शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
2
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
3
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
4
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
5
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
6
मोठी बातमी! पालघरमधील मेलोडी फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
7
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
8
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
9
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
10
Shreyas Iyer : बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
11
नागपुरात आई अन् मुलानेच सुरू केलं सेक्स रॅकेट, व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो पाठवायचे; रात्री...
12
पाकिस्तानात मोठी घडामोड! इम्रान खान तुरुंगातून बाहेर येणार? एकाचवेळी आठ प्रकरणांत मिळाला जामीन 
13
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!
14
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
15
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
16
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
17
Asia Cup 2025 : टीम इंडिया आशिया कप स्पर्धेत पाकविरुद्ध खेळणार का? मोठी माहिती आली समोर
18
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका
19
Nashik House Collapses: नाशकात दुमजली घर कोसळलं, आठ महिलांसह नऊ जण जखमी
20
भारताच्या सीमेवर 'चिनी' पकड मजबूत होतेय? जिनपिंग यांनी तिबेटला दिले 'हे' नवे निर्देश!

आत्महत्येच्या प्रमाणात झाली वाढ

By admin | Updated: October 19, 2015 00:23 IST

तालुक्यात दिवसेंदिवस आत्महत्येचे प्रमाण वाढताना दिसत आहे. ही स्थिती अत्यंत गंभीर आहे. आत्महत्येचा विचार प्रथम मनात येत, ...

मानसोपचार यंत्रणा नाही : ग्रामीण रूग्णालयात समुपदेशन केंद्राची आवश्यकता विठ्ठल पाईलवार झरीतालुक्यात दिवसेंदिवस आत्महत्येचे प्रमाण वाढताना दिसत आहे. ही स्थिती अत्यंत गंभीर आहे. आत्महत्येचा विचार प्रथम मनात येत, मात्र यावर उपचाराची व्यवस्था ग्रामीण भागात कुठेही नाही.शारीरिक आजारावर उपचाराची व्यवस्था ग्रामीण स्तरापर्यंत पोहोचली आहे. मात्र मानसोपचार व्यवस्था शहरी भागातच व तीसुद्धा काही मोजक्याच ठिकाणी उपलब्ध आहे. धकाधकीच्या व स्पर्धेच्या युगात मानसिकदृष्ट्या निरोगी मनुष्य शोधून सापडणार नाही. शारीरिक आजार झाला तर, लगेच दवाखान्यात दाखविले जाते. चिंता, नैराश्य, अपराधीपणाची भावना, आत्मविश्वासाचा अभाव, बेकारी, कौटुंबिक कलह, वृद्धापकाळातील समस्या, प्रेमभंग यासारख्या अनेक समस्या या मानसिक आजारात मोडतात. मात्र समाजाचेही या बाबतीत सहकार्य लाभत नाही.आपणाकडे एखादी व्यक्ती वेडी झाल्याशिवाय तिला मानसिक रूग्ण म्हटले जात नाही. मात्र लाजाळूपणा, आर्थिक विकलांगता, अशा अनेक गोष्टीही मानसिक आजारात मोडतात. यावर पाहिजे त्या प्रमाणात समाज जागृकता झालेली नाही. सध्या अनेक गावात काही मनोरूग्ण, वेडी माणसे भटकताना दिसतात. त्यापैकी काही जण उपचाराने बरे होऊ शकतात. मात्र त्यासाठी कुणाकडेही वेळ नाही व सामाजिक भान नाही. अनेक नकारात्मक भावना व विचारांचे दमन, दीर्घकाळ झाल्यास त्या व्यक्तीच्या मनात आत्महत्येचे विचार घोळू लागतात. काही जण तसे पाऊलही उचलतात. तथापि, मूळ कारण मात्र बाजूलाच राहाते. सध्या ग्रामीण भागात मोठमोठे सरकारी दवाखाने उभारले जात आहे. त्यात एखाद्या मानसोपचार विभागाची व्यवस्था होणे गरजेचे आहे.झरीसारख्या भागात असा विभाग निर्माण करण्याची गरज आहे. यातून संकटांना तोंड देण्याची क्षमता त्या व्यक्तींमध्ये निर्माण केली जाऊ शकेल. सध्या योग्य रितीने जीवन जगण्यासाठी निरोगी मनाची गरज आहे. हा सर्व मानसशास्त्राचा भाग आहे. त्यावरील उपचाराची व्यवस्था जर ग्रामीण पातळीवर झाली, तर अनेकांचा वेळ व पैसा वाचेल. आत्महत्याही कमी करता येईल.