शहरं
Join us  
Trending Stories
1
निसर्ग कोपला! एका दिवसात ११ ठिकाणी ढगफुटी, पूर आणि भूस्खलन; हिमाचल प्रदेशात हाहाकार
2
गाझापट्टीत ६० दिवस युद्धविराम; अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांचा आणखी एक मोठा दावा
3
FD-RD विसरून जा, हा आहे LIC चा ‘अमृत’ प्लान; आयुष्यभर पडेल पैशांचा पाऊस, टेनशन संपेल
4
गोगावलेंवर भाजप आमदार भडकले; विधानभवनात परिसरात झाली शाब्दिक चकमक
5
"माझी डॉक्टर पत्नी पाकिस्तानची गुप्तहेर..."; व्यावसायिक पतीचा खळबळजनक दावा, तपास यंत्रणेकडे तक्रार
6
तीन महिन्यांत ७६७ शेतकरी आत्महत्या; मदत व पुनर्वसन मंत्र्यांची विधान परिषदेत कबुली
7
नाना पटोले अध्यक्षांकडे धावले; राजदंडाला हात लावला, निलंबित
8
Navi Mumbai: धक्कादायक! नवजात बाळाला प्रवाशांकडे सोडून जन्मदात्री गेली पळून, गुन्हा दाखल
9
२० हून अधिक गर्लफ्रेंड, १० जणींसोबत शारीरिक संबंध; पोलिसांच्या जाळ्यात अडकला 'बोगस पोलीस'
10
पंचतारांकित हॉटेलमध्ये नेऊन विद्यार्थ्याचं लैंगिक शोषण, प्रतिष्ठित शाळेतील शिक्षिका अटकेत  
11
आजचे राशीभविष्य- २ जुलै २०२५: 'या' राशीतील लोकांनी अवैध कृत्यांपासून दूर राहा, वाणीवर संयम ठेवा
12
मुलींचे लैंगिक शोषण; नराधमांना सोडणार नाही; बीड कोचिंग क्लास प्रकरणात एसआयटी
13
"मी ना तिचा बाप आहे ना बॉयफ्रेंड", 'त्या' अभिनेत्रीसोबतच्या नात्यावर आमिर खानची प्रतिक्रिया
14
"ब्लड टेस्ट करायला गेल्यावर १० मिनिटांनी.."; अंशुमन विचारेच्या पत्नीने सांगितला धक्कादायक अनुभव, काय घडलं?
15
शेतकऱ्यांना फसविले, विमा कंपन्या होणार ब्लॅक लिस्ट; कृषिमंत्री माणिकराव कोकाटेंची माहिती
16
‘ठाकरे ब्रँड’चे शनिवारी मेळाव्यानिमित्त शक्तिप्रदर्शन; राज-उद्धव वरळी डोममध्ये एकाच व्यासपीठावर
17
शालार्थ आयडी, ३ महिन्यांत होणार एसआयटी चौकशी, शिक्षणमंत्री दादा भुसेंची माहिती
18
कोण खरे बोलते आहे? आणि कोणाचे दावे झूठ आहेत?
19
कुंडमळा पुलाच्या बांधकामात दिरंगाई झाली; सार्वजनिक बांधकाममंत्री भोसले यांची कबुली
20
बाळासाहेब ठाकरे यांचे महापौर बंगल्यातच स्मारक; उच्च न्यायालयाने आव्हान याचिका फेटाळल्या

जिल्हा विकासासाठी नावीन्यपूर्ण आराखडा

By admin | Updated: September 14, 2015 02:37 IST

जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी नावीन्यपूर्ण बाबींच्या संकल्पनेचा आराखडा तयार करण्यात येणार आहे.

यवतमाळ : जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी नावीन्यपूर्ण बाबींच्या संकल्पनेचा आराखडा तयार करण्यात येणार आहे. त्यासाठी जिल्ह्यातील नागरिकांनी नवसंकल्पना सूचविण्याचे आवाहन जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह यांनी केले आहे. केंद्र शासनाच्या सूचनेप्रमाणे सदर आराखडा केला जात असून यासाठी जिल्हास्तरीय नाविन्यता परिषदेची स्थापनाही करण्यात आली आहे. या नवसंकल्पनांमध्ये कृषी, फलोत्पादन, स्वच्छता, सार्वजनिक आरोग्य, पाणी पुरवठा या मूलभूत बाबींसह दूरसंचार, पणन, जैव तंत्रज्ञान, पर्यावरण, सूक्ष्म तंत्रज्ञान, अपारंपरिक ऊर्जा तसेच लोककलांचे जतन आदींचा समावेश असणे आवश्यक आहे. यासोबतच जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबविण्यासाठीही नव्या सूचना व संकल्पना स्वीकारण्यात येणार आहे.जिल्हास्तरावरील सर्व विभागांकरिता ही परिषद मार्गदर्शक म्हणून एकछत्री भूमिका बजावणार आहे. जिल्ह्यातील गुणवत्ता, कला, उपक्रमशीलता, उद्योगशीलता, नैसर्गिक साधनसंपत्ती यांचा प्रभाविपणे वापरास प्रोत्साहन देतील. याशिवाय शाळा, महाविद्यालय, कारखाने, शिक्षण व संशोधन संस्था यांच्यात समन्वय साधून विद्यार्थी, तरूण, बुद्धिजीवी वर्गाला नव्या संकल्पनाचा शोध घेण्यासाठी प्रवृत्त करतील. चांगल्या संकल्पनांना पुरस्कार देण्यात येणार आहे. जिल्ह्यातील नागरिक, संस्था तसेच यंत्रणांनी आपल्या संकल्पना तथा प्रस्ताव जिल्हा उद्योग केंद्राच्या महाव्यवस्थापकामार्फत जिल्हा नियोजन अधिकारी कार्यालयास सादर करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा नावीन्यता परिषदेचे अध्यक्ष सचिंद्र प्रताप सिंह यांनी केले आहे. (स्थानिक प्रतिनिधी)