शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासाठी गुड न्यूज! अमेरिकेला मागे टाकत बनू शकतो जगातील दुसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था; EY च्या रिपोर्टमध्ये काय?
2
शी जिनपिंग यांचं सीक्रेट लेटर, मैत्रीसाठी पुढाकार; भारत-चीन संंबंध सुधारण्यामागची Inside Story
3
रोज फोनवर बोलता बोलता मित्राच्या पत्नीवर जीव जडला, अडथळा ठरलेल्या नवऱ्याचा प्रियकरानेच खेळ खल्लास केला! 
4
भयंकर! तांत्रिकाच्या सांगण्यावरून ११ वीतील युवकाचा दिला नरबळी; शीर धडापासून वेगळे केले, अन्...
5
बॉयफ्रेंडने लाथा-बुक्क्यांनी मारलं, सर्व पैसे चोरले, माझं घर घेतलं; प्रसिद्ध गायिकेचा आरोप
6
ना चित्रपट ना जाहिरात, तरीही सोनू सूदने कमावले ३.१० कोटी रुपये; काय आहे उत्पन्नाचा स्त्रोत?
7
संतापजनक! मोबाईल दुरुस्ती दुकानातून खाजगी व्हिडीओ लीक, आता येत आहेत वाईट मेसेज
8
पहिलाच टी-२० सामना ठरला शेवटचा; जाणून घ्या 'त्या' ५ भारतीय खेळाडूंबद्दल!
9
"तुम्ही गोळ्या घातल्या, तरी हटणार नाही"; मनोज जरांगेंचा निर्धार, CM फडणवीसांना काय केलं आवाहन?
10
AAI Recruitment: एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियामध्ये नोकरी, निवड झाल्यास दीड लाख पगार!
11
EV सेक्टरच्या शेअरची कमाल! दिला 8600% परतावा, 59 पैशांचा स्टॉक 51 रुपयांवर पोहोचला; करतोय मालामाल
12
पार्थ पवारांनी पैसे दिले, जॅकलिनने लालबागच्या राजाच्या पेटीत टाकले, पाहा VIDEO
13
मतदानानंतर रेशन आणि आधारही हिसकावून घेतील..; राहुल गांधींचा मोदी सरकारवर हल्लाबोल
14
Pooja Kumari : कष्टाचं फळ! भाजी, कपडे विकले, कोरोनात मास्क शिवले; अडचणींवर मात करुन झाली अधिकारी
15
जिओ IPO, AI आणि नवीन उर्जा... मुकेश अंबानी उद्या मोठ्या घोषणा करणार? गुंतवणूकदारांना संधी?
16
बिहारमध्ये हाय अलर्ट, जैश-ए-मोहम्मदचे तीन पाकिस्तानी दहशतवादी नेपाळमधून घुसले
17
सोनं झळाळलं, चांदी कडाडली... दोघांचीही किंमत चांगलीच वधारली! कॅरेटप्रमाणे पटापट चेक करा सोन्याचे लेटेस्ट रेट
18
इंजेक्शन घेऊन वर्ल्ड कप खेळला; आता त्याच्या फिटनेसवर नाही भरवसा! मोहम्मद शमी म्हणाला...
19
TVS: टीव्हीएसचा बाजारात धमाका! स्टायलिश डिझाइनसह ई-स्कूटर केली लॉन्च, जाणून घ्या किंमत
20
Open AI: एआयचा वापर धोकादायक? चॅटजीपीटीमुळे १६ वर्षांच्या मुलाने आत्महत्या केल्याचा आरोप

खर्डा प्रकल्पामधून मिळणार का पाणी?

By admin | Updated: December 21, 2015 02:41 IST

तालुक्यातील महत्त्वाकांक्षी खर्डा मध्यम प्रकल्पामधून सिंचनाकरिता पाणी केव्हा मिळेल, अशी विचारणा परिसरातील शेतकऱ्यांकडून केली जात आहे.

आरिफ अली बाभूळगावतालुक्यातील महत्त्वाकांक्षी खर्डा मध्यम प्रकल्पामधून सिंचनाकरिता पाणी केव्हा मिळेल, अशी विचारणा परिसरातील शेतकऱ्यांकडून केली जात आहे. तर दुसरीकडे लपवाछपवीमुळे अनेक बड्या अधिकाऱ्यांसमोरची संकटे अधिक वाढण्याची चिन्हे निर्माण झाली आहे.बाभूळगाव तालुक्यातील खर्डा गावातील मध्यम प्रकल्पाला २००७ मध्ये प्रशासकीय मान्यता मिळून कामाला सुरुवात झाली. त्यावेळी सदर प्रकल्प ३० कोटी रुपयांचा होता. प्रकल्पाची किमत वाढून तो आजघडीला ९० कोटी रुपयांवर पोहोचला. मात्र आठ वर्षांपासून आशेवर जगणाऱ्या हाडाच्या शेतकऱ्याला पाणी मिळू शकले नाही. खर्डा प्रकल्पात ३०० हेक्टर जमीन पाण्याखाली जाणार असून सदर प्रकल्पामधून ११७५ हेक्टरमध्ये सिंचन होणार होते. मात्र काही अतिमहत्त्वाच्या बाबींबाबत प्रकल्पाची प्रशासकीय मान्यता मिळविताना अधिकाऱ्यांनी शासनाला अंधारात ठेवले. या कारणामुळे गेल्या तीन वर्षांपासून प्रकल्पाचे कामबंद आहे. सद्यस्थितीत प्रकल्पावर ३१ कोटी रुपये खर्च झाला आहे. प्रकल्पाचे मातीकाम पूर्ण झाले असून केवळ तोंड बंद करणे बाकी आहे.खर्डा प्रकल्पाचे काम का रखडले या संबंधात अधिक माहिती घेतली असता अनेक गंभीर बाबी समोर आल्या. खर्डा प्रकल्पाचा सर्वे केला जात असताना अधिकाऱ्यांनी प्रशासकीय मान्यता घेत असताना प्रकल्पाच्या बुडीत क्षेत्रात ३९ हेक्टर वनजमीन येते, ही बाब शासनाच्या निदर्शनास आणून दिली नाही. दुसरे म्हणजे, सरूळ गावातील अर्धी घरे पाण्याखाली जाईल, ही बाबसुद्धा शासनापासून दडवून ठेवली. सरूळ गावात वीज वितरण कंपनीने दीड कोटी रुपये खर्चून ३३ केव्हीचे उपकेंद्र नव्याने बांधले, याही बाबीची भनक प्रशासकीय मान्यता घेत असताना शासनाला लागू दिली नाही. परिणामी गेल्या आठ वर्षांपासून हाडाचा शेतकरी सिंचन सुविधेपासून वंचित राहिला आणि जिल्ह्यातील शेतकरी आत्महत्येचा आकडाही फुगत राहिला. सरूळ गावच्या नागरिकांनी ग्रामसभा घेऊन संपूर्ण गावांचे पुनर्वसन मागितले आहे. शिवाय पुनर्वसनाकरिता तीन ठिकाणेसुद्धा सुचविली आहे. सरूळ पुनर्वसनाकरिता ३६ हेक्टर जमिनीची आवश्यकता आहे. सरूळ पुनर्वसनावर २३ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. सदर पुनर्वसन प्राधिकरणाकडे मंजुरीसाठी पडून आहे. तर वनजमीन मान्यतेची प्रतीक्षा केंद्र शासनाकडून केली जात आहे. ही मान्यता प्राप्त झाल्याशिवाय खर्डा मध्यम प्रकल्पाचे काम पुढे सरकणार नाही, ही बाब सूर्यप्रकाशाइतकी सत्य आहे. (प्रतिनिधी)