शहरं
Join us  
Trending Stories
1
संतापजनक...! IAS अधिकाऱ्याची गाडी तपासली; गोव्याच्या एसपींनी पोलिसांनाच दिली उठाबशांची शिक्षा...
2
१९ तारखेला अत्यंत स्फोटक माहिती उघड होणार, ज्यानं भाजपा नेत्यांची फजिती होईल; संजय राऊतांचा दावा
3
महायुतीत एकनाथ शिंदेंची कोंडी; मुंबईत भाजपानं शिंदेसेनेला केवळ ५२ जागांचा दिला प्रस्ताव?
4
टीम इंडियाला मल्टीप्लेक्समध्ये पाहून सगळचे चकीत झाले...; मैदानातील सगळेच धुरंधर 'धुरंधर' पहायला गेलेले...
5
Crime: बुरखा न घातल्यानं पती संतापला, पत्नीसह पोटच्या २ मुलींना संपवलं; मृतदेह पुरले खड्ड्यात!
6
कोण आहे डोनाल्ड ट्रम्प यांची होणारी सून...! मंगळवारीच उरकला साखरपुडा, दोघे भारतातही येऊन गेलेले...
7
उद्धव-राज विरुद्ध भाजप-शिंदेसेना असाच सामना; १३८ मराठी बहुल मतदारसंघ या निवडणुकीत ठरणार निर्णायक
8
सरकार आणखी एका बँकेतील हिस्सा विकण्याच्या तयारीत; खात्यात येणार २१०० कोटी, सध्या आहे ९५% हिस्सा
9
'उद्याच्या तेजस्वी पहाटेसाठी!' रितेश देशमुखचा छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेतील पहिला लूक समोर
10
"महापालिका निवडणूक लुटण्याचे वाटे केले गेले"; अंजली दमानियांचा निशाणा, महायुतीवर भडकल्या
11
प्रसिद्ध दिग्दर्शक आणि पत्नीच्या हत्या प्रकरणाला नवं वळण, पोलिसांनी लेकालाच केली अटक
12
निवडणुका जाहीर होताच तापले युती अन् आघाडीचे राजकारण; महाराष्ट्रात काही ठिकाणी गणित बिघडणार
13
अमेरिकन शेअर बाजारात मोठा बदल! नॅस्डॅक २४ तास ट्रेडिंग सुरू करण्याच्या तयारीत; भारतीय गुंतवणूकदारांवर काय होणार परिणाम?
14
अमेरिकेत पॅलेस्टिनसह इतर ७ देशांतील नागरिकांना प्रवास बंदी; डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय
15
Stock Market Today: सुस्त सुरुवातीनंतर सेन्सेक्स-निफ्टीमध्ये किंचित वाढ; ICICI Bank, Nestle, HDFC Bank मध्ये घसरण
16
महालक्ष्मी व्रत उद्यापन: ४ गुरुवार नेटाने केलेल्या महालक्ष्मी व्रताचे १८ डिसेंबर रोजी उद्यापन कसे करावे? वाचा विधी
17
'१२ लाख सैनिकांची गरज काय? त्यांना दुसरे काम लावा'; पृथ्वीराज चव्हाण यांनी स्पष्टच सांगितलं
18
आई मंदिराबाहेर फुले विकायची...! आयपीएलने मुलाला बनविले 'करोडपती', वडील मैदानावर...
19
LIC ची कोणत्या कंपनीत किती गुंतवणूक? सरकारनं दिली महत्त्वाची माहिती; टाटा, रिलायन्स, अदानीसह कोणत्या कंपन्या?
20
अंबरनाथमध्ये भाजपाचे उमेदवार पवन वाळेकर यांच्या कार्यालयावर गोळीबार; घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद
Daily Top 2Weekly Top 5

काेराेना दहशतीमुळे चार खांदेकरीही मिळणे कठीण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2021 05:00 IST

अंत्यविधी हा मुलाने किंवा मुलीनेच करावा असा धार्मिक प्रघात आहे. काेराेना दहशतीमुळे आता नैसर्गिक मृत्यू झाल्यानंतरही अंत्यसंस्कार कठीण झाले आहेत. तिरडीला खांदा देणे पुण्याचे समजले जात हाेते. आता काेराेना महामारीच्या संकटात चार खांदेकरी मिळणे कठीण झाले आहे. त्यासाठीसुद्धा अंत्यसंस्कार करणाऱ्याचे पॅकेज ठरले आहे.  काेराेना महामारीच्या  काळात एकल कुटुंबाची अधिक परवड हाेत आहे. ज्यांचा मुलगा-मुलगी बाहेरगावी अशा कुटुंबात एखाद्याचा मृत्यू झाल्यास चार जण खांदा देण्यासही मिळत नाहीत.

ठळक मुद्देनातेवाईक फिरकेनात : अंत्यसंस्कारासाठी नऊ हजारांचे ‘पॅकेज’

सुरेंद्र राऊत यवतमाळ : सर्वच धर्मात अंत्यसंस्काराला अनन्यसाधारण महत्त्व आहे. देह त्याग केल्यानंतर आत्म्याचा इहलाेकीचा प्रवास सुरू हाेताे. देहावर अंत्यसंस्कार केल्यानंतर ताे पंचत्वात विलीन हाेतो. अंत्यविधी हा मुलाने किंवा मुलीनेच करावा असा धार्मिक प्रघात आहे. काेराेना दहशतीमुळे आता नैसर्गिक मृत्यू झाल्यानंतरही अंत्यसंस्कार कठीण झाले आहेत. तिरडीला खांदा देणे पुण्याचे समजले जात हाेते. आता काेराेना महामारीच्या संकटात चार खांदेकरी मिळणे कठीण झाले आहे. त्यासाठीसुद्धा अंत्यसंस्कार करणाऱ्याचे पॅकेज ठरले आहे.  काेराेना महामारीच्या  काळात एकल कुटुंबाची अधिक परवड हाेत आहे. ज्यांचा मुलगा-मुलगी बाहेरगावी अशा कुटुंबात एखाद्याचा मृत्यू झाल्यास चार जण खांदा देण्यासही मिळत नाहीत. काेराेना आजाराबाबत अनेक संभ्रम आहेत. अनेकदा तपासण्या करून पाॅझिटिव्ह आलेली व्यक्ती मृत्यूच्या पूर्वी निगेटिव्ह येते. अशा मृतांची संख्याही माेठी आहे. त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यासाठी कुटुंबातील सदस्यच येत नाहीत. त्यामुळे मुलांनाच आपल्या आई-वडिलांच्या अंत्यसंस्काराची जबाबदारी एकट्याने उचलावी लागते. अनेकांना तर मृत्यू झाल्यानंतर घरापर्यंतही आणले जात नाही. इतकी भीती आहे. पूर्वी शेजारी, मित्रमंडळी ज्या घरी मृत्यू झाला तेथे आवर्जून जात. काय हवं नकाे ते पाहत हाेते. इतकंच काय ज्या घरात मयत झाली तेथील चूल पेटविली जात नव्हती. त्यामुळे शेजारीपाजारीच किंवा नातेवाइकांकडूनच जेवण, चहा, नाश्ता याची व्यवस्था केली जाई. काेराेना महामारीच्या दहशतीमुळे आता हा संस्कारच मागे पडला आहे. कधीकाळी महानगरात घडलेले प्रकार आता यवतमाळसारख्या लहानशा शहरात पाहावयास मिळत आहेत.  कोरोना महामारी आणखी कुठल्या पातळीवर नेते याचा अंदाज बांधणेही कठीण झाले आहे.  

गरिबांना अत्यंंविधीच्या पॅकेजचा खर्च न परवडणारा 

काेराेना संशयिताचा मृतदेह थेट रुग्णालयातून स्मशानभूमीत नेला जाताे. त्यासाठी ठराविक रकमेचे पॅकेज माेजले जाते. अंत्यविधीला मदत करणाऱ्यांना साडेचार हजार रुपये द्यावे लागतात. यात ते रुग्णवाहिकेसह सर्व सुविधा पाेहाेचवितात. नंतर स्मशानात सरणाच्या लाकडाकरिता साडेतीन हजार रुपये घेतले जातात. हा नऊ हजार रुपये अंत्यविधीचा खर्च गरिबांना न परवडणारा आहे; मात्र अडचण असल्याने त्यांचाही नाइलाज झाला आहे. काळाच्या ओघात अंत्यविधी हा पार पाडणे कठीण झाले आहे. पॅकेजमध्ये केवळ मृतदेहाला अग्नी दिला जाताे. दुसऱ्या दिवशी राख नातेवाइकांना सुपूर्द केली जाते. यावरून काेराेनामुळे मानवी जनजीवन किती ढवळून निघालंय याची प्रचिती       येते.

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याDeathमृत्यू