शहरं
Join us  
Trending Stories
1
संतापजनक...! IAS अधिकाऱ्याची गाडी तपासली; गोव्याच्या एसपींनी पोलिसांनाच दिली उठाबशांची शिक्षा...
2
१९ तारखेला अत्यंत स्फोटक माहिती उघड होणार, ज्यानं भाजपा नेत्यांची फजिती होईल; संजय राऊतांचा दावा
3
महायुतीत एकनाथ शिंदेंची कोंडी; मुंबईत भाजपानं शिंदेसेनेला केवळ ५२ जागांचा दिला प्रस्ताव?
4
टीम इंडियाला मल्टीप्लेक्समध्ये पाहून सगळचे चकीत झाले...; मैदानातील सगळेच धुरंधर 'धुरंधर' पहायला गेलेले...
5
Crime: बुरखा न घातल्यानं पती संतापला, पत्नीसह पोटच्या २ मुलींना संपवलं; मृतदेह पुरले खड्ड्यात!
6
कोण आहे डोनाल्ड ट्रम्प यांची होणारी सून...! मंगळवारीच उरकला साखरपुडा, दोघे भारतातही येऊन गेलेले...
7
उद्धव-राज विरुद्ध भाजप-शिंदेसेना असाच सामना; १३८ मराठी बहुल मतदारसंघ या निवडणुकीत ठरणार निर्णायक
8
सरकार आणखी एका बँकेतील हिस्सा विकण्याच्या तयारीत; खात्यात येणार २१०० कोटी, सध्या आहे ९५% हिस्सा
9
'उद्याच्या तेजस्वी पहाटेसाठी!' रितेश देशमुखचा छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेतील पहिला लूक समोर
10
"महापालिका निवडणूक लुटण्याचे वाटे केले गेले"; अंजली दमानियांचा निशाणा, महायुतीवर भडकल्या
11
प्रसिद्ध दिग्दर्शक आणि पत्नीच्या हत्या प्रकरणाला नवं वळण, पोलिसांनी लेकालाच केली अटक
12
निवडणुका जाहीर होताच तापले युती अन् आघाडीचे राजकारण; महाराष्ट्रात काही ठिकाणी गणित बिघडणार
13
अमेरिकन शेअर बाजारात मोठा बदल! नॅस्डॅक २४ तास ट्रेडिंग सुरू करण्याच्या तयारीत; भारतीय गुंतवणूकदारांवर काय होणार परिणाम?
14
अमेरिकेत पॅलेस्टिनसह इतर ७ देशांतील नागरिकांना प्रवास बंदी; डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय
15
Stock Market Today: सुस्त सुरुवातीनंतर सेन्सेक्स-निफ्टीमध्ये किंचित वाढ; ICICI Bank, Nestle, HDFC Bank मध्ये घसरण
16
महालक्ष्मी व्रत उद्यापन: ४ गुरुवार नेटाने केलेल्या महालक्ष्मी व्रताचे १८ डिसेंबर रोजी उद्यापन कसे करावे? वाचा विधी
17
'१२ लाख सैनिकांची गरज काय? त्यांना दुसरे काम लावा'; पृथ्वीराज चव्हाण यांनी स्पष्टच सांगितलं
18
आई मंदिराबाहेर फुले विकायची...! आयपीएलने मुलाला बनविले 'करोडपती', वडील मैदानावर...
19
LIC ची कोणत्या कंपनीत किती गुंतवणूक? सरकारनं दिली महत्त्वाची माहिती; टाटा, रिलायन्स, अदानीसह कोणत्या कंपन्या?
20
अंबरनाथमध्ये भाजपाचे उमेदवार पवन वाळेकर यांच्या कार्यालयावर गोळीबार; घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा विकासासाठी नावीन्यपूर्ण आराखडा

By admin | Updated: September 14, 2015 02:37 IST

जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी नावीन्यपूर्ण बाबींच्या संकल्पनेचा आराखडा तयार करण्यात येणार आहे.

यवतमाळ : जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी नावीन्यपूर्ण बाबींच्या संकल्पनेचा आराखडा तयार करण्यात येणार आहे. त्यासाठी जिल्ह्यातील नागरिकांनी नवसंकल्पना सूचविण्याचे आवाहन जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह यांनी केले आहे. केंद्र शासनाच्या सूचनेप्रमाणे सदर आराखडा केला जात असून यासाठी जिल्हास्तरीय नाविन्यता परिषदेची स्थापनाही करण्यात आली आहे. या नवसंकल्पनांमध्ये कृषी, फलोत्पादन, स्वच्छता, सार्वजनिक आरोग्य, पाणी पुरवठा या मूलभूत बाबींसह दूरसंचार, पणन, जैव तंत्रज्ञान, पर्यावरण, सूक्ष्म तंत्रज्ञान, अपारंपरिक ऊर्जा तसेच लोककलांचे जतन आदींचा समावेश असणे आवश्यक आहे. यासोबतच जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबविण्यासाठीही नव्या सूचना व संकल्पना स्वीकारण्यात येणार आहे.जिल्हास्तरावरील सर्व विभागांकरिता ही परिषद मार्गदर्शक म्हणून एकछत्री भूमिका बजावणार आहे. जिल्ह्यातील गुणवत्ता, कला, उपक्रमशीलता, उद्योगशीलता, नैसर्गिक साधनसंपत्ती यांचा प्रभाविपणे वापरास प्रोत्साहन देतील. याशिवाय शाळा, महाविद्यालय, कारखाने, शिक्षण व संशोधन संस्था यांच्यात समन्वय साधून विद्यार्थी, तरूण, बुद्धिजीवी वर्गाला नव्या संकल्पनाचा शोध घेण्यासाठी प्रवृत्त करतील. चांगल्या संकल्पनांना पुरस्कार देण्यात येणार आहे. जिल्ह्यातील नागरिक, संस्था तसेच यंत्रणांनी आपल्या संकल्पना तथा प्रस्ताव जिल्हा उद्योग केंद्राच्या महाव्यवस्थापकामार्फत जिल्हा नियोजन अधिकारी कार्यालयास सादर करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा नावीन्यता परिषदेचे अध्यक्ष सचिंद्र प्रताप सिंह यांनी केले आहे. (स्थानिक प्रतिनिधी)