शहरं
Join us  
Trending Stories
1
स्टार फुटबॉलर लिओ मेस्सी पोहोचला 'वनतारा'मध्ये; केली महाआरती, वन्य प्राण्यांमध्येही रमला!
2
मेस्सीची 'वनतारा भेट'! महाआरती, शिवाभिषेक, बाप्पाचरणी नतमस्तक अन् वाघ-सिंहाशी धमाल (Photos)
3
IPL 2026 Auction: पृथ्वी शॉने लिलाव सुरू असताना केलेली मोठी चूक, नंतर करावं लागलं 'हे' काम
4
नागपुरात भाजपमध्ये उमेदवारीसाठी तोबा गर्दी, मुलाखतीच्या वेळापत्रकात करावा लागला बदल
5
VIDEO : अनसोल्ड परदेशी खेळाडूसाठी काव्या मारननं पर्समधून १३ कोटी काढले; संजीव गोएंका बघतच राहिले!
6
Aadhaar New Rules : आधार फेस ऑथेंटिकेशन म्हणजे काय? केंद्र सरकार नवीन नियम लागू करणार
7
पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दोन वेळा 'अनसोल्ड' राहिल्यावर शेवटी जुन्या मालकानेच दाखवला भरवसा
8
स्मृतिभ्रंशाने त्रस्त असलेल्या महिलेचा क्रिकेटपटू सलीम दुराणी यांची पत्नी असल्याचा दावा
9
"पंतप्रधान मोदींना दोन गोष्टींचा अत्यंत तिरस्कार, एक गांधींचे विचार अन् दुसरे...!"; राहुल गांधींचा हल्लाबोल
10
पतसंस्था अध्यक्षाला ग्राहक आयोगाने सुनावली दोन वर्षांच्या कारावास, दंडाची शिक्षा
11
विरार हत्याकांड प्रकरण: कुख्यात गुंड सुभाषसिंह ठाकूर याला ७ दिवसांची पोलीस कोठडी
12
मुंबईकर सरफराज खानला मोठा दिलासा! IPL च्या आगामी हंगामात पगारवाढीसह चेन्नईकडून उतरणार मैदानात
13
रोजगार क्षेत्रातून दिलासादायक बातमी; बेरोजगारी 9 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर
14
IPL Auction 2026 : काव्या मारन vs आकाश अंबानी यांच्यात जुगलबंदी; त्यात अनकॅप्ड खेळाडू झाला 'करोडपती'
15
धक्कादायक! विमानतळावर भुताटकी, प्रवाशांना त्रास देते एक रहस्यमय सावली, प्रवाशांचा दावा
16
IPL 2026 Auction: 'त्या' खेळाडूविषयी मनात आदरच..; आकाश अंबानींनी सांगितली पडद्यामागची गोष्ट
17
Harsimrat Kaur Badal : "सरकार गरिबांच्या पोटावर लाथा मारतंय...", मनरेगावरून हरसिमरत कौर यांचा जोरदार हल्लाबोल
18
पीएम मोदींना दोन गोष्टींची खूप चीड; 'जी राम जी' विधेयकावरुन राहुल गांधींची टीका
19
कोण आहे Prashant Veer? MS धोनीसोबत खेळण्याचं स्वप्न पाहणाऱ्या खेळाडूवर CSK नं लावली विक्रमी बोली
Daily Top 2Weekly Top 5

कौशल्य विकास व उद्योजकता विभागाची स्वतंत्र निर्मिती

By admin | Updated: January 27, 2015 23:41 IST

रोजगाराबाबत बदलत्या आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय परिस्थितीत कौशल्य विकास व उद्योजकतेस प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने राज्य शासनाने केंद्र सरकारच्या धर्तीवर स्वतंत्र कौशल्य विकास व उद्योजकता

नीलेश भगत - यवतमाळरोजगाराबाबत बदलत्या आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय परिस्थितीत कौशल्य विकास व उद्योजकतेस प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने राज्य शासनाने केंद्र सरकारच्या धर्तीवर स्वतंत्र कौशल्य विकास व उद्योजकता विभागाची निर्मिती केली आहे. १९९७ पासून कार्यरत असलेला रोजगार व स्वयंरोजगार विभाग (एम्प्लॉयमेंट) आता ‘कौशल्य विकास व उद्योजकता विभाग’ या नावाने ओळखला जाणार आहे. या विभागासाठी आयएएस दर्जाच्या स्वतंत्र प्रधान सचिवपदाचीही निर्मिती करण्यात आली आहे.जिल्हास्तरावर पूर्वी एम्प्लॉयमेंट आॅफीसमध्ये दहावी, बारावी झाल्याबरोबर सुशिक्षित बेरोजगार नोंदणी करीत. त्यानंतर सदर कार्यालय त्यांच्या शैक्षणिक योग्यतेनुसार पात्र पदासाठी संबंधित कार्यालयात मुलाखतीसाठी पत्र पाठवित. सर्वच पदासाठी एम्प्लॉयमेंट आॅफीसमधूनच मुलाखतींचे पत्र निघत असल्याने या कार्यालयाचे वेगळेच महत्त्व होते. पुढे मुलाखतीचे पत्र पाठविण्याचा अधिकार कमी झाल्याने या कार्यालयाकडे केवळ शैक्षणिक अर्हता नोंदणीचे कार्यालय म्हणून पाहण्यात येऊ लागले. १९९७ मध्ये मात्र स्वतंत्र मंत्रालयीन विभागांतर्गत रोजगारासोबत स्वयंरोजगार विभाग जोडून रोजगार व स्वयंरोजगार मार्गदर्शन केंद्राची निर्मिती करण्यात आली.सुशिक्षित बेरोजगारांची नोंदणी करणे, त्यांना सेवा संस्थेच्या माध्यमातून स्वयंरोजगार उपलब्ध करून देणे, त्यासाठी आर्थिक विभाग महामंडळातून आर्थिक सहाय्य करणे, ग्रंथालय, प्रशिक्षण, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन इत्यादी अनेक कामे या विभागाकडे आले. सहा-आठ महिन्यापूर्वी केंद्रात आलेल्या सरकारने युवकांकडे विशेषत: सुशिक्षित बेरोजगारांकडे प्रभावीपणे लक्ष दिले. आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय स्तरावर रोजगाराबाबत युवकांच्या कौशल्य विकासावर अधिक भर देण्याच्या उद्देशाने केंद्र शासनाने ‘कौशल्य विकास व उद्योजकता’ या स्वतंत्र मंत्रालयाची निर्मिती केली.राज्य शासनाने देखील केंद्र शासनाच्या धर्तीवर स्वतंत्र कौशल्य विकास व उद्योजकता विभाग निर्माण करावा या उद्देशाने रोजगार व स्वयंरोजगार विभागाचे नामकरण कौशल्य विकास व उद्योजकता विभाग असे केले. नवीन विभागामार्फत कुशल मनुष्यबळ उपलब्ध करून विविध विभागात परिणामकारक समन्वय साधता यावा यासाठी प्रधान सचिव श्रेणीतील एक पद नव्याने निर्माण करण्याचा व त्या पदावर भारतीय प्रशासन सेवेतील अधिकाऱ्याची नियुक्ती करण्याचा देखील शासनाने निर्णय घेतला आहे. या निर्णयाने पूर्वीचे रोजगार विभाग नव्या स्वरूपात अधिक कार्यक्षम व परिणामकारक होईल. याबाबतचा अध्यादेश शासनाने १५ जानेवारी २०१५ रोजी निर्गमित केला आहे.