शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेच्या ४८ जागा, ५० हजारांपेक्षा कमी फरक; २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकीवर काँग्रेसचा मोठा दावा
2
'ओबीसी समाज श्रीमंत मराठ्यांविरोधात जाऊ नये, हाच शरद पवारांच्या मंडळ यात्रेचा हेतू'; प्रकाश आंबेडकरांचा टोला
3
'मतचोरी' विरोधात इंडिया आघाडीचे उद्या शक्तिप्रदर्शन, राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली खासदार संसदेपासून निवडणूक आयोगाच्या कार्यालयापर्यंत मोर्चा काढणार
4
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोरील अडचणी वाढणार? शकुन राणीला 'डबल व्होटर' म्हणून फसले; आयोगाने बजावली नोटीस
5
'बुडायला लागलो तर अर्धे जग सोबत घेऊन जाणार'; पाकिस्तानची भारताला पुन्हा अणु हल्ल्याची धमकी!
6
रामदास आठवले महाराष्ट्र भाजपवर नाराज; थेट पीएम मोदींकडे केली तक्रार, कारण काय?
7
ब्रिटनच्या F-35B विमानामागचं शुक्लकाष्ठ सुटेना, आता या देशात करावं लागलं आपातकालीन लँडिंग
8
मनी लॉंड्रिंगप्रकरणी रॉबर्ट वाड्रांच्या अडचणीत वाढ; दोन कंपन्यांद्वारे ५८ कोटी रुपये कमावल्याचा आरोप
9
"जेव्हा देशासाठी निवड होते, तेव्हा..."; मराठमोळ्या 'वर्ल्ड चॅम्पियन'ने जसप्रीत बुमराहला सुनावलं
10
मासे खरेदी करण्यावरून दोन गटांमध्ये तुफान राडा, एकमेकांना लाथा-बुक्क्यांनी मारले
11
टस्कर हत्तीने भिंत फाेडून घरात केला प्रवेश; जीवनावश्यक साहित्याची नासधूस, छत्तीसगड सीमेलगतच्या मंजिगड टाेला येथील घटना
12
फक्त १२७९ रुपयांत करा हवाई प्रवास; Air India ने आणली खास ऑफर, जाणून घ्या डिटेल...
13
मत चोरीच्या मुद्यावरुन लक्ष वळवण्याचा प्रयत्न; हवाई दल प्रमुखांच्या वक्तव्यावर काँग्रेस नेत्याची टीका
14
IPS वडिलांनी कॉन्स्टेबलला बडतर्फ केलं, त्यांच्याच मुलीने कोर्टात खटला लढवून पुन्हा सेवेत घेतलं; नेमकं प्रकरण काय?
15
रोहित शर्मा, विराट कोहलीची वनडे क्रिकेटमधूनही लवकरच निवृत्ती? गौतम गंभीरचे विधान व्हायरल
16
धक्कादायक! तीन मुलांसह आईने संपवलं जीवन, लेकरांना पोटाला बांधलं आणि… 
17
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल
18
इयत्ता तिसरीतील मुलीवर वर्गमित्राकडून अत्याचार; बाभुळगाव तालुक्यातील घटना
19
AAI JE Recruitment 2025 : विमानतळावर नोकरीची संधी! एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाने जाहीर केली बंपर नोकरभरती
20
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...

‘कुमारी माता’ हा पुरुषांना विचारण्याचा प्रश्न

By admin | Updated: January 15, 2017 01:01 IST

कुमारी माता हा प्रश्न यवतमाळसाठी कलंक ठरला. हा कलंक कसा पुसावा, हा पुरुषांना विचारण्याचा प्रश्न आहे.

सिनेअभिनेत्री सोनाली कुलकर्णी : जीवनात दु:ख आले तर निसर्गाशी मैत्री करा अविनाश साबापुरे  यवतमाळ कुमारी माता हा प्रश्न यवतमाळसाठी कलंक ठरला. हा कलंक कसा पुसावा, हा पुरुषांना विचारण्याचा प्रश्न आहे. जेव्हा सर्व पुरुष स्वत:ची सामाजिक जबाबदारी स्वाकारतील, तेव्हाच तो सुटू शकेल. खरे तर, मुलांना आज सेक्स एज्युकेशन देणे अत्यंत गरजेचे आहे. पण मुले-मुली वयात येणे या बाबीकडे सध्या एखाद्या गुन्ह्याप्रमाणेच पाहिले जात आहे, असे रोखठोक मत प्रसिद्ध सिनेअभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केले. शनिवारी यवतमाळ येथे रोटरी क्लबच्या ‘एज्युफेस्ट’ कार्यक्रमाकरिता आल्या असता सोनाली कुलकर्णी यांनी ‘लोकमत’ला खास मुलाखत दिली. त्यात यवतमाळच्या लोकांविषयी त्या भरभरून बोलल्या. त्या म्हणाल्या, इथले शेकडो तरुण-तरुणी, महिला-पुरुष आज मला भेटले. त्यांच्यात एक सळसळता उत्साह जाणवला. त्यांच्या वागण्यात अरेरावी नव्हती, तर सहजपणा होता. इथली माणसं ज्या आपुलकीने भेटली, ती आपुलकी मनाला जाऊन भिडणारी होती. यवतमाळ जिल्ह्यातील शेतकरी महिलांना सोनाली कुलकर्णी यांनी खूप मार्मिक आवाहन केले. त्या म्हणाल्या, ‘गाभ्रीचा पाऊस’मध्ये मी ज्या महिलेची भूमिका केली, तशा हजारो महिला या जिल्ह्यात आहेत. त्यांना माझे एकच सांगणे आहे. मनुष्यजन्म भाग्याने मिळतो. तो कुणीही गमावता काम नये. मनात थोडासाही निराशेचा सूर उमटला तर आठवावे की, आपण पशू नाही माणूस आहोत. कोणत्याही परिस्थितीवर आपल्याला मात करता येते. आपल्या घरातला माणूस निराश दिसला तर त्याला धीर द्या. त्याच्याशी मोकळे बोला. स्त्रीच्या बोलण्यात ताकद असते. तीच पूर्ण घर नियंत्रित करू शकते. जीवनात दु:ख वाटले तर निसर्गाशी मैत्री करा. तो आपल्याला जगणे शिकवत असतो. आयुष्यात पहिल्यांदाच मी यवतमाळला आले. पण इथल्या शेतकऱ्यांसाठी मी वारंवार येणार आहे. आमीर खानच्या पाणी फाउंडेशनतर्फे वॉटर कप स्पर्धा सुरू आहे. या फाउंडेशनमध्ये यवतमाळ जिल्ह्यातील काही परिसरांची निवड झाली आहे. तेथे जनजागृतीसाठी मी नक्की येणार आहे. शैक्षणिक गुणवत्ता वाढविणे, समाजातील अंधश्रद्धा मिटविणे या उद्देशानेही येथे येईल, अशी ग्वाही शेवटी सोनाली कुलकर्णी यांनी दिली. गोडच नव्हे, सत्यही बोला... हॅपी मकरसंक्रांती! अभिनेत्री असले म्हणून काय झाले? इतरांप्रमाणे मीही मकरसंक्रांती साजरी करते. या सणाला मी काळ्या रंगाचा मान ठेवते. काळीच साडी घालते. तिळाचे लाडू करून वाटते. पण केवळ परंपरा पाळण्यापेक्षा माझा सण थोडा वेगळा आहे. मकरसंक्रांती वाणीवर ताबा ठेवायला शिकवते. तीळगूळ घ्या, गोड गोड बोला म्हणजे तेच. पण नुसते गोडच का बोला? सत्यही बोला. आप्तस्वकीयांना समजून घ्या. मी यवतमाळात मकरसंक्रांतीच्या दिवशी आले, इथल्या महिलांना माझा हाच संदेशरूपी वाण समजा... अशा ओघवत्या शैलीत उत्तरे देतानाच सोनाली कुलकर्णी म्हणाल्या, हॅपी मकरसंक्रांती!