शहरं
Join us  
Trending Stories
1
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
2
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
3
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
4
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
5
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
6
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
7
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
8
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
9
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
10
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
11
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
12
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
13
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
14
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
15
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
16
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
17
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
18
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
19
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
20
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

जुलैपर्यंत भूसंपादन पूर्ण करण्याचे निर्देश

By admin | Updated: May 28, 2017 00:43 IST

वर्धा-यवतमाळ-नांदेड या महत्त्वाकांक्षी रेल्वे प्रकल्पासाठी येत्या जुलै अखेरपर्यंत भूसंपादनाची सर्व प्रक्रिया पूर्ण करण्याचे निर्देश

वर्धा-यवतमाळ-नांदेड रेल्वे : शेतकऱ्यांच्या खात्यात ३३ कोटी जमा, पुसद उपविभागाला गती वाढविण्याच्या सूचना रूपेश उत्तरवार । लोकमत न्यूज नेटवर्क यवतमाळ : वर्धा-यवतमाळ-नांदेड या महत्त्वाकांक्षी रेल्वे प्रकल्पासाठी येत्या जुलै अखेरपर्यंत भूसंपादनाची सर्व प्रक्रिया पूर्ण करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले. आत्तापर्यंत भूसंपादनापोटी शेतकऱ्यांच्या खात्यात ३३ कोटी रुपये जमा केले आहे. वर्धा-यवतमाळ-नांदेड रेल्वे मार्गाच्या भूसंपादनाची प्रक्रिया वेगाने सुरू आहे. ही प्रक्रिया जून अखेरपर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह यांनी दिले. त्यामुळे प्रशासनाला पुढील ६५ दिवसांत ११०० हेक्टरची भूसंपादन प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे. त्यादृष्टीने ९१ गावांमध्ये युद्धपातळीवर काम सुरू आहे. जिल्ह्यात आत्तापर्यंत १० गावांमधील भूसंपादनाची प्रक्रिया पूर्ण झाली. सहा गावांतील भूसंपादनाची प्रक्रिया शेवटच्या टप्प्यात आहे. त्यासाठी दोन तालुक्यांना २०० कोटी रूपयांचा निधी लागणार आहे. आत्तापर्यंत शेतकऱ्यांना ३३ कोटींचे वितरण करण्यात आले. आता यवतमाळ तालुक्यातील पारवा, गोदनी, वडगाव, भोयर, बोथबोडन आणि तिवसा येथील भूसंपादनाची प्रक्रिया पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे. नवीन कायद्यानुसार ८० गावांतील भूसंपादन होणार आहे. यात दारव्हा, पुसद आणि उमरखेड उपविभागाचा समावेश आहे. तेथे भूसंपादन प्रक्रिया पूर्ण करून अवार्ड घोषित करणे व मोबदला देण्याची प्रक्रिया बाकी आहे. जलदगतीने दोन तालुक्यात १५ कोटी वाचले जलदगतीने जमीन भूसंपादित करून पैसे थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात येत असल्याने दोन तालुक्यात १५ कोटींचा निधी वाचला आहे. भूसंपादन प्रक्रिया करताना कुणालाही संशय आल्यास यवतमाळ एनआयसी डॉट ईनवर प्रसिद्ध केलेली माहती पाहता येणार आहे. ३६ किलोमीटरचा मार्ग मोकळा या रेल्वे मार्गासाठी ९१ गावांमधील ११०० हेक्टर जमीन भूसंपादित होणार आहे. त्यातील २१ गावांमध्ये अवार्ड घोषित करून ३४० शेतकऱ््यांची १७७ हेक्टर जमीन संपादित करण्यात आली. यामुळे ३६ किलोमीटरचा मार्ग मोकळा झाला आहे. वर्धा-यवतमाळ-नांदेड रेल्वे मार्गाकरिता भूसंपादनासाठी सर्वच विभागांची मदत घेतली जात आहे. पहिला टप्पा पूर्ण करण्यासाठी जुलै अखेरपर्यंत भूसंपादन प्रक्रिया पूर्ण करण्याचे निर्देश आहे. आमच्याकडून त्वरित काम पूर्ण करण्याची तयारी सुरू आहे. - सचिंद्र प्रताप सिंह, जिल्हाधिकारी ,यवतमाळ ज्या कामाला पूर्वी तीन वर्ष लागायचे, ते काम १० महिन्यात पूर्ण केले. तसेच पारदर्शक व लोकाभिमुख काम करण्यावर भर दिला. थेट गावांत जावून नागरिकांना प्रमाणपत्र आणि धनादेश दिले जात आहे. - विजय भाकरे, भूसंपादन अधिकारी, यवतमाळ