शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीत 'आप'ला मोठा धक्का; १५ नगरसेवकांनी दिला राजीनामा, नवा पक्ष स्थापन करण्याची घोषणा
2
"कुठल्याही थेट युद्धातल्या विजयापेक्षा..."; एकनाथ शिंदेंनी केलं PM नरेंद्र मोदींचं कौतुक
3
Virat Kohli: विराट कोहलीची जर्सी खरेदी करण्यासाठी चिन्नास्वामी स्टेडियमबाहेर चाहत्यांची झुंबड, व्हिडीओ होतोय व्हायरल!
4
पाकिस्तानविरुद्धच्या संघर्षादरम्यान या पिल्लांना सरकारने दिली झेड प्लस सुरक्षा, ७०० किमी दूर केली रवानगी
5
कॅन्सरसोबत झुंज ठरली अपयशी! ४४ वर्षीय प्रसिद्ध गायिकेचं निधन, चाहत्यांनी व्यक्त केली हळहळ
6
अरे बापरे! एका छोट्याशा चुकीमुळे होऊ शकतो प्रेशर कुकरचा भीषण स्फोट; सेफ्टीसाठी 'हे' करा
7
भारतीय सैन्याची मोठी तयारी!६ जण ठार, ११ जणांच्या खात्म्यासाठी ऑपरेशन; लष्कर -जैश'च्या दहशतवाद्यांचा शोध सुरू
8
Astro Tips: मुलांची दहावी, बारावी झाली की पालकांनी ग्रहदशा जाणून घेत मुलांचे करिअर ठरवणे उत्तम!
9
आयकर अधिकारी सांगून छगन भुजबळ यांच्याकडे मागितली एक कोटीची खंडणी; युवक अटकेत
10
पंख्याच्या हवेवरून वरातीत पेटला वाद, लाठ्या-काठ्या, दगड धोंडे घेऊन तुंबळ हाणामारी, एकाचा मृत्यू  
11
पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याचा आरोप, प्रसिद्ध युट्युबर ज्योती मल्होत्रा हिच्यासह सहा जण अटकेत
12
वेळीच व्हा सावध! टूथपेस्टमुळे होऊ शकतो कॅन्सर; 'हे' केमिकल बेतेल जीवावर, आताच घ्या काळजी
13
गुन्हेगारांना पकडण्यासाठी कालव्यात मारली उडी; तेव्हाच पडली विजेची तार, कॉन्स्टेबलचा मृत्यू
14
केंद्राच्या सर्वपक्षीय शिष्टमंडळात शशी थरूर यांचं नाव पाहून काँग्रेस अवाक्, व्यक्त केली अशी प्रतिक्रिया
15
IPL 2025 अंतिम सामन्यावरून मोठा गोंधळ; BCCIच्या 'या' निर्णयावर चाहते संतापले, नेमकं काय घडलं?
16
जबरदस्त! कंपनी असावी तर अशी, नफा होताच बोनस म्हणून दिली ७ महिन्यांची दिली सॅलरी
17
पुणे IED केस: ISIS साठी काम करणाऱ्या दोन जणांना NIA ने विमानतळावरून केली अटक
18
मनाविरुद्ध काही झालं की संताप होतो, चिडचिड होते? रागावर नियंत्रण मिळवण्याच्या ६ टिप्स
19
भयानक! तरुणाची स्टंटबाजी, वेगाने कार चालवून ४ जणांना चिरडलं; थरकाप उडवणारा Video
20
"ओशो आश्रमात गेल्यावर बाबांनी.."; अक्षय खन्नाचा मोठा खुलासा, विनोद खन्नांविषयी काय म्हणाला?

आत्महत्येच्या प्रमाणात झाली वाढ

By admin | Updated: October 19, 2015 00:23 IST

तालुक्यात दिवसेंदिवस आत्महत्येचे प्रमाण वाढताना दिसत आहे. ही स्थिती अत्यंत गंभीर आहे. आत्महत्येचा विचार प्रथम मनात येत, ...

मानसोपचार यंत्रणा नाही : ग्रामीण रूग्णालयात समुपदेशन केंद्राची आवश्यकता विठ्ठल पाईलवार झरीतालुक्यात दिवसेंदिवस आत्महत्येचे प्रमाण वाढताना दिसत आहे. ही स्थिती अत्यंत गंभीर आहे. आत्महत्येचा विचार प्रथम मनात येत, मात्र यावर उपचाराची व्यवस्था ग्रामीण भागात कुठेही नाही.शारीरिक आजारावर उपचाराची व्यवस्था ग्रामीण स्तरापर्यंत पोहोचली आहे. मात्र मानसोपचार व्यवस्था शहरी भागातच व तीसुद्धा काही मोजक्याच ठिकाणी उपलब्ध आहे. धकाधकीच्या व स्पर्धेच्या युगात मानसिकदृष्ट्या निरोगी मनुष्य शोधून सापडणार नाही. शारीरिक आजार झाला तर, लगेच दवाखान्यात दाखविले जाते. चिंता, नैराश्य, अपराधीपणाची भावना, आत्मविश्वासाचा अभाव, बेकारी, कौटुंबिक कलह, वृद्धापकाळातील समस्या, प्रेमभंग यासारख्या अनेक समस्या या मानसिक आजारात मोडतात. मात्र समाजाचेही या बाबतीत सहकार्य लाभत नाही.आपणाकडे एखादी व्यक्ती वेडी झाल्याशिवाय तिला मानसिक रूग्ण म्हटले जात नाही. मात्र लाजाळूपणा, आर्थिक विकलांगता, अशा अनेक गोष्टीही मानसिक आजारात मोडतात. यावर पाहिजे त्या प्रमाणात समाज जागृकता झालेली नाही. सध्या अनेक गावात काही मनोरूग्ण, वेडी माणसे भटकताना दिसतात. त्यापैकी काही जण उपचाराने बरे होऊ शकतात. मात्र त्यासाठी कुणाकडेही वेळ नाही व सामाजिक भान नाही. अनेक नकारात्मक भावना व विचारांचे दमन, दीर्घकाळ झाल्यास त्या व्यक्तीच्या मनात आत्महत्येचे विचार घोळू लागतात. काही जण तसे पाऊलही उचलतात. तथापि, मूळ कारण मात्र बाजूलाच राहाते. सध्या ग्रामीण भागात मोठमोठे सरकारी दवाखाने उभारले जात आहे. त्यात एखाद्या मानसोपचार विभागाची व्यवस्था होणे गरजेचे आहे.झरीसारख्या भागात असा विभाग निर्माण करण्याची गरज आहे. यातून संकटांना तोंड देण्याची क्षमता त्या व्यक्तींमध्ये निर्माण केली जाऊ शकेल. सध्या योग्य रितीने जीवन जगण्यासाठी निरोगी मनाची गरज आहे. हा सर्व मानसशास्त्राचा भाग आहे. त्यावरील उपचाराची व्यवस्था जर ग्रामीण पातळीवर झाली, तर अनेकांचा वेळ व पैसा वाचेल. आत्महत्याही कमी करता येईल.