शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदींची डिग्री सार्वजनिक होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द
2
फडणवीसांबद्दल अपशब्द वापरल्यास जीभ हासडून हातात देऊ; मंत्री नितेश राणेंचा मनोज जरांगेंना इशारा
3
पाकिस्तान हेरगिरी प्रकरणी यूट्यूबर ज्योती मल्होत्राला केलं कोर्टात हजर; ९५ दिवसांनी तुरुंगाबाहेर!
4
ईडीने छापा टाकला,आमदार भिंतीवरून उडी मारून पळून गेले, फोनही नाल्यात फेकला; अधिकाऱ्यांनी केली अटक
5
Shakib Al Hasan World Record : ५०० विकेट्स अन् ७००० धावा! पठ्ठ्यानं वर्ल्ड रेकॉर्डसह केली हवा
6
वडील सोडून गेले, चारित्र्यावर झाली चिखलफेक, जीवे मारण्याच्या धमक्या; अभिनेत्रीने केला संघर्ष
7
Hartalika Teeja 2025: हरितालिका व्रत केल्याने केवळ सौभाग्य नाही, तर 'हे'देखील लाभ होतात!
8
TCS-इन्फोसिस ठरले हिरो! आयटी शेअर्समुळे बाजारात तेजी; निफ्टी-सेन्सेक्सही वधारले; पण, 'या' क्षेत्रात दबाव
9
Mumbai Crime: मरीन ड्राईव्हच्या समुद्रात आढळला तरुणीचा मृतदेह; चेहऱ्यावर जखमा
10
"तीच लोक डोक्यावर पाय देऊन गद्दारांच्या टोळीत सामील झाले"; मनसे नेते राजू पाटलांना संताप अनावर
11
५ वर्षात १ लाख रुपयांचे झाले १९ लाख! डिफेन्स शेअरची जोरदार उसळी, ६ महिन्यांत १००% परतावा!
12
स्मशानभूमीला पाणीपट्टीचे बिल पाठवले, १० टक्के सवलतही दिली; महापालिकेचा अजब पराक्रम!
13
जगदीप धनखड नजरकैदेत? अमित शाहांच्या उत्तरावर जयराम रमेश यांची टीका; म्हणाले- 'रहस्य...'
14
'माय फ्रेंड गणेशा' मधला छोटासा मुलगा आता आहे प्रसिद्ध अभिनेत्री, पाहा कशी दिसते? (Photos)
15
Jio IPO ची प्रतीक्षा आता संपणार! शुक्रवारी मुकेश अंबानी देणार सरप्राईज?
16
व्हिएतनाममधील ५.८ लाख लोकांना आपली घरं सोडावी लागणार! नेमकं कारण तरी काय?
17
'एकीला पाठवून आता पश्चात्ताप करतोय, आता दुसरीला त्यांच्याकडे...'; लेकीच्या आठवणीने निक्कीची आईला अश्रू अनावर!
18
तुमच्याकडेही SBI क्रेडिट कार्ड आहे का? आता 'हे' फायदे कायमचे बंद, १ सप्टेंबरपासून नवा नियम लागू
19
तेल व्यवसायाचा King! अमेरिका पाहत राहिला..; भारताने जगाला विकले ५.३५ लाख कोटींचे तेल
20
शाहरुखसोबत अनेक वर्षांनी मिटला वाद, आता सनी देओलने किंग खानच्या लेकाची केली स्तुती

कौशल्य विकास व उद्योजकता विभागाची स्वतंत्र निर्मिती

By admin | Updated: January 27, 2015 23:41 IST

रोजगाराबाबत बदलत्या आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय परिस्थितीत कौशल्य विकास व उद्योजकतेस प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने राज्य शासनाने केंद्र सरकारच्या धर्तीवर स्वतंत्र कौशल्य विकास व उद्योजकता

नीलेश भगत - यवतमाळरोजगाराबाबत बदलत्या आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय परिस्थितीत कौशल्य विकास व उद्योजकतेस प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने राज्य शासनाने केंद्र सरकारच्या धर्तीवर स्वतंत्र कौशल्य विकास व उद्योजकता विभागाची निर्मिती केली आहे. १९९७ पासून कार्यरत असलेला रोजगार व स्वयंरोजगार विभाग (एम्प्लॉयमेंट) आता ‘कौशल्य विकास व उद्योजकता विभाग’ या नावाने ओळखला जाणार आहे. या विभागासाठी आयएएस दर्जाच्या स्वतंत्र प्रधान सचिवपदाचीही निर्मिती करण्यात आली आहे.जिल्हास्तरावर पूर्वी एम्प्लॉयमेंट आॅफीसमध्ये दहावी, बारावी झाल्याबरोबर सुशिक्षित बेरोजगार नोंदणी करीत. त्यानंतर सदर कार्यालय त्यांच्या शैक्षणिक योग्यतेनुसार पात्र पदासाठी संबंधित कार्यालयात मुलाखतीसाठी पत्र पाठवित. सर्वच पदासाठी एम्प्लॉयमेंट आॅफीसमधूनच मुलाखतींचे पत्र निघत असल्याने या कार्यालयाचे वेगळेच महत्त्व होते. पुढे मुलाखतीचे पत्र पाठविण्याचा अधिकार कमी झाल्याने या कार्यालयाकडे केवळ शैक्षणिक अर्हता नोंदणीचे कार्यालय म्हणून पाहण्यात येऊ लागले. १९९७ मध्ये मात्र स्वतंत्र मंत्रालयीन विभागांतर्गत रोजगारासोबत स्वयंरोजगार विभाग जोडून रोजगार व स्वयंरोजगार मार्गदर्शन केंद्राची निर्मिती करण्यात आली.सुशिक्षित बेरोजगारांची नोंदणी करणे, त्यांना सेवा संस्थेच्या माध्यमातून स्वयंरोजगार उपलब्ध करून देणे, त्यासाठी आर्थिक विभाग महामंडळातून आर्थिक सहाय्य करणे, ग्रंथालय, प्रशिक्षण, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन इत्यादी अनेक कामे या विभागाकडे आले. सहा-आठ महिन्यापूर्वी केंद्रात आलेल्या सरकारने युवकांकडे विशेषत: सुशिक्षित बेरोजगारांकडे प्रभावीपणे लक्ष दिले. आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय स्तरावर रोजगाराबाबत युवकांच्या कौशल्य विकासावर अधिक भर देण्याच्या उद्देशाने केंद्र शासनाने ‘कौशल्य विकास व उद्योजकता’ या स्वतंत्र मंत्रालयाची निर्मिती केली.राज्य शासनाने देखील केंद्र शासनाच्या धर्तीवर स्वतंत्र कौशल्य विकास व उद्योजकता विभाग निर्माण करावा या उद्देशाने रोजगार व स्वयंरोजगार विभागाचे नामकरण कौशल्य विकास व उद्योजकता विभाग असे केले. नवीन विभागामार्फत कुशल मनुष्यबळ उपलब्ध करून विविध विभागात परिणामकारक समन्वय साधता यावा यासाठी प्रधान सचिव श्रेणीतील एक पद नव्याने निर्माण करण्याचा व त्या पदावर भारतीय प्रशासन सेवेतील अधिकाऱ्याची नियुक्ती करण्याचा देखील शासनाने निर्णय घेतला आहे. या निर्णयाने पूर्वीचे रोजगार विभाग नव्या स्वरूपात अधिक कार्यक्षम व परिणामकारक होईल. याबाबतचा अध्यादेश शासनाने १५ जानेवारी २०१५ रोजी निर्गमित केला आहे.