शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या संरक्षण वेबसाईट्सवर पाकिस्तानकडून सायबर हल्ला, महत्त्वपूर्ण गोपनीय माहिती लीक झाल्याचा संशय
2
पाकवर आर्थिक हल्ला; ADB अध्यक्षांना भेटल्या निर्मला सीतारामण, निधी रोखण्याची केली मागणी
3
"जातीनिहाय जनगणनेमुळे मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटेल’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास
4
१ कोटी दे, नाहीतर ठार मारून टाकू; गोलंदाज मोहम्मद शमीला जीवे मारण्याच्या धमकीचा ई-मेल
5
Video - रीलचा नाद लय बेक्कार! सिंगरने गाण्यासाठी लावली पँटला आग; अवघ्या काही सेकंदात...
6
इन्स्टाग्राम मेसेजवरून भांडण पेटलं, पुण्यात शेजऱ्यानं तरुणाला दगडावर आपटून संपवलं! 
7
सईसोबत 'गुलकंद'मध्ये रोमान्स करणाऱ्या समीर चौघुले यांच्या बायको आणि मुलाला पाहिलंत का?
8
...अन् साथीदार गेला! नवरीच्या मांडीवर डोके ठेवून नवरदेवाने सोडले प्राण, महाराष्ट्रातील घटना
9
पहलगाम हल्ल्यानंतर भारताला मिळाली जपानची साथ; संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी मानले आभार
10
ताजमहालाजवळ ड्रायव्हरविना धावली कार, दोन पर्यटकांना चिरडले, धक्कादायक घटनेचा व्हिडीओ व्हायरल
11
Jalgaon Suicide: बारावीत कमी गुण मिळाल्याने विद्यार्थ्याची आत्महत्या, जळगावातील पाचोरा येथील घटना
12
कपूर कुटुंबाची सून अन् सुमित राघवनची बहीण आहे 'ही' मराठी अभिनेत्री, तुम्ही ओळखलंत का?
13
लक्षात ठेवा, नापास झाल्याने आयुष्य संपत नाही ! सचिन तेंडुलकर, नागराज मंजुळे झाले होते नापास
14
सोन्याच्या दरात मोठी घसरण, पाहा १० ग्रॅम सोनं खरेदी करायला किती खर्च करावा लागणार?
15
Video: हॉर्न वाजवण्यास रोखल्याने तो संतापला; सुरक्षा रक्षकाला थारखाली चिरडले...
16
Sensex २९५ आणि Nifty ११४ अंकांच्या तेजीसह बंद; 'या' शेअर्समध्ये मोठा चढ-उतार
17
रशियाचा भारताला पाठिंबा! 'पहलगामच्या गुन्हेगारांना सोडता कामा नये'; पुतिन यांचा पीएम मोदींना फोन
18
"ऋषभ पंतला पुन्हा फॉर्मात यायचे असेल तर त्याने धोनीला फोन करावा"; दिग्गज फलंदाजाचा सल्ला
19
Nashik Crime: तिन्ही कोयत्यांवर जाधव बंधूंच्या रक्ताचे डाग आहेत तसेच; महाजनच्या घरात सापडली शस्त्रे
20
Ather Energy IPO चं अलॉटमेंट 'असं' करा चेक, ग्रे मार्केट प्रीमिअम काय देतोय संकेत?

‘कुमारी माता’ हा पुरुषांना विचारण्याचा प्रश्न

By admin | Updated: January 15, 2017 01:01 IST

कुमारी माता हा प्रश्न यवतमाळसाठी कलंक ठरला. हा कलंक कसा पुसावा, हा पुरुषांना विचारण्याचा प्रश्न आहे.

सिनेअभिनेत्री सोनाली कुलकर्णी : जीवनात दु:ख आले तर निसर्गाशी मैत्री करा अविनाश साबापुरे  यवतमाळ कुमारी माता हा प्रश्न यवतमाळसाठी कलंक ठरला. हा कलंक कसा पुसावा, हा पुरुषांना विचारण्याचा प्रश्न आहे. जेव्हा सर्व पुरुष स्वत:ची सामाजिक जबाबदारी स्वाकारतील, तेव्हाच तो सुटू शकेल. खरे तर, मुलांना आज सेक्स एज्युकेशन देणे अत्यंत गरजेचे आहे. पण मुले-मुली वयात येणे या बाबीकडे सध्या एखाद्या गुन्ह्याप्रमाणेच पाहिले जात आहे, असे रोखठोक मत प्रसिद्ध सिनेअभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केले. शनिवारी यवतमाळ येथे रोटरी क्लबच्या ‘एज्युफेस्ट’ कार्यक्रमाकरिता आल्या असता सोनाली कुलकर्णी यांनी ‘लोकमत’ला खास मुलाखत दिली. त्यात यवतमाळच्या लोकांविषयी त्या भरभरून बोलल्या. त्या म्हणाल्या, इथले शेकडो तरुण-तरुणी, महिला-पुरुष आज मला भेटले. त्यांच्यात एक सळसळता उत्साह जाणवला. त्यांच्या वागण्यात अरेरावी नव्हती, तर सहजपणा होता. इथली माणसं ज्या आपुलकीने भेटली, ती आपुलकी मनाला जाऊन भिडणारी होती. यवतमाळ जिल्ह्यातील शेतकरी महिलांना सोनाली कुलकर्णी यांनी खूप मार्मिक आवाहन केले. त्या म्हणाल्या, ‘गाभ्रीचा पाऊस’मध्ये मी ज्या महिलेची भूमिका केली, तशा हजारो महिला या जिल्ह्यात आहेत. त्यांना माझे एकच सांगणे आहे. मनुष्यजन्म भाग्याने मिळतो. तो कुणीही गमावता काम नये. मनात थोडासाही निराशेचा सूर उमटला तर आठवावे की, आपण पशू नाही माणूस आहोत. कोणत्याही परिस्थितीवर आपल्याला मात करता येते. आपल्या घरातला माणूस निराश दिसला तर त्याला धीर द्या. त्याच्याशी मोकळे बोला. स्त्रीच्या बोलण्यात ताकद असते. तीच पूर्ण घर नियंत्रित करू शकते. जीवनात दु:ख वाटले तर निसर्गाशी मैत्री करा. तो आपल्याला जगणे शिकवत असतो. आयुष्यात पहिल्यांदाच मी यवतमाळला आले. पण इथल्या शेतकऱ्यांसाठी मी वारंवार येणार आहे. आमीर खानच्या पाणी फाउंडेशनतर्फे वॉटर कप स्पर्धा सुरू आहे. या फाउंडेशनमध्ये यवतमाळ जिल्ह्यातील काही परिसरांची निवड झाली आहे. तेथे जनजागृतीसाठी मी नक्की येणार आहे. शैक्षणिक गुणवत्ता वाढविणे, समाजातील अंधश्रद्धा मिटविणे या उद्देशानेही येथे येईल, अशी ग्वाही शेवटी सोनाली कुलकर्णी यांनी दिली. गोडच नव्हे, सत्यही बोला... हॅपी मकरसंक्रांती! अभिनेत्री असले म्हणून काय झाले? इतरांप्रमाणे मीही मकरसंक्रांती साजरी करते. या सणाला मी काळ्या रंगाचा मान ठेवते. काळीच साडी घालते. तिळाचे लाडू करून वाटते. पण केवळ परंपरा पाळण्यापेक्षा माझा सण थोडा वेगळा आहे. मकरसंक्रांती वाणीवर ताबा ठेवायला शिकवते. तीळगूळ घ्या, गोड गोड बोला म्हणजे तेच. पण नुसते गोडच का बोला? सत्यही बोला. आप्तस्वकीयांना समजून घ्या. मी यवतमाळात मकरसंक्रांतीच्या दिवशी आले, इथल्या महिलांना माझा हाच संदेशरूपी वाण समजा... अशा ओघवत्या शैलीत उत्तरे देतानाच सोनाली कुलकर्णी म्हणाल्या, हॅपी मकरसंक्रांती!