शहरं
Join us  
Trending Stories
1
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
2
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
3
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
4
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
5
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
6
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
7
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
8
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
9
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
10
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
11
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
12
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
13
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
14
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
15
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
16
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
17
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
18
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
19
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
20
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
Daily Top 2Weekly Top 5

जुलैपर्यंत भूसंपादन पूर्ण करण्याचे निर्देश

By admin | Updated: May 28, 2017 00:43 IST

वर्धा-यवतमाळ-नांदेड या महत्त्वाकांक्षी रेल्वे प्रकल्पासाठी येत्या जुलै अखेरपर्यंत भूसंपादनाची सर्व प्रक्रिया पूर्ण करण्याचे निर्देश

वर्धा-यवतमाळ-नांदेड रेल्वे : शेतकऱ्यांच्या खात्यात ३३ कोटी जमा, पुसद उपविभागाला गती वाढविण्याच्या सूचना रूपेश उत्तरवार । लोकमत न्यूज नेटवर्क यवतमाळ : वर्धा-यवतमाळ-नांदेड या महत्त्वाकांक्षी रेल्वे प्रकल्पासाठी येत्या जुलै अखेरपर्यंत भूसंपादनाची सर्व प्रक्रिया पूर्ण करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले. आत्तापर्यंत भूसंपादनापोटी शेतकऱ्यांच्या खात्यात ३३ कोटी रुपये जमा केले आहे. वर्धा-यवतमाळ-नांदेड रेल्वे मार्गाच्या भूसंपादनाची प्रक्रिया वेगाने सुरू आहे. ही प्रक्रिया जून अखेरपर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह यांनी दिले. त्यामुळे प्रशासनाला पुढील ६५ दिवसांत ११०० हेक्टरची भूसंपादन प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे. त्यादृष्टीने ९१ गावांमध्ये युद्धपातळीवर काम सुरू आहे. जिल्ह्यात आत्तापर्यंत १० गावांमधील भूसंपादनाची प्रक्रिया पूर्ण झाली. सहा गावांतील भूसंपादनाची प्रक्रिया शेवटच्या टप्प्यात आहे. त्यासाठी दोन तालुक्यांना २०० कोटी रूपयांचा निधी लागणार आहे. आत्तापर्यंत शेतकऱ्यांना ३३ कोटींचे वितरण करण्यात आले. आता यवतमाळ तालुक्यातील पारवा, गोदनी, वडगाव, भोयर, बोथबोडन आणि तिवसा येथील भूसंपादनाची प्रक्रिया पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे. नवीन कायद्यानुसार ८० गावांतील भूसंपादन होणार आहे. यात दारव्हा, पुसद आणि उमरखेड उपविभागाचा समावेश आहे. तेथे भूसंपादन प्रक्रिया पूर्ण करून अवार्ड घोषित करणे व मोबदला देण्याची प्रक्रिया बाकी आहे. जलदगतीने दोन तालुक्यात १५ कोटी वाचले जलदगतीने जमीन भूसंपादित करून पैसे थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात येत असल्याने दोन तालुक्यात १५ कोटींचा निधी वाचला आहे. भूसंपादन प्रक्रिया करताना कुणालाही संशय आल्यास यवतमाळ एनआयसी डॉट ईनवर प्रसिद्ध केलेली माहती पाहता येणार आहे. ३६ किलोमीटरचा मार्ग मोकळा या रेल्वे मार्गासाठी ९१ गावांमधील ११०० हेक्टर जमीन भूसंपादित होणार आहे. त्यातील २१ गावांमध्ये अवार्ड घोषित करून ३४० शेतकऱ््यांची १७७ हेक्टर जमीन संपादित करण्यात आली. यामुळे ३६ किलोमीटरचा मार्ग मोकळा झाला आहे. वर्धा-यवतमाळ-नांदेड रेल्वे मार्गाकरिता भूसंपादनासाठी सर्वच विभागांची मदत घेतली जात आहे. पहिला टप्पा पूर्ण करण्यासाठी जुलै अखेरपर्यंत भूसंपादन प्रक्रिया पूर्ण करण्याचे निर्देश आहे. आमच्याकडून त्वरित काम पूर्ण करण्याची तयारी सुरू आहे. - सचिंद्र प्रताप सिंह, जिल्हाधिकारी ,यवतमाळ ज्या कामाला पूर्वी तीन वर्ष लागायचे, ते काम १० महिन्यात पूर्ण केले. तसेच पारदर्शक व लोकाभिमुख काम करण्यावर भर दिला. थेट गावांत जावून नागरिकांना प्रमाणपत्र आणि धनादेश दिले जात आहे. - विजय भाकरे, भूसंपादन अधिकारी, यवतमाळ