शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

उमरखेडमध्ये पारंपरिक वस्तूंचे महत्त्व

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 15, 2018 21:39 IST

आधुनिक काळातही ग्रामीण भागात पारंपरिक वस्तूंचे महत्त्व कायम आहे. विशेषत: ग्रामीण भागात आजही पाटा, वरवंट्यांची क्रेज कायम असल्याचे दिसते.

एकनाथ पवार ।लोकमत न्यूज नेटवर्कउमरखेड : आधुनिक काळातही ग्रामीण भागात पारंपरिक वस्तूंचे महत्त्व कायम आहे. विशेषत: ग्रामीण भागात आजही पाटा, वरवंट्यांची क्रेज कायम असल्याचे दिसते.ग्रामीण भागात दगडी पाटे, वरवंट्यांचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जातो. आधुनिक काळात तंत्रज्ञानातील प्रगतीमुळे सर्वत्र यांत्रिकीकरणाचा वापर वाढला. त्याचे लोण स्वयंपाक गृहापर्यंत पोहोचले. यांत्रिकीकरणामुळे स्वयंपाक घरातील काही कामे कमी वेळेत होऊ लागली. मिक्सरच्या वापरामुळे दगडी पाटा, वरवंटा आणि खलबत्ताच्या सहाय्याने मसाल्याचे पदार्थ एकत्रित करण्याचे काम मागे पडले. ग्रार्इंडरमुळे ही कामे काही सेकंदातच होऊ लागली.बाजारात उपलब्ध असणाऱ्या फूड प्रोसेसर व मिक्सरमुळे मसाले बनविण्याचे काम अगदी कमी वेळेत आणि आरामात होते. यामुळे गृहिणींचा कल तिकडे वाढला. तथापि मिक्सरमध्ये बारीक केलेल्या मसाल्यांची चांगली चव येत नसल्याने आजही ग्रामीण व शहरी भागातील काही महिला पुरण पोळीचे पुरण असो, वा आमटीचा मसाला असो, यासाठी पाटे, वरवंट्याचा वापर करतात. त्यावर वाटलेल्या हाताच्या चवीला प्राधान्य देतात. त्यामुळे ग्रामीण भागासह शहरी भागातदेखील बहुतांश ठिकाणी आजही पाटा व वरवंट्यालाच महत्व आहे.विशिष्ट प्रकारचे घडीव व कोरीव काम केल्यानंतर पाटे, वरवंटे तयार होतात. दगड फुटला, तर सगळी मेहनत फुकट जाण्याची भिती असते.