शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण-इस्त्रायल युद्धातून भारताने घेतला धडा; आता 'ही' क्षमता दुप्पट करण्याची तयारी
2
युद्धविराम झाला तरी...! इराणचे खामेनी बेपत्ता, इस्रायलचे सिक्रेट ऑपरेशन सुरूच
3
लाखावर दर गेल्यावर युरोप मागतोय अमेरिकेकडे सोने; रस्त्याच्या खाली आहे लाखो टन सोने...
4
"...तर आईची भाषा घरा बाहेर गेलीच समजा’’, वैभव मांगलेंची खरमरीत पोस्ट, उपस्थित केले असे प्रश्न 
5
'या' तरुणीने रील बनवून कमावले ४१ कोटी! रोज कमावते अडीच लाख रुपये! कोण आहे 'द रिबेल किड'?
6
'नमस्कार फ्रॉम स्पेस; तुम्हीही या प्रवासाचा आनंद घ्या', अंतराळातून शुभांशू शुक्लांचा नवीन Video
7
'शांत हो श्रीगुरुदत्ता' हे विनवणीपर कवन टेंबे स्वामींना का लिहिले? त्याक्षणी नेमके घडले तरी काय?
8
"दिवा विझल्यावर.…’’, भास्कर जाधवांची नाराजी व्यक्त करण्यासाठी ‘स्टेटस’नीती, चर्चांना उधाण
9
Maharashtra Politics : “तुझ्या अंगावरचे कपडे आम्ही दिलेत, बापाला पेरणीला पैसेही”, भाजपाच्या लोणीकरांचं वादग्रस्त विधान
10
FASTag वापरणाऱ्यांसाठी खूशखबर! आता फक्त टोल नाही, तर पार्किंग-चार्जिंगसह 'या' कामांसाठीही वापरता येणार?
11
मित्रांसोबत इकडं जा... तिकडं जा खेळ रंगला अन् सराव कमी पडला! पृथ्वी शॉला चूक कळली, आता...
12
Video: धक्कादायक! रील बनवण्यासाठी महिलेने चक्क रेल्वे रुळांवरून चालवली कार, अखेरीस...  
13
Viral Video: धापा टाकत रुग्णालयात पोहोचला, डॉक्टरांनी विचारताच उघडली बॅग, पाहून अनेकांची बोलती बंद!
14
"कॉम्प्रोमाइज कर तुला रोल देतो", टीव्ही अभिनेत्याला दिग्दर्शकाने दिलेली ऑफर, केला धक्कादायक खुलासा
15
Shaktipeeth Expressway: ‘शक्तिपीठ’साठी ९२ गावांची मोजणी पूर्ण, ऑगस्टपर्यंत मोजणी; डिसेंबर अखेरीस भूसंपादन 
16
इराणने युद्धात शौर्य दाखवले, मी आता त्यांना रोखणार नाही; नाटोच्या परिषदेत ट्रम्प यांचे मोठे वक्तव्य
17
दहशतवादावरून राजनाथ सिंह यांनी चीनसमोरच केलं पाकिस्तानचं वस्त्रहरण, म्हणाले...  
18
५० हजार पगारात कोणती कार तुमच्यासाठी ठरेल फायदेशीर?; '२०-४-१०' फॉर्म्युला वापरा
19
लढाई संपली, आता कमाईची संधी! सेन्सेक्स ४०० अंकांनी वधारला, 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ
20
इराणच्या अण्वस्त्रांचे मोठे नुकसान! सीआयएच्या अहवालात मोठा खुलासा

पांढरकवडाच्या दीड लाख नागरिकांची सुरक्षा धोक्यात

By admin | Updated: December 31, 2015 02:45 IST

तालुक्यात मागील पाच वर्षांत लोकसंख्येत भरमसाठ वाढ झाली. सोबतच गुन्हेगारीतही मोठ्या प्रमाणात वाढ झाली.

केवळ ८२ पोलीस : तालुक्यात दुसरे पोलीस ठाणेच नाहीपांढरकवडा : तालुक्यात मागील पाच वर्षांत लोकसंख्येत भरमसाठ वाढ झाली. सोबतच गुन्हेगारीतही मोठ्या प्रमाणात वाढ झाली. मात्र येथील पोलीस ठाणे व कर्मचाऱ्यांमध्ये पाहिजे त्या प्रमाणात वाढ झाली नाही. परिणामी तालुक्यातील एक लाख ४० हजार जनतेची सुरक्षा केवळ ८२ पोलिसांवर येऊन पडली आहे. येथे अद्यापही ब्रिटिशकालीन आराखड्यानुसारच पोलीस ताफा असल्याने व सतत मंत्र्यांचा सुरक्षा बंदोबस्त करावा लागत असल्याने कार्यरत पोलिसांना जनतेची सुरक्षा करणे अवघड झाले आहे.पांढरकवडा तालुक्यात गेल्या पाच वर्षात ५५ घरफोड्या, ४३ शेतकऱ्यांच्या आत्महत्या, आठ खून, ४० हून अधिक विनयभंगाच्या घटना, २५ च्यावर लुटमारीच्या घटना, २२५ च्यावर लहान-मोठे अपघात घडले आहेत. ६० हून अधिक लोकांचे अपघाती मृत्यू झाले. १२५ हून अधिक जखमी झाले. छोट्या-मोठ्या भांडण-तंट्यांची तर गिनतीच नाही. असे असतानाही एक लाख ४० हजार नागरिकांच्या सुरक्षेचा डोलारा केवळ ८२ पोलिसांवर येऊन पडला आहे.तालुक्यात १२४ गावे आहेत. क्षेत्रफळाने तालुका बराच मोठा आहे. पूर्व आणि पश्चिमेला असणाऱ्या दोन टोकांवरील गावाचे अंतर ४० ते ५० किलोमीटर आहे. आदिवासीबहुल असलेला हा तालुका आर्थिक, शैक्षणिक तसेच सांस्कृतिक दृष्ट्या मागासलेला आहे. तालुक्यात एकही मोठा किंवा लहान उद्योग नाही. परिणामी सुशिक्षीत बेरोजगाराची संख्या अधिक आहे. त्यामुळे एकूणच गुन्हेगारीला परिपूर्ण पोषक असे वातावरण तालुक्यात आहे. तालुक्यात गुन्हेगारी वाढत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. अवैध व्यवसाय, असामाजिक घटनांवर नियंत्रण ठेवून कायदा व सुव्यवस्था, शांतता राखून सामाजिक आरोग्य राखण्यासाठी शासनाने तालुकास्थळी पोलीस ठाण्यांची निर्मिती केली. मात्र आता गावांची संख्या, लोकसंख्या, गुन्ह्यांची व गुन्हेगारांची संख्या वाढली. तथापि शासनाने पोलीस ठाण्यातील पोलिसांची संख्या मात्र त्या मानाने वाढविलीच नाही. तालुक्यातील १२४ गावांपैकी ११६ गावे पांढरकवडा पोलीस ठाण्याअंतर्गत येतात. येथे पोलीस निरीक्षक दर्जाचा ठाणेदार, एक सहाय्यक पोलीस निरीक्षक, चार पोलीस उपनिरीक्षकांसह ८२ पोलीस कार्यरत आहेत. मागील कित्येक वर्षांपासून पोलिसांची संख्या वाढली नाही. गुन्हेगारांकडून आता आधुनिक यंत्र , तंत्रवापरण्यात येते. मात्र गुन्ह्यांचा तपास अद्याप जुन्याच पद्धतीने केला जातो. पोलिसांकरिता मूलभूत सोयीही उपलब्ध नाही. त्यामुळे उपलब्ध पोलीस यंत्रणा गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवण्यात असमर्थ ठरत आहे. दरवर्षी गुन्ह्यांच्या संख्येत वाढ होत आहे. परिणामी तालुक्यातील एक लाख ४० हजार जनतेची सुरक्षा धोक्यात सापडली आहे. (तालुका प्रतिनिधी)