शहरं
Join us  
Trending Stories
1
'काळजी करू नका; तुम्हाला जे हवे, तेच होणार', पहलगामबाबत राजनाथ सिंह यांचे सूचक विधान
2
कुख्यात नक्षलवाद्याला दहशतवाद विरोधी पथकाने केली अटक, ६-७ वर्षांपासून होता फरार
3
PBKS vs LSG : बॅटिंग-बॉलिंगमध्ये 'सिंग इज किंग शो'; पंतच्या लखनौसमोर श्रेयस अय्यरच्या पंजाबचा 'भांगडा'
4
"...त्यासाठी सुंदर महिलांना अमेरिकेत पाठवा’’, ज्येष्ठ पत्रकाराचा पाकिस्तानला अजब सल्ला, आता होतेय टीका   
5
सीमेवर तणाव, त्यात पाकिस्तानच्या या मित्रदेशाने थेट कराचीला पाठवली युद्धनौका, कारण काय?
6
विमानतळावर उतरताना भिंतीवर आदळले विमान, वैमानिकाने उडी मारून वाचवले प्राण
7
नागपुरात शिंदेसेनेच्या पदाधिकाऱ्याविरोधात विनयभंग, फसवणुकीचा गुन्हा दाखल
8
पाच लग्नं केली, सहाव्याच्या तयारीत होता, पण पीडित पत्नीने घेतली पोलिसांत धाव, पोलिसाचाच कारनामा झाला उघड
9
सेंच्युरी हुकली; फिफ्टी प्लस धावसंख्येसह प्रभसिमरन याने साधला मोठा डाव; गेलच्या विक्रमाशी बरोबरी
10
मोदी पहलगाममधील दहशतवाद्यांना धडा कधी शिकवणार? काँग्रेस नेत्याचा सवाल, राफेलला म्हटलं खेळणं  
11
अजिंक्य रहाणेनं घेतलेला कॅच भारीच! याशिवाय या दोन गोष्टींची रंगली चर्चा (VIDEO)
12
चार पैकी दोन दहशतवादी काश्मिरी, पर्यटकांशी मैत्री केली आणि..., पहलगाम हल्ल्याबाबत सर्वात मोठा गौप्यस्फोट  
13
KKR vs RR : "हम तो डूबे हैं सनम तुम को भी ले डूबेंगे..." गाणं वाजलंच होतं, पण कॅसेट गुंडाळलं अन्...
14
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी चालवली रिक्षा
15
IPL 2025 : रियान परागचा मोठा पराक्रम; ६ चेंडूत सलग ६ षटकार मारत सेट केला नवा रेकॉर्ड
16
IND W vs SL W: श्रीलंकेच्या नीलाक्षी दा सिल्वाचं वादळी अर्धशतक; भारताचा तीन विकेट्सने पराभव
17
तेल अवीव विमानतळाजवळ क्षेपणास्त्र हल्ला; दिल्लीहून इस्रायलला जाणारे एअर इंडियाचे विमान वळवले
18
१५ दिवसांपूर्वीच दुकान सुरु केले अन् हल्ल्याच्याच दिवशी गायब झाला; पहलगाममध्ये NIA कडून एकाची चौकशी
19
'आम्हाला मित्रांची गरज आहे, उपदेश देणाऱ्यांची नाही', जयशंकर यांनी युरोपला खडसावले...
20
HSC Result 2025: १२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या

जगाच्या इतिहासात बाबासाहेबांनी भारतात केलेली क्रांती अभूतपूर्व

By admin | Updated: April 9, 2017 00:51 IST

जगात विविध देशात क्रांती घडून आली. परंतु भारतातील क्रांती इतर देशाच्या तुलनेने अशक्य अशी असताना बाबासाहेबांनी ती निशस्त्र लढवून

अशोक गोडघाटे : पुसद येथे धम्मक्रांती प्रज्ञापर्वाला प्रारंभ पुसद : जगात विविध देशात क्रांती घडून आली. परंतु भारतातील क्रांती इतर देशाच्या तुलनेने अशक्य अशी असताना बाबासाहेबांनी ती निशस्त्र लढवून ती घडवून आणली. तसेच संविधानाच्या माध्यमातून सर्व राष्ट्राला समतेच्या तत्वात बांधून ठेवण्याच्या त्यांच्या कर्तृत्वाची परिचीती भारतासह जगाला झाली, असे प्रतिपादन प्रख्यात आंबेडकरी विचारवंत प्रा. अशोक गोडघाटे यांनी येथे केले. महात्मा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीच्यावतीने आयोजित धम्मक्रांती प्रज्ञापर्वात पहिले पुष्प गुंफताना ते ‘भारतीय संविधान निर्मिती : स्वरूप आणि अपेक्षित गणराज्य’ या विषयावर बोलत होते. शुक्रवारी धम्मक्रांती प्रज्ञापर्वाला प्रारंभ झाला. उद्घाटन माजी मंत्री आमदार मनोहरराव नाईक यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी अ‍ॅड़ आप्पाराव मैंद होते. प्रमुख पाहुणे म्हणून महेश खडसे, जयवंतराव पाटील कामारकर, राजेश आसेगावकर, अर्जुनराव लोखंडे, फकीरराव वाढवे, गणेश पागीरे आदी उपस्थित होते. सर्व प्रथम सुजाता महिला मंडळाकडून सामुहिक बुद्धवंदना घेण्यात आली. दि बुद्धिस्ट इंटरनॅशनल स्कूलच्या चिमुकल्यांनी ‘प्रथम नमो गौतमा’ या गीतावर नृत्य सादर केले. प्रा. गोडघाटे म्हणाले, जगात अनेक क्रांत्या झाल्या. फ्रान्सच्या राज्यक्रांतीतून स्वातंत्र्य, समता व बंधूता या मूल्यांचा उदय झाला. बाबासाहेबांनी या मूल्यांचा समावेश संविधानात केला. परंतु तो फ्रान्सच्या राज्यक्रांतीतून न घेता तथागत गौतम बुद्धांच्या तत्वातून घेतल्याचे त्यांनी सांगितले. गुलामाला गुलामीची जाणीव करून द्या, म्हणजे तो सर्वप्रथम त्याविरुद्ध बंड करून उठेल ही जाणीव बाबासाहेबांनी सर्वप्रथम करून दिली. लोकांच्या जीवनात रक्ताचा एक थेंबही सांडू न देता आर्थिक, सामाजिक क्रांती बाबासाहेबांनी आपल्या कर्तृत्वाने करून दाखविली. म्हणून जगाच्या इतिहासात बाबासाहेबांनी भारतात केलेली क्रांती अभूतपूर्व होय, असे विचार त्यांनी व्यक्त केले. प्रास्ताविक मिलींद हट्टेकर यांनी, संचालन प्रा. विलास भवरे यांनी तर आभार सुभाष गायकवाड यांनी मानले. (प्रतिनिधी)