शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

कर्जमाफी लाभार्थ्यांच्या संख्येचा गोंधळ

By admin | Updated: July 6, 2017 00:31 IST

शासनाने कर्जमाफी जाहीर केली असली तरी जिल्ह्यात त्याचे लाभार्थी नेमके किती याच्या आकड्याचा प्रचंड गोंधळ आहे.

‘सीएमओ’- बँकांच्या आकड्यांमध्ये तफावत : ७० टक्के शेतकरी बाद ठरण्याची चिन्हे लोकमत न्यूज नेटवर्क यवतमाळ : शासनाने कर्जमाफी जाहीर केली असली तरी जिल्ह्यात त्याचे लाभार्थी नेमके किती याच्या आकड्याचा प्रचंड गोंधळ आहे. ‘सीएमओ’ व बँकांच्या पात्र लाभार्थ्यांमध्ये प्रचंड तफावत आहे. बँकांची जीआरनुसार तयार झालेली यादी ग्राह्य धरल्यास जिल्ह्यातील ७० टक्क्यापेक्षा अधिक थकबाकीदार शेतकरी कर्जमाफीपासून वंचित राहण्याची चिन्हे दिसू लागली आहे. मंगळवार ४ जुलै २०१७ रोजी मुख्यमंत्री कार्यालयाने ३६ हजार कोटींच्या कर्जमाफीसाठी ४० लाख शेतकऱ्यांची राज्यातील यादी जाहीर केली. या अनुषंगाने यवतमाळ जिल्ह्याचा विचार केल्यास मुख्यमंत्र्यांच्या या यादीनुसार दोन लाख ४२ हजार ४७१ शेतकरी कर्जमाफीस पात्र ठरतात. त्यात गेल्या आठ-दहा वर्षातील थकबाकीदार तमाम शेतकऱ्यांचा समावेश आहे. परंतु शासनाने जारी केलेल्या कर्जमाफीच्या जीआरमध्ये २०१२ नंतरचे शेतकरी ग्राह्य धरले जाणार आहे. या जीआरचीच काटेकोर अंमलबजावणी करा, असे शासनाचे स्पष्ट आदेश आहेत. त्यानुसार बँकांनी या जीआरनुसार पात्र ठरणाऱ्या शेतकऱ्यांची यादी पाठविली असता जिल्ह्यातील ७० टक्के शेतकरी मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेल्या पात्रता यादीतून बाद ठरणार आहे. त्यामुळे एकूणच गोंधळाची स्थिती निर्माण झाली आहे. पात्र शेतकरी नेमके कोण हे सध्या कुणालाही सांगणे कठीण आहे. एकट्या यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा विचार केल्यास या बँकेचे माफीच्या घोषणेपूर्वी एक लाख ६० हजार शेतकरी पात्र ठरणार होते. त्यांना १२०० कोटी रुपयांची माफी मिळणार होती. परंतु माफीच्या जीआरनंतर हा आकडा ३२ हजार शेतकरी आणि ३५० कोटी एवढा खाली आला आहे. राष्ट्रीयकृत बँकांकडे आतापर्यंत २२ पैकी १२ बँकांचेच आकडे आल्याने त्यांचा नेमका आकडा उपलब्ध होऊ शकला नाही. गेल्या आठवड्यात सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी व्हीडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे घेतलेल्या आढाव्यात सध्या कर्जमाफीच्या जीआरनुसारच काम चालू द्या, असे आदेश सहकार प्रशासनाला दिले आहे. २०१२ पूर्वीच्या थकबाकीदार शेतकऱ्यांना माफीचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन असल्याचे त्यांनी सांगितले. जिल्हा बँकेचे शासनाला साकडे दरम्यान जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष अमन गावंडे, मुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश सिंघम यांनी मुख्यमंत्र्यांना एक निवेदन सादर करून शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्यावी म्हणून साकडे घातले आहे. माफीच्या जीआरनुसार अंमलबजावणी झाल्यास २०१२ पूर्वीचे शेतकरी मोठ्या संख्येने माफीतून वगळले जाण्याची भीती त्यांनी व्यक्त केली आहे. या पार्श्वभूमीवर शासनाने आता सर्व जिल्ह्यांना २०१२ पूर्वीचे थकबाकीदार नेमके किती याची माहिती मागितली आहे.