शहरं
Join us  
Trending Stories
1
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
2
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
3
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
4
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
5
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
6
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
7
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
8
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
9
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
10
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
11
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
12
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
13
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
14
'धुरंधर'मुळे पालटले या टीव्ही कलाकारांचे नशीब; कोणी आयटम साँगने गाजवले, तर कोणी अभिनयाने जिंकली मने!
15
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
16
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
17
बॉक्स ऑफिस मॉन्स्टर 'धुरंधर'सोबत 'उत्तर' रिलीज झाला अन्.., क्षितिज पटवर्धनची लक्षवेधी पोस्ट
18
सरकारच्या तिजोरीत लोकांनी भरले १७ लाख कोटी; कॉर्पोरेट, वैयक्तिक करात मोठी वाढ
19
'धुरंधर'मध्ये अक्षय खन्नाचंच होतंय कौतुक, आर माधवनचा जळफळाट? म्हणाला, "तो नव्या घरात..."
20
BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?
Daily Top 2Weekly Top 5

खर्डा प्रकल्पामधून मिळणार का पाणी?

By admin | Updated: December 21, 2015 02:41 IST

तालुक्यातील महत्त्वाकांक्षी खर्डा मध्यम प्रकल्पामधून सिंचनाकरिता पाणी केव्हा मिळेल, अशी विचारणा परिसरातील शेतकऱ्यांकडून केली जात आहे.

आरिफ अली बाभूळगावतालुक्यातील महत्त्वाकांक्षी खर्डा मध्यम प्रकल्पामधून सिंचनाकरिता पाणी केव्हा मिळेल, अशी विचारणा परिसरातील शेतकऱ्यांकडून केली जात आहे. तर दुसरीकडे लपवाछपवीमुळे अनेक बड्या अधिकाऱ्यांसमोरची संकटे अधिक वाढण्याची चिन्हे निर्माण झाली आहे.बाभूळगाव तालुक्यातील खर्डा गावातील मध्यम प्रकल्पाला २००७ मध्ये प्रशासकीय मान्यता मिळून कामाला सुरुवात झाली. त्यावेळी सदर प्रकल्प ३० कोटी रुपयांचा होता. प्रकल्पाची किमत वाढून तो आजघडीला ९० कोटी रुपयांवर पोहोचला. मात्र आठ वर्षांपासून आशेवर जगणाऱ्या हाडाच्या शेतकऱ्याला पाणी मिळू शकले नाही. खर्डा प्रकल्पात ३०० हेक्टर जमीन पाण्याखाली जाणार असून सदर प्रकल्पामधून ११७५ हेक्टरमध्ये सिंचन होणार होते. मात्र काही अतिमहत्त्वाच्या बाबींबाबत प्रकल्पाची प्रशासकीय मान्यता मिळविताना अधिकाऱ्यांनी शासनाला अंधारात ठेवले. या कारणामुळे गेल्या तीन वर्षांपासून प्रकल्पाचे कामबंद आहे. सद्यस्थितीत प्रकल्पावर ३१ कोटी रुपये खर्च झाला आहे. प्रकल्पाचे मातीकाम पूर्ण झाले असून केवळ तोंड बंद करणे बाकी आहे.खर्डा प्रकल्पाचे काम का रखडले या संबंधात अधिक माहिती घेतली असता अनेक गंभीर बाबी समोर आल्या. खर्डा प्रकल्पाचा सर्वे केला जात असताना अधिकाऱ्यांनी प्रशासकीय मान्यता घेत असताना प्रकल्पाच्या बुडीत क्षेत्रात ३९ हेक्टर वनजमीन येते, ही बाब शासनाच्या निदर्शनास आणून दिली नाही. दुसरे म्हणजे, सरूळ गावातील अर्धी घरे पाण्याखाली जाईल, ही बाबसुद्धा शासनापासून दडवून ठेवली. सरूळ गावात वीज वितरण कंपनीने दीड कोटी रुपये खर्चून ३३ केव्हीचे उपकेंद्र नव्याने बांधले, याही बाबीची भनक प्रशासकीय मान्यता घेत असताना शासनाला लागू दिली नाही. परिणामी गेल्या आठ वर्षांपासून हाडाचा शेतकरी सिंचन सुविधेपासून वंचित राहिला आणि जिल्ह्यातील शेतकरी आत्महत्येचा आकडाही फुगत राहिला. सरूळ गावच्या नागरिकांनी ग्रामसभा घेऊन संपूर्ण गावांचे पुनर्वसन मागितले आहे. शिवाय पुनर्वसनाकरिता तीन ठिकाणेसुद्धा सुचविली आहे. सरूळ पुनर्वसनाकरिता ३६ हेक्टर जमिनीची आवश्यकता आहे. सरूळ पुनर्वसनावर २३ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. सदर पुनर्वसन प्राधिकरणाकडे मंजुरीसाठी पडून आहे. तर वनजमीन मान्यतेची प्रतीक्षा केंद्र शासनाकडून केली जात आहे. ही मान्यता प्राप्त झाल्याशिवाय खर्डा मध्यम प्रकल्पाचे काम पुढे सरकणार नाही, ही बाब सूर्यप्रकाशाइतकी सत्य आहे. (प्रतिनिधी)