शहरं
Join us  
Trending Stories
1
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
2
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
3
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
4
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
5
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
6
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
7
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
8
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
9
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
10
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
11
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
12
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
13
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
14
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट
15
कुठे गेला 'श्वास'मधला चिमुकला 'परश्या'? २९ वर्षीय तरुणाने आता धरली वेगळीच वाट
16
IND vs ENG: गिल-राहुलची फलंदाजी अन् स्टोक्सची तंदुरूस्ती... 'या' ५ गोष्टी ठरवतील चौथ्या कसोटीचा निकाल
17
चातुर्मासातील पहिली श्रावण विनायक चतुर्थी: गणपती होईल प्रसन्न, कसे कराल व्रतपूजन? शुभच घडेल
18
पहिला श्रावणी सोमवार: ‘असे’ करा शिवपूजन, कोणती शिवामूठ वाहावी? पाहा, महत्त्व अन् मान्यता
19
Corona Virus : संकटं संपता संपेना! कोरोना महामारीचा मेंदूवर भयंकर परिणाम, संसर्ग झाला नसला तरी...
20
प्राडाच्या वादानंतर कोल्हापुरी चप्पलांना QR कोड! संघटनेने का घेतला असा निर्णय? जाणून घ्या कोल्हापुरीचा इतिहास!

जगाच्या इतिहासात बाबासाहेबांनी भारतात केलेली क्रांती अभूतपूर्व

By admin | Updated: April 9, 2017 00:51 IST

जगात विविध देशात क्रांती घडून आली. परंतु भारतातील क्रांती इतर देशाच्या तुलनेने अशक्य अशी असताना बाबासाहेबांनी ती निशस्त्र लढवून

अशोक गोडघाटे : पुसद येथे धम्मक्रांती प्रज्ञापर्वाला प्रारंभ पुसद : जगात विविध देशात क्रांती घडून आली. परंतु भारतातील क्रांती इतर देशाच्या तुलनेने अशक्य अशी असताना बाबासाहेबांनी ती निशस्त्र लढवून ती घडवून आणली. तसेच संविधानाच्या माध्यमातून सर्व राष्ट्राला समतेच्या तत्वात बांधून ठेवण्याच्या त्यांच्या कर्तृत्वाची परिचीती भारतासह जगाला झाली, असे प्रतिपादन प्रख्यात आंबेडकरी विचारवंत प्रा. अशोक गोडघाटे यांनी येथे केले. महात्मा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीच्यावतीने आयोजित धम्मक्रांती प्रज्ञापर्वात पहिले पुष्प गुंफताना ते ‘भारतीय संविधान निर्मिती : स्वरूप आणि अपेक्षित गणराज्य’ या विषयावर बोलत होते. शुक्रवारी धम्मक्रांती प्रज्ञापर्वाला प्रारंभ झाला. उद्घाटन माजी मंत्री आमदार मनोहरराव नाईक यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी अ‍ॅड़ आप्पाराव मैंद होते. प्रमुख पाहुणे म्हणून महेश खडसे, जयवंतराव पाटील कामारकर, राजेश आसेगावकर, अर्जुनराव लोखंडे, फकीरराव वाढवे, गणेश पागीरे आदी उपस्थित होते. सर्व प्रथम सुजाता महिला मंडळाकडून सामुहिक बुद्धवंदना घेण्यात आली. दि बुद्धिस्ट इंटरनॅशनल स्कूलच्या चिमुकल्यांनी ‘प्रथम नमो गौतमा’ या गीतावर नृत्य सादर केले. प्रा. गोडघाटे म्हणाले, जगात अनेक क्रांत्या झाल्या. फ्रान्सच्या राज्यक्रांतीतून स्वातंत्र्य, समता व बंधूता या मूल्यांचा उदय झाला. बाबासाहेबांनी या मूल्यांचा समावेश संविधानात केला. परंतु तो फ्रान्सच्या राज्यक्रांतीतून न घेता तथागत गौतम बुद्धांच्या तत्वातून घेतल्याचे त्यांनी सांगितले. गुलामाला गुलामीची जाणीव करून द्या, म्हणजे तो सर्वप्रथम त्याविरुद्ध बंड करून उठेल ही जाणीव बाबासाहेबांनी सर्वप्रथम करून दिली. लोकांच्या जीवनात रक्ताचा एक थेंबही सांडू न देता आर्थिक, सामाजिक क्रांती बाबासाहेबांनी आपल्या कर्तृत्वाने करून दाखविली. म्हणून जगाच्या इतिहासात बाबासाहेबांनी भारतात केलेली क्रांती अभूतपूर्व होय, असे विचार त्यांनी व्यक्त केले. प्रास्ताविक मिलींद हट्टेकर यांनी, संचालन प्रा. विलास भवरे यांनी तर आभार सुभाष गायकवाड यांनी मानले. (प्रतिनिधी)