शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain Alert: मुंबईत रेड अलर्ट; तीन ते चार तासात 'अतिमुसळधार' कोसळणार, शाळांना सुट्टी जाहीर
2
School Holiday: मुंबईत शाळांना सुट्टी जाहीर, पाणी साचल्याने अनेक ठिकाणी वाहतूक ठप्प; ४८ तासांसाठी रेड अलर्ट जारी
3
आभाळ फाटले! मुखेड तालुक्यातील सहा गावांत पाणी शिरले; बेपत्ता १२ जणांचा शोध सुरु
4
चेकच्या मागच्या बाजूला सही का करतात? ९०% लोकांना या प्रश्नाचे उत्तर माहित नसणार
5
‘मत चोरी’चा वाद वाढला, विरोधक मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात महाभियोग प्रस्ताव आणण्याच्या तयारीत 
6
Technology: ATM मधून पैसे काढल्यानंतर तुमचा PIN सुरक्षित राहतो का? 'अशी' घ्या काळजी!
7
Asia Cup India Squad : गंभीरनं 'फिल्डिंग' लावली तर गिल खेळणार; नाहीतर... आगरकर हे ३ मोठे निर्णय घेणार?
8
धक्कादायक! रणथंभोर व्याघ्र प्रकल्पात पर्यटकांची गाडी अचानक पडली बंद आणि मग...
9
श्रावणातला शेवटचा आठवडा; 'या' दिशेला लावा बेलाचे झाड, घरात धन, समृद्धी, पैसा येईल अपार
10
"सिनेमाच्या नावाखाली अभिनेते मजा..." कमी वयाच्या अभिनेत्रींसोबत काम करण्यावर आर माधवनचं भाष्य
11
सतर्क राहा: कोकण, पश्चिम महाराष्ट्रात १८-१९ ऑगस्टला मुसळधार पाऊस; कुठे-कुठे 'रेड अलर्ट'?
12
अहिल्यानगरमध्ये फर्निचरच्या दुकानात अग्नितांडव; अख्खं कुटुंब संपलं, दोन चिमुकल्यांसह पाच जणांचा मृत्यू
13
भाडे देऊन लाखोंचे नुकसान की EMI देऊन घर खरेदी करावे? ५० लाखांच्या घराचं आर्थिक गणित समजून घ्या
14
फ्लॉप शोचा सिलसिला संपेना! अन् म्हणे; सलमानचा पाक संघ आशिया कपमध्ये टीम इंडियासमोर हिट ठरेल
15
Apple नं ट्रम्प आणि चीनला दाखवला ठेंगा; भारतात आणखी एका प्रकल्पातून सुरू केलं iPhone चं उत्पादन
16
Home Remedy: महागडी हेअर ट्रीटमेंट सोडा, ५० रुपयांत लांबसडक, घनदाट, काळेभोर केस मिळवा 
17
जन्माष्टमीच्या मिरवणुकीतील रथ विजेच्या तारांना चिकटला, शॉक लागून ५ जणांचा मृत्यू, केंद्रीय मंत्र्यांचा सुरक्षा रक्षकही जखमी 
18
'सिटी ऑफ ड्रीम्स'नंतर प्रिया बापटचा पुन्हा 'तो' सीन, अभिनेत्री सुरवीन चावलासोबत लिपलॉक
19
दरमहा १२,५०० रुपये गुंतवा आणि ४० लाख रुपये मिळवा! पोस्ट ऑफिसची ही योजना देते करमुक्त परतावा
20
शेतकऱ्यांवर चिनी संकट! महत्त्वाच्या खनिजांवरील निर्यात कमी, रोखला खतांचाही पुरवठा

७६ हजार हेक्टरवर होणार खरिपाची लागवड

By admin | Updated: May 30, 2017 01:21 IST

गेल्या दोन महिन्यांपासून उन्हाचा तडाखा सहन करीत शेतकऱ्यांनी खरीप पेरणीपूर्व मशागतीची कामे उरकली आहेत.

पुसद तालुका : पेरणीपूर्व मशागतीची कामे पूर्णत्वाकडेलोकमत न्यूज नेटवर्कपुसद : गेल्या दोन महिन्यांपासून उन्हाचा तडाखा सहन करीत शेतकऱ्यांनी खरीप पेरणीपूर्व मशागतीची कामे उरकली आहेत. त्यानंतर शेतकरी खत व बियाणे जमा करण्याच्या प्रयत्नात आहेत. आता शेतकऱ्यांना प्रतीक्षा आहे ती दमदार पावसाची. तालुक्यात खरीपाचे ७६ हजार हेक्टर क्षेत्र आहे. मार्च महिन्यापर्यंत शेतकऱ्यांनी रबी हंगामातील पिकांची काढणी केली. त्यानंतर काही दिवस उसंत घेऊन बैलजोडी ज्यांच्याकडे आहे, अशा शेतकऱ्यांनी बैलजोडीच्या मदतीने तर काही शेतकऱ्यांनी ट्रॅक्टरच्या मदतीने मशागतीची कामे पूर्ण केली. ४५ ते ४६ अंश एवढे तापमान असतानाही बळीराजा सकाळी ७ ते ११ आणि सायंकाळी ३.३० ते ७ या वेळेत मशागतीची कामे पूर्ण करीत होता. आता ही कामे बहुतांश पूर्ण झाली आहेत. पेरणीपूर्व मशागत पूर्ण झाल्यानंतर आता पेरणीची जुळवाजुळव करण्यामध्ये शेतकरी मग्न आहे. पुसद तालुक्यात यंदा खरीपाचे क्षेत्र वाढण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांना यासाठी बी-बियाणे, खते कमी पडणार नाही, याची चाचपणी कृषी विभाग कटाक्षाने घेत आहे. साधारणत: दरवर्षीचा अनुभव पाहता खरीप हंगामात सोयाबीन बियाण्यांचा तुटवडा पडतो. त्यामुळे शेतकऱ्यांची वेळेवर धावपळ होते. अशा वेळी अनेक शेतकऱ्यांना सोयाबीन बियाणे उपलब्ध होत नसल्यामुळे त्यांना पेरणीपासून वंचित राहावे लागते. दरवर्षी मागणीच्या तुलनेत या बियाण्यांचा पुरवठा हा कमी असतो. ही परिस्थिती यंदा बदलणार का, असा प्रश्न शेतकऱ्यांमधून विचारल्या जात आहे. खरीप हंगामात बहुतांश शेतकरी सोयाबीनच्या पेरणीला पसंती देत आहेत. तीन ते साडेतीन महिन्यात या पिकांची काढणी होते. नगदी पीक म्हणून शेतकरी सोयाबीनकडे पाहतात. शिवाय साडेतीन महिन्यांनंतर सोयाबीनची काढणी केल्यानंतर त्याच शेतात रबी हंगामातील पिके घेण्याकडे अनेक शेतकऱ्यांचा कल असतो. त्यामुळे सोयाबीनचे क्षेत्र वाढत आहे. यंदा पाऊस वेळेवर होईल या अपेक्षेने शेतकऱ्यांनी मशागतीची कामे उरकली असून, पेरणीसाठी सज्ज झालेला शेतकरी आता दमदार पावसाच्या प्रतीक्षेत आहे. बियाणे व खताबाबत शेतकऱ्यांमध्ये साशंकतागेल्या काही वर्षात दुय्यम दर्जाची बियाणे व खते बाजारात विक्रीसाठी येतात. यातून शेतकऱ्यांची फसवणूक केली जाते. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये यावेळीसुद्धा साशंकता दिसून येत आहे. यासाठी कृषी विभागाचे मार्गदर्शन आवश्यक आहे. तसेच कृषी विभागाने शेतकऱ्यांसोबत संवाद वाढवून त्यांना विश्वास देणे आवश्यक आहे. शेतकऱ्यांना बियाणे व खतांबाबत कोणतीही शंका आल्यास त्यांनी कृषी विभागाकडे तक्रार करणे गरजेचे आहे, परंतु अनेकवेळा तक्रारींची दखल घेतलीच जात नसल्याचे शेतकरी सांगतात.