शहरं
Join us  
Trending Stories
1
AirStrike on Pakistan: मोठी बातमी! ऑपरेशन सिंदूरला सुरुवात; भारताचा पाकिस्तान, पीओकेवर हवाई हल्ला 
2
भारताच्या पाकिस्तानवरील एअर स्ट्राईकवर डोनाल्ड ट्रम्प यांची पहिली प्रतिक्रिया...; 'ते खूप काळापासून लढतायत'
3
गुजरातचे 'टायटन्स' बुडता बुडता वाचले! हार्दिकच्या चुकीमुळे MI ची 'सुपर ओव्हर'ची संधीही हुकली
4
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
5
पांड्या तुला सूर्यावर भरवसा नाय काय? मुंबई इंडियन्सनेच जिंकली असती मॅच, पण... (VIDEO)
6
कल्याणमध्ये रिक्षावर झाड कोसळून मोठी दुर्घटना, रिक्षाचालक आणि दोन प्रवाशांसह तीन जणांचा मृत्यू
7
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
8
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
9
MI vs GT : बुमराहनं जबरदस्त इनस्विंग चेंडूवर उडवला शुबमन गिलचा त्रिफळा! मग...
10
‘गुगल पे’वरील हे सिक्रेट फिचर्स आहेत खूप उपयुक्त, असे आहेत त्यांचे फायदे
11
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
12
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
13
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
14
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
15
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
16
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
17
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
18
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
19
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
20
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  

कृष्णा इंगळे यांनी उलगडला बाबासाहेबांचा दुर्मिळ जीवनपट

By admin | Updated: April 20, 2017 00:34 IST

आयुष्यभर वंचितांच्या प्रश्नासाठी लढा देणाऱ्या बाबासाहेबांच्या जीवनातील दुर्मिळ प्रसंगांचे हुबेहुब चित्रण

समता पर्व : मोक्याची पदे काबीज करण्याचा संदेश यवतमाळ : आयुष्यभर वंचितांच्या प्रश्नासाठी लढा देणाऱ्या बाबासाहेबांच्या जीवनातील दुर्मिळ प्रसंगांचे हुबेहुब चित्रण कास्ट्राईब कर्मचारी महासंघाचे राज्याध्यक्ष कृष्णा इंगळे यांनी येथील समजा पर्वात केले. बाबासाहेबांच्या जीवनातील एक-एक प्रसंग ते सांगत होते, तेव्हा उपस्थित श्रोते मंत्रमुग्ध होऊन ऐकत होते. येथील समता पर्व प्रतिष्ठाणतर्फे आयोजित समता पर्वात ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे जीवन प्रसंग व विचार’ या विषयावर ते बोलत होते. दलित समाज शिक्षीत झाला, उच्चशिक्षीत झाला. परंतु आजही मोक्याच्या पदांवर दलित समाजाची टक्केवारी अत्यल्प आहे. निर्णय घेणाऱ्या आणि माऱ्याच्या जागा अर्थात मोक्याची पदे काबीज करावी, असे बाबासाहेब वारंवार सांगायचे. आयएएस आणि आयपीएस होण्यासाठी त्याकाळी त्यांनी अनेकांना मदत केली. काही जण या पदांपर्यंत पोहोचलेत. परंतु त्यांची आजही टक्केवारी कमी आहे. एकीकडे समाज उच्चशिक्षीत झाल्याचे म्हटले जाते. परंतु दलित समाजातील पीएचडी धारक, डीएम (डॉक्टर आॅफ मेडिसीन) झालेले डॉक्टर अत्यल्प आहेत. शिक्षण क्षेत्रातील अनेक शाखा अशा आहेत की, ज्याचा आपण कधीही विचारच करीत नाही. चार-पाच विषयाच्या पलिकडे आपली मुले जात नाहीत. त्यामुळेच आपल्याला मोक्याची पदे मिळविणे कठीण जात आहे. बाबासाहेबांचा संदेश आत्मसात करून माऱ्याच्या जागा मिळविण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. बाबासाहेबांनी आयुष्यात लवंग, विलाचीलाही हात लावला नाही. बाबासाहेबांसारखे निर्व्यसनी जीवन जगण्याचे आवाहन त्यांनी केले. ३६ शाखा असणाऱ्या पक्षाची मुळे अद्यापही एकजीव का रूजत नाही, असा आत्मपरीक्षणाचा सवालही त्यांनी उपस्थित केला. प्रास्ताविक कास्ट्राईबचे जिल्हाध्यक्ष सिद्धार्थ भवरे, संचालन भरत लढे, किरण मानकर यांनी तर आभार समता पर्वाचे प्रवक्ते राजूदास जाधव यांनी मानले. यावेळी विचारपीठावर डॉ.टी.सी. राठोड, उपमुख्य कार्यकारी अधिकारी अरुण मोहोड, शिक्षणाधिकारी चिंतामण वंजारी, समाज कल्याण अधिकारी मंगला मून, समता पर्व संघटक नामदेव थूल, गटविकास अधिकारी सुभाष मनवर, अंबादास पेंदोर, सचिव जयश्री भगत, अ‍ॅड़ रामदास राऊत, कार्याध्यक्ष प्रकाश भस्मे उपस्थित होते. (नगर प्रतिनिधी)