शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
3
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
4
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
5
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
6
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
7
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
8
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
9
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
10
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
11
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
12
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
13
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
14
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
15
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
16
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
17
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
18
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा

आजची रात्र ठरणार वैऱ्याची

By admin | Updated: February 15, 2017 02:50 IST

जिल्हा परिषद आणि पंचायत समिती उमेदवारांसाठी बुधवारची रात्र वैऱ्याची ठरणार आहे.

९२८ उमेदवार : १३ लाख ७३ हजार मतदार यवतमाळ : जिल्हा परिषद आणि पंचायत समिती उमेदवारांसाठी बुधवारची रात्र वैऱ्याची ठरणार आहे. पहिल्या टप्प्यात ९२८ उमेदवारांचे भवितव्य १३ लाख ७३ हजार मतदार ठरविणार आहे. पहिल्या टप्प्यात १६ फेब्रुवारीला जिल्हा परिषदेच्या ५५ गटांसाठी ३१९, तर पंचायत समितींच्या ११० गणांसाठी ६०९ मतदार रिंगणात आहेत. पहिल्या टप्प्यात १३ लाख ७३ हजार १०४ मतदार मतदानाचा हक्क बजावतील. यात सात लाख २१ हजार २५४ पुरूष, तर सहा लाख ५१ हजार ८४० महिला मतदार आहेत. पहिल्या टप्प्यासाठी एक हजार ७१२ मतदान केंद्र राहतील. गुरूवारी सकाळी ७.३० पासून मतदानाला सुरूवात होणार आहे. आता जाहीर प्रचार संपल्याने उमेदवार आणि नेत्यांसाठी बुधवारची रात्र महत्त्वाची ठरणार आहे. मतदानाच्या पूर्वीची रात्र प्रत्येक निवडणुकीत ‘कत्ल की रात’ म्हणून ओळखली जाते. या रात्रीतूनच उमेदवारांचे जय-पराजयाचे आडाखे बांधले जातात. कच्चे दुवे शोधून संबंधित भागात जादा जोर लावला जातो. त्यासाठी साम, दाम, दंड, भेद, नितीचा अवलंब केला जातो. यातून विजय सुकर करण्याचा प्रयत्न होतो. त्यामुळेच ही रात्र महत्त्वाची ठरते. या रात्री उमेदवार, कार्यकर्ते, नेते सर्वच अक्षरश: जागली करतात. रात्रीतून चित्र पालटविण्यासाठी त्यांची धडपड असते. त्यामुळे यावेळी बुधवारची ही रात्र सर्व ९२८ उमेदवारांसाठी अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे. (शहर प्रतिनिधी)