शहरं
Join us  
Trending Stories
1
बेस्ट पतपेढी कोणाच्या ताब्यात? आज मतदान, उद्या फैसला! ठाकरे बंधूंच्या युतीची पहिली कसोटी
2
लंडनमध्ये आज ‘लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन’! भारतीय अर्थव्यवस्थेच्या लक्ष्यावर मंथन
3
पुन्हा निळ्या ड्रमाची दहशत, ड्रममध्ये सापडला तरुणाचा मृतदेह, पत्नी आणि तीन मुले बेपत्ता  
4
‘कबुतर आ आ...’ कधी करावे? दाणे टाकण्यासंदर्भात पालिकेने मागवल्या सूचना; ई-मेल आयडीही दिला
5
मुंबईत इमारतीचा भाग कोसळला, तिघे जखमी; मुसळधार पावसात बचावकार्य सुरु
6
दहीहंडीच्या दिवशी वाहतूक पोलिसांनी फोडली कोट्यवधीच्या ‘दंडाची हंडी’; मुंबईत नियमांचे उल्लंघन
7
आपल्या आई, बहिणीचे मतदानावेळचे CCTV फुटेज द्यावे का? राहुल गांधींच्या मागणीवर आयोगाचा सवाल
8
दहीहंडी दुर्घटनेतील महेशच्या कुटुंबाला ५ लाखांचा धनादेश; दहिसर येथे घडला होता दुर्दैवी प्रकार
9
जे भारतात तयार होते तेच खरेदी करा; दिवाळीत ‘डबल बोनस’ मिळणार आहे : पंतप्रधान मोदी
10
फक्त महिला रडत होती म्हणून हुंड्यासाठी छळाचा गुन्हा होत नाही- दिल्ली उच्च न्यायालय
11
लेख: कुठे नाचताय जनाब मुनीर, शुद्धीवर तरी आहात का? चेष्टामस्करीलाही काही मर्यादा असते!
12
पुन्हा निसर्ग कोपला, ढगफुटीने हाहाकार! जम्मू-काश्मिरातील कठुआमध्ये ७ मृत्युमुखी; अनेक जखमी
13
आजचा अग्रलेख: भारताच्या प्रवासाचा ‘रोडमॅप’! विक्रमांपेक्षाही भाषणाचा आशय अधिक महत्त्वाचा
14
वर्गात मुलांनी सरळ रांगेत बसावे की ‘यू’ आकारात? शिक्षकापेक्षा मुले एकमेकांकडून जास्त शिकतात!
15
निवडणूक आयोग भाजपशी हातमिळवणी करून करतोय मतांची चोरी: राहुल गांधींचा आरोप
16
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
17
चिनी बदकांमुळे ‘शटलकॉक’ महाग! लोकांच्या खानपानाच्या सवयी बदलल्या अन् परिणाम किमतींवर झाला...
18
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
19
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
20
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना

काेराेना दहशतीमुळे चार खांदेकरीही मिळणे कठीण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2021 05:00 IST

अंत्यविधी हा मुलाने किंवा मुलीनेच करावा असा धार्मिक प्रघात आहे. काेराेना दहशतीमुळे आता नैसर्गिक मृत्यू झाल्यानंतरही अंत्यसंस्कार कठीण झाले आहेत. तिरडीला खांदा देणे पुण्याचे समजले जात हाेते. आता काेराेना महामारीच्या संकटात चार खांदेकरी मिळणे कठीण झाले आहे. त्यासाठीसुद्धा अंत्यसंस्कार करणाऱ्याचे पॅकेज ठरले आहे.  काेराेना महामारीच्या  काळात एकल कुटुंबाची अधिक परवड हाेत आहे. ज्यांचा मुलगा-मुलगी बाहेरगावी अशा कुटुंबात एखाद्याचा मृत्यू झाल्यास चार जण खांदा देण्यासही मिळत नाहीत.

ठळक मुद्देनातेवाईक फिरकेनात : अंत्यसंस्कारासाठी नऊ हजारांचे ‘पॅकेज’

सुरेंद्र राऊत यवतमाळ : सर्वच धर्मात अंत्यसंस्काराला अनन्यसाधारण महत्त्व आहे. देह त्याग केल्यानंतर आत्म्याचा इहलाेकीचा प्रवास सुरू हाेताे. देहावर अंत्यसंस्कार केल्यानंतर ताे पंचत्वात विलीन हाेतो. अंत्यविधी हा मुलाने किंवा मुलीनेच करावा असा धार्मिक प्रघात आहे. काेराेना दहशतीमुळे आता नैसर्गिक मृत्यू झाल्यानंतरही अंत्यसंस्कार कठीण झाले आहेत. तिरडीला खांदा देणे पुण्याचे समजले जात हाेते. आता काेराेना महामारीच्या संकटात चार खांदेकरी मिळणे कठीण झाले आहे. त्यासाठीसुद्धा अंत्यसंस्कार करणाऱ्याचे पॅकेज ठरले आहे.  काेराेना महामारीच्या  काळात एकल कुटुंबाची अधिक परवड हाेत आहे. ज्यांचा मुलगा-मुलगी बाहेरगावी अशा कुटुंबात एखाद्याचा मृत्यू झाल्यास चार जण खांदा देण्यासही मिळत नाहीत. काेराेना आजाराबाबत अनेक संभ्रम आहेत. अनेकदा तपासण्या करून पाॅझिटिव्ह आलेली व्यक्ती मृत्यूच्या पूर्वी निगेटिव्ह येते. अशा मृतांची संख्याही माेठी आहे. त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यासाठी कुटुंबातील सदस्यच येत नाहीत. त्यामुळे मुलांनाच आपल्या आई-वडिलांच्या अंत्यसंस्काराची जबाबदारी एकट्याने उचलावी लागते. अनेकांना तर मृत्यू झाल्यानंतर घरापर्यंतही आणले जात नाही. इतकी भीती आहे. पूर्वी शेजारी, मित्रमंडळी ज्या घरी मृत्यू झाला तेथे आवर्जून जात. काय हवं नकाे ते पाहत हाेते. इतकंच काय ज्या घरात मयत झाली तेथील चूल पेटविली जात नव्हती. त्यामुळे शेजारीपाजारीच किंवा नातेवाइकांकडूनच जेवण, चहा, नाश्ता याची व्यवस्था केली जाई. काेराेना महामारीच्या दहशतीमुळे आता हा संस्कारच मागे पडला आहे. कधीकाळी महानगरात घडलेले प्रकार आता यवतमाळसारख्या लहानशा शहरात पाहावयास मिळत आहेत.  कोरोना महामारी आणखी कुठल्या पातळीवर नेते याचा अंदाज बांधणेही कठीण झाले आहे.  

गरिबांना अत्यंंविधीच्या पॅकेजचा खर्च न परवडणारा 

काेराेना संशयिताचा मृतदेह थेट रुग्णालयातून स्मशानभूमीत नेला जाताे. त्यासाठी ठराविक रकमेचे पॅकेज माेजले जाते. अंत्यविधीला मदत करणाऱ्यांना साडेचार हजार रुपये द्यावे लागतात. यात ते रुग्णवाहिकेसह सर्व सुविधा पाेहाेचवितात. नंतर स्मशानात सरणाच्या लाकडाकरिता साडेतीन हजार रुपये घेतले जातात. हा नऊ हजार रुपये अंत्यविधीचा खर्च गरिबांना न परवडणारा आहे; मात्र अडचण असल्याने त्यांचाही नाइलाज झाला आहे. काळाच्या ओघात अंत्यविधी हा पार पाडणे कठीण झाले आहे. पॅकेजमध्ये केवळ मृतदेहाला अग्नी दिला जाताे. दुसऱ्या दिवशी राख नातेवाइकांना सुपूर्द केली जाते. यावरून काेराेनामुळे मानवी जनजीवन किती ढवळून निघालंय याची प्रचिती       येते.

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याDeathमृत्यू