शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

५० हजारात शेततळे खोदायचे कसे ?

By admin | Updated: February 29, 2016 01:54 IST

शासनाने शेतकऱ्यांसाठी ‘मागेल त्याला शेततळे’ ही योजना आणली आहे.

शेतकऱ्यांचा सवाल : यवतमाळ जिल्ह्यात साडेतीन हजार यवतमाळ : शासनाने शेतकऱ्यांसाठी ‘मागेल त्याला शेततळे’ ही योजना आणली आहे. राज्यात पहिल्या टप्प्यात तब्बल ५१ हजार ५०० शेततळ्यांचे उद्दीष्ट ठेवले गेले असले तरी ५० हजारात शेततळे खोदायचे कसे हा शेतकऱ्यांचा शासनाला सवाल आहे. विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या शेततळे योजनेची घोषणा केली होती. नियोजन विभागाने १७ फेब्रुवारी रोजी त्या संबंधीचा आदेश जारी केला. २३ फेब्रुवारीपासून ‘आपले सरकार’ या शासकीय पोर्टलवर शेततळ्यांसाठी अर्ज डाऊनलोड करणे सुरू झाले. २९ फेब्रुवारीपर्यंत ते डाऊनलोड करता येतील. त्यानंतर हे अर्ज त्याच वेबसाईडवर अपलोड करायचे आहेत. राज्यात पहिल्या टप्प्यात सन २०१६-१७ मध्ये ५१ हजार ५०० शेततळे खोदण्याचे उद्दीष्ट निश्चित करण्यात आले आहे. त्यात एकट्या अमरावती विभागात १३ हजार २१५ शेततळे खोदले जाणार असून यातील सर्वाधिक तीन हजार ४४३ शेततळे एकट्या शेतकरी आत्महत्याग्रस्त यवतमाळ जिल्ह्यात देण्यात आले आहे. प्रत्येक शेततळ्यासाठी शासन ५० हजार रुपये देणार असून मशीनने हे शेततळे खोदले जाणार आहे. सात प्रकारच्या आकारमानाचे शेततळे यात आहेत. सर्वात मोठे ३० बाय ३० आणि तीन मीटर खोल आकाराचे शेततळे असून सर्वात लहान १५ बाय १५ व तीन मीटर खोलीचे शेततळे आहे. शेतकऱ्याला शेततळे मंजूर झाल्यानंतर त्याला स्वत: आधी पैसा गुंतवून हे शेततळे तयार करायचे आहेत. त्यानंतर त्याच्या खात्यात आकारमानानुसार अनुदान जमा केले जाणार आहे. परंतु ५० हजारात शेततळे होणार कसे असा शेतकऱ्यांचा सवाल आहे. आघाडी सरकारचीच योजनाहीच शेततळ्यांची योजना काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी सरकारमध्ये राबविली गेली होती. महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजना, फलोत्पादन अभियान अंतर्गत राबविल्या गेलेल्या या योजनेत सव्वा लाख रुपये अनुदान दिले जायचे. परंतु भाजपा-शिवसेना युती सरकारने हीच योजना नाव बदलवून आणली असून त्याचा खर्च मात्र अर्ध्यावर आणला आहे.आधी खर्च, नंतर देयक मिळणारविदर्भातील शेतकरी आधीच दुष्काळाचा सामना करतो आहे. ५० पैशापेक्षा कमी आणेवारी येऊनही त्याला दुष्काळी मदत अद्याप मिळाली नाही. आर्थिक संकटात असलेला शेतकरी शेततळ्यासाठी ५० हजार आणणार कोठून ही मुख्य अडचण आहे. त्याने व्याजाने पैसे आणल्यास पैसे नेमके किती दिवसात खात्यात जमा होणार याची हमी नाही. शेततळ्यामध्ये जागा जात असल्याने शेतकऱ्यांची आधीच त्यासाठी मानसिकता नाही. शेतकऱ्यांचा कल विहिरींकडेविदर्भात अनेक ठिकाणी तीन फुटाखाली मुरुम असल्याने मोठ्या आकाराचे शेततळे खोदायचे असेल तर २ बाय १० चा पोकलॅन्ड लागतो. जेसीबीने तो खोदला जाऊ शकत नाही. शेतकऱ्यांच्या दृष्टीने ही योजना कुचकामी ठरत आहे. ते पाहता पाचशेही तळे होणार की नाही याबाबत साशंकता व्यक्त केली जात आहे. त्याऐवजी शेतकऱ्यांचा ४५ हजार मशीनने विहीर खोदण्याकडे अधिक कल असल्याचे सांगितले जाते. (जिल्हा प्रतिनिधी) सामूहिक शेततळ्यातही जाचक अटी शासनाने पश्चिम महाराष्ट्रात सामूहिक शेततळे योजना राबविली. मात्र त्यात परिसरातील २५ हेक्टर क्षेत्रात फळबाग व भाजीपाला लागवड ही अट आहे. विदर्भात असे क्षेत्र मिळणे कठीण आहे. ही अट शिथील केल्यास शेतकऱ्यांचा प्रतिसाद मिळू शकतो.