शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी शेवटी 'जय गुजरात' म्हणालो कारण..."; एकनाथ शिंदे यांनी दिलं स्पष्टीकरण; ठाकरेंनाही डिवचलं...
2
बेशुद्ध करणाऱ्या कोणत्याही स्प्रे चा वापर झाला नाही; कोंढवा अत्याचार प्रकरणात धक्कादायक खुलासा
3
DSP सिराजचा 'सिक्सर' अन् आकाश दीपचा 'चौकार'! इंग्लंडचा संघ ४०७ धावांवर All Out
4
कोंढवा बलात्कार प्रकरणात मोठा ट्विस्ट; ‘तो’ कुरिअर बॉय नसून तरुणीचा मित्र, अनेक धक्कादायक बाबी समोर
5
"कोण दुटप्पी? हे मराठी माणसाला लक्षात येतं...!"; ठाकरेंच्या विजयी मेळाव्यावर फडणवीसांची खरमरीत टीका, स्पष्टच बोलले
6
‘जय गुजरात’ म्हटलं म्हणजे शिंदेंचे महाराष्ट्रावरील प्रेम कमी झालं का? मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना सवाल
7
"देशाला दिशा देणाऱ्या महाराष्ट्रात वाढत्या शेतकरी आत्महत्या भूषणावह नाहीत"; काँग्रेसचे टीकास्त्र
8
देशाच्या आरोग्याचे बजेट ३७ हजार कोटींवरून १ लाख कोटींवर नेण्याचे काम पंतप्रधान मोदींनी केले - अमित शाह
9
“नोंदणीचा ‘एक टक्का’ निधी थेट स्थानिक स्वराज्य संस्थांना देण्याचा विचार”: चंद्रशेखर बावनकुळे
10
'पंत तूने क्या किया!' कॅच नव्हे त्यानं टीम इंडियाला टेन्शन फ्री करण्याची संधी सोडली
11
"ते नेमकं काय म्हणाले माहित नाही, मी..."; एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'वर अजित दादांची पहिली प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
12
नीचभंग दशांक योग: ८ राशींना पद-पैसा-लाभ, ४ ग्रहांची साथ; विठ्ठलाचे वरदान, शुभ-कल्याणच होईल!
13
‘जय गुजरात’वरून टीका; शिंदे गटाच्या नेत्यांनी उद्धव ठाकरेंचा ‘तो’ व्हिडिओच दाखवला, दिले उत्तर
14
महाराष्ट्रात मराठी शिकण्याचा आग्रह करू शकतो, पण दुराग्रह करू शकत नाही- CM देवेंद्र फडणवीस
15
स्लिपमध्ये कॅच घेताना अंदाज चुकला! ब्रूकनं मारलेला चेंडू थेट शुबमन गिलच्या डोक्याला लागला (VIDEO)
16
सोमनाथ सूर्यवंशी कोठडीतील मृत्यू प्रकरण; पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे न्यायालयाचे आदेश
17
'देशांतर्गत बाबींमध्ये हस्तक्षेप करू नका', भारताने दलाई लामांना पाठिंबा दिल्याने चीन संतापला
18
भारताचा बुद्धीबळपटू डी. गुकेशचा मोठा पराक्रम; वर्ल्ड नंबर वन कार्लसनची जिरवली!
19
मथुरा श्रीकृष्ण जन्मभूमी प्रकरण: हिंदू पक्षाला झटका, शाही ईदगाहला वादग्रस्त ढाचा घोषित करण्याची मागणी HC नं फेटाळली
20
ENG vs IND : जलद शतकी खेळीसह Jamie Smith चा पराक्रम! १४८ वर्षांत असं पहिल्यांदा घडलं

आत्महत्येच्या प्रमाणात झाली वाढ

By admin | Updated: October 19, 2015 00:23 IST

तालुक्यात दिवसेंदिवस आत्महत्येचे प्रमाण वाढताना दिसत आहे. ही स्थिती अत्यंत गंभीर आहे. आत्महत्येचा विचार प्रथम मनात येत, ...

मानसोपचार यंत्रणा नाही : ग्रामीण रूग्णालयात समुपदेशन केंद्राची आवश्यकता विठ्ठल पाईलवार झरीतालुक्यात दिवसेंदिवस आत्महत्येचे प्रमाण वाढताना दिसत आहे. ही स्थिती अत्यंत गंभीर आहे. आत्महत्येचा विचार प्रथम मनात येत, मात्र यावर उपचाराची व्यवस्था ग्रामीण भागात कुठेही नाही.शारीरिक आजारावर उपचाराची व्यवस्था ग्रामीण स्तरापर्यंत पोहोचली आहे. मात्र मानसोपचार व्यवस्था शहरी भागातच व तीसुद्धा काही मोजक्याच ठिकाणी उपलब्ध आहे. धकाधकीच्या व स्पर्धेच्या युगात मानसिकदृष्ट्या निरोगी मनुष्य शोधून सापडणार नाही. शारीरिक आजार झाला तर, लगेच दवाखान्यात दाखविले जाते. चिंता, नैराश्य, अपराधीपणाची भावना, आत्मविश्वासाचा अभाव, बेकारी, कौटुंबिक कलह, वृद्धापकाळातील समस्या, प्रेमभंग यासारख्या अनेक समस्या या मानसिक आजारात मोडतात. मात्र समाजाचेही या बाबतीत सहकार्य लाभत नाही.आपणाकडे एखादी व्यक्ती वेडी झाल्याशिवाय तिला मानसिक रूग्ण म्हटले जात नाही. मात्र लाजाळूपणा, आर्थिक विकलांगता, अशा अनेक गोष्टीही मानसिक आजारात मोडतात. यावर पाहिजे त्या प्रमाणात समाज जागृकता झालेली नाही. सध्या अनेक गावात काही मनोरूग्ण, वेडी माणसे भटकताना दिसतात. त्यापैकी काही जण उपचाराने बरे होऊ शकतात. मात्र त्यासाठी कुणाकडेही वेळ नाही व सामाजिक भान नाही. अनेक नकारात्मक भावना व विचारांचे दमन, दीर्घकाळ झाल्यास त्या व्यक्तीच्या मनात आत्महत्येचे विचार घोळू लागतात. काही जण तसे पाऊलही उचलतात. तथापि, मूळ कारण मात्र बाजूलाच राहाते. सध्या ग्रामीण भागात मोठमोठे सरकारी दवाखाने उभारले जात आहे. त्यात एखाद्या मानसोपचार विभागाची व्यवस्था होणे गरजेचे आहे.झरीसारख्या भागात असा विभाग निर्माण करण्याची गरज आहे. यातून संकटांना तोंड देण्याची क्षमता त्या व्यक्तींमध्ये निर्माण केली जाऊ शकेल. सध्या योग्य रितीने जीवन जगण्यासाठी निरोगी मनाची गरज आहे. हा सर्व मानसशास्त्राचा भाग आहे. त्यावरील उपचाराची व्यवस्था जर ग्रामीण पातळीवर झाली, तर अनेकांचा वेळ व पैसा वाचेल. आत्महत्याही कमी करता येईल.