शहरं
Join us  
Trending Stories
1
Anil Ambani : अनिल अंबानी अडचणीत? घरासह इतरही ठिकाणांवर सकाळपासूनच छापे; १७००० कोटींच्या बँक कर्ज घोटाळाप्रकरणी CBI ची कारवाई!
2
'भारत-पाकिस्तान मुद्द्यावर कोणतीही मध्यस्थी स्वीकार्य नाही', परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी नाव न घेता ट्रम्प यांना स्पष्टच सांगितले
3
मुंबईत घडामोडींना वेग, शिवसेना शिंदे गटाच्या मंत्र्यांनी घेतली शरद पवारांची भेट; कारण काय?
4
सरकारची 'उपसमिती' म्हणजे 'जुनेच खुळ', आमच्या मागण्यांचे काय? मनोज जरांगेंचा संतप्त सवाल
5
नागपूर: चालकाला येऊ लागली झोप, स्वतःच कार...; अपघातात कुलगुरू हरेराम त्रिपाठी यांचा पत्नीसह मृत्यू
6
एक ऑर्डर पोहोचवण्यासाठी Myntra आणि Amazon च्या डिलिव्हरी बॉयला किती पैसे मिळतात?
7
मुंबईत घडतेय तरी काय? आता अमित ठाकरेंनी घेतली आशिष शेलारांची भेट; राजकीय वर्तुळात चर्चा
8
"छन छन छन...असा आवाज करत ते...", प्रिया बापटनं सांगितला दादरच्या घरातील थरकाप उडवणारा प्रसंग
9
ठरलं! मेस्सी अर्जेंटिनाचा अख्खा वर्ल्ड चॅम्पियन संघ घेऊन भारतात खेळायला येतोय! कधी अन् कुठं रंगणार सामना?
10
विराट आणि रोहित वनडेतून कधी निवृत्त होणार? राजीव शुक्ला स्पष्टच बोलले...
11
भाद्रपद महिन्यात गौरी, गणपती आणि पितृपक्षही; जाणून घ्या या मराठी महिन्याचे महत्त्व!
12
अखेर लग्नाच्या ३८ वर्षांनंतर गोविंदा आणि सुनीताचा होतोय घटस्फोट? चीचीचे वकील म्हणाले...
13
खिलाडी अन् अनाडी १६ वर्षांनंतर एकत्र येणार, अक्षय कुमार-सैफ अली खानच्या 'हैवान'चं शूट सुरु
14
काजोलच्या 'द ट्रायल' सीझन २ चा दमदार ट्रेलर पाहिलात का? सोनाली कुलकर्णीचीही मुख्य भूमिका
15
विराट-धोनी नव्हे, तर हा आहे जगातला सर्वात श्रीमंत क्रिकेटर; बघा टॉप-5 क्रिकेटर्सची लिस्ट...!
16
उपराष्ट्रपती निवडणूक २०२५: “पवार-ठाकरेंची भूमिका विरोधाभासी, राष्ट्रहितविरोधी”; भाजपाची टीका
17
कर्जाचं ओझं कमी करतेय अनिल अंबानींची कंपनी; आता २००० कोटी रुपयांत विकणार पुणे-सातारा टोल रोड प्रोजेक्ट
18
जगदीप धनखड नेमके आहेत तरी कुठे? ते सध्या काय करतात?; महत्त्वाची माहिती समोर आली, पत्ता लागला!
19
काळाचा घाला...! पाटण्यात भीषण अपघात, ट्रक-ऑटोच्या धडकेत गंगा स्नानासाठी जात असलेल्या ७ महिलांसह ८ जणांचा मृत्यू!
20
रात्रभर नोटा जाळल्या, तरीही पैसे संपले नाहीत; अधीक्षक अभियंता निघाला काळ्या धनाचा कुबेर!

दीड हजार तूर उत्पादकांची चौकशी

By admin | Updated: May 29, 2017 00:41 IST

जिल्ह्यातील तब्बल दीड हजार शेतकऱ्यांची आता चौकशी केली जाणार आहे. वाजवीपेक्षा जादा तूर विक्री केल्याचा ठपका

जादा विक्रीचा संशय : सहायक निबंधकांना कारवाईचे निर्देश रूपेश उत्तरवार। लोकमत न्यूज नेटवर्क यवतमाळ : जिल्ह्यातील तब्बल दीड हजार शेतकऱ्यांची आता चौकशी केली जाणार आहे. वाजवीपेक्षा जादा तूर विक्री केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. जिल्हा उपनिबंधकांनी अशा शेतकऱ्यांवर कारवाईचे निर्देश दिले आहे. जिल्ह्यात १५ शासकीय तूर खरेदी केंद्रांवर २२ एप्रिलपर्यंत तब्बल दोन लाख क्विंटल तुरीची खरेदी झाली. ही तूर शेतकऱ्यांची, की व्यापाऱ्यांची, याचा शोध घेण्याचे निर्देश राज्य शासनाने दिले होते. काही शेतकऱ्यांच्या नावे जादा तूर विकल्याचे आढळले होते. यात काही व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या सातबारावर आपली तूर विकल्याचे आढळले होते. त्यामुणे प्रभारी जिल्हा उपनिबंधक अर्चना माळवी यांनी सर्व सहाय्यक निबंधकांना चौकशीचे आदेश दिले. आता सर्व सहाय्यक निबंधकांनी जादा तूर विक्रीची चौकशी सुरू केली. यात २५ क्विंटलपेक्षा जादा अथवा शासकीय नियमांचे उल्लंघन करून तूर विक्री करणाऱ्या शेतकऱ्यांची यादी तयार करण्यात आली. प्रत्येक खरेदी केंद्राने अशा १०० शेतकऱ्यांची यादी सहाय्यक निबंधकांना सादर केली. १५ केंद्रांवरील या दीड हजार शेतकऱ्यांची आता चौकशी होणार आहे. यवतमाळ, दारव्हा व नेर केंद्राने शेतकऱ्यांना नोटीस बजावली आहे. पुसद आणि महागाव केंद्रावरील शेतकऱ्यांचे दस्तावेज तपासले जात असून नियमांचे उल्लंघन आढळल्यास शेतकऱ्यांवर थेट कारवाई होणार आहे. यामुळे ज्या शेतकऱ्यांच्या सातबारावर जादा तूर विक्री झाली, ते संकटात सापडणार आहे. निम्म्या शेतकऱ्यांची चौकशीला पाठ सहाय्यक निबंधकांनी या शेतकऱ्यांना नोटीस बजावून चौकशीकरिता हजर राहण्याचे निर्देश दिले. मात्र नोटीस मिळूनही धास्तीमुळे अनेक शेतकरी दस्तावेज घेऊन आलेच नाही. आता जे शेतकरी केंद्रात चौकशीला आले नाही, त्यांच्यावर संशय व्यक्त केला जात आहे. त्यांना फेरनोटीस बजावण्यात येणार आहे. यानंतरही शेतकरी न आल्यास उपलब्ध दस्तावेजानुसार त्यांच्यावर फौजदारीची कारवाई केली जाणार आहे. आम्हाला चोर समजता का ? नोटीस बजावल्यानंतर काही शेतक ऱ्यांनी लोकप्रतिनिधींकडे धाव घेतली. त्यांनी शेती व त्यात पिकविलेली तूर, याची माहिती त्यांना दिली. प्रचंड संतापलेल्या शेतकऱ्यांनी ‘आम्हाला चोर समजता का’, असा प्रश्न लोकप्रतिनिधींना विचारला. यामुळे आता लोकप्रतिनिधी सहाय्यक निबंधकांना धारेवर धरत आहेत. यामुळे पुढील काही दिवसात चौकशी प्रकरणात नवा पेच निर्माण होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.