शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

दहावी पास पोरांनो...वाटेल तेथे घ्या ॲडमिशन; ४३ हजार जागा तुमच्यासाठीच

By अविनाश साबापुरे | Updated: May 29, 2024 19:08 IST

पारंपरिक अकरावीसह, आयटीआय, पाॅलिटेक्नीलाही संधी

यवतमाळ : मुंबई-पुण्यात अकरावी प्रवेशासाठी मारमार असली, तरी यवतमाळ जिल्ह्यात मात्र दहावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी यंदा भरघोस जागा उपलब्ध आहेत. यंदा जिल्ह्यातील ३६ हजार १३९ विद्यार्थ्यांनी दहावी पार केली. तर पुढच्या शिक्षणासाठी जिल्ह्यात ४३ हजारांपेक्षा अधिक जागा त्यांची वाट पाहाताहेत. त्यामुळे चिंतेची गरज नाही, पोरांनो वाट्टेल तेथे घ्या ॲडमिशन असे म्हणण्यासारखे सुखद चित्र आहे.

सोमवारी २७ मे रोजी दहावीच्या परीक्षेचा निकाल लागताच आता पुढे कुठले शिक्षण घ्यावे, पोराची ॲडमिशन कुठल्या अभ्यासक्रमाला घ्यावी, या विचारांचे काहूर पालकांच्या मनात दाटले आहे. परंतु, शिक्षण खात्याकडून यासंदर्भात माहिती घेतली असता, दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांपेक्षा जिल्ह्यात कितीतरी अधिक जागा उपलब्ध असल्याचे स्पष्ट करण्यात आले. पारंपरिक कला, विज्ञान, वाणिज्य या विद्याशाखांमध्ये अकरावीला प्रवेश घ्यायचा असल्यास जिल्ह्यातील ३४९ महाविद्यालयांमध्ये तब्बल ३५ हजार ५२० जागा यंदा उपलब्ध आहेत.

त्यासोबतच जिल्ह्यातील तीन तंत्रनिकेतन (पाॅलिटेक्नीक) महाविद्यालयांमध्ये ८१० जागा आहेत. गेल्या वर्षी एवढ्याच जागांसाठी तब्बल दीड हजारांपेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी गर्दी केली होती, हे विशेष. शिवाय जिल्ह्यात १८ शासकीय आणि चार अशासकीय अशा तब्बल २२ औद्योगिक प्रशिक्षण संस्था आहेत. या २२ आयटीआयमधील विविध ट्रेडसाठी एकंदर चार हजार ५१६ जागा दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध राहणार आहेत. त्यासोबतच व्यवसाय अभ्यासक्रमाच्या दोन हजारांपेक्षा अधिक म्हणजे २२४० जागा विविध महाविद्यालयांमध्ये भरल्या जाणार आहेत. पाॅलिटेक्नीक व आयटीआयच्या जागा प्रत्यक्ष प्रवेश प्रक्रिया सुरु होताना थोड्याबहुत कमी-जास्त होण्याची शक्यता आहे.

रोजगाराभिमुख अभ्यासक्रमांकडे वाढता कलकला, विज्ञान, वाणिज्य या विद्याशाखांमध्ये अकरावीला प्रवेश घेण्यासाठी दरवर्षी विद्यार्थी उत्सुक असतात. परंतु, गेल्या दोन वर्षांपासून दहावी झाल्यानंतर व्यवसाय अभ्यासक्रम, पाॅलिटेक्नीक तसेच आयटीआयमध्ये प्रवेश घेण्याकडे विद्यार्थ्यांचा कल वाढत आहे.

लवकरच प्रवेश प्रक्रियेला सुरुवातजिल्ह्यातील ३४९ महाविद्यालयांमध्ये अकरावीची प्रवेश प्रक्रिया लवकरच सुरु होणार आहे. त्याबाबत गुरुवारी ३० मे रोजी सर्व महाविद्यालयांना लेखी पत्र दिले जाणार असल्याचे शिक्षण विभागातून सांगण्यात आले. दहावीचा निकाल लागला तरी अजून गुणपत्रिका विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचायच्या आहेत. गुणपत्रिका आल्यानंतर अकरावी प्रवेशाला सुरुवात होणार आहे. तर आयटीआय आणि पाॅलिटेक्नीकची प्रवेश प्रक्रियाही केंद्रीय पद्धतीनुसार लवकरच सुरु होणार आहे.

- जिल्ह्यात दहावी उत्तीर्ण विद्यार्थी : ३६,१३९- पुढच्या शिक्षणासाठी उपलब्ध जागा : ४३,०८६

- अकरावीसाठी उपलब्ध काॅलेज : ३४९- जिल्ह्यातील आयटीआय : २२- जिल्ह्यातील पाॅलिटेक्नीक : ०३

कोणत्या अभ्यासक्रमाच्या किती जागा आहेत?* जिल्ह्यात अकरावीच्या जागा : ३५,५२०- कला शाखा : १८९००- विज्ञान शाखा : १३७६०- वाणिज्य शाखा : २८६०

* व्यवसाय अभ्यासक्रम : २२४०- अकाउंटिंग : २४०- ॲनिमल हसबंडरी : २००- इलेक्ट्रिकल टेक्नाॅलाॅजी : ४२०- इलेक्ट्राॅनिक टेक्नाॅलाॅजी : १८०- ऑटोमोबाइल १२०- कन्स्ट्रक्शन टेक्नाॅलाॅजी : १२०- क्राॅप सायन्स : २००- मार्केटिंग : १२०- लाॅजिस्टिक : ४०- हाॅर्टिकल्चर : ५२०- बीएसएफ : ८०* आयटीआय : ४,५१६* पाॅलिटेक्नीक : ८१०