शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
3
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
4
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
5
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
6
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
7
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
8
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
9
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
10
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
11
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
12
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
13
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
14
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
15
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
16
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
17
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
18
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
19
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
Daily Top 2Weekly Top 5

जगाच्या इतिहासात बाबासाहेबांनी भारतात केलेली क्रांती अभूतपूर्व

By admin | Updated: April 9, 2017 00:51 IST

जगात विविध देशात क्रांती घडून आली. परंतु भारतातील क्रांती इतर देशाच्या तुलनेने अशक्य अशी असताना बाबासाहेबांनी ती निशस्त्र लढवून

अशोक गोडघाटे : पुसद येथे धम्मक्रांती प्रज्ञापर्वाला प्रारंभ पुसद : जगात विविध देशात क्रांती घडून आली. परंतु भारतातील क्रांती इतर देशाच्या तुलनेने अशक्य अशी असताना बाबासाहेबांनी ती निशस्त्र लढवून ती घडवून आणली. तसेच संविधानाच्या माध्यमातून सर्व राष्ट्राला समतेच्या तत्वात बांधून ठेवण्याच्या त्यांच्या कर्तृत्वाची परिचीती भारतासह जगाला झाली, असे प्रतिपादन प्रख्यात आंबेडकरी विचारवंत प्रा. अशोक गोडघाटे यांनी येथे केले. महात्मा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीच्यावतीने आयोजित धम्मक्रांती प्रज्ञापर्वात पहिले पुष्प गुंफताना ते ‘भारतीय संविधान निर्मिती : स्वरूप आणि अपेक्षित गणराज्य’ या विषयावर बोलत होते. शुक्रवारी धम्मक्रांती प्रज्ञापर्वाला प्रारंभ झाला. उद्घाटन माजी मंत्री आमदार मनोहरराव नाईक यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी अ‍ॅड़ आप्पाराव मैंद होते. प्रमुख पाहुणे म्हणून महेश खडसे, जयवंतराव पाटील कामारकर, राजेश आसेगावकर, अर्जुनराव लोखंडे, फकीरराव वाढवे, गणेश पागीरे आदी उपस्थित होते. सर्व प्रथम सुजाता महिला मंडळाकडून सामुहिक बुद्धवंदना घेण्यात आली. दि बुद्धिस्ट इंटरनॅशनल स्कूलच्या चिमुकल्यांनी ‘प्रथम नमो गौतमा’ या गीतावर नृत्य सादर केले. प्रा. गोडघाटे म्हणाले, जगात अनेक क्रांत्या झाल्या. फ्रान्सच्या राज्यक्रांतीतून स्वातंत्र्य, समता व बंधूता या मूल्यांचा उदय झाला. बाबासाहेबांनी या मूल्यांचा समावेश संविधानात केला. परंतु तो फ्रान्सच्या राज्यक्रांतीतून न घेता तथागत गौतम बुद्धांच्या तत्वातून घेतल्याचे त्यांनी सांगितले. गुलामाला गुलामीची जाणीव करून द्या, म्हणजे तो सर्वप्रथम त्याविरुद्ध बंड करून उठेल ही जाणीव बाबासाहेबांनी सर्वप्रथम करून दिली. लोकांच्या जीवनात रक्ताचा एक थेंबही सांडू न देता आर्थिक, सामाजिक क्रांती बाबासाहेबांनी आपल्या कर्तृत्वाने करून दाखविली. म्हणून जगाच्या इतिहासात बाबासाहेबांनी भारतात केलेली क्रांती अभूतपूर्व होय, असे विचार त्यांनी व्यक्त केले. प्रास्ताविक मिलींद हट्टेकर यांनी, संचालन प्रा. विलास भवरे यांनी तर आभार सुभाष गायकवाड यांनी मानले. (प्रतिनिधी)