शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी यांचा सर्वात मोठा आरोप; मतचोरीचा पुरावा देत 'त्या' लोकांना थेट स्टेजवर बोलावले अन्...
2
'डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे अध्यक्ष, जगाचे सम्राट नाहीत, त्यांच्या चुकांची किंमत...'; ब्राझीलच्या राष्ट्रपतींनी सुनावले
3
अमेरिकेत ३० वर्षांपासून वास्तव्यास असलेल्या भारतीयाला ग्रीन कार्ड असूनही अटक, कुटुंबीय हताश! नेमकं प्रकरण काय?
4
पाकिस्तान-सौदी अरेबियात डील, भारताची पहिली प्रतिक्रिया; "आम्ही देशहिताचं रक्षण करण्यासाठी..."
5
'यानं' केवळ ३.७७ रुपयांप्रमाणे घेतलेले Urban Company चे शेअर्स, IPO उघताच त्याचे झाले ३९० कोटी
6
IND vs PAK: नीरज चोप्रा आज अर्शद नदीमशी भिडणार! भारत-पाकमध्ये आणखी एक 'हाय-व्होल्टेज' सामना
7
कर्नाटकमध्ये मतचोरीचा डाव काँग्रेसवरच उलटला, आमदार संशायाच्या भोवऱ्यात, हायकोर्टाने निकाल रद्द केला
8
'साप चावला' म्हणत कळवळला, वांद्रे-वरळी सी-लिंकवर गाडी थांबवली अन्...; मुंबईतल्या व्यापाऱ्याने उचलले टोकाचे पाऊल
9
"पल्लेदार वाक्य बोलणारी प्रिया शेवटच्या क्षणी...", अभिजीतची प्रतिक्रिया ऐकून डोळ्यात येईल पाणी
10
ऐकावं ते नवलच! डिजिटल फ्रेंडली भिकारी; ऑनलाईन मागतो भीक, काही मिनिटांत बक्कळ कमाई
11
दीड कोटींच्या जमिनीवर सगळ्यांचा डोळा; सावत्र भावांनी कट रचला, ८ लाख दिले तरी प्लॅन कसा फसला?
12
फक्त ५००० रुपयांच्या कर्जातून उभारले १३,५०० कोटींचे साम्राज्य! तुमच्या घरातही वापरली जाते 'ही' वस्तू
13
BAN vs AFG Live Streaming : अफगाणिस्तानसमोर मोठं चॅलेंज! लढत श्रीलंकेविरुद्ध अन् चितपट करायचंय बांगलादेशला! जाणून घ्या समीकरण
14
महामार्गावर अचानक भूस्खलन, पळाले म्हणून थोडक्यात वाचले भाजप खासदार; व्हिडीओ केला शेअर
15
पाकिस्तानवर कुणी हल्ला केल्यास तर 'हा' इस्लामिक देश थेट युद्धात उतरणार; काय आहे 'डिफेन्स डील'?
16
पहिल्याच प्रयत्नात नीरज पोहोचला अंतिम फेरीत; जागतिक अजिंक्यपद : सचिन यादवही ठरला पात्र
17
तासाभराचं नाट्य, बहिष्काराची धमकी, ६ ईमेल आणि..., पाकिस्तान असा आला वठणीवर, त्या बैठकीत काय घडलं?
18
१ रुपया द्या आणि एसी घ्या, नव्या GST दरांवर सुरू केलं बुकिंग; ग्राहकांना खेचण्यासाठी कंपन्यांमध्ये स्पर्धा
19
'स्पोर्टिंग क्लब'च्या निवडणुकीत शिंदेसेनेला शह देण्यासाठी झाली भाजपा-मनसे-उद्धवसेनेची युती
20
TVS Success Story: इंग्रजांसमोर हार मानली नाही, बँकेची नोकरी सोडून सायकल रिपेरिंगचं काम सुरू केलं; आज आहे ₹१,६६,२०० कोटींची कंपनी

टँकरच्या पाण्याने संसर्गाचे आजार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2018 00:13 IST

टँकरमधून घरोघरी पोहोचणाऱ्या पाण्यामुळे शहरातील अनेक वस्त्यांमध्ये संसर्गाचे आजार बळावत आहे. अंगावर पुरळ, खाज आणि लालचट्टे दिसत असून नाईलाजाने टँकरचे पाणी .....

ठळक मुद्देपाणी टंचाईचा परिणाम : अंगावर पुरळ, खाज, लालचट्टे, पचनाचे आजार, उलट्या आणि हगवण

सुरेंद्र राऊत।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : टँकरमधून घरोघरी पोहोचणाऱ्या पाण्यामुळे शहरातील अनेक वस्त्यांमध्ये संसर्गाचे आजार बळावत आहे. अंगावर पुरळ, खाज आणि लालचट्टे दिसत असून नाईलाजाने टँकरचे पाणी प्राशन केल्याने पचनाचे विकार आणि जलजन्य आजाराची भीती निर्माण झाली आहे. टँकरचे पाणी तापवूनच वापरण्याचा सल्ला त्वचारोग तज्ज्ञांनी दिला आहे.यवतमाळ शहरात भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. महिनाभरानंतर येणाºया नळामुळे प्रत्येकालाच टँकरचे पाणी वापरावे लागत आहे. शहरातील जलस्रोत आटल्याने सांडपाण्याच्या नाल्यावरील विहिरींचे थेट पाणी टँकरमध्ये भरुन वितरित केले जाते. या विहिरींची निर्जंतुकीकरण न करताच पाणी वितरित होत आहे. परिणामी अनेक वस्त्यांमध्ये अ‍ॅलर्जिक आणि त्वचेच्या संसर्गाचे आजार बळावत आहेत.शहरातील वंजारीफैल, गवळीपुरा, शास्त्रीनगर, विठ्ठलवाडी, इंदिरानगर, पिंपळगाव या परिसरात नागरिकांना पुरळ, खाज, चट्टे झाल्याच्या तक्रारी वाढत आहे. अनेक भागात टँकरचे पाणी पिण्यासाठी वापरावे लागते. त्यामुळे जलजन्य आजाराची भीती निर्माण झाली आहे. यातून पचनाचे विकार जडले असून अनेकांना पाणी पिल्यानंतर मळमळ, उलट्या आणि हगवणीचा त्रास होत आहे.टँकरद्वारे येणाºया पाण्याला उग्र वास येतो. अनेक टँकरमधील पाणी हिरव्या रंगाचे असते. घरी पाणी साठविल्यानंतर दोन-तीन दिवसातच त्यात चामडोक पडतात. अनेक ठिकाणी तर साठविलेल्या पाण्यात शेपटी असलेल्या अळ्याही आढळून येतात. हेच पाणी आंघोळीसाठी आणि कपडे धुण्यासाठी वापरले जाते. त्यातून आजार पसरत आहेत.शहराच्या विविध भागातील नागरिकांकडून सातत्याने संसर्गजन्य आजार होत असल्याचे सांगितले जात आहे. वास्तविक टँकरमध्ये पाणी भरताना ते शुद्ध असते असे सांगितले जाते. मात्र टँकर वेळोवेळी साफ केले जात नसल्याने शुद्ध पाणीही त्यात दूषित होते. यातूनच नागरिकांना संसर्गजन्य आजार बळावत असल्याचे दिसून येते. यावर तातडीने उपाययोजना करण्याची गरज आहे.पाणी उकळूनच वापराटँकरद्वारे आलेले पाणी दूषित असल्यास वापरण्यापूर्वी ते उकळून घेणे गरजेचे आहे. पाणी तापविल्याने त्यातील बुरशी आणि जलजन्य आजाराला कारणीभूत ठरणारे घटक नाहीसे होतात. दररोज पाण्याचा वापर करण्यापूर्वी पाणी तापविणे शक्य नसल्यास काही काळ ते उन्हात गरम केल्यानंतर त्याचा वापर करावा. टँकरच्या पाण्याने धुतलेले कपडे कडक उन्हात वाळू द्यावे. यामुळे संसर्गाचा धोका पूर्णत: कमी करता येऊ शकतो.वापराचे व पिण्याच्या पाण्याचे एकच टँकरपाणी वितरणासाठी टँकर लावले असून पिण्याच्या पाण्यासाठी स्वतंत्र टँकरची व्यवस्था कुठेही दिसत नाही. वापराचे पाणी वितरण करणाºया टँकरमधूनच पिण्याचे पाणीही दिले जाते. यामुळे शुद्ध असलेले पिण्याचे पाणी अशुद्ध टँकरमध्ये सोडताच दूषित होते. यातूनही जलजन्य आजाराचा धोका निर्माण झाला आहे.