शहरं
Join us  
Trending Stories
1
Nikki Murder Case : निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण
2
"आता माझ्याकडे मृत्यूशिवाय पर्याय नाही, म्हणून..."; भाजपा नेत्यानं मुख्यमंत्र्यांकडे मागितलं इच्छामरण
3
भारतीय औषध कंपन्यांसमोर डोनाल्ड ट्रम्प झुकले! ५० टक्के टॅरिफमधून दिली सूट, नेमके कारण काय?
4
'आम्ही तिला मारलं नाही' निक्कीच्या सासरच्या लोकांचा दावा! पण पतीच्या एका कृतीने वाढला संशय
5
शेजाऱ्यांना खुश करण्यासाठी मार्क झुकेरबर्ग वाटतायेत 'हेडफोन'; का वैतागले आहेत शेजारी?
6
टाटानं केली नव्या 'एआय अँड सर्व्हिस ट्रांसफॉर्मेशन' युनिटची स्थापन, काय असणार काम? कुणाला मिळाली जबाबदारी? जाणून घ्या
7
बॉलिवूड सेलिब्रिटींच्या घरी बाप्पाचे आगमन, पाहा खास PHOTOS
8
एका वर्षापूर्वी झालेला बेपत्ता; आता केदारनाथ मंदिराजवळ सापडला भाविकाचा सांगाडा
9
मोठी बातमी! मनोज जरांगे पाटलांना आझाद मैदानावर आंदोलनासाठी परवानगी, अटीशर्तीही घातल्या
10
इस्रायलप्रमाणे युद्धाची तयारी करत आहे 'हा' देश, ८१ प्रदेशांमध्ये काम सुरू!
11
"भारत आणि अमेरिका यांच्यात लवकरच होणार 'मुक्त व्यापार करार'!"; माजी परराष्ट्र सचिवांचं मोठं विधान, आणखी काय म्हणाले?
12
महाराष्ट्राच्या सीमेवर भयंकर चकमक; 'सी- ६०' दलाकडून भर पावसात चार नक्षल्यांचा खात्मा
13
भयंकर... पाचवीतील विद्यार्थिनीने शाळेतच घेतलं पेटवून, कुटुंबीय म्हणाले, 'तिच्यावर अत्याचार...'
14
हे लक्षात ठेवाच! कमी पाणी प्यायल्याने वाढू शकते स्ट्रेस लेव्हल; दररोज किती प्यावं पाणी?
15
Solapur Crime: 'तुला आणि तुझ्या आईला खल्लास करीन'; बापाकडूनच अल्पवयीन मुलीवर अनेकवेळा अत्याचार
16
'डोनाल्ड ट्रम्प यांचा कॉल अन् PM मोदींनी ५ तासात युद्ध थांबवले', राहुल गांधींची बोचरी टीका
17
नागपूर: 'चॅट जीपीटी'च्या मदतीने पोलिसांनी पकडला मास्टरमाईंड; पुण्यातील व्यक्तीच्या घरावर घेतलं कर्ज, ५ कोटींचा गंडा
18
Ganesh Chaturthi 2025: मराठी कलाकारांच्या घरी झाले बाप्पाचे आगमन, पाहा फोटो
19
जैशला पुनरुज्जीवित करण्याचा पाकिस्तानचा प्रयत्न; मसूदच्या दहशतवाद्यांसाठी काय करतंय पाक सरकार?
20
अभिनेतापासून राजकारणी बनलेल्या थलापती विजय वादात! TVK रॅलीत बाउन्सरने कार्यकर्त्यांना व्यासपीठावरुन खाली फेकले, गुन्हा दाखल, व्हिडीओ व्हायरल

दीडशे शाळा शौचालयाविना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2019 21:32 IST

नव्या शैक्षणिक सत्राला बुधवारपासून मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला. मात्र खासगी शाळांशी स्पर्धा करण्याच्या बाता मारणाऱ्या जिल्हा परिषद प्रशासनाला आपल्या प्राथमिक शाळांमध्ये मूलभूत सुविधाही पुरविता आलेल्या नाही. तब्बल १४८ शाळांमध्ये शौचालय नसल्यामुळे मुलामुलींची कुचंबणा होत आहे. १५ शाळांमध्ये तर प्यायलाही पाणी उपलब्ध नसल्याची गंभीर बाब पुढे आली आहे.

ठळक मुद्देमुलींची कुचंबणा : १५ शाळांमध्ये पिण्याचे पाणीही नाही

अविनाश साबापुरे।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : नव्या शैक्षणिक सत्राला बुधवारपासून मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला. मात्र खासगी शाळांशी स्पर्धा करण्याच्या बाता मारणाऱ्या जिल्हा परिषद प्रशासनाला आपल्या प्राथमिक शाळांमध्ये मूलभूत सुविधाही पुरविता आलेल्या नाही. तब्बल १४८ शाळांमध्ये शौचालय नसल्यामुळे मुलामुलींची कुचंबणा होत आहे. १५ शाळांमध्ये तर प्यायलाही पाणी उपलब्ध नसल्याची गंभीर बाब पुढे आली आहे.विद्यार्थी संख्येनुसार शिक्षक संख्या निश्चित करणे, विद्यार्थी संख्या घटल्यास शाळाच बंद करणे अशा कायद्यातील तरतुदींचा सोईस्कर वापर करीत जिल्हा परिषद प्रशासन शाळांवर होणारा खर्च कमी करण्याच्या मानसिकतेत आहे. मात्र त्यासाठी ज्या आरटीई कायद्याचा आधार घेतला जात आहे, त्याच कायद्यात प्राथमिक शाळांमध्ये मुला-मुलींसाठी स्वतंत्र शौचालयाची तरतूद आहे. त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे. शाळांमधील भौतिक सुविधा पूर्ण करणे, त्यासाठी निधी उपलब्ध करणे या बाबी समग्र शिक्षा अभियानावरच लोटून जिल्हा परिषदेने हात झटकले आहे. जिल्हा परिषदेच्या अखत्यारित चालणाºया शाळांसाठी प्रत्यक्ष जिल्हा परिषदेकडून अत्यल्प खर्च होतो. महत्त्वाच्या खर्चाच्या बाबींसाठी सर्वशिक्षा अभियानाच्या अंदाजपत्रकावर भिस्त ठेवण्यात आली आहे. मात्र समग्र शिक्षाचे अंदाजपत्रक वर्षातून एकदाच आणि तेही शैक्षणिक सत्र सुरू झाल्यावर अंतिम होते. त्यानंतर प्रत्यक्ष निधी येणे, त्यावर जिल्हा परिषदेचे शिक्कामोर्तब होऊन प्रत्यक्ष शाळेपर्यंत पैसा आणि सुविधा उपलब्ध होण्यासाठी बराच कालावधी निघून जातो.याच लांबलचक प्रक्रियेमुळे दीडशे शाळांमध्ये अद्याप शौचालय उपलब्ध होऊ शकलेले नाही. समग्र शिक्षा अभियानाच्या मुंबई कार्यालयाकडे जिल्हास्तरीय यंत्रणेने निधी मागितला आहे. ७८ शाळांमध्ये मुलांसाठी, ५२ शाळांमध्ये मुलींसाठी तर १८ शाळांमध्ये दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र शौचालयाची गरज आहे. त्यासाठी तीन कोटी ४६ लाख २० हजारांच्या खर्चाला परवानगी मागण्यात आली आहे. मात्र अद्याप राज्याचेच अंदाजपत्रक अंतिम न झाल्यामुळे जिल्ह्यातील या दीडशे शाळांना निधी मिळण्यासाठी विलंब होणार आहे.जिल्हा परिषद सदस्य कुठे-कुठे पुरणार?जिल्हा परिषदेच्या सदस्यांना वर्षाचा अत्यल्प निधी मिळतो. एका जिल्हा परिषद सदस्याच्या मतदारसंघात जिल्हा परिषदेच्या किमान ५० शाळा येतात. त्यामुळे जिल्हा परिषद सदस्याच्या निधीतून यातील बहुतांश शाळांची दुरुस्ती होणे शक्य नाही. तरीही काही सदस्य समस्येची तीव्रता पाहून काही शाळांमध्ये खर्च करतात. परंतु अशा शाळांची संख्या बोटावर मोजण्याइतकी आहे. उर्वरित शाळांसाठी जिल्हा परिषद समग्र शिक्षाच्या निधीशिवाय कुठलाही पैसा देत नाही, अशी खंत सदस्यांनी व्यक्त केली.१५ शाळांच्या पाण्यासाठी हवे २२ लाखवाई हातोला, चिंचवाडी, राजना, लोहरा, सोनखास, नागेशवाडी, सातघरी तांडा, नांदगव्हाण, माळवाकद, हिवळणी, बोरी ईजारा, बाबासाहेबनगर, पिंपळखुटी, टिपेश्वर, कोठा या ठिकाणच्या जिल्हा परिषद शाळांमध्ये एक तर पाण्याची सोयच नाही, जिथे पाणी उपलब्ध आहे ते पिण्यायोग्य नाही. त्यामुळेच समग्र शिक्षा अभियानाकडे २२ लाख ५० हजारांचा निधी मागण्यात आला आहे. या निधीतून १५ शाळांमध्ये पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्याचे नियोजन आहे. मात्र समग्र शिक्षाचा निधी येण्यापूर्वी जिल्हा परिषदेने पुढाकार घेऊन तेथे पाणी उपलब्ध करावे, अशी मागणी होत आहे.