शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
2
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
3
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
4
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
5
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
6
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
7
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
8
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
9
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
10
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
11
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
12
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
13
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
14
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
15
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
16
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
17
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
18
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
19
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
20
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव

खचलेल्या व बुजलेल्या विहिरींवरून खडाजंगी

By admin | Updated: March 31, 2016 03:00 IST

जिल्हा परिषदेच्या बुधवारी झालेल्या स्थायी समितीच्या सभेत खचलेल्या व बुजलेल्या विहिरींच्या लाभार्थ्यांवरून चांगलीच खडाजंगी झाली.

जिल्हा परिषद : स्थायी समिती सभा गाजली, खरे लाभार्थी वंचितयवतमाळ : जिल्हा परिषदेच्या बुधवारी झालेल्या स्थायी समितीच्या सभेत खचलेल्या व बुजलेल्या विहिरींच्या लाभार्थ्यांवरून चांगलीच खडाजंगी झाली. बोगस लाभार्थ्यांना लाभ देण्यात येऊन खरे लाभार्थी डावलल्याचा आरोप जिल्हा परिषद सदस्य देवानंद पवार यांनी केला. खचलेल्या व बुजलेल्या विहिरींसाठी दीड लाख रुपये देण्याला प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. दीड लाखांपेक्षा जास्त खर्च आल्यास तो सबंधित शेतकऱ्याने करावयाचा आहे. तसेच दीड लाखांपेक्षा कमी खर्च आल्यास तेवढे पैसे शासनाकडून कमी देण्यात येणार असल्याची शासनाकडून तरतूद करण्यात आली. यामध्येही जिल्ह्यात २०१२ मध्ये प्रचंड पावसानंतर आलेल्या महापुरात नुकसान झालेल्या विहिरींबाबत प्राधान्याने मदत करण्याचे आदेश आहेत. २०१२ मध्ये महापुरात नुकसान झालेल्या विहिरींची पाहणी करून अहवाल व याद्या तयार करण्यासाठी शासनाने एका समितीची स्थापना केली होती. यात मंडळ अधिकारी, तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहाय्यक व शाखा अभियंता यांचा समावेश होता. या समितीने खचलेल्या आणि बुजलेल्या विहिरींची पाहणी करून पंचनामा करून अहवाल व यादी तयार करून गटविकास अधिकाऱ्यांकडे सोपविला. गटविकास अधिकाऱ्यांनी अहवाल तहसीलदार आणि नंतर जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठविला. परंतु या याद्यांनुसार मदतीचे वाटप झाले नाही. नियमबाह्य पद्धतीने खऱ्या लाभार्थ्यांना वंचित ठेऊन अनेक खोट्या लाभार्थ्यांना या मदतीचा लाभ देण्यात आल्याचा आरोप देवानंद पवार यांनी केला. खचलेल्या व बुजलेल्या विहिरीच्या मदतीपासून २०१२ मधील खरे लाभार्थी वंचित असल्याचा मुद्या पवार यांनी मांडला. शासनाच्याच समितीने सर्व्हे करून तयार केलेल्या आणि त्यानंतर मंजूर करण्यात आलेल्या या याद्या जिल्हाधिकारी कार्यालयातच आहेत, त्या याद्या काढून सबंधितांना त्वरित लाभ देण्याची मागणी पवार यांनी केली. उल्लेखनिय म्हणजे विहिरींचा लाभ ज्या बोगस लाभार्थ्यांना मिळाला त्याबाबत संपूर्ण चौकशी करून दोषींवर कारवाईची मागणीही करण्यात आली. हा विषय आपण १५ दिवसात मार्गी लावतो, असे आश्वासन मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी सभेत दिले. समाजकल्याणच्या अनुदानित वसतीगृहांचाही मुद्दा यावेळी देवानंद पवार यांनी उपस्थित केला. या वसतीगृहातील विद्यार्थ्यांची संख्या जुळत नसल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. दारव्हा तालुक्यातील शेंद्री (बु.) येथील अनुदानित वसतीगृहात २०००-०१ मध्ये ७४ विद्यार्थ्यांना मान्यता होती. आता १०३ विद्यार्थ्यांना मान्यता आहे. सोळा वर्षांपासून ग्रँन्टही दिली जाते. मात्र या वसतीगृहाचे सबंधित कागदपत्र गहाळ झाल्याचे सांगण्यात येते. जिल्ह्यात अशाप्रकारे ५० वसतीगृहांकडे आवश्यक ते कागदपत्रच मिळत नसल्याचे सांगण्यात येते. यामध्ये अडीच हजार विद्यार्थी जिल्ह्यातील कमी होत आहेत. याकडेही पवार यांनी लक्ष वेधले. (प्रतिनिधी)