शहरं
Join us  
Trending Stories
1
Anil Ambani : अनिल अंबानी अडचणीत? घरासह इतरही ठिकाणांवर सकाळपासूनच छापे; १७००० कोटींच्या बँक कर्ज घोटाळाप्रकरणी CBI ची कारवाई!
2
'भारत-पाकिस्तान मुद्द्यावर कोणतीही मध्यस्थी स्वीकार्य नाही', परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी नाव न घेता ट्रम्प यांना स्पष्टच सांगितले
3
मुंबईत घडामोडींना वेग, शिवसेना शिंदे गटाच्या मंत्र्यांनी घेतली शरद पवारांची भेट; कारण काय?
4
सरकारची 'उपसमिती' म्हणजे 'जुनेच खुळ', आमच्या मागण्यांचे काय? मनोज जरांगेंचा संतप्त सवाल
5
नागपूर: चालकाला येऊ लागली झोप, स्वतःच कार...; अपघातात कुलगुरू हरेराम त्रिपाठी यांचा पत्नीसह मृत्यू
6
एक ऑर्डर पोहोचवण्यासाठी Myntra आणि Amazon च्या डिलिव्हरी बॉयला किती पैसे मिळतात?
7
मुंबईत घडतेय तरी काय? आता अमित ठाकरेंनी घेतली आशिष शेलारांची भेट; राजकीय वर्तुळात चर्चा
8
"छन छन छन...असा आवाज करत ते...", प्रिया बापटनं सांगितला दादरच्या घरातील थरकाप उडवणारा प्रसंग
9
ठरलं! मेस्सी अर्जेंटिनाचा अख्खा वर्ल्ड चॅम्पियन संघ घेऊन भारतात खेळायला येतोय! कधी अन् कुठं रंगणार सामना?
10
विराट आणि रोहित वनडेतून कधी निवृत्त होणार? राजीव शुक्ला स्पष्टच बोलले...
11
भाद्रपद महिन्यात गौरी, गणपती आणि पितृपक्षही; जाणून घ्या या मराठी महिन्याचे महत्त्व!
12
अखेर लग्नाच्या ३८ वर्षांनंतर गोविंदा आणि सुनीताचा होतोय घटस्फोट? चीचीचे वकील म्हणाले...
13
खिलाडी अन् अनाडी १६ वर्षांनंतर एकत्र येणार, अक्षय कुमार-सैफ अली खानच्या 'हैवान'चं शूट सुरु
14
काजोलच्या 'द ट्रायल' सीझन २ चा दमदार ट्रेलर पाहिलात का? सोनाली कुलकर्णीचीही मुख्य भूमिका
15
विराट-धोनी नव्हे, तर हा आहे जगातला सर्वात श्रीमंत क्रिकेटर; बघा टॉप-5 क्रिकेटर्सची लिस्ट...!
16
उपराष्ट्रपती निवडणूक २०२५: “पवार-ठाकरेंची भूमिका विरोधाभासी, राष्ट्रहितविरोधी”; भाजपाची टीका
17
कर्जाचं ओझं कमी करतेय अनिल अंबानींची कंपनी; आता २००० कोटी रुपयांत विकणार पुणे-सातारा टोल रोड प्रोजेक्ट
18
जगदीप धनखड नेमके आहेत तरी कुठे? ते सध्या काय करतात?; महत्त्वाची माहिती समोर आली, पत्ता लागला!
19
काळाचा घाला...! पाटण्यात भीषण अपघात, ट्रक-ऑटोच्या धडकेत गंगा स्नानासाठी जात असलेल्या ७ महिलांसह ८ जणांचा मृत्यू!
20
रात्रभर नोटा जाळल्या, तरीही पैसे संपले नाहीत; अधीक्षक अभियंता निघाला काळ्या धनाचा कुबेर!

दोन लाख हेक्टरवरील खरीप पीक धोक्यात

By admin | Updated: September 10, 2016 00:46 IST

महिनाभरापासून पावसाने दडी मारल्याने खरिपाचे तब्बल दोन लाख हेक्टरवरील पीक धोक्यात आले आहे.

सर्वेक्षणाचे आदेश : पावसाअभावी ३१ हजार हेक्टर पीक उद्ध्वस्त यवतमाळ : महिनाभरापासून पावसाने दडी मारल्याने खरिपाचे तब्बल दोन लाख हेक्टरवरील पीक धोक्यात आले आहे. प्राथमिक अंदाजानुसार ३१ हजार हेक्टरवरील पीक हातचे गेले आहे. सुरुवातीला दमदार पावसाने सुखावलेला शेतकरी आता मात्र पुन्हा चिंतेत पडला आहे. नुकसानग्रस्त भागाचे सर्वेक्षण करण्याचे निर्देश पालकमंत्र्यांनी जिल्हा प्रशासनाला दिले आहे. जिल्ह्यात प्रारंभी जोमदार अवस्थेत असलेले पीक नंतरच्या काळात करपण्यास सुरूवात झाली. महिना झाला तरी अनेक भागात पाऊस बरसला नाही. तेथे पीक हातातून जाणार आहे. काही ठिकाणी झाड आणि शेंगाही करपल्या आहेत. कृषी अधीक्षकांनी घेतलेल्या आढावा बैठकीत अशा क्षेत्राचा आकडा ३१ हजार हेक्टर असल्याचा अहवाल पुढे आला आहे. जिल्ह्यात दोन लाख ४० हजार हेक्टरवर सोयाबीनचे पीक आहे. यातील दोन लाख हेक्टरवरील पीक पाण्याअभावी करपत आहे. यामुळे सलग तीन वर्षांपासून नुकसानीचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांना यावर्षी मोठा फटका बसण्याचा धोका आहे. गुलाबी बोंडअळी, उंटअळी, एलो मोझॅक आणि आता पावसाअभावी करपणाऱ्या पिकांनी शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले. जिल्हा प्रशासनाकडे अशा शेतकऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात तक्रारी आल्या आहेत. काही शेतकऱ्यांनी गुरूवारी जिल्हाधिकाऱ्यांना याबाबत निवेदनही सादर केले. अशा तक्रारग्रस्त शेतकऱ्यांच्या शेतीचे प्राधान्याने सर्वेक्षण केले जाणार आहे. यासोबतच इतरत्र झालेल्या नुकसानीचा आढावा घेण्यात येणार आहे. (शहर वार्ताहर)