शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
2
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
3
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
4
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
5
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
6
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
7
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
8
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
9
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
10
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
11
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
12
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
13
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
14
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
15
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
16
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
17
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
18
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
19
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
20
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
Daily Top 2Weekly Top 5

दोन लाख हेक्टरवरील खरीप पीक धोक्यात

By admin | Updated: September 10, 2016 00:46 IST

महिनाभरापासून पावसाने दडी मारल्याने खरिपाचे तब्बल दोन लाख हेक्टरवरील पीक धोक्यात आले आहे.

सर्वेक्षणाचे आदेश : पावसाअभावी ३१ हजार हेक्टर पीक उद्ध्वस्त यवतमाळ : महिनाभरापासून पावसाने दडी मारल्याने खरिपाचे तब्बल दोन लाख हेक्टरवरील पीक धोक्यात आले आहे. प्राथमिक अंदाजानुसार ३१ हजार हेक्टरवरील पीक हातचे गेले आहे. सुरुवातीला दमदार पावसाने सुखावलेला शेतकरी आता मात्र पुन्हा चिंतेत पडला आहे. नुकसानग्रस्त भागाचे सर्वेक्षण करण्याचे निर्देश पालकमंत्र्यांनी जिल्हा प्रशासनाला दिले आहे. जिल्ह्यात प्रारंभी जोमदार अवस्थेत असलेले पीक नंतरच्या काळात करपण्यास सुरूवात झाली. महिना झाला तरी अनेक भागात पाऊस बरसला नाही. तेथे पीक हातातून जाणार आहे. काही ठिकाणी झाड आणि शेंगाही करपल्या आहेत. कृषी अधीक्षकांनी घेतलेल्या आढावा बैठकीत अशा क्षेत्राचा आकडा ३१ हजार हेक्टर असल्याचा अहवाल पुढे आला आहे. जिल्ह्यात दोन लाख ४० हजार हेक्टरवर सोयाबीनचे पीक आहे. यातील दोन लाख हेक्टरवरील पीक पाण्याअभावी करपत आहे. यामुळे सलग तीन वर्षांपासून नुकसानीचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांना यावर्षी मोठा फटका बसण्याचा धोका आहे. गुलाबी बोंडअळी, उंटअळी, एलो मोझॅक आणि आता पावसाअभावी करपणाऱ्या पिकांनी शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले. जिल्हा प्रशासनाकडे अशा शेतकऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात तक्रारी आल्या आहेत. काही शेतकऱ्यांनी गुरूवारी जिल्हाधिकाऱ्यांना याबाबत निवेदनही सादर केले. अशा तक्रारग्रस्त शेतकऱ्यांच्या शेतीचे प्राधान्याने सर्वेक्षण केले जाणार आहे. यासोबतच इतरत्र झालेल्या नुकसानीचा आढावा घेण्यात येणार आहे. (शहर वार्ताहर)