शहरं
Join us  
Trending Stories
1
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
2
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
3
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
4
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
5
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
6
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
7
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
8
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
9
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
10
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
11
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
12
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
13
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
14
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
15
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
16
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला
17
"आम्हीही खूप काही बोलू शकतो, मी जर तिथे असतो तर..."; हस्तांदोलन प्रकरणावर शोएब अख्तर बरळला
18
अणुबॉम्बसारखा स्फोट! भर समुद्रात ज्वालामुखी उद्रेक; जीव वाचवण्यासाठी पर्यटकांची धावाधाव...
19
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
20
हैदराबाद गॅजेट टिकवणे सरकारची जबाबदारी, अन्यथा सरकारला सुट्टी नाही; मनोज जरांगेंचा इशारा

जिल्हा विकासासाठी नावीन्यपूर्ण आराखडा

By admin | Updated: September 14, 2015 02:37 IST

जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी नावीन्यपूर्ण बाबींच्या संकल्पनेचा आराखडा तयार करण्यात येणार आहे.

यवतमाळ : जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी नावीन्यपूर्ण बाबींच्या संकल्पनेचा आराखडा तयार करण्यात येणार आहे. त्यासाठी जिल्ह्यातील नागरिकांनी नवसंकल्पना सूचविण्याचे आवाहन जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह यांनी केले आहे. केंद्र शासनाच्या सूचनेप्रमाणे सदर आराखडा केला जात असून यासाठी जिल्हास्तरीय नाविन्यता परिषदेची स्थापनाही करण्यात आली आहे. या नवसंकल्पनांमध्ये कृषी, फलोत्पादन, स्वच्छता, सार्वजनिक आरोग्य, पाणी पुरवठा या मूलभूत बाबींसह दूरसंचार, पणन, जैव तंत्रज्ञान, पर्यावरण, सूक्ष्म तंत्रज्ञान, अपारंपरिक ऊर्जा तसेच लोककलांचे जतन आदींचा समावेश असणे आवश्यक आहे. यासोबतच जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबविण्यासाठीही नव्या सूचना व संकल्पना स्वीकारण्यात येणार आहे.जिल्हास्तरावरील सर्व विभागांकरिता ही परिषद मार्गदर्शक म्हणून एकछत्री भूमिका बजावणार आहे. जिल्ह्यातील गुणवत्ता, कला, उपक्रमशीलता, उद्योगशीलता, नैसर्गिक साधनसंपत्ती यांचा प्रभाविपणे वापरास प्रोत्साहन देतील. याशिवाय शाळा, महाविद्यालय, कारखाने, शिक्षण व संशोधन संस्था यांच्यात समन्वय साधून विद्यार्थी, तरूण, बुद्धिजीवी वर्गाला नव्या संकल्पनाचा शोध घेण्यासाठी प्रवृत्त करतील. चांगल्या संकल्पनांना पुरस्कार देण्यात येणार आहे. जिल्ह्यातील नागरिक, संस्था तसेच यंत्रणांनी आपल्या संकल्पना तथा प्रस्ताव जिल्हा उद्योग केंद्राच्या महाव्यवस्थापकामार्फत जिल्हा नियोजन अधिकारी कार्यालयास सादर करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा नावीन्यता परिषदेचे अध्यक्ष सचिंद्र प्रताप सिंह यांनी केले आहे. (स्थानिक प्रतिनिधी)