शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
2
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
3
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
4
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
5
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
6
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
7
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
8
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
9
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
10
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!
11
Operation Sindhu : इराणमध्ये अडकलेले १००० विद्यार्थी मायदेशी परतणार! भारतासाठी खुला केला हवाई मार्ग
12
माता न तू वैरिणी! बॉयफ्रेंडसोबत पळून जाण्यासाठी जन्मदात्या आईनेच २ मुलांना विष देऊन मारलं
13
जैस्वालचा आणखी एक 'यशस्वी' डाव! इंग्लंडमध्ये पहिल्याच टेस्टमध्ये भात्यातून आली बेस्ट खेळी
14
घरातून निघाले पण...; नवविवाहित जोडपे ६ दिवसांपासून बेपत्ता; पोलिसांचा शोध सुरू
15
इराणच्या मदतीला चीन धावला; युद्ध साहित्य घेऊन ड्रॅगनची तीन विमाने तेहरानमध्ये दाखल...
16
कोयनेत साडेचार टीएमसी पाणीसाठा वाढला; धरणातून विसर्ग सुरू 
17
संतापजनक...! ब्रा नसेल तर परीक्षेला बसता येणार नाही, स्पर्शकरून होतेय तपासणी; विद्यापीठाचं अजब फर्मान, VIDEO व्हायरल 
18
फक्त ९९ पैशात जमीन! आधी TCS ला २१ एकरचा भूखंड, आता सरकारचा 'या' कंपनीसोबत करार
19
Tejasswi Prakash : "मला काही फरक पडत नाही"; ४ वर्षांनी नात्याला तडा, तेजस्वी प्रकाश-करण कुंद्राचं झालं ब्रेकअप?
20
IPL मधील टॉपर 'टेस्ट'मध्ये फेल; पदार्पणाच्या सामन्यात पदरी पडला भोपळा!

दीडशे शाळा शौचालयाविना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2019 21:32 IST

नव्या शैक्षणिक सत्राला बुधवारपासून मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला. मात्र खासगी शाळांशी स्पर्धा करण्याच्या बाता मारणाऱ्या जिल्हा परिषद प्रशासनाला आपल्या प्राथमिक शाळांमध्ये मूलभूत सुविधाही पुरविता आलेल्या नाही. तब्बल १४८ शाळांमध्ये शौचालय नसल्यामुळे मुलामुलींची कुचंबणा होत आहे. १५ शाळांमध्ये तर प्यायलाही पाणी उपलब्ध नसल्याची गंभीर बाब पुढे आली आहे.

ठळक मुद्देमुलींची कुचंबणा : १५ शाळांमध्ये पिण्याचे पाणीही नाही

अविनाश साबापुरे।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : नव्या शैक्षणिक सत्राला बुधवारपासून मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला. मात्र खासगी शाळांशी स्पर्धा करण्याच्या बाता मारणाऱ्या जिल्हा परिषद प्रशासनाला आपल्या प्राथमिक शाळांमध्ये मूलभूत सुविधाही पुरविता आलेल्या नाही. तब्बल १४८ शाळांमध्ये शौचालय नसल्यामुळे मुलामुलींची कुचंबणा होत आहे. १५ शाळांमध्ये तर प्यायलाही पाणी उपलब्ध नसल्याची गंभीर बाब पुढे आली आहे.विद्यार्थी संख्येनुसार शिक्षक संख्या निश्चित करणे, विद्यार्थी संख्या घटल्यास शाळाच बंद करणे अशा कायद्यातील तरतुदींचा सोईस्कर वापर करीत जिल्हा परिषद प्रशासन शाळांवर होणारा खर्च कमी करण्याच्या मानसिकतेत आहे. मात्र त्यासाठी ज्या आरटीई कायद्याचा आधार घेतला जात आहे, त्याच कायद्यात प्राथमिक शाळांमध्ये मुला-मुलींसाठी स्वतंत्र शौचालयाची तरतूद आहे. त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे. शाळांमधील भौतिक सुविधा पूर्ण करणे, त्यासाठी निधी उपलब्ध करणे या बाबी समग्र शिक्षा अभियानावरच लोटून जिल्हा परिषदेने हात झटकले आहे. जिल्हा परिषदेच्या अखत्यारित चालणाºया शाळांसाठी प्रत्यक्ष जिल्हा परिषदेकडून अत्यल्प खर्च होतो. महत्त्वाच्या खर्चाच्या बाबींसाठी सर्वशिक्षा अभियानाच्या अंदाजपत्रकावर भिस्त ठेवण्यात आली आहे. मात्र समग्र शिक्षाचे अंदाजपत्रक वर्षातून एकदाच आणि तेही शैक्षणिक सत्र सुरू झाल्यावर अंतिम होते. त्यानंतर प्रत्यक्ष निधी येणे, त्यावर जिल्हा परिषदेचे शिक्कामोर्तब होऊन प्रत्यक्ष शाळेपर्यंत पैसा आणि सुविधा उपलब्ध होण्यासाठी बराच कालावधी निघून जातो.याच लांबलचक प्रक्रियेमुळे दीडशे शाळांमध्ये अद्याप शौचालय उपलब्ध होऊ शकलेले नाही. समग्र शिक्षा अभियानाच्या मुंबई कार्यालयाकडे जिल्हास्तरीय यंत्रणेने निधी मागितला आहे. ७८ शाळांमध्ये मुलांसाठी, ५२ शाळांमध्ये मुलींसाठी तर १८ शाळांमध्ये दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र शौचालयाची गरज आहे. त्यासाठी तीन कोटी ४६ लाख २० हजारांच्या खर्चाला परवानगी मागण्यात आली आहे. मात्र अद्याप राज्याचेच अंदाजपत्रक अंतिम न झाल्यामुळे जिल्ह्यातील या दीडशे शाळांना निधी मिळण्यासाठी विलंब होणार आहे.जिल्हा परिषद सदस्य कुठे-कुठे पुरणार?जिल्हा परिषदेच्या सदस्यांना वर्षाचा अत्यल्प निधी मिळतो. एका जिल्हा परिषद सदस्याच्या मतदारसंघात जिल्हा परिषदेच्या किमान ५० शाळा येतात. त्यामुळे जिल्हा परिषद सदस्याच्या निधीतून यातील बहुतांश शाळांची दुरुस्ती होणे शक्य नाही. तरीही काही सदस्य समस्येची तीव्रता पाहून काही शाळांमध्ये खर्च करतात. परंतु अशा शाळांची संख्या बोटावर मोजण्याइतकी आहे. उर्वरित शाळांसाठी जिल्हा परिषद समग्र शिक्षाच्या निधीशिवाय कुठलाही पैसा देत नाही, अशी खंत सदस्यांनी व्यक्त केली.१५ शाळांच्या पाण्यासाठी हवे २२ लाखवाई हातोला, चिंचवाडी, राजना, लोहरा, सोनखास, नागेशवाडी, सातघरी तांडा, नांदगव्हाण, माळवाकद, हिवळणी, बोरी ईजारा, बाबासाहेबनगर, पिंपळखुटी, टिपेश्वर, कोठा या ठिकाणच्या जिल्हा परिषद शाळांमध्ये एक तर पाण्याची सोयच नाही, जिथे पाणी उपलब्ध आहे ते पिण्यायोग्य नाही. त्यामुळेच समग्र शिक्षा अभियानाकडे २२ लाख ५० हजारांचा निधी मागण्यात आला आहे. या निधीतून १५ शाळांमध्ये पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्याचे नियोजन आहे. मात्र समग्र शिक्षाचा निधी येण्यापूर्वी जिल्हा परिषदेने पुढाकार घेऊन तेथे पाणी उपलब्ध करावे, अशी मागणी होत आहे.