शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

७६ हजार हेक्टरवर होणार खरिपाची लागवड

By admin | Updated: May 30, 2017 01:21 IST

गेल्या दोन महिन्यांपासून उन्हाचा तडाखा सहन करीत शेतकऱ्यांनी खरीप पेरणीपूर्व मशागतीची कामे उरकली आहेत.

पुसद तालुका : पेरणीपूर्व मशागतीची कामे पूर्णत्वाकडेलोकमत न्यूज नेटवर्कपुसद : गेल्या दोन महिन्यांपासून उन्हाचा तडाखा सहन करीत शेतकऱ्यांनी खरीप पेरणीपूर्व मशागतीची कामे उरकली आहेत. त्यानंतर शेतकरी खत व बियाणे जमा करण्याच्या प्रयत्नात आहेत. आता शेतकऱ्यांना प्रतीक्षा आहे ती दमदार पावसाची. तालुक्यात खरीपाचे ७६ हजार हेक्टर क्षेत्र आहे. मार्च महिन्यापर्यंत शेतकऱ्यांनी रबी हंगामातील पिकांची काढणी केली. त्यानंतर काही दिवस उसंत घेऊन बैलजोडी ज्यांच्याकडे आहे, अशा शेतकऱ्यांनी बैलजोडीच्या मदतीने तर काही शेतकऱ्यांनी ट्रॅक्टरच्या मदतीने मशागतीची कामे पूर्ण केली. ४५ ते ४६ अंश एवढे तापमान असतानाही बळीराजा सकाळी ७ ते ११ आणि सायंकाळी ३.३० ते ७ या वेळेत मशागतीची कामे पूर्ण करीत होता. आता ही कामे बहुतांश पूर्ण झाली आहेत. पेरणीपूर्व मशागत पूर्ण झाल्यानंतर आता पेरणीची जुळवाजुळव करण्यामध्ये शेतकरी मग्न आहे. पुसद तालुक्यात यंदा खरीपाचे क्षेत्र वाढण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांना यासाठी बी-बियाणे, खते कमी पडणार नाही, याची चाचपणी कृषी विभाग कटाक्षाने घेत आहे. साधारणत: दरवर्षीचा अनुभव पाहता खरीप हंगामात सोयाबीन बियाण्यांचा तुटवडा पडतो. त्यामुळे शेतकऱ्यांची वेळेवर धावपळ होते. अशा वेळी अनेक शेतकऱ्यांना सोयाबीन बियाणे उपलब्ध होत नसल्यामुळे त्यांना पेरणीपासून वंचित राहावे लागते. दरवर्षी मागणीच्या तुलनेत या बियाण्यांचा पुरवठा हा कमी असतो. ही परिस्थिती यंदा बदलणार का, असा प्रश्न शेतकऱ्यांमधून विचारल्या जात आहे. खरीप हंगामात बहुतांश शेतकरी सोयाबीनच्या पेरणीला पसंती देत आहेत. तीन ते साडेतीन महिन्यात या पिकांची काढणी होते. नगदी पीक म्हणून शेतकरी सोयाबीनकडे पाहतात. शिवाय साडेतीन महिन्यांनंतर सोयाबीनची काढणी केल्यानंतर त्याच शेतात रबी हंगामातील पिके घेण्याकडे अनेक शेतकऱ्यांचा कल असतो. त्यामुळे सोयाबीनचे क्षेत्र वाढत आहे. यंदा पाऊस वेळेवर होईल या अपेक्षेने शेतकऱ्यांनी मशागतीची कामे उरकली असून, पेरणीसाठी सज्ज झालेला शेतकरी आता दमदार पावसाच्या प्रतीक्षेत आहे. बियाणे व खताबाबत शेतकऱ्यांमध्ये साशंकतागेल्या काही वर्षात दुय्यम दर्जाची बियाणे व खते बाजारात विक्रीसाठी येतात. यातून शेतकऱ्यांची फसवणूक केली जाते. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये यावेळीसुद्धा साशंकता दिसून येत आहे. यासाठी कृषी विभागाचे मार्गदर्शन आवश्यक आहे. तसेच कृषी विभागाने शेतकऱ्यांसोबत संवाद वाढवून त्यांना विश्वास देणे आवश्यक आहे. शेतकऱ्यांना बियाणे व खतांबाबत कोणतीही शंका आल्यास त्यांनी कृषी विभागाकडे तक्रार करणे गरजेचे आहे, परंतु अनेकवेळा तक्रारींची दखल घेतलीच जात नसल्याचे शेतकरी सांगतात.