलेज बंद
14
रोनाल्डोचा साखरपुडा आणि सौदीचे ‘रहस्य’! स्थानिकांना वेगळा नियम आणि स्टारला वेगळा न्याय, का?
15
ठाकरे बंधू किंवा महायुती कुणीही निवडणूक जिंकली तरी बेस्ट कर्मचाऱ्यांना न्याय मिळेल का?
16
चिपळुणात वाशिष्ठी नदीने ओलांडली इशारा पातळी; पूरसदृश स्थितीमुळे कामाशिवाय घराबाहेर न पडण्याची सूचना
17
"२६ जुलैचा जलप्रलय, तुम्ही मला...", वीणा जामकरने सांगितली ज्योती चांदेकरांची भावुक आठवण
18
ट्रम्प यांच्यासोबतच्या बैठकीनंतर पुतिन यांना आली भारताची आठवण, डायल केला पंतप्रधान मोदींचा नंबर; सगळंच सांगितलं!
19
Pune Traffic: पुण्यात सकाळपासून मुसळधार! शहरात प्रचंड वाहतूककोंडी, प्रमुख मार्गांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा
20
"झोया अख्तर बड्या बापाची मुलगी...", 'गलीबॉय'साठी ऑडिशन द्यायला सांगितल्याने भडकल्या उषा नाडकर्णी

४२ वर्षांपासून नंदपूर धरण अर्धवटच

By admin | Updated: December 11, 2014 23:16 IST

तालुक्यातील किन्ही-नंदपूर येथील धरणाचे बांधकाम गेल्या ४२ वर्षांपासून अर्धवट स्थितीत खितपत पडले आहे. सन १९७२-७३ पासून आत्तापर्यंत ९० टक्के बांधकाम झाले असून केवळ १० टक्के काम अपूर्ण आहे.

पांढरकवडा : तालुक्यातील किन्ही-नंदपूर येथील धरणाचे बांधकाम गेल्या ४२ वर्षांपासून अर्धवट स्थितीत खितपत पडले आहे. सन १९७२-७३ पासून आत्तापर्यंत ९० टक्के बांधकाम झाले असून केवळ १० टक्के काम अपूर्ण आहे.सन १९७२-७३ मध्ये या धरणाच्या कामाला सुरूवात झाली. त्याला आता ४२ वर्षे लोटली. दरम्यानच्या काळात धरणाचे कसे तरी ९० टक्के बांधकाम पूर्ण झाले. मात्र केवळ १० टक्के काम पूर्ण न झाल्याने शेतकऱ्यांचे हिरवे स्वप्न करपत आहे. अर्धवट स्थितीतील हे धरण पूर्ण झाल्यास किन्ही-नंदपूर परिसरातील दुष्काळी भागाततील शेतकऱ्यांना काही प्रमाणात लाभ होऊ शकतो. सिंचनाची सुविधा झाल्यास या परिसरातील शेतकरी नगदी बारमाही पिके घेऊ शकतील. त्यामुळे त्यांची आर्थिक बाजू सुधारू शकते.सध्या या परिसरातील शेतकरी नापिकी व कर्जबाजारामुळे हैराण आहेत. त्यातून शेतकरी आत्महत्या घडत आहेत. हे प्रमाण वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे धरण पूर्ण होण्याची गरज आहे. त्यातून सिंचनासोबतच व जंगली जनावारांचा पाण्याचा प्रश्न मिटू शकतो. मात्र हे धरण वन विभागाच्या क्षेत्रात येत असल्यामुळे व वनहक्क कायद्यामुळे वन विभागाचा सतत अडथळा येत आहे. या धरण क्षेत्रात रोजगार हमी योजनेअंतर्गत कोट्यवधींची कामे आवश्यकता नसताना झाली आहे. त्याऐवजी हे धरण पूर्ण झाले असते, तर शासनाचे कोट्यवधी रूपये वाचले असते. शेतकऱ्यांचा आर्थिक लाभही झाला असता. तथापि राज्य सरकारने या धरणाकडे आजपर्यंत दुलर्क्ष केले आहे. आता शेतकऱ्यांनी धरणाचे बांधकाम करून शेतकऱ्यांना पाण्याचा लाभ द्यावा, अशी मागणी पुढे रेटली आहे. धरण पूर्ण न केल्यास परिसरातील शेतकरी आत्मदहन करतील, असा इशारा किन्ही, घोडदरा, किन्हाळा येथील शेतकऱ्यांनी उपविभागीय अधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून दिला आहे. येत्या अधिवेशन काळात मागणीचा विचार न झाल्यास त्यांनी आत्मदहनाचा मार्ग स्विकारण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत खासदार, आमदारांनाही निवेदन पाठविण्यात आले. निवेदन देताना किसन आदे, श्रीहरी कट्टेवार, अभय कट्टेवार, भास्कर आदे, अशोक सामृतवार, वामन आदे, प्रमोद गोर्लेवार, राकेश नेमनवार, चंद्रशेखर पोलाडीवार, विजय तेलंगे यांच्यासह किन्ही, किन्हाळा, घोडदरा येथील अनेक शेतकरी उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी)