शहरं
Join us  
Trending Stories
1
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
2
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
3
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
4
T20I मधून निवृत्ती घेण्याच्या निर्णयात घाई झाली का? विराट कोहली म्हणाला- "तो विचार पूर्णपणे..."
5
वादळी वाऱ्याने लग्नाचा मंडप उडाला; नवरदेव-नवरीला चिखलातून खांद्यावर न्यावे लागले
6
Raigad Accident: रायगडमध्ये विचित्र अपघात, भरधाव टेम्पोची सायकलसह दोन वाहनांना धडक, ३ जण ठार
7
“आमच्याकडे आजही सगळे नियोजन, महिलांना ३ हजार रुपये देऊ शकतो”; ठाकरे गटाचा मोठा दावा
8
बलुचिस्तानमधील बोलान येथे पाकिस्तानी सैन्याच्या वाहनावर हल्ला, एका अधिकाऱ्यासह ६ सैनिकांचा मृत्यू 
9
MI vs GT : 'पॉवरप्ले'मध्ये DSP सिराजचा धाक! पहिल्याच ओव्हरमध्ये साधला विकेट्सचा डाव
10
मशिदीत होता हजारोंचा जमाव, मौलानाने विचारलं भारताविरोधात कोण लढणार? हात वर करा, मग घडलं असं काही...
11
"धोनीसाठी हे सगळं करण्यात आलंय..."; सुनील गावसकरांचा IPL 2025च्या नियमावरून प्रचंड संताप
12
चीनला मोठा धक्का; iPhone चे सर्व मॉडेल्स भारतात तयार होणार, केंद्रीय मंत्र्यांची माहिती...
13
“आमचा युद्धसराव झालेला आहे, महापालिका निवडणुकांसाठी तयार”; संजय राऊतांचा निर्धार
14
वैभव सूर्यवंशी नंतर आणखी एका 14 वर्षीय स्फोटक खेळाडूने झळकावले द्विशतक, कोण आहे तो?
15
जीवघेण्या फंगसचा अलर्ट! वाढत्या तापमानामुळे येईल नवं संकट; तज्ज्ञांनी दिला धोक्याचा इशारा
16
पाकिस्तानने मर्यादा ओलांडल्या, आता अद्दल घडवावी लागेल..; काश्मीरमधून ओवेसींचा निशाणा
17
महापालिका, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका महायुती एकत्र लढणार का? CM फडणवीस म्हणाले...
18
कोहलीच्या पोस्टरसमोर बकऱ्याचा बळी, आरसीबीच्या ३ चाहत्यांना अटक, कारण ऐकूण पोलीसही चक्रावले
19
चीनचा पाकिस्तानसोबत डबल गेम! UN परिषदेत भेटी-गाठींचा देखावा; पण बाजूने एक शब्दही नाही बोलला
20
'ही' आहेत पाकिस्तानातील श्रीमंत शहरं? मुंबई-दिल्लीशी तुलना करायची झाली तर...

पुसद तहसीलवर धडकले शेकडो शेतकरी

By admin | Updated: October 29, 2014 22:57 IST

निसर्गाच्या अवकृपेने मजुरीएवढेही उत्पन्न येत नसल्याने शेतकरी पुरता उद्ध्वस्त झाला असून पुसद तालुका दुष्काळग्रस्त घोषित करावा, अशी मागणी करीत बुधवारी शेकडो शेतकरी तहसीलवर धडकले.

पुसद : निसर्गाच्या अवकृपेने मजुरीएवढेही उत्पन्न येत नसल्याने शेतकरी पुरता उद्ध्वस्त झाला असून पुसद तालुका दुष्काळग्रस्त घोषित करावा, अशी मागणी करीत बुधवारी शेकडो शेतकरी तहसीलवर धडकले. शेतकऱ्यांनी आजवर अनेक संकटे झेलली. परंतु यंदाचे संकट भीषण आहे. ३० किलो सोयाबीन बियाण्यातून केवळ ५० किलो उत्पन्न येत आहे. यापेक्षा मजुरांची मजुरीच जास्त होत आहे. अपुऱ्या पावसाने कपाशीचे पीकही उद्ध्वस्त झाले आहे. एकरी दहा ते २० हजार खर्च करून हाती काहीच येत नाही. यंदा लागवडीचा खर्चही निघणे अशक्य आहे. यामुळे शेतकरी देशोधडीला लागला असून संपूर्ण पुसद तालुका दुष्काळग्रस्त घोषित करावा, अशी मागणी करीत तालुक्यातील वेणी, खडकदरी, दहीवड, कोंढई, पाळूवाडी, आसोली, पोखरी या गावातील सुमारे ५०० वर शेतकरी बुधवारी पुसद तहसीलवर धडकले. पुसद तालुका दुष्काळग्रस्त करावा या मागणीसह मोटारपंपाचे वीज बिल माफ करावे, नियमित वीज पुरवठा करावा, रबी हंगामासाठी बियाणे अनुदानावर उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी करण्यात आली. यावेळी उत्तमराव खंदारे, प्रेमराव मस्के, प्रवीण दुद्दल, सूर्यभान टारफे, संजय भोने, माधवराव सुरोशे, गोविंदराव मस्के, नारायण महाराज यांच्यासह परिसरातील अनेक शेतकरी उपस्थित होते. (वार्ताहर)