शहरं
Join us  
Trending Stories
1
Raigad Boat Accident: मोठी बातमी! रायगडच्या समुद्रात मासेमारी बोट बुडाली, बचाव कार्य सुरू; व्हिडीओ व्हायरल
2
१२%, २८% चा GST स्लॅब संपवण्याचा प्रस्ताव राज्यांच्या अर्थमंत्र्यांच्या गटानं स्वीकारला, सामान्यांना मिळणार मोठा दिलासा
3
रशियाची सर्वात शक्तिशाली युद्धनौका S-400 बटालियनसह समुद्रात दाखल, पुतिन काय करतायत..?
4
Video: कुत्रा येणाऱ्या-जाणाऱ्यांवर सतत भुंकायचा; टोळक्याने मालकालाच लाठ्या-काठ्यांनी बेदम चोपले...
5
नशीब असावं तर असं! पावसापासून वाचण्यासाठी दुकानात शिरली, काही वेळाने करोडपती बनून बाहेर आली
6
जिम सोडा अन् ब्रॉन्को टेस्टवर फोकस करा! टीम इंडियातील खेळाडूंना जपावा लागणार फिटनेसचा नवा 'मंत्र'
7
आरोग्य विमा आणि गंभीर आजार विम्यात काय आहे फरक? अनेकजण इन्शुरन्स घेताना करतात चूक!
8
रोज मृत्यूची भीती, तरीही खचली नाही सौंदर्यवती! कोण आहे Nadeen Ayoub? तिच्या नावाची चर्चा का?
9
श्वेताची विवाहित प्रियकरानेच केली हत्या; फिरायला घेऊन गेला आणि कार घातली तलावात, दोघांमध्ये काय बिनसलं होतं?
10
आर्यन खानच्या 'बॅड्स ऑफ बॉलिवूड'मधून प्रसिद्ध खलनायकाचं कमबॅक, लूक पाहून खूश झाले चाहते
11
BEST Election Results 2025: उद्धवसेना-मनसे युतीचा २१-० ने पराभव; राज ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया आली
12
जीएसटी कपातीनंतरही कारवर जादा कर लागू शकतो...; सीएने केले विश्लेषण...
13
१० हजार रुपयांत भारतीय जपानमध्ये काय काय करू शकतात? रुपयाची जपानी किंमत किती?
14
दोन वर्षाच्या मुलीसह अख्ख कुटुंब मृतावस्थेत आढळल्याने खळबळ; ५ जणांसोबत नेमकं काय घडलं? 
15
अभिनेत्रीला अश्लील मेसेज करणारा तो युवा नेता कोण? समोर आली धक्कादायक माहिती, राष्ट्रीय पक्षाशी संबंध 
16
4 वर्षांत तीन वेळा प्रेग्नंट, तुरुंगवासाची शिक्षा टाळण्यासाठी महिलेने भलताच मार्ग अवलंबला...! जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
17
Mumbai Crime: 'तुझ्या अंगात भूत आहे', पुजेला बोलावलं आणि ३२ वर्षीय महिलेवर मांत्रिकाने केला बलात्कार
18
श्रावण अमावस्येला पिठोरी अमावस्या का म्हणतात? त्याच दिवशी असतो पोळा आणि मातृदिन
19
राज ठाकरे शिवतीर्थावर परतताच CM देवेंद्र फडणवीसांनी केला उद्धव ठाकरेंना फोन; नेमके कारण काय?
20
रामललांच्या भक्तांना दिवाळीपूर्वीच मिळणार खास गिफ्ट! राम मंदिर ट्रस्ट देणार विशेष भेट, जाणून घ्या सविस्तर

जिल्हा परिषदेसाठी रंगतदार लढतींचे संकेत

By admin | Updated: January 22, 2017 00:04 IST

जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत रंगतदार लढतीचे संकेत मिळत आहे.

निवडणूक : बसपा, एमआयएम, मनसे, विदर्भवादीही रिंगणात यवतमाळ : जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत रंगतदार लढतीचे संकेत मिळत आहे. या निवडणुकीत आघाडी होण्याची कुणकुण सुरू असून युती मात्र दुभंगलेलीच राहणार आहे. जिल्हा परिषदेवरील वर्चस्वासाठी सर्वच पक्षांनी कंबर कसली आहे. आत्तापर्यंत अपवाद वगळता जिल्हा परिषद व पंचायत समितीवर काँग्रेस आणि राष्ट्रवादीचेच वर्चस्व कायम आहे. हे वर्चस्व मोडीत काढण्यासाठी राज्यस्तरावर भाजपा आणि शिवसेनेत युती होण्याची शक्यता वर्तविली जात होती. मात्र या दोन्ही पक्षांनी युतीचे पर्याय स्थानिक स्तरावर बहाल केल्याने ती शक्यता संपुष्टात आली आहे. युतीची शक्यता दुरावली असताना काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आघाडीची शक्यता व्यक्त केली जात आहे. या संदर्भात प्राथमिक चर्चा झाली असून वरिष्ठांच्या अंतिम निर्णयानंतर त्यावर शिक्कामोर्तब केले जाणार असल्याची चर्चा आहे. या आघाडीमुळे भाजप व शिवसेनेसमोर तगडे आव्हान उभे राहणार आहे. त्यातच भाजप आणि शिवसेनेत पालकमंत्री पदावरून वितुष्ट झाल्याने भाजपाला ही निवडणूक अत्यंत जड जाण्याची शक्यता वर्तविली जात आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजप आणि शिवसेना या चार प्रमुख पक्षांशिवाय मनसे, एमआयएम, बसपा, विदर्भवादी संघटना आदींचे उमेदवार निवडणूक रिंगणात उतरणार आहे. परिणामी ही निवडणूक यावेळी प्रथमच रंगतदार होण्याची शक्यता आहे. काँग्रेस व राष्ट्रवादीची आघाडी झाल्यास चौरंगी, तर आघाडी न झाल्यास पंचरंगी लढती होण्याचे संकेत आहे. काही ठिकाणी तगडे अपक्षही या पक्षांना जोरदार टक्कर देण्याची शक्यता आहे. (शहर प्रतिनिधी) कळंब : भाजपा, काँग्रेस की स्वतंत्र ? कळंब तालुक्यातील राष्ट्रवादीचे काही पदाधिकारी काँग्रेसच्या वाटेवर असल्याचे सांगितले जाते. दुसरीकडे दिग्रस तालुक्यातील मातब्बर काँग्रेस पदाधिकारी भाजपाच्या वाटेवर असल्याचे बोलले जाते. राळेगाव तालुक्यात काँग्रेसमध्ये सरळसरळ दोन गट पडले. जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षांच्या गटाने पक्ष मुलाखतींना हजेरी लावल्याने ही बाब उघड झाली. एकूणच उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या तारखेपर्यंत जवळपास सर्व पक्षातील पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्या पक्षांतराला आणखी वेग येण्याची शक्यता आहे.